Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गोंदिया. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑक्टोबर ०१, २०२३

हरीषभाऊ बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट. आर्थिक मदत करून दिली मानवतेचा संदेश.

हरीषभाऊ बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट. आर्थिक मदत करून दिली मानवतेचा संदेश.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१ ऑक्टोबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी येथील शेतकरी रमेश कोल्हे वय वर्ष ५७ या शेतकऱ्याने गाव शिवारात झाडाला गळफास लागून आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर घरचा कर्ता पुरूष गेल्याने उपासमारीची पाळी आली या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरीषभाऊ बन्सोड यांनी आर्थिक मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे यांच्या सोबत यावेळी कनेरी येथील सरपंच ज्योती प्रकाश पाउलझगडे, उपसरपंच विशाल वाघाये,भरत मेंढे, विणू भेंडारकर, दिनेश मोहतुरे,सुधीर शिवणकर आदी गावकरी उपस्थित होते या वेळी हरीषभाऊ बंसोड यांनी शासनाच्या मदत मिळवून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले....

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.

रेती तस्करांमुळे सौंदड येथील बायपास मार्गाची दुर्दशा.



संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील बायपास रस्ता महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. सौंदड पिपरी ५ किमी. रस्ता सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत तयार करण्यात आला. आजघडीला या मार्गाने अवैध मुरुमाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. अवैध मुरुम,रेतीचे ओव्हरलोड ट्रक,ट्रॅक्टर रात्रंदिवस रेतीची वाहतूक करीत असतात.. तस्करांनी अक्षरश: या मार्गाची वाट लावली आहे.सद्यस्थितीत या रस्त्यावर १-१,२-२ मीटरचे खड्डे पडले आहेत.त्याकारणाने अनेकदा दुर्घटना होत असतात.मात्र याकडे संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांनी ढुकूंनही पाहिले नाही.वास्तविक रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे ५ वर्षापर्यंत कंत्राटदाराकडे असते.तेसुद्धा केले गेले नाही.या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रेती तस्करांनी रस्त्यावर मुरुम टाकून भर पावसाळ्यात माती भरलेल्या खड्ड्यामध्ये पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.याकारणाने गांधी वार्डातील नागरिकांचे घरासमोर चिखल व पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्यावर परिणाम पडत असून डेंगू,मलेरिया पसरविणा-या रोगांना कारणीभूत ठरत असल्याची नागरिक बोलत आहेत.
चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

चिचटोला-धानोरी रस्त्याचे काम कासवगतीने.

                         


संजीव बडोले.
नवेगावबांध दि.२सप्टेंबर:-
सडक अर्जुनीतालुक्याच्या टोकावर व व्याघ्र प्रकल्पाचे सिमेवरील लेंडेझरी ते चिचटोला या ५.५ किमी. जिल्हा मार्ग दुरुस्तीचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर काम म.रा. ग्रामविकास मंत्रालयाचे सौजन्याने होत आहे.या कामासाठी ३२९ लक्ष रुपये  निधीचे कामाचे कंत्राट गोंदिया येथील कंत्राटदार सरफराज अमीन गोडील यांना असून सदर काम ८  नोव्हेंबर २०२१ ते ७नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे होते.पण आज सन २०२३ संपण्याचे मार्गावर असून काम पूर्णत्वास आले नाही.मुख्य कंत्राटदाराने सदर काम पेटी कंत्राटवर बाम्पेवाडा येथील कंत्राटदाराला दिले आहे.पेटी कंत्राटदाराने प्रथम खडीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेच डांबरीकरण करणे अपेक्षित होते.मात्र लेंडेझरी ते धानोरी ३ किमी.पर्यंत खडीकरण करून ठेवले आहे.लेंडेझरी ते धानोरी दरम्यान डांबरीकरणाचे काम आजही रखडले आहे.पेटी कंत्राटदाराने ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम केल्याने डांबरीकरण उखळत आहे.सदर डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून काम व्यवस्थित होत नसल्याने काम नागरिकांनी थांबविले आहे.वास्तविक डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे होते.तसेच धानोरी ते चिचटोला २.५ किमी.खडीकरणाचे काम आजही रखडले आहे.रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे ठेवल्याने शेतक-यांना व नागरिकांना ये-जा करतांनी त्रास  सहन करावा लागत आहे.सदर रस्ता शेतामधून पूर्वीचाच असल्याने या रस्त्याचे चौवळीकरण न करता कंत्राटदार माती मुरुम जास्त लागत असल्याने पूर्वीच्याच असलेल्या रस्त्यावर रस्ता बनवित आहे.रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कालावधी संपून एक वर्ष झाला तरी रस्त्याचे बांधकाम अपूरे आहे.                   ‌                                           ‌ ================    ‌ **कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करा**::--रस्त्याचे काम करण्याची कालावधी लोटून एक वर्ष झाले आहे.या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम एक वर्षापासून रखडले आहे.याकडे संबंधित बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाही.संबंधित कंत्राटदाराला बांधकाम विभागाने नोटीस बजावून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे.तसेच कामात दिरंगाई केल्याने कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.                      ‌                                           ‌   **अनिता बांबोळे माजी सरपंच चिचटोला**                ‌                                             ‌ =================  ‌                                       ‌‌ ‌ ================= ‌                                       ‌ ‌ **चिचटोला-धानोरी हा मार्ग शेतशिवारात जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे.या मार्गाची स्थिती दयनीय झाली असून दोन्ही कडेला मुरुमाचे ढिगारे ठेवले असल्याने ये-जा करणारे शेतक-यांना व नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.या मार्गाने मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागते.या मार्गाचे काम कंत्राटदाराने त्वरीत पूर्ण करावे.अन्यथा कंत्राटदाराविरोधात तक्रार करावी लागेल**                  ‌                                          ‌    **सदाशिव कापगते माजी उपसरपंच चिचटोला**                       ‌                                       ‌‌ ‌ ================

शुक्रवार, जून ३०, २०२३

आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.

आजपासून शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व नवागतांचे जंगी स्वागत.






शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिष्ठांन्नाची मेजवानी.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० जून.
गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन नवागत विद्यार्थ्यांचे शाळांमधून मुख्याध्यापक व शिक्षकांकडून आनंददायी स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण शाळेच्या आजच्या दिवशी पाहायला मिळाले.
आज ३० जूनला शाळेच्या नवीन शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झाली असून,मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी शाळांमधून उपस्थिती दर्शवली आहे. शाळेमध्ये झालेल्या जंगी स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
शाळा प्रवेशोत्सव व कुणीही विद्यार्थी गैरहजर राहू नये,यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती घडविण्यासाठी अनेक शाळांमधून गावातून शोभायात्रा काढण्यात आल्यात.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या,शाळा सजवण्यात आल्या.आनंददायी स्वागतानंतर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, त्या-त्या इत्तेनुसार पुस्तके वाटप करण्यात आले.तसेच शालेय पोषण आहारात मिष्ठांन्न वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहातसाजरा करण्यात आला. मुख्याध्यापक शिक्षकांबरोबरच,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहत होता.शिक्षण विभागाचे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव त्यांचे जंगी स्वागत करून करण्यात आल्यामुळे, पालकांमध्येही उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे नवागत विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थित विद्यार्थ्यांचेही गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे व शिक्षकांनी जंगी स्वागत केले. विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख एस.व्ही. बडोले,जे.एस.हटवार,के.एम.भैसारे, एम यु घरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एच एस पात्रीकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.एम.साखरे, बी.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावरटोला येथे प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच
युवराज तरोणे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पद्माताई सुखदेवे, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सरीताताई मेश्राम, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, म. गांधी तंटामुक्त समिती सदस्य आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. मुख्याध्यापकआर.के.कापगते यांनी प्रास्ताविक मांडून अतिथींचे स्वागत केले. शिक्षक एच.बी.बहेकार,ए.के.वासनिक,डी.एम. कोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक मंडळीी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोट-
आज शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या मुलांचे शाळेत पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.त्यांना गणवेश व नवीन कोऱ्या पुस्तका मिळाल्या याचा आनंद आहे.आजचा पहिलाच दिवस आनंददायी ठरल्यामुळे,विद्यार्थ्यांमध्ये रोजच नियमित शाळेत जाण्याचा उत्साह कायम राहील.
-कुंजीलाल कुंभारे,
पालक,सावरटोला.

आज शाळेचा पहिला दिवस विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात विद्यार्थ्यांचे आम्ही जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तका दिल्यात. तसेच शालेय पोषण आहारात
मिष्ठांन्नही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
-एस.एस.टेंभुर्णे, मुख्याध्यापक
सम्राट अशोक विद्यालय,उमरी.

शाळेतील सर्व मुले व पालकांना शाळा सुरू झाली आहे याची माहिती व्हावी, शाळेच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के उपस्थिती राहावी, पहिलीच्या मुलांना शाळेत येताना ताण येऊ नये,यासाठी पालकांना खेळीमेळीच्या वातावरणात शाळेत आणण्यासाठी सदर रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये शाळेत येण्याविषयी घोषणा, नारे, देशभक्ती गीत गायन करण्यात आले.
- राजकुमार कापगते
मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा सावरटोला.

शुक्रवार, जून ०२, २०२३

कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकची धान वाहून नेणाऱ्या ट्रकला जबर धडक. ट्रक मधे खचाखच भरली होती गाय,बैल.

कत्तलखान्यात जाणाऱ्या ट्रकची धान वाहून नेणाऱ्या ट्रकला जबर धडक. ट्रक मधे खचाखच भरली होती गाय,बैल.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२ जून:-
आज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडलीआज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडली छत्तीसगड मधून चिचगड नवेगावबांध सानगडी मार्गे नागपूर ला जनावरे भरून भरधाव वेगात (ट्रक क्रमांक  MP 04 GB 4456 ) नेण्यात येत होती .त्याच वेळेस अर्जुनी-मोर - नवेगावबांध -कोहमारा या हायवेवर अर्जुनी-मोर कडून कोहमारा मार्गे आमगाव ला धान घेवून जाणारे ट्रक क्रमांक MH 33T 2522  या ट्रक ला छत्तीसगड कडून जनावरांचा भरधाव ट्रक ने धडक दिली.
आज (शुक्रवार दि.२)पहाटे पाच वाजता   नवेगावबांध टी पाॅईन्ट, शिवाजी चौकात सदर घटना घडली.
धडक एवढी जोरदार होती की, यामधे धान भरलेला ट्रक ने पलटी खाल्ली यात सुदैवाने कोणालाही गंभीर जखम किंवा जिवीत हानी झाली नाही.जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.घटनास्थळावरून या ट्रक चालक अशफ़ाक शेख व कनड्रायव्हर इरफान रैफ या दोघाना ताब्यात घेवून त्यांवर गुन्हा नोंदवून उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे दाखल करण्यात आले आहे .या घटनेचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२३ अन्वये प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत  भा.द.वी.२७९ ,४२७ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पहाटेची वेळ असल्याने या चौकात सकाळी सकाळीच फिरायला जाणारांची गर्दी होती.
माहीती मिळताच घटनास्थळावर लगेचच नवेगावबांध चे ठाणेदार संजय पांढरे आपल्या शिपायासह पोहोचून परिस्थिती चा आढावा घेवून जनावरे भरलेला ट्रक पोलीस स्टेशनला लावून गुन्हा दाखल केला आहे. ट्रक मधिल सर्व जणावरे  मीनी ट्रक च्या सहाय्याने शासन मान्य ज्ञान फांऊडेशन साकोली च्या गो शाळेत पाठविण्यात आली आहेत .
घटनेची माहीती मिळताच शिवसेना ठाकरे गट चे गोंदिया जिल्हाध्यक्ष शैलेश जयस्वाल, नवेगावबांध चे शाखाप्रमुख मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन ला पोहोचून घटनेची माहीती घेवून कतली साठी जाणारी जणांवर सुपरूत नाम्यावर रजिस्टर संस्थे कडे सोपविण्यात यावे,ही मागणी केली परंतु ठाणेदार संजय पांढरे यांनी गुन्हा नोंद करून नियमानुसार सदर जनावरे गोशाळेत पाठविली.
 या पुर्वी जणांवर अवैध वाहतूक करनाऱ्यांवर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्तीसगड कडून देवरी-चिचगड-धाबेपवनी नवेगावबांध हा मार्ग नक्षलप्रभावीत क्षेत्र असल्याने या मार्गावर सदर जणांवर तस्करी करणारे ट्रक हे रात्री बेरात्री सुसाट वाहतूक करतात .अशा सुसाट वाहतुकीवर नवेगावबांध पोलीस ठाण्याचे स.पो.नी.संजय पांढरे याचे कडून कडक कारवाई ची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
नवेगावबांध येथिल टी पाॅईन्ट चौकात मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावर दूकाणे थाटली असून,आठवडी बाजार पण भरविण्यात येत आहे. जड वाहतूक या मार्गावर होत असते.सुसाट वेगात जाणारी वाहने अशावेळेस वेळी अशाचप्रकारे मोठी दुर्घटना झाली तर मोठ्याप्रमाणात जिवीत व वीत्त हानी होण्यास वेळ लागणार नाही. या  मुळे नाहक लोकांचे बळी जातील,या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून बघ्याचीच भुमीका पार पाडत आहे.

गुरुवार, मे २५, २०२३

बीएडी विद्यालयाच्या युगेश्वरी लंजे, मंजुषा नेवारे प्रथम,मुलींनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९४.२९ % निकाल.

बीएडी विद्यालयाच्या युगेश्वरी लंजे, मंजुषा नेवारे प्रथम,मुलींनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९४.२९ % निकाल.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ मे:-
येथील भागेरथीबाई आत्माराम डोंगरवार विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा ,आज जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत(इयत्ता१२ वी) परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.तर कला शाखेचा निकाल ९४.२९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून युगेश्वरी मिनेश शेंडे हिने ४९७ (८२.८३ टक्के) गुण प्राप्त करून , महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे,जयेश मारोती कापगते  याने ४२७  (७१.१७ टक्के) तर दर्शना प्रदीप टेंभुर्णे हिने ४२७  (७१.१७ टक्के) गुण प्राप्त करुन द्वितीय स्थान मिळवले आहे.तर सलोनी तुलाराम ठवकर हिने ४२३  (७०.५० टक्के) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तर कला शाखेतून  मंजुषा गोरेलाल नेवारे हिने४६२ (७७ .०० टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.मीनाक्षी जनार्दन कापगते हिने४३२ (७२.०० टक्के) गुण प्राप्त करुन द्वितीय, तर दिव्या रामलाल करपते ४३० (७१.६७ टक्के) गुण प्राप्त करून तृतीय,तर भाग्यश्री विनायक आदमने व महिमा ताराचंद वलथरे यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान शाखेतून ६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.पैकी प्रथम श्रेणीत१८,द्वितीय श्रेणीत ४४,तृतीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेतून ७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम श्रेणीत १८,द्वितीय श्रेणीत ३६,तृतीय श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर ४ विद्यार्थी  अनुत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य आर.टी. काशिवार,प्रा.एन.व्ही. कापगते, प्रा.अश्विन लांजेवार यांच्यासह, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
संग्रामे विद्यालयातून उत्पन्न,दिपाली यांनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९२.००% निकाल.

संग्रामे विद्यालयातून उत्पन्न,दिपाली यांनी मारली बाजी. विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा ९२.००% निकाल.





संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ मे:-
येथील यु.एम.संग्रामे कनिष्ठ महाविद्यालयाचा,आज जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत(इयत्ता१२ वी) परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला.तर कला शाखेचा निकाल ९२.०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ८६.३३ टक्के गुण प्राप्त करून उत्पन्न हरिराम येळणे याने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, अनिकेत विलास बोळणे याने ८२.८३ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय स्थान,तर समीर रमेश गजबे याने ७८.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
तर कला शाखेतून दीपाली नरेश सुर्यवंशी हिने ७४.०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.सेवकराम प्रेमदास मोटघरे याने ६५.६७ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय, तर करिष्मा प्रकाश झोडे हिने ६५.३३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विज्ञान शाखेतून ६५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.पैकी प्रथम श्रेणीत ३२,द्वितीय श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेतून ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.प्रथम श्रेणीत १०,द्वितीय श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य दत्ता संग्रामे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
नवेगावबांध पोलीस ठाणे येथे भरती प्रक्रिया व सत्कार समारंभ संपन्न.  गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आयोजन.

नवेगावबांध पोलीस ठाणे येथे भरती प्रक्रिया व सत्कार समारंभ संपन्न. गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आयोजन.










संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ मे:-
गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या
दादा रोला खिडकी योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व गार्डियन सिक्युरिटी अँड फॅसिलिटी हैदराबाद तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २५ मे रोज गुरुवार ला पोलीस ठाणे नवेगावबांध येथे नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळावा, याकरिता १० वी, १२ वी पास-नापास युवकांसाठी सुरक्षा रक्षक,सुरक्षा सुपरवायझर (सिक्युरिटी गार्ड) या पदासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ६० युवक सहभागी झाले होते.त्यापैकी १४ युवकांची निवड करून,त्यांना नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. निवड झालेल्या युवकांना  रिक्रुटमेंट ऑफिसर गार्डियन ट्रेनिंग अकादमी हैदराबाद तेलंगणा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पोलीस ठाणे नवेगावबांध तसेच सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी येथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी हे विविध सरकारी सेवेत नियुक्त झालेले आहेत.सशस्त्र दुरक्षेत्र पवनीधाबे अंतर्गत नितेश नीलकंठ अमले, दुर्गा संजय रहिले, राजश्री श्रीराम गावड, पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत रोशनी दीनदयाल बडोले यांचा आत्मविश्वास वाढावा व इतर युवकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांचा शाल व श्रीफळ देऊन, यावेळी सत्कार  करण्यात आला.
सदर मेळाव्यात उपस्थित युवकांना नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पोलीस उपनिरीक्षक नागरे,शेख,सिक्युरिटी ऑफिसर कटरे यांनी स्पर्धा परीक्षा,स्किल डेव्हलपमेंट आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
भरती प्रक्रिया व सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सहाय्यक फौजदार तुलावी, पोलीस हवालदार मारवाडे, पोलीस शिपाई वाघाये,रुद्रावाड यांनी सहकार्य केले.

गुरुवार, एप्रिल २७, २०२३

हत्तीच्या कळपाने करूझरी येथे केले धान पिकांचे नुकसान

हत्तीच्या कळपाने करूझरी येथे केले धान पिकांचे नुकसान

अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीचे पुनरागमन
राष्ट्रीय उद्यानातील मलकाझरी येथे सध्या वास्तव्य.








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२७ एप्रिल.
मौजा करुझरी येथील अनिल आचले व इतर सात शेतकऱ्यांच्या शेतात हत्तीच्या कळपाने आज दि.२७ एप्रिल रोज गुरुवारला सकाळी ६.०० वाजे दरम्यान शेतपिकाची नुकसान केली असून, त्यांच्या अस्तीत्वाचे निशान दिसुन आले आहे. याची वनविभागाने पुष्टी केली असून सदर नुकसानीचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकांचे नुकसान करून, हा हत्तींचा कळप त्यानंतर मलकाझरी कॅम्प मार्गे परत नवेगाव राष्ट्रीय उद्यानात परत गेल्याचे पुरावे दिसुन आले आहे. आज दुपारचे लोकेशन नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे मलकाझरी बीटातील कंपार्टमेंट नंबर ७१२ मध्ये आढळून आले आहे. सदर घटनेची पुष्टी करून, कळपामध्ये अंदाजे १४ ते १५ हत्ती असण्याची शक्यता आहे. असा अंदाज नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे गेल्या वर्षी या रानटी हत्तीच्या कळपाने धान पिकाचे फार मोठे नुकसान केले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावून गेले आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवून असून परिसरात शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी २८ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात पुनरागमन केले आहे. बुधवार, २६ एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पळसगाव ते सर्रेगाव परिसरात सायंकाळी एका गुराख्याला हत्तींचा कळप दिसला आहे. पडताळणी केली असता जिल्ह्यातील सीमेवर कळपाचे लोकेशन दिसून आले. हत्तींचा कळप नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. वनविभागाने या मार्गावरील भसबोडन गावात अलर्ट जारी केला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला होता. नवेगावबांध वन परिक्षेत्रांतर्गत कवठा जंगल परिसरात रानटी हत्तींनी बस्तान मांडले होते.बोळदे, कावठा,डोंगरगाव, इंजोरी,अरततोंडी,बोरटोला, सिरेगाव बांध या गावात हत्तीच्या कळपाने अक्षरशः धान व उसाचे पिकांचा चुराडा करून नुकसान केले होते.नंतर या मार्गे हा हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. याच कालावधीत ३ ऑक्टोबर २०२२ ला हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तिडका येथील एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. जवळपास १५ दिवस या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर, १२ ऑक्टोंबर च्या रात्री नागनडोह येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस केली होती. त्यामुळे गावातील भयभीत आदिवासी जीव मुठीत घेऊन,गाव सोडून पळाले होते. हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. भंडारा जिल्ह्याचा प्रवास करून पुन्हा छत्तीसगड मध्यप्रदेश च्या सीमेवरून त्यानंतर रानटी हत्ती दूर निघून गेले होते.२१ एप्रिल रोजी या हत्तींचे लोकेशन गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा वनपरिक्षेत्र, रामगड बीटमध्ये दिसून आले होते. बुधवारी सायंकाळी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याची सीमा ओलांडली असून, सध्या हे हत्ती जिल्ह्यातील पळसगाव व सर्रेगाव शिवारात असल्याची माहिती आहे. सावधगिरी म्हणून वनविभागाने नवेगाव बांध उद्यान आणि भसबोडन गावात अलर्ट जारी केला आहे. रानटी हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी दिली.

रविवार, मार्च ०५, २०२३

तिडका येथील नळ योजना बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण.पाणीपुरवठा योजना वा-यावर.

तिडका येथील नळ योजना बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण.पाणीपुरवठा योजना वा-यावर.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.4 मार्च:-
सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका येथील पाणीपुरवठा योजना बंद पडलीअसल्याने,
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.केंद्र शासनाचे घर घर नळ योजनेंतर्गत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी घर नळ योजना सुरू करण्यात आली.मात्र तिडका ग्रामवासी शुद्ध पिण्याचे पाण्यापासून वंचित आहेत. ‌ तिडका येथील पाणीपुरवठा योजना बंद असून पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना विशेष करून महिलांना बोअरवेलवर पाण्यासाठी भांडणे करावे लागत आहे.या गावापासून पंचायत समिती सडक अर्जुनी हाकेच्या अंतरावर असून मागील तीन-चार वर्षांपासून येथील नळ योजना बंद पडली असल्याने दुषित पाणी घ्यावे लागत आहे.या गावची लोकसंख्या दोन हजार असून ग्रामपंचायत मध्ये तीन वार्ड आहेत.सदस्यसंख्या ९ आहे.तिडका येथे सन१९९०मध्ये पाणी पुरवठा योजना अंतर्गत नळाद्वारे पाणी पुरवठा होत असे.पण सन २०१९ मध्ये पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीचे साहित्य जिर्ण झाल्याने पाणी पुरवठा बंद पडले आहे.सन २०२० मध्ये ग्रामपंचायत ने जि.प.शाळा समोर बोअरवेल खोदून त्यावर पंप बसविले.आणि जून्या घरगुती पाईप लाईनला जोडणी करून गावातील पाणी पुरवठा सुरू केले.पण या पंपाने वार्ड क्रं.१ मधील ४०० लोकांना पाणी पुरवठा होत आहे.वार्ड क्रं.२व३मधील १५००लोकांना बोअरवेल च्या पाण्यावर अवलंबून आहेत.यात माळी,ढिवर, आदिवासी,हलबी या जातीचे लोकांना पंपाचे दुषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. एकिकडे केंद्र व राज्य शासन स्वच्छ गाव व स्वच्छ पाणी घर तेथे नळ ही योजना सन २०१७ पासून राबवित असून ही योजना लोकप्रतिनिधी यांचे भाषणापुरतीच राहिलेली दिसते.तसेच जि.प.व पं.स.येथील अधिका-यांच्या निष्क्रियतेमुळे ६०ते७० टक्के गावांना पिण्याचे पाण्याच्या समस्येशी झुंजावे लागते.वरिष्ठ अधिकारी गावोगावी शुद्ध पाणी पुरवठा पुरवित असल्याचे सांगून स्वत:ची पाठ स्वत:च थोपटत असल्याचे दिसून येते.

मंगळवार, फेब्रुवारी २१, २०२३

आजच्या बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये ६ गुणांच्या चुका.विद्यार्थ्यांना सरसकट ६ गुण देण्याची मागणी.

आजच्या बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये ६ गुणांच्या चुका.विद्यार्थ्यांना सरसकट ६ गुण देण्याची मागणी.





संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ फेब्रुवारी:-
आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच प्रश्नपत्रिकेत छापून आली आहेत.चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत
(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. 21 फेब्रुवारी परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा होता आणि या पहिल्या पेपरमध्येच घोळ झाल्याचं दिसून आलं आहे.
12वीच्या परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पान नंबर 10 वर प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बोर्डाने सांगितले की, या त्रुटी संदर्भात आम्ही लवकरच बैठक घेऊ आणि या लवकरच उत्तर देऊ. तिन्ही प्रश्न हे सहा गुणांचे आहेत त्यामुळे सहा गुणांचा बोनस विद्यार्थ्यांना मिळणार का? याबाबत आता बोर्डाचा निर्णय अपेक्षित आहे.शिक्षण मंडळाने एक पत्रक काढलं आहे. 
यामध्ये म्हटलं, "फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा होवू शकलेली नाही. इंग्रजी विषयात्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येवून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी." तर इकडे विद्यार्थी व पालकांनी इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांना या त्रुटीचे सरसकट सहा मार्क विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे

शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.

कुंभरे कुटूंबियांवर शोककळा. प्रभाबाईच्या दुर्दैवी निधनाने हळहळले नवेगावबांधवाशी.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ फेब्रुवारी:-
प्रतापगड यात्रेत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्री शंकराच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या नवेगावबांध येथील एका भाविक महिलेचे दुर्देवी निधन झाले.मृतक महिलेचे नाव प्रभाबाई नीलकंठ कुंभरे (वय ५२वर्षे)असे आहे.यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड यात्रेत घडली.
नवेगावबांध येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नीलकंठ कुंभरे यांच्या पत्नी प्रभाबाई वय ५५ वर्षे यांचे आज प्रतापगड यात्रेत दुःखद निधन झाले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर त्यांचे दुःखद निधनाने कुंभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.त्या ग्रामपंचायत सदस्य विजय कुंभरे यांच्या मातोश्री आहेत.ही दुर्दैवी घटना दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान घडली. प्रभाबाई यांच्या दुर्देवी निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.यात्रेदरम्यान एखाद्या भाविकांचा मृत्यू व्हावा .ही प्रतापगड यात्रेतील पहिलीच घटना आहे,असे सांगितले जाते. मृतक प्रभा ह्या  प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या.त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जायला निघाल्या त्या उभ्या राहिल्या बरोबर समोर अचानक भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळल्या. पडल्या त्यांचा त्याच क्षणी मृत्यूझाला असा अंदाज आहे.प्रतापगड यात्रेत त्या कोसळल्या त्या वेळेस त्याचे जवळ त्याचा लहान मुलगा वैभव सोबत होता.
त्या भोले शंकराचे दर्शन घेण्यासाठी प्राचीन मंदिरात वर टेकडीवर जात असताना, सीतेच्या न्हानीजवळ पोहोचल्या असता,अचानक भोवळ येऊन  खाली पडल्या. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी तसेच यात्रेकरूंनी त्यांना नजीकच असलेल्या आरोग्य विभागाच्या आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतक प्रभा यांना मृत घोषित केले. त्यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.त्यांच्यावर उद्या दि.१९ फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता स्थानिक स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

सौंदड गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.

सौंदड गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
श्री साईबाबा गजानन धाम सौंदड रेल्वे येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखीचे दर्शन,भजन,गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलिस निरीक्षक आर.के.सिंगनजुडे, सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी,जि.प.सदस्या निशा तोडासे,पं.स.सदस्या वर्षा चरण शहारे,जि.प.सदस्या कविता रंगारी, माजी जि.प.सदस्या रुपाली टेंभुर्णे,माजी पं.स.सदस्या मंजूर डोंगरवार,सदूभाऊ विठ्ठले,शुभम जनबंधू, खुशाल ब्राम्हणकर,रंजना भोईर,प्रमिला निर्वाण,शोभा चोपकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन वाय.जी.बेंदवार व आभार प्रकाश ऊरकुडे यांनी केले.

गुरुवार, फेब्रुवारी १६, २०२३

सावरटोला येथे 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे भव्य आयोजन.

सावरटोला येथे 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे भव्य आयोजन.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
नवयुवक सार्वजनिक छत्रपती शिवाजी राजे मंडळ सावरटोला बोरटोला, उमरी यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वाजता ध्वजारोहण व मानवंदना दुपारी ३.०० वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.सायंकाळी ७.०० वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे हे राहणार असून,सोहळ्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर पाहुणे म्हणून, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे, प्राध्यापक शिवरकर,मुख्याध्यापक एस.एस.टेंभुर्णे, मुख्याध्यापक आर. के.कापगते, मुख्याध्यापक लांजेवार, रंगारी,एस. व्ही. बडोले, उपसरपंच सुवर्णा तरोणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सरिता मेश्राम,उपाध्यक्ष सेवदास मेश्राम,पोलीस पाटील शंकर तरोणे, आदी प्रभुती उपस्थित राहणार आहेत. सदर शिवजन्मोत्सव सोहळ्याला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिवणकर, उपाध्यक्ष प्रवीण वलथरे,महेश तरोणे, सचिव गजेंद्र तरोणे, महेंद्र शिवणकर, विवेक नारनवरे,यशपाल डोये, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
सौंदड येथे सेवालाल महाराज जयंती साजरी.

सौंदड येथे सेवालाल महाराज जयंती साजरी.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
सडकअर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सौन्दड येथे थोर समाजसुधारक,जगद्गुरू श्रीसंत सेवालाल महाराज यांची २८४वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. भीमटे यांनी श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ज्येष्ठ शिक्षक ए.एस.बोरकर यांनी मार्गदर्शन करतांना बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांनी सर्व मानव जातीला प्रेमाने राहायला शिकवले तसेच त्यांचे विचार संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे होते असे मत व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील शिक्षक जे.एस.मोटघरे,ए.आर.कापगते, एस.आर.रामटेके,एल.बी.रहांगडाले,एम.जी.कोहळे शिक्षिका डी. एम.तुरकर,हिना बोरकर,
एन.एम.मांडारकर,अश्विनी डोंगरवार,प्रतिभा बाकडे उपस्थित होते.

बुधवार, फेब्रुवारी १५, २०२३

सौंदड येथे  महिला मेळावा व मार्गदर्शन  शिबिर संपन्न.

सौंदड येथे महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.15 फेब्रुवारी:-
आज दिनांक 15/02/2023 ला रोज बुधवार ला सकाळी 11:00  वाजता सौंदड ग्रामपंचायत आणि महिला व बालविकास यांच्या संयुक्त सौजन्याने भव्य महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक   सौ.सविताताई पुराम सभापती जि. प. गोंदिया, 
सहउदघाटक  सौ.निशाताई तोडासे सदस्य जि.प. गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्ष विनोदकुमार मोदी सरपंच ग्रामपंचायत सौंदड, 
दिपप्रज्वलक  सौ. वर्षाताई शहारे सदस्य पं. स.सदस्य सडक अर्जुनी,  डॉ.रूखीराम वाडई सदस्य पं. स.सदस्य सडक अर्जुनी, सौ. रुपालीताई टेंभुर्णे माजी जि. प. सदस्य,, सौ भावणाताई यावलकर 
निखिल मेश्राम सरपंच ग्रां.पं. बोपाबोडी ,
सौ. भूमिका बाळबुद्धे   सरपंच ग्रां.पं.घाटबोरी,
 नितीश गुरणुले सरपंच ग्रां.पं. तिडका ,
 माधोराव तरोणे सरपंच ग्रां.पं. बाम्हणी ,
सौ.लता गहाने  सरपंच ग्रां.पं. फुटाळा 
 सौ. रंजना भोई ग्रामपंचायत सदस्य सौंदड,
 सौ. शुभम जनबंधू ग्रामपंचायत सदस्य सौंदड,
सौ. प्रमीला निर्वाण ग्रा.प. सौंदड, सौ. सुषमा राऊत ग्रा.प. सौंदड,.  सौ.रीता राऊत काणूनी कलाकार
सौ.निशा कोरे कृषी सखी ,सौ.अर्चना नंदेश्वर बँक सखी, सौ.किरण भुमके बचत गट सखी,  सौ. ॲड. रिता राऊत,सौ.रेखा राउत, सौ.योगेश्वरी निर्वाण,  सौ. एन.बी.बक्त पर्यवेक्षिका ,
सौ.अर्चना डोंगरवार , आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका महिला व बालक व पालक व गावातील मंडळी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमात उपस्थित झाले.

शनिवार, जानेवारी २८, २०२३

पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
रमेश शिक्षण संस्था कुडेगाव द्वारा संचालीत पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी ता-लाखांदूर जि-भंडारा येथे दिनांक-२३ ते २५  जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. २३ जानेवारी २०२३ ला दुपारी १२ वाजता वार्षिकोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. नरेशजी मेश्राम सचिव र.शि.स. कु., उद्घाटक  म्हणून मा.नितीनजी पुगलिया इंडोफॉर्म ट्रॅक्टर अँड इक्विपमेंट नवेगाव बांध,स्वागताध्यक्ष  सुनीलभाऊ कापगते उपाध्यक्ष शा. व्य. समिती, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव, मा मनोजजी बन्सोड,मा संजयजी बन्सोड,मा सुरजजी चचाने,मा देवेन्द्रजी झोडे,मा संजयजी परशुरामकर,मा हिरालाल गजभिये,मा मोतीरामजी कुंभरे,सौ केवणाबाई परशुरामकर, सौ प्रज्ञाताई मेश्राम,मा राजेशजी नाकाडे,मा धनराजजी डोंगरवार, मा उज्वलजी नाकाडे,मा भालचंद्र चुटे मुख्या.,शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्कारमूर्ती मा काशीरामजी कापगते,मा व्यंकटजी कुंभरे, मा कैलासजी परतेके,मा शालीकजी धोटे उपस्थित होते.सदर उद्घाटन सोहळ्यात चारही सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार केला गेला.सदर कार्यक्रमाला समस्त विद्यार्थी, बहुसंख्य पालक आणि गावकरी उपस्थित होते.
 यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि गावकरी मंडळींना मार्गदर्शन केले.यानंतर सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२४ जानेवारी २०२३ ला दुपारी विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक आणि बौद्धिक स्पर्धा पार पडल्या.तसेच सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजता महिला मेळावा तसेच महिलांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता यात मा. सविताताई उपरीकर सरपंचा सानगडी, सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले आणि दुपारी २ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडला.त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन दिले गेले.सदर वार्षिकोत्सवात मुख्याध्यापक भालचंद्र चुटे यांचा शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार केला गेला. तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांचा ग्रामपंचायत आणि गावकरी यांनी त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री खुशाल डोंगरवार सर ,प्रास्ताविक श्री भालचंद्र चुटे सर आणि आभार प्रदर्शन सुनीलजी  कापगते यांनी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री किशोर शहारे, कु.अनुराधा रंगारी,कु.शिल्पा मेश्राम तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि माता पालक संघाचे  श्री दुर्गेश कुडेगावे, श्री कृष्णाजी कोराम, श्री राहुलजी जनबंधु, श्री विनोदजी शहारे, श्री संजयजी बन्सोड,श्री  विनोद शहारे,सौ आशा परशुरामकर, सौ सरोज परशुरामकर, सौ वंदना जोशी, सौ प्रियंका परशुरामकर,सौ रिता परतेके,सौ मिनाक्षी गजभिये, सौ हेमलता परशुरामकर, सौ मनीषा परशुरामकर, सौ मोतिका परशुरामकर,सौ रजनी जनबंधु, सौ दुर्गा परशुरामकर,  तुळशीराम बागडे, श्री रमेश शहारे,श्री प्रमोद परशुरामकर सौ चंपाबाई बागडे,सौ शेवंताबाई शहारे,समस्त पालक आणि मतापालक तसेच सर्व शालेय मंत्रिमंडळ आणि विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले. अशाप्रकारे वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला.

मंगळवार, जानेवारी १७, २०२३

गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन.गोंदिया पोलीस व एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम.

गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन.गोंदिया पोलीस व एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम.

सहली दरम्यान दिल्या विवीध स्थळांना भेटी.

मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून केले जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व.

गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम.







संजीव बडोले,
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध:-17 जानेवारी:-
गोंदिया जिल्हयातील अति- दुर्गम नक्षलग्रस्त भागातील किशोर वयीन मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच त्यांना राज्यातील औद्योगिक, आर्थीक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीची माहिती व्हावी ईत्यादी चे दृष्टीने निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी यांच्या मार्गदर्शना खाली तसेच विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प देवरी, यांचे सहकार्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नाविण्य पूर्ण उपक्रम म्हणून जिल्हया तील नक्षलग्रस्त भागातील युवक/युवतीना मुंबई सहली करीता गोंदिया जिल्हा पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेच्या माध्यमाने (मुंबई) दर्शन सहली करीता आणि दिनांक 15/01/2023 रोजी मुंबई, टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नेण्यात आले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 10/01/2023 ते 16/01/2023 रोजी पर्यंत विद्यार्थी युवक युवती यांनी सहल दरम्यान मुंबई येथील वेगवेगळया पर्यटनस्थळांना भेटी दिल्यात त्यात प्रामुख्याने
मुलांना दादासाहेब फाळके चित्रनगरी,मराठी कलर्स चॅनल वरील मालिका चे लाईव्ह शूटिंग व कलाकारांची भेट
कपिल शर्मा यांचा स्टुडिओ सेट, तारक मेहता का उल्टा चष्मा चा गोकुल धाम स्टुडिओ दाखविण्यात आला.
जुहु चौपाटी, एलिफंटा लेणी, गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, हाजी अली दर्गा दाखविण्यात आली.
स्नो वर्ल्ड,नेहरु तारांगण, श्री.सिद्धि विनायक मंदिर, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान , रानी बाग दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे मा. पोलीस महासंचालक, यांचे कार्यालय, दाखविण्यात येवून मुलांना पोलीस विभागाची, तसेच डायल 100 , 112 बाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतर दिनांक 15/01/2023 रोजी मुंबई येथे आयोजित टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्या करिता जिल्ह्यातील सर्व स्पर्धक मुला मुलींची नोंदणी करून सकाळी 03:30 वाजता मुलांना मॅरेथॉन स्पर्धे करिता कलिना व माहीम दर्गा, CSTM स्टार्टींग पॉईंटवर नेण्यात आले. इतर स्पर्धका सोबत सामिल् करण्यात आले. ज्यात 10 किलोमीटर दौडमध्ये 43 युवक युतींनी, तर 21 किलो मीटर मध्ये 5 स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील 49 युवक युतींपैकी मॅरेथॉन स्पर्धेत एकूण 6 स्पर्धक टॉप 10 मध्ये आले आहेत .तसेच एकूण 48 मुली, मुलांना पदक मिळाले आहेत. सदर स्पर्धेत कु. शारदा मसराम रा. बक्की ह्या मुलीने 42 किलो मीटर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केले आहे. सहली दरम्यान सर्व युवक युवतीं यांचे अल्पोपहार, राहण्याची, जेवणाची उत्तम सोय विभामार्फत करण्यात आली होती. दिनांक 16/01/2023 रोजी गोंदिया येथे परत आल्यानंतर सर्व सहभागी युवक युवतींचे पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्याचे वतीने मुंबई सहल व टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी. युवक / युवतीं चे मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, पोलीस उप- अधीक्षक (मुख्या.) दिनकर ठोसरे यांनी पोलीस विभागा कडुन त्यांचे उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
तर मुंबई दर्शन सहल, व मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घडवून आणल्या बद्दल* अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील युवक युवतींनी पोलीस विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी केलेल्या सहल आयोजन व कार्याचे विशेष आभार मानून मनोगत सादर करून आनंद व्यक्त केला आहे. मुंबई दर्शन सहलीत सहभागी युवक युवतींना त्यांचे स्वगावी सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतीदुर्गम नक्षल ग्रस्त भागातील 35 युवक व 14 युवतीं असे एकूण 49 मुलं, मुली यांना मुंबई दर्शन, सहली करीता व मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेवून सहा. पोलीस निरिक्षक नाईक शरणागत, यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार मुस्ताक सैय्यद , आशिष वंजारी, नंदू राऊत, भास्कर हरिंखेडे, महिला पोलीस अंमलदार - ज्योती उईके, मंगला प्रधान, यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

मंगळवार, जानेवारी ०३, २०२३

सावरटोला येथे 3 व 4 जानेवारीला महिला व बालकल्याण प्रशिक्षणाचे आयोजन.

सावरटोला येथे 3 व 4 जानेवारीला महिला व बालकल्याण प्रशिक्षणाचे आयोजन.




संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२ जानेवारी:-

गट ग्रामपंचायत सावरटोलाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बालिका दिना निमित्ताने ३ व ४ जानेवारी ला १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत महिला व बालकल्याण प्रशिक्षण,सॅनिटरी नॅपकिन व औषध उपचार या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.

३ जानेवारी रोज मंगळवार ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुनी मोर तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कु. पी.एन. किरणापुरे यांच्या शुभहस्ते, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस पाटील शंकर तरोणे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरिताताई मेश्राम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डुडेश्वर तरोणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे,ग्रामसेवक एस.के. चिमनकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी १२:३० वाजता बालस्नेही या विषयावर यशदा पुणेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक रजनीताई रामटेके,गरिबी व उपजीविका या विषयावर यशदाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक लीलाधरजी पटले दुपारी २.३० ते ३.०० वाजता लिंग समभाव पोषक पंचायत,स्वच्छ आणि हरित पंचायत या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सायंकाळी ७.३० वाजता गावातील बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मनोहर तरोने, सह उद्घाटक देवराम शिवणकर यांच्या शुभहस्ते, शिरेगाव बांधचे उपसरपंच दादाजी संग्रामे यांच्या अध्यक्षतेखाली, पांडुरंग भोपे,महादेव डोये, रघुनाथ शिवणकर, राधेश्याम तरोणे, थोटूजी मेश्राम,रामगोपाल शिवणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

४ जानेवारी रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पंचायत समिती अर्जुनी मोरचे सभापती सविताताई कोडापे यांच्या शुभहस्ते,खंडविकास अधिकारी व्ही. आर.निमजे यांच्या अध्यक्षतेखाली, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे,गटशिक्षणाधिकारी आर.डी.मांढरे,जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे,लायकराम भेंडारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.दुसऱ्या सत्रात स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा या विषयावर यशदा पुणे चे प्रशिक्षक लीलाधर पटले, सुशासनासह पंचायत, जलसमृद्ध पंचायत या विषयावर प्रांजल वाघ सरपंच स्मार्ट ग्राम कढोली, आरोग्यदायी पंचायत, सामाजिक दृष्ट्या न्याय आणि सुरक्षित पंचायत या विषयावर यशदाचे प्रशिक्षक रजनीताई रामटेके मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी ५.०० वाजता अल्पोपहार व सायंकाळी ७.०० वाजता शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एस. व्ही.बडोले सम्राट अशोक विद्यालय उमरी,सहउदघाटक लोचन शेंडे छत्रपती शिवाजी विद्यालय सावरटोला यांच्या शुभ हस्ते, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रप्रमुख दिलीप टेंभुर्णे,संजय राऊत,वनरक्षक दुधराम तरोणे,राजाराम तरोणे,राकेश डोये यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला गावातील सर्व महिला बचत गट,युवक,ग्रामस्थ महिला,पुरुष यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे,उपसरपंच सुवर्णा तरोणे,ग्रामविकास अधिकारी एस के चिमणकर,ग्रामपंचायत सदस्य,महिला ग्राम संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे.


मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२

सम्राट अशोक विद्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन.

सम्राट अशोक विद्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. १५ नोव्हेंबर:-
जननायक,स्वातंत्र्य सैनिक,क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे, पाहुणे म्हणून ग्रामसेवक चिमणकर, भागवत मुनेश्वर,जे.एस.हटवार. के. एम.भैसारे,एम.यु.घरोटे उपस्थित होते. प्रारंभी सरपंच तरोणे,मुख्याध्यापक टेंभुर्णे तसेच सर्व अतिथींनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून संचालन एस. व्ही. बडोले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एच.एस. पात्रीकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. एम.साखरे,बी.आर.पंचलवार यांनी सहकार्य केले.