Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑक्टोबर ०५, २०२३

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा


पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भात व कर्मचारी नियुक्ती बाबत संविधान विरोधी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय पुरोगामी संघ, भद्रावतीने तहसीलदार भद्रावती यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.

सरकारी शाळा हे उद्योगपतींना देऊन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा, सरकारी शाळा बंद करण्याचा, शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्याचा संविधान विरोधी निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. हा घेतलेला निर्णय संविधान विरोधी असून सामान्य, वंचित, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य समाजसुधारक यांनी बहुजनांच्या हितासाठी शिक्षण सुरू केले. मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी महाराजांच्या जन कल्याणकारी, पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण विरोधी धोरण अवलंबिले आहे. शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत आहेत. सरकारी शाळा उद्योगपतींना दत्तक देण्यात येणार आहेत. सरकारी कामकाज ज्या कर्मचारी वर्गाकडून पूर्ण होतो ती नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने खाजगी कंपन्या मार्फत केली जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांना नोकरी ची शाश्वती असणार नाही. हे संविधान विरोधी असून पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे आहे.
एकीकडे संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार मुलांना दिला आणि दुसरीकडे मात्र सरकारी शाळा बंद करण्याचा घाट यामार्फत चाललेला आहे. आपण घेतलेला शाळा बंद करण्याचा, शाळा दत्तक देवून खाजगीकरण करण्याचा तसेच खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती करण्याचा आदेश त्वरित रद्द करावा.

या आपल्या निर्णयावर सामान्य माणसाला असुरक्षितपणा, आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता त्रस्त करीत आहे. राज्य सरकारचे ध्येय जनकल्याणासाठी कार्य करीत राहणे हे आहे. तेव्हा राज्य सरकारने घेतलेला संविधान विरोधी, जनकल्याण विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. असे पत्र पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीने तहसीलदार अनिकेत सोनावणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती चे अध्यक्ष प्रविण चिमुरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, मनोज मोडक, हर्षल रामटेके, उमेश कामडे, शिरीष उगे, आशीष कोटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा  #Goverment #School

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा #Goverment #School


पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भात व कर्मचारी नियुक्ती बाबत संविधान विरोधी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय पुरोगामी संघ, भद्रावतीने तहसीलदार भद्रावती यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.

सरकारी शाळा हे उद्योगपतींना देऊन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा, सरकारी शाळा बंद करण्याचा, शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्याचा संविधान विरोधी निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. हा घेतलेला निर्णय संविधान विरोधी असून सामान्य, वंचित, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य समाजसुधारक यांनी बहुजनांच्या हितासाठी शिक्षण सुरू केले. मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी महाराजांच्या जन कल्याणकारी, पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण विरोधी धोरण अवलंबिले आहे. शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत आहेत. सरकारी शाळा उद्योगपतींना दत्तक देण्यात येणार आहेत. सरकारी कामकाज ज्या कर्मचारी वर्गाकडून पूर्ण होतो ती नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने खाजगी कंपन्या मार्फत केली जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांना नोकरी ची शाश्वती असणार नाही. हे संविधान विरोधी असून पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे आहे.
एकीकडे संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार मुलांना दिला आणि दुसरीकडे मात्र सरकारी शाळा बंद करण्याचा घाट यामार्फत चाललेला आहे. आपण घेतलेला शाळा बंद करण्याचा, शाळा दत्तक देवून खाजगीकरण करण्याचा तसेच खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती करण्याचा आदेश त्वरित रद्द करावा.

या आपल्या निर्णयावर सामान्य माणसाला असुरक्षितपणा, आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता त्रस्त करीत आहे. राज्य सरकारचे ध्येय जनकल्याणासाठी कार्य करीत राहणे हे आहे. तेव्हा राज्य सरकारने घेतलेला संविधान विरोधी, जनकल्याण विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. असे पत्र पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीने तहसीलदार अनिकेत सोनावणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती चे अध्यक्ष प्रविण चिमुरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, मनोज मोडक, हर्षल रामटेके, उमेश कामडे, शिरीष उगे, आशीष कोटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सोमवार, सप्टेंबर ११, २०२३

गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad  Ganesh Utsav 2023

गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन Ganesh Utsav 2023 आणि इद ए मिलाद (Eid-e-Milad ) हे दोन्ही सण 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी येत आहेत. यामुळे दोन्ही सणांचे उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण होणार होती. मात्र, मुस्लिम समाजाच्या निर्णयाने ही अडचण दूर झाली आहे. हे सण उत्साहात साजरे व्हावे यासासाठी इद ए मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी २९ रोजी मिरवणूक काढण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे होण्यास मदत होईल.

दादमहाल मदरसा येथे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि मशीद प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न काढता 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद Eid-e-Milad  एकाच दिवशी, मुस्लिम समाजाने मिरवणुकीचा निर्णय पुढे ढकलला आहे. गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होत असून, गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपुरा गेट ते कस्तुरबा रोड गिरनार चौक या मार्गावर मिरवणूक होईल. या निर्णयाचे चंद्रपूर शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम सलोखा वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

रविवार, सप्टेंबर १०, २०२३

या जिल्ह्यात येणार पाऊस  | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli

या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli




या जिल्ह्यात येणार पाऊस

rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.



नागपूर, 10 सप्टेंबर 2023: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत (10 आणि 11 सप्टेंबर) पूर्वविदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली (Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli) या पाच जिल्ह्यांत पुढील पाच दिवस (6 ते 10 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 11 ते 12 सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच, घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.

अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान

  • पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
  • रस्ते, पुल, इमारतींचे नुकसान
  • शेतीचे नुकसान
  • जीवितहानी

अतिवृष्टीपासून बचाव

  • नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवा
  • घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा
  • मुसळधार पावसाच्या वेळी घरातच रहा
  • आवश्यक असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
  • पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित द्या
  • Heavy rain
  • Eastern Vidarbha
  • Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
  • Cloudy sky
  • Light to moderate rain
  • Thunderstorm with lightning
  • Possibility of flooding
  • Safety measures to be taken during heavy rain
मराठा आरक्षणाला विरोध; 17 सप्टेंबरला महा आंदोलन |Maratha reservation

मराठा आरक्षणाला विरोध; 17 सप्टेंबरला महा आंदोलन |Maratha reservation

मराठा आरक्षणाविरोधात 17 सप्टेंबरला संपूर्ण तेली समाज ओबीसीच्या महामोर्चात रस्त्यावर उतरेल



चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत 17 सप्टेंबरला गांधी चौक येथून निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आज स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी शेकडो तेली समाज बांधव उपस्थित होते.

बैठकीत बोलताना तेली समाजाचे नेते प्रा. सुर्यकांत खनके यांनी सांगितले की, मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. त्या मुळे तेली समाज रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करणार आहे.

याप्रसंगी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्रजी बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित असलेल्या तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की, 17 सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात संपूर्ण तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल.

बैठकीत तेली समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तेली समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

गुरुवार, सप्टेंबर ०७, २०२३

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले | Chandrapur district

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले | Chandrapur district



चंद्रपूर, ७ सप्टेंबर २०२३: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागात गुरुवार ७ सप्टेंबर रोजी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
Tiger cubs found dead
Chandrapur district

चंद्रपूर जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या आहे. गेल्या काही वर्षापासून वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.

वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक ५७२ मध्ये त्यांना अपंग वाघाचे बछडे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले.

त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर जवानांना वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सविस्तर पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता.

चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे शेकडो नागरिकांना जीव गेला आणि दुसरीकडेच या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वाघाचे देखील जीव जात आहेत. यामुळे वन्यजीव रक्षणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

**संभावित कारणे**

बछडयांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप निश्चितपणे काही सांगता येत नाही. मात्र, खालील कारणे शक्य आहेत:

विषबाधा: जंगलात शिकारींसाठी ठेवलेल्या विषबाधित पदार्थांमुळे वाघांना विषबाधा होऊ शकते.

आजार: वाघांनाही विविध प्रकारचे आजार होतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

नैसर्गिक कारणे: वाघांना इतर प्राण्यांपासून किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे देखील मृत्यू येऊ शकतो.

वनविभागाचे प्रतिक्रिया

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बछडयांचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल.


News keywords

* Tiger cubs found dead
* Chandrapur district
* Ballarpur forest range
* Kalmana sub-division
* Cause of death not clear
* Forest department investigation
* Wildlife treatment center
* Dr. Kundan Podchelwar
* Dr. Dilip Jambhule
* Increasing number of tigers in Chandrapur
* Human-tiger conflict
* Rising number of tiger deaths in recent years
* Hunting, poisoning, railway accidents, other causes

मंगळवार, सप्टेंबर ०५, २०२३

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur

जिल्हास्तरीय शांतता समितीवर प्रशांत विघ्नेश्वर व मजहर अली यांची नियुक्ती


चंद्रपूर, 5 सप्टेंबर 2023: चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांचा समावेश आहे.

या समितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व आमदार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी, जिल्हा साहित्य संघाचे प्रतिनिधी, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हा महिला संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

या समितीचे मुख्य कार्य म्हणजे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे. यासाठी समिती वेळोवेळी बैठका घेऊन कायदेशीर मार्गाने आवश्यक उपाययोजना करेल.

पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत. ते चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव आहेत. मजहर अली हे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हास्तरीय शांतता समिती सदस्य

मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. श्री. विजय वडेट्टीवार
मा. श्री. किशोर जोरगेवार
मा. श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर
मा. श्री. कितीकुमार (बंटी) भांगडिया
मा. श्री. सुभाष रामचंद्रराव धोटे
मा. श्री. सुधाकर अडबाले
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद चंद्रपूर
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर
पोलीस अधिक्षक, चंद्रपूर
अति. पोलीस अधिक्षक / पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर, श्री. प्रविण उर्फ बाळू हेमचंद खोब्रागडे
श्री. सैय्यद रमजान अली सैय्यद अहेमदअली, पत्रकार चंद्रपूर
श्री. रामजिवनसिंह मनिरामसिंह परमार
श्री. सबेस्टीयन सुकर्तीक जॉन
अॅड. आशिष गोपाल मुंधडा
श्री. नरेंद्र लटारी बोबडे
प्रा. प्रियदर्शी वसंत मेश्राम
श्रीमती अंजली शंकरराव घोटेकर
श्रीमती शालीनी कमलेश भगत
श्री. अहेमद हुसेन पिर मोहम्मद अन्सारी
श्री. प्रकाश शंकरराव शेंडे
श्री. ईबादल मो. हुसेन सिद्दीकी
श्री. श्रीनिवास परशुराम जंगम
श्री. छोटुभाई उर्फ शेख जैरुद्दिन शेख मोहीद्दिन
श्री. रब्बानी गुलाम रसूल शेख
श्री. प्रविण धोंडूजी सुर
डॉ. संजय पुंडलिकराव पिठाडे
श्री. धनराज मुंगले
श्री. पंकज गाडीवार
श्री. उमाकांत गोविंदा माकोडे
प्रा. प्रकाश श्रावणजी बगमारे
डॉ. गणपत देवाजी देशमुख
श्री उपेंद्र चिटमलवार
श्री. धनंजय तुळशिराम बोरकर
श्री. नंदु कान्हुजी खोब्रागडे
श्री. सुभान सत्तार खॉ पठाण
श्री. संजय रघुनाथ पडोळे
श्री. अतुल किसन लेनगुरे
श्री. राजेंद्र अमृतलाल अढिया
श्री. विनोद मारोतराव देशमुख
श्री. राजु मंगल झाडे
श्री. उमाकांत आबाजी घोटे
श्री. काशीनाथ स्व
श्री. नसीर मोहमद रहीम बक्श (भुरूभाई)
श्री. प्रकाश शंकरराव उत्तरवार
श्री. अविनाश प्रभाकर रामटेके
श्री. पांडुरंग पत्र गावडे
श्री. शामराव शेडमाके
श्री. बबन गजानन पत्तीवार
श्री. मनोज कैकाळी भोजेकर
श्री. दिनेश राठोड
श्री. महेश बळीराम देवकते
श्री. भिमराव व्यंकटी पवार
श्री. पंकज तुकाराम पवार
श्री गणेश उत्तम कदम
श्री. मुनीर मकबूल शेख
श्री. देवेंद्र शंकरराव तुराणकर

चंद्रपूर जिल्ह्याचा शांततेचा नावलौकीक कायम ठेवा – जिल्हाधिकारी गौडा

Ø सण उत्सवात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Ø शांतता समितीच्या बैठकीत सदस्यांकडून सामाजिक सलोखा व ऐक्याची ग्वाही

चंद्रपूरदि. 5 : आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते. सर्वधर्मीय सण/ उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळे हीच ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांनी चंद्रपूरचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली.

नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

चंद्रपूरची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, एकाच दिवशी गणपती विसर्जन आणि ईद असल्यामुळे सर्वांनी मिरवणुकीच्या वेळा पाळाव्यात तसेच नियमांचे पालन करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिरवणुकीचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावे. डीजे / लाऊडस्पीकरचा आवाज 55 डेसीबलपेक्षा जास्त नसावा. ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गणपती मंडळांना सर्व परवानग्या देण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या रस्त्यावर बॅनर, फटाके, कमानी लावण्यात येऊ नये. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. दाताळा रोडवरील इरई नदीत गणपती विसर्जनाची व्यवस्था मनपाने योग्य प्रकारे करावी.

सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. विशेष करून तरुणांनी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एखाद्या मॅसेजमुळे समाजभावना भडकणार नाही, यासाठी दक्ष असावे. जेष्ठ नागरिकांनी आपापल्या कुटुंबातील तरुणांना सोशल मिडीया वापराबाबत मार्गदर्शन करावे. सण / उत्सव हे आनंदाने आणि शांततेत पार पाडायचे असतात, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सामाजिक सलोखा आणि ऐक्य  ही चंद्रपुरची परंपरा आहे. सण / उत्सव आनंदाने साजरे करून जिल्ह्याचा लौकिक कायम ठेवावा. गणेश मंडळाने सामाजिक विषयांवर देखावे करावेत. तसेच शासकीय परवानग्या देतांना लोकांना चकरा माराव्या लागू नये, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाचे कान-नाक-डोळे : पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी

गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मनपातर्फे फिरते कुंड व निर्माल्य रथाचे आयोजन : आयुक्त विपीन पालीवाल

घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याकरीता चंद्रपूर शहरामध्ये 20 ते 30 कृत्रीम विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच फिरते कुंड आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी रथाचेसुध्दा नियोजन आहे. नागरिकांनी ईद मिरवणूक व गणपती विसर्जनावेळी रस्त्यावर बॅनर, स्वागत गेट, पताका लावू नये. आपापल्या मिरवणुकीच्या वाहनांवरच बॅनर लावावे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात पीओपीच्या मुर्तींना बंदी आहे. त्यामुळे पीओपीची मूर्ती बनवितांना किंवा विक्री करतांना आढळल्यास त्वरीत तक्रार करावी. गणेश मंडळांना एक खिडकी योजनेंतर्गत परवानग्या देण्यात येत आहे. याबाबत काही अडचण आल्यास मनपा सभागृहात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

   शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : पीओपी मुर्तीच्या संदर्भात मनपाने मुर्तीकारांची बैठक घ्यावी. गणेश मंडळांनी परवानग्या कशा घ्याव्यात, याबाबत जनजागृती करावी. सोशल मिडीयावर अफवा पसरणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी. मनपाने कृत्रीम विसर्जन कुंड तयार करावे. मुर्तीचे नुकसान / मोडतोड होऊ नये म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंडळांनी गणेश मुर्तीसाठीची वाहने सुव्यवस्थित ठेवावी तसेच चालक मद्यप्राशन करणारा नसावा. डीजेबद्दलच्या नियमांची माहिती पोलिस विभागाने आपापल्या क्षेत्रातील मंडळांना द्यावी. मनपाने मंडळांना पेंडालचा आकार निश्चित करून द्यावा. एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच वेळी देण्यात याव्या. विद्युत विभागाने पेंडॉलमधील इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी करावी. दाताळा रोडवरील इरई नदी येथे विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार करावा. सण / उत्सवाच्या दोन-तीन दिवसांपासून दारूविक्री बंद ठेवावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.


सोमवार, सप्टेंबर ०४, २०२३

चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident

चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident



चंद्रपूर, 04 सप्टेंबर 2023: चंद्रपूर- शहरात आज तीन अपघात झाले. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा नगर परिसरातील सौ.अनिता किशोर ठाकरे यांचे आज सकाळी सुमारे 10.15 वाजता चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ट्रकने धडक मारल्यामुळे दुःखद निधन झाले.

अनिता ठाकरे या चंद्रपूरला लागून असलेल्या लखमापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या जनता महाविद्यालयाचे प्रा.किशोर ठाकरे यांच्या पत्नी होत्या.

अनिता ठाकरे या आदर्श शिक्षिका व मनमिळाऊ व्यक्ती म्हणून अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

अनिता ठाकरे यांच्या पार्थिवावर उद्या 5 रोजी सकाळी 10.00 वाजता जगन्नाथ बाबा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.


चंद्रपूर: शिक्षिका सौ.अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन Chandrapur: Teacher Ms. Anita Thackeray passed away in an accident

अनिता ठाकरे यांचे कार्य

अनिता ठाकरे या त्यांच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर देखील भर देत होत्या. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना गुणवंत करण्यास मदत करत होत्या.

अनिता ठाकरे या त्यांच्या सहकाऱ्यांशी देखील अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध ठेवत होत्या. त्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीला नेहमी तत्पर होत्या.

अनिता ठाकरे यांचे निधन हे चंद्रपूर शहरासाठी एक मोठे नुकसान आहे. त्यांची आठवण कायम राहील.



दुसरा अपघात सायंकाळी साडेसात वाजता आदर्श पेट्रोल पंप जवळ झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी आहे.


हे दोन्ही युवक चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होते. आदर्श पेट्रोल पंप जवळ येताच त्यांचा दुचाकीवरून नियंत्रण सुटले असता दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.


दुसरा अपघात सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एसपायर अकॅडमी नेहरू नगर मूल रोड येथे झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाचे नाव भास्कर सातपुते (वय 35, रा. कोंढाळा-घुग्गुस) असे आहे. भास्कर पायी जात असताना त्याला मागून येणाऱ्या एका ऑटोने जोरदार धडक दिली. या अपघातात भास्करचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन ऑटो पसार झाला आहे. रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या अपघातांमुळे चंद्रपूर-मूल मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

या अपघातांवरून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या आवाहन पोलिसांनी केले आहे.