Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा | Latest and Breaking News in Marathi

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा | Latest and Breaking News in Marathi

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा


वर्धा, 30 ऑगस्ट 2023: वर्धा जिल्ह्यात पिपरी मेघे गावात बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. (Latest and Breaking News in Marathi | Live Marathi )

अशोक सावरकर (55), बाळू शेर (60) व सुरेश झिले (33) अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. मंदिराच्या झेंड्याचा खांब जवळपास 25 फूट उंच होता. मंदिरावर झेंडा लावताना अचानक खांब कलंडला आणि शेजारून जाणाऱ्या 33 केव्ही विजेच्या तारेवर पडला. यामुळे अशोक सावरकर, बाळू शेर व सुरेश झिले या तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. ते तिघेही मंदिराच्या शेडवर पडले. तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Rakshabandhan)

LATEST POSTS




या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी विजेच्या धोक्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विजेच्या कामात कुशल कर्मचाऱ्यांनाच हाताळावे. स्वतःहून विजेच्या कामात हात घालू नये. Rakshabandhan रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. त्यात सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.




3 People Killed in Electric Shock in Maharashtra

Three people were killed in an electric shock while putting up a flag at a temple in Pimpri Meghe village in Wardha district, Maharashtra on Wednesday morning.


The deceased have been identified as Ashok Sawarkar (55), Balu Shere (60) and Suresh Jile (33). They were all trying to put up a flag on the temple's 25-foot-tall flagpole when the pole suddenly fell and came in contact with a 33 kV overhead power line. The three men were electrocuted and fell to the ground. One of them died on the spot, while the other two died in hospital.

The police have registered a case and are investigating the matter.

  • Violence - 3 people died due to electric shock.
  • Temple - the incident happened at a temple.
  • Flag - the people were trying to put up a flag.
  • Electricity - the people died due to electric shock.
  • Death - 3 people died in the incident.
  • Accident - the incident was an accident.
  • Warning - the article warns people to be careful around electricity.

Pipri Meghe Wardha Pin Code

'या' गावात रक्षाबंधनाच्या दिवशी बांधत नाही 'राखी'
Rakshabandhan : रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणीने मनगटावर बांधलेली राखी अभिमानाने दाखवतो. या दिवशी क्वचितच कोणी लहान मूल, वृद्ध किंवा तरुण असेल ज्याच्या मनगटावर राखी बांधलेली नाही. पण, उत्तर प्रदेशातील एक असे गाव आहे, जिथे गेल्या अनेक शतकांपासून नव्हे तर अलीकडच्या वर्षांत रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी या गावातील प्रत्येक भावाचे मनगट खाली राहते. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीमुळे दोन्ही गावांमध्ये रक्षाबंधन साजरे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवार, मार्च २२, २०२३

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित


उमेश तिवारी/ कारंजा:
21 मार्च मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर सनशाईन स्कूल कारंजा (घा )येथे पूर्व दिवसाला गुढी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.

या प्रदर्शनी मध्ये वर्ग 5वी व वर्ग ६वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यामध्ये पलक पालीवाल ,फाल्गुनी ढगे ,प्रांजली खवशी ,सांझी मोटवानी,मृणाली केवटे ,समृद्धि भांगे,काव्या भिंगारे,आराध्या ढबाले,श्रुति एकापूरे,शर्लिन घागरे,रुधवी दळवी , अक्षरा चाफले,हर्शिका बन्नागरे,हेमांगी बारंगे,मोनिका डंढाळे,स्वरा वानखेडे,अलिजा शाह,राम शेखार,आदित्य वाघ,कृष्णा पाठे,सानिध्य दिढेकर या विद्यार्थांनी सहभाग घेतला.

या प्रदर्शनीचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमसिंग महीले यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना गुढी पाडवा चे महत्व थोडक्यात समजवून सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गुढी प्रदर्शनीचा अनोखा आनंद अनुभवला.व गुढी प्रदर्शनाची सांगता झाली.

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

नागरी समस्या संघर्ष समितीची
विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.

कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.

वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.

अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

सिंदीजवळ वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब | INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI

सिंदीजवळ वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब | INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI

आझादी का अमृत महोत्सव
विदर्भाची जिल्हानिहाय क्षमता

वर्धा

१) नियोजन - सिंदीजवळ भारतातील सगळ्यात मोठे वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब

कारण - 
अ) मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे तयार झाला अस्ल्याने बर्ध्याजवळ अनेक व्यवसाय संधी. मुंबई, नाशीक, पुणे यासह मुंबई जवळील शहरांमध्ये वेयरहाऊसिंग व वितरण बरेच खर्चिक, महाग आहे. योग्य धोरणाचा पाठिंबा मिळाला तर विदर्भ प्रदेशातील वर्धा व्यवसाय आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मुंबई, पुणे, नाशिक हा प्रवास काही तासांचा असल्याने तसेच मनुष्यबळ, वेयरहाऊसिंग आणि वितरणाचे दर बरेच कमी असल्याने लॉजिस्टिक्स, वेयराहाऊसिंग, वितरण कंपन्यांसाठी प्रचंड बचत.
ब) जीएसटी लागू झाल्यामुळे, विदर्भाच्या आस्थापनेतून, नागपूर, जबलपूर, रायपूर, भोपाळ, इंदूर, हैदराबाद, पुणे मुंबई नाशिकसह अनेक मेट्रो शहरांशी वर्ध्यातून संपर्क करत अधिक दुप्पट लोकसंख्या समाविष्ट होऊ शकते. कमी वेयरहाऊसिंग खर्चामुळे वितरणाचे प्रमाण अनेकपटींनी वाढू शकते आणि चांगल्या गुंतवणूक अनुकूल धोरणांमुळे मोठी गुंतवणूक येणे शक्य. हजारो कुशल आणी अकुशल मनुष्यबळाला रोजगार मिळेल.
क) देशाभरातून माल घेणार्‍या ऑनलाईन रिटेल मार्केटिंग कंपन्यांना असे मोठे वेयरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स, वितरणाचा लाभ होईल. नागपूर जवळील वर्धा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने उत्पादक कंपन्यांना कमी किंमतीत जलद वितरण करता येईल.
ड) या प्रयत्नांमुळे राज्य शासनाचा जीएसटी महसूल अनेक पटींनी वाढेल तचे एमएसआरडीसीसाठी होणार्‍या टोल संकलनात मोठी वृद्धी होईल आणि गुंतवणुकदारांना धोरण पाठिंब्यातून दिलेले प्रोत्साहनाची भरपाई होईल.

२) नियोजन - एकात्मिक स्टील प्रकल्पाजवळ सरकारच्या क्लस्टर धोरणांतर्गत मोठे स्टील क्लस्टर
कारण - १२० किमीच्या त्रिज्येत जवळपास २ एमएमटीपीए क्षमतेचे ३ मोठे स्टील प्रकल्प. या प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त प्राकारच्या स्टीलचे उत्पादन केले जाते. स्टील क्लस्टरमध्ये विद्युत, फॅब्रिकेशन, कृषी उपकरणे, साधने, टॉगल्स, हार्डवेयर वस्तू, बांधकाम उपकरणे, वस्तू हाताळण्याची उपकरणे तयार केली जाऊ शकतात. जवळपासच्या आघाडीच्या सर्व स्टील उत्पादकांच्या डेपोमध्येही स्टील उपलब्ध.

याचप्रकारे, या प्रकल्पांसाठी अलगणारे अनेक इनपुट्स या क्लस्टरमध्ये तयार केले जाऊ शकतात. स्टील प्रकल्पाच्या साहाय्याने शहराचा विकास कसा होऊ शकतो याचे भिलई हे उदाहरण आहे. या इनपुट क्लस्टरसाठी कच्चा माल म्हणून अनेक खनिजे, कोळसा, वीज आणि मनुष्यबळ जवळपास उपलब्ध आहे. सतत दुरुस्ती, दुरुस्ती-तपासणी देखभाल, उपभोग्य वस्तूंसारख्या उत्पादनांची प्रचंड आवश्यकता असते. राज्याकडून पुन्हा योग्य धोरण आवश्यक आहे.

आदरणीय नितीन गडकरी सर आधीच सिंदी ड्राय पोर्टला शक्य तितका सर्वोत्कृष्ट पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेमुळे वर्धा जिल्ह्यात नाशवंत नसलेल्या वस्तूंसाठी मोठी संधी आहे.

प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने


*AZADI KA AMRIT MAHOTSAV IN VIDARBHA*

*DISTRICT WISE POTENTIAL IN VIDARBHA*

*WARDHA*

1)PLAN- INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI 

LOGIC--A)With MumbaiNagpurExpressway ready many Business Opportunities near Wardha. Warehousing&Distribution much more costly near Mumbai covering Mumbai Nasik Pune Cities.With right policy support Wardha in VIDARBHA region most suitable place to attract this business. As Mumbai Pune Nasik few hours journey huge savings for Logistics, Warehousing and Distribution companies due to much lower rates of Manpower,Warehousing and Distribution. 

B)With GST in place VIDARBHA establishment can cover double population with more MetroCities from Wardha like Nagpur,Jabalpur,Raipur,Bhopal,Indore,Hyderabad,With Pune Mumbai Nasik. Manifold increase in Distribution volume with lower Warehousing costs and better investor friendly policies huge investments may come.Thousands of Skilled,Unskilled manpower get engaged. 

C)Such large Warehousing,Logistics Distribution mostly benifit Online Retail Marketing Companies where Procurement done from all over country.Wardha near Nagpur Most Centrally located City helps manufacturing companies to deliver fast at lower costs.

D)With this efforts State Govt GST revenues may increase manifold as well as Huge increase in Toll Collection for MSRDC will compensate incentives given by policy support to investors. 

2)PLAN---LARGE STEEL CLUSTER UNDER GOVT CLUSTER POLICY NEAR INTEGRATED STEEL PLANT. 


LOGIC---3 Large Steel plants with approx 2MMTPA capacity working in 120KM Radius.Maximum Varities of Steel Produced by these plants.From Electricals,Fabrication,AgriEquipments,Tools&Toggels,Hardware items,Construction Equipments,Materials Handling Equipments can be Made in Steel Cluster.Steel also available from Depot of all leading Steel Producers nearby. 

2)Same way many inputs required in these plants can be made in this cluster. Bhilai an example how City developed With Steel Plant Support. Many minerals,Coal,Electricity, Manpower nearby as Raw materials for this Input Cluster.Constant Repair Overhaul maintenance,Consumables like products having huge requirements. Again suitable policy from State must. 

3)ADVANCED TECHNOLOGY VEHICLE SCRAPPING PLANT 

LOGIC--A)Govt of India few months back announced VEHICLE SCRAPPING POLICY Where 15 years old vehicles must be scrapped.Advanced technology plant in Wardha can handle huge number of Old Vehicles coming from 20-25districts.Mechanical Seperation of different items possible by latest technology plants only. 

B)Different types of Scrap like Castings,Forgings,MildSteel,Rubbers,Plastics,Cables and many more items need nearby users.In Wardha itself large Steel plant working.Nearby districts Chandrapur,Nagpur,Bhandara also having bulk consumers.Win Win Situations for all.

C)As Shri Nitin Gadkari Sir saying with such Recycling cost of Auto Component will come down substantially will help M&M and attract new Automobile Companies to invest.Employments&Opportunity for Entrepreneurs both. 

Respected Nitin Gadkari Sir already trying hard to ensure best possible support to SINDI dry port.With MN Expressway huge opportunity for Perishable Non Perishable items here in Wardha dist. 

TOMORROW *AMRAVATI*

PRADEEP MAHESHWARI STRATEGIST NATURAL RESOURCES NAGPUR



बुधवार, जुलै २०, २०२२

 वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam

वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam

 चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. लष्कराचे एक पथक, एनडीआरएफचे एक पथक, एसडीआरएफच्या दोन तुकड्या व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.




नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सध्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच जिल्ह्यात नागपूरचे एसडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ टीम व तालुका प्रशासन यांनी २ हजार २४७ लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविले आहे.
कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलैपर्यंत सकाळी सहा वाजतापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती
राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले असून आतापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०९ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर १८९ प्राणी दगावले आहेत.पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत: तर २०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १८ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड-१ महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ तुकड्या तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१, चंद्रपूर -२, यवतमाळ-१ अशा एकूण पाच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात येत आहे.

Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam
 फक्त पिकं नव्हे संपूर्ण हंगाम बुडाला..!

फक्त पिकं नव्हे संपूर्ण हंगाम बुडाला..!

मागील दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पाऊसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला आतापर्यंत दोनदा प्रचंड पूर आला असून वर्धा नदीच्या पूरामुळे साधारण ४० गावे प्रभावित झाले आहेत. या पूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातील मुख्यत्वे कापूस आणि सोयाबिन पिकाची प्रचंड हानी झाली आहे. वर्धा नदीच्या परिसरात प्रमुख पिकं म्हणून कापूस आणि सोयाबीन घेतले जाते. या पूरामुळे हे दोन्ही पिकं प्रचंड प्रभावित झाले असून जिथं जिथं पूराचे पाणी घुसले तिथं तिथं संपूर्ण पिकं नष्ट झाली आहे.





‘पूरामुळे पिकं बुडाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे’, असे सर्वत्र बोलले जात आहे. पण हे अर्धसत्य आहे. पूरामुळे फक्त पिकं बुडाली नाही तर संपूर्ण हंगाम बुडाला आहे. आजही पूर ओसरलेला नाही, समजा येत्या दोन दिवसात पूर ओसरला तरी देखील संपूर्ण वारानी येऊन जमीन पेरणी योग्य करण्यासाठी इथून किमान १२ -१५ दिवसं लागतील. सोयाबीन आणि कापूस लागवडीचा कालावधी बघता, लवकरच येणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बघता आता सोयाबीन आणि कापूस लागवट शक्य दिसतं नाही. समजा काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली देखील तरी त्याचा खर्च निघेल यांची शाश्वती नाही. यावर्षी वाढलेल्या बी-बियाणे, खतांच्या किमंती बघता दरवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के जास्तं पैसा खर्च करून उभारलेली शेती तर पाण्यात गेलीच परंतु इथून वर्धा नदी परिसरातील ४० गावाची वाटचाल ही नापिकीकडे आहे, हे जास्त गंभीर आणि भयावह आहे.

पूरामुळे पिकांसोबत शेतजमिनीचे सुद्धा नुकसान..!
शेतामध्ये साठवून ठेवले खते, बियाणे आणि इतर शेतपयोगी वस्तू पूराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेच सोबतच पूराच्या धारेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. अनेक जागी शेतातील बांध उद्धवस्त झाले आहे. शेतीतील सुपीक गाळ वाहून जाणे ही कुठल्याही शेतजमिनीची प्रचंड मोठी हानी असते.

शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा.
पिककर्जच्या मदतीने उभारलेली शेती बुडाल्यामुळे यापुढील कारभार कसा चालवावा असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना सद्यास्थित पडलेला आहे. शासनाने सर्वत्र एकच निकष लावत सरसकट मदत लागू करण्यापेक्षा संपूर्ण हंगाम गेलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी मदत करण्याची गरज आहे. नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई सोबतच शेतजमीनी व्यवस्थित करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
सतीश गिरसावळे,
व्यवस्थापकीय संचालक, Krushak Swaraj


Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam Due to the release of water from the Upper Wardha Dam, floodwaters of the Wardha River entered Shastrinagar, Ambedkarnagar and Shivnagar Colonies in Ghugghus town around midnight on Monday, causing extensive damage to household materials. Visited this flooded area and inspected the damage.

सोमवार, जुलै १८, २०२२

कारंज्यात चिखलातून माखलेल्या रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट:नागरिकांना मनस्ताप

कारंज्यात चिखलातून माखलेल्या रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट:नागरिकांना मनस्ताप


कारंजा (घाडगे)जगदीश बाबू:
कारंजा घाडगे शहरातील वस्तीतील रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून सततच्या पावसाने रस्ता चिखलाने माखलेला आहे संपूर्ण रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हे ठिकाण डासाच्या उत्पत्तीचे केंद्र झाले आहे. या रस्त्याने आवागमन करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत ही समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत नागरिकांच्या जीवाचे काही देणेघेणे नसल्याचे आता नागरिक बोलत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी तसेच बँकेतील अधिकारी पंचायत समिती बांधकाम विभागाचे ऑफिस सरकारी कॉटर्स कान्वेंट मॉडेल कॉलेज न्यायालय रस्त्यावर येत असल्यामुळे इथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषता प्रभारी मुख्याधिकारी याच रस्त्यावरून आवागमन करतात.
गेल्या कित्येक दिवसापासून हा रोड चिखलमय झालेला आहे. या रोडवर डांबरीकरण झालेले होते. मात्र त्यावर खड्डे पडलेले होते. त्या रोडवर नगरपंचायत ने मुरूम टाकून पुन्हा रोड उंच केला. आता त्या रोडची परिस्थिती अशी झाली आहे की खाली रोड आणि त्यावर मुरमाचे भरन त्यामुळे कित्येक अपघात या ठिकाणी होत आहे बाजूलाच न्यायालयाची इमारत आहे. परंतु अजून पर्यंत नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही.
या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार उद्भभवत असून सुद्धा लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मोटर सायकल रोडवर घसरुन अनेक अपघात
गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याविषयी आमदार.माजी आमदार,नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा या रस्त्याचे काम झाले नाही. सतत पाऊस पडत असून पावसाचे पाणी निघून जात नाही परिणामी च्या रस्त्याला डोहाचे स्वरूप येत राहते कित्येक मोटरसायकल वरून इथे घसरून पडले आहे.
चारचाकी वाहने आणि ऑटो रिक्षा चालकांची या पाण्यातून वाहन टाकण्याची हिंमत होत नाही. नागरिकांना ही जीव मुठीत घेऊनच हा रस्ता मार्गक्रमण करावे लागत आहे. शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून अवागमन करतात मात्र अजून नगरपंचायत याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही.
धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू

धक्कादायक:कारंजाच्या आठवडी बाजारात विजेच्या धक्क्याने २ गाईचा जागीच मृत्यू



कारंजा (घाडगे)/जगदीश बाबू:
 रविवार दिनांक 17. 7.2022 ला कारंजा येथील आठवडी बाजारात विद्युत प्रवाह आणि रात्री आठच्या दरम्यान दोन आईचा जागीच मृत्यू झाला. रविवारला कारंजा येथे आठवडी बाजार भरत असतो. त्या निमित्याने भाजीपाल्याचा व्यापार करणारे व्यापारी आपले पाल ठोकून भाजीचा व्यवसाय करीत असतात. 

 तालुक्यातून बरेच ग्रामीण भागात नागरिक बाजार करण्यासाठी कारंजाला येतात. आठवडी बाजारात व्यापाराची पाल टाकून व्यवसाय करीत असताना पाल लावण्याचा खिळा जमिनीच्या वायरिंग वर ठोकल्या गेल्या मुळे  बाजूला विद्युत पोल असल्यामुळे त्या पोलची वायरिंग जमिनीतून असल्यामुळे त्या वायरिंगवर त्या तालपत्रीचा खिळा आल्यामुळे त्या लोखंडी रॉडला करंट आला रात्रीचे लाईट त्या पोल  वरील सुरू असल्यामुळे रात्री आठवडी बाजारात गाई फिरत होत्या. 

आणि त्या ताडपत्रीच्या  रॉडला गाईचा स्पर्श झाला आणि त्या गाईला करंट लागून जागीच मृत्यू झाला.  त्याच प्रमाणे दुसरी गाय सुद्धा त्या गाई  जवळ गेली तिचा पण जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळेस नागरिक जर त्या दुकानाजवळ गेले  असते तर मोठी जीवित हानी झाली असती बोलल्या जात आहे.


weekly market Karanja, electrocution and death 

रविवार, एप्रिल ०३, २०२२

समुद्रपुर परिसरात काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेले अवशेष सापडले

समुद्रपुर परिसरात काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेले अवशेष सापडले



2 एप्रिल रात्री पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीमध्ये नितीन सोर्टे यांचे वाघेडा ढोक शिवारातील शेतात अवकाशातून अवशेष पडल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची मिळून आली. सदर वस्तू पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेण्यात आली आहे.



Remains wrapped in black thread were found in Samudrapur area



मंगळवार, जानेवारी २५, २०२२

सात तरुण जागीच ठार; नागपूर मार्गावर कार पुलाच्या खाली कोसळली

सात तरुण जागीच ठार; नागपूर मार्गावर कार पुलाच्या खाली कोसळली





वर्धा - झायलो कार यवतमाळ येथून नागपूरकडे जात असताना पुलाच्या खाली कोसळली आहे. यात भीषण अपघातात सात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीच्या वेळीला जंगली श्वापदं वाहनासमोर आल्याने वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरी ही कार कोसळली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेले तरुण हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचंही प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे.





तुळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा येथे मोठा अपघात झाला आहे.
सेलसुरा येथील जुना आणि नवीन पुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुस्कान झाले आहे. गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली आहे. या अपघाताची माहिती समजताच सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या अपघातात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांचा देखील मृत्यू झाला आहे.






Yavatmal Nagpur wardha Mumbai Maharashtra India

शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२

ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार

ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार




खासदार रामदास तडस
पत्रकार संरक्षण समितीचे पत्रकार दिनाचे आयोजन

वर्धा (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न , त्यांना शासकीय योजनानेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या समस्या संसदेत मांडू असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यानी पत्रकार दिनी सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभ द हेरिटेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते.
कार्यक्रमास कामगार नेते यशवंत झाडे,पत्रकार प्रशांत देशमुख, ग्रामगीताचार्य गंगाधर जगताप, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, अमरावती जिल्हाध्यक्ष संघापल उमरे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय मालखेडे , महेश ढवळे सह जेष्ठ पञकार अश्विन सव्वालाखे , वर्धा
कार्याध्यक्ष सत्तार शेख , जिल्हाध्यक्ष रविराज घुमे, जिल्हा सचिव योगेश काबंळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना खा. तडस म्हणाले की ग्रामिण पत्रकारांच्या समस्या शासनाकडे मांडल्या जातील. अन्य जिल्ह्याप्रमाणे वर्धेतही पत्रकार भवन झाले पाहिजे. पत्रकारांनी नवीन आणि जुनी संसद भवन पाहण्यासाठी अभ्यास दौरा करु , अशी ग्वाही खासदार तडस यांनी दिली.
यशवंत झाडे बोलताना म्हणाले, पत्रकारिता ही विस्वाहर्या आहे. आजही वृत्तपत्र वाचणारा वर्ग असुन ग्रामीण भागातील पत्रकार सुंदर बातम्या लिहून समाजाच्या प्रश्न जणतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याचे वास्तव आहे.
यावेळी प्रशांत देशमुख, विनोद पत्रे , यानी  विचार व्यक्त केले.
उत्कृष्ठ पत्रकार विशाल कट्टोजवार वर्धा , दिलीप पिंपळे सेलू,  प्रदीपचंद्र कुलकर्णी  समुद्र्पुर,  आनंद छाजड , सिंदी रेल्वे,  निखिल लाड  आष्टी, विनोद घोडे देवळी, महेंद्र जुगणाके खरांगना मोरांगना आश्विन सव्वालाखे यवतमाळ,  धामणगाव  व सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे
पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी, प्राध्यापक सचिन सावरकर , ग्रामीण साहित्यीक नारायण जारुंडे यांना शाल,व  सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रविराज घुमे यानी केले. संचालन संदीप रघाटाटे, पंकज  गाडगे यानी केले, मोहन सुरकार  यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता संजय धोंगडे, प्रशांत आजनकर, बाळा चतारे, गणेश शेंडे, गजानन जिकार, दिपक चौधरी, बाळासाहेब वाघ, विनोद महाजन, गजानन गारघाटे, अवधूत शेंद्रे, रवि साखरे , राजु वाटाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जिल्हयातील ग्रामीण भागातील पञकार उपस्थित होते.



पत्रकार हा समाजाचा आरसा असून तळागाळातील तसेच उच्च विभूषितांच्या समस्या आपल्या लेखणीतून त्या त्या घटका समोर मांडून त्यांना न्याय देतो. पण पत्रकारांच्या दिनाच्या निमित्त कोणतीही संस्था संघटना प्रशासन शासन या दिनाची जबाबदारीची स्वीकारत नाही अशी खंत पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी व्यक्त केली आहे.

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

 अवैध दारुविक्रेत्या धानोरकरची हत्या; जयस्वालला अटक

अवैध दारुविक्रेत्या धानोरकरची हत्या; जयस्वालला अटक


 
अवैध दारुविक्रेत्या धानोरकरची हत्या; जयस्वालला अटक

वर्धा : दारुविक्रेत्या मनोज मुकुंद धानोरकर (32) रा. केळकरवाडी याची जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने सपासप वार करीत हत्या केल्याची घटना वर्धा शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली.  पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करुन पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मनोज भाड्याच्या खोलीत बेकायदेशीर दारुविक्री करीत होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर भाड्याने खोली घेतली होती. त्या खोलीतून तो पोलिसांपासून लपून अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला फोन करुन जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशी तरी वाद सुरु असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.


मृतक मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर 2020 मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजची हत्या केल्याची माहिती आहे. मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारु अड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे 15 ते 20 वेळा सपासप वार करुन मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली.  


 #Murder #Dhanorkar #Jayswal

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

 नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या कामाची केली पाहणी |

नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या कामाची केली पाहणी |

वर्ध्यातील धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची माहिती



नागपूर/ वर्धा 18 ऑक्टोबर 2021
पुराच्या पाण्यामुळे धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होत होते. परंतु ही समस्या आता नाला रुंदीकरण व खोलीकरण यामुळे उद्भवत नसून या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे सुमारे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली असून 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याची माहिती केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज वर्धा येथे पत्रकार परिषदेत दिली. 



नितीन गडकरी (Nitin Gadkari) वर्धा जिल्ह्यातील (Wardha district) जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी करण्याकरता एक दिवसाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ही माहिती दिली. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील येळाकेळी गावच्या धामनदीच्या 26 किलोमीटर लांबीच्या तसेच मांडवा येथील मोती नाल्याच्या 9 किलोमीटर लांबीच्या जलसंधारणाचे कार्य चालू आहे. यातील धाम नदीच्या जलसंधारणाच्या कार्याला जमनालाल बजाज फाउंडेशनने सहकार्य केले असून मोती नाला येथील जलसंधारणाच्या कार्याला जवाहरलाल नेहरू पोर्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळत आहे. अशा प्रकारचे कमी खर्चात तसेच पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम असे प्रकल्प गावागावात उभारले तर कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही असा आशावाद गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी वर्ध्याचे खासदार रामदास तडस, पुर्ती सिंचन संस्थेचे माधव कोटस्थाने उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात तामसवाडा नाला खोलीकरणाने नदीचे पात्र रुंद झाले आणि पाणीसाठा पूर्वीप्रमाणे होऊन नदीचा प्रवाह पूर्ववत झाला हा पॅटर्न 'तामसवाडा पॅटर्न ' म्हणून प्रसिद्ध झाला . अशाच पॅटर्नच्या आधारे वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील मोतीनाला जलसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून मृतप्राय अशा मोती नाल्याचे पुनरुज्जीवन करण्याकरिता नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळाले . तीन टप्प्यात सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा पूर्ती सिंचन समृद्धी संस्था आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे . यामुळे सुमारे 9 किलोमीटर लांबीचा मुख्य मोती नाल्यावर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले असून या प्रकल्पामध्ये सुमारे 280 घन मिलिलिटर जलसाठा प्रति वर्ष होत आहे . त्यामुळे सुमारे 600 एकर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून शेतीपूरक व्यवसायात सुद्धा वाढ झाली आहे .या प्रकल्पाकरिता पूर्ती सिंचन समृद्धी व कल्याणकारी संस्थेचे दत्ता जामदार , माधव कोटस्थाने , सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलिंद भगत तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी यांची मोलाची साथ लाभली आहे .

या मोती नाल्याची पाहणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडवा येथील जन सभेला संबोधित केले . सोयाबीन कापूस यासारख्या पिकाऐवजी या परिसरातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी . फळशेतीसाठी 'वन ड्राप मोअर क्रॉप' या तत्वाद्वारे ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी . तामसवाडा पॅटर्ननुळे या परिसरात जलसंवर्धन झाले असून इथे एकही शेतकरी आत्महत्या होवू नये अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली. मोतीनाला पुर्नज्जीवन प्रकल्पाच्या उभारणीत हातभार लावणारे पाटबंधारे विभागाचे अभियंता मोहाडे यांचा सत्कारही वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी यावेळी केला. यावेळी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच मांडवा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यापुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी मधील धाम नदीच्या जलसंधारणाचे काम बघितले .धाम नदीच्या मध्यम प्रकल्पातून उन्नई बंधाऱ्या पर्यंत सिंचन तसेच एमआयडीसीमध्ये औद्योगिक वापराकरीता वापरल्या जाणा-या पाण्याचा प्रवाह बारमाही असतो. परंतू या प्रवाहामुळे नदीपात्रात काटेरी झुडपे तसेच इतर वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात झालेली वाढ नदी प्रवाहात अडथळा निर्माण करत . यासोबतच या नदी तीरावर पाणीपुरवठ्यासाठी विहिरी खोदल्या होत्या त्यामध्ये सुद्धा दूषित पाण्याचा पुरवठा होत होता या पाणीपुरवठ्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुढाकाराने व वर्ध्यातील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने धाम नदीतून गाळ काढण्याचे काम हे 27 ते 31 मे 2021 दरम्यान करण्यात आले आणि यामध्ये नदीप्रवाहाच्या 200 मीटर लांबी मधून एकूण 16 हजार 233 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे . याचा फायदा कालव्यातील पाणीसाठा वाढण्यास आणि शेती सिंचनास झाला आहे .या धामनदीच्या पुनर्जीवन्नप्रकलुआ अंतर्गत कांचनुर ते मोरांगना, मोरांगना ते खैरी , खैरी ते आंजी मोठी , आंजी मोठी ते येळीकेळी अशा 26 किमी लांबीच्या नदी जलसंधारणाचे काम राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्यामार्फत केले जात आहे.

Kanchanur to Morangana, Morangana to Khairi, Khairi to Anji Mothi, Anji Mothi to Yelikeliinspects water conservation work 

सोमवार, जुलै १९, २०२१

हिंगणघाटच्या आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश सुरू

हिंगणघाटच्या आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश सुरू


शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट येथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दि.16 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,व इतर माहिती साठी
admission.dvet.gov.in
या वेब साईट (संकेत स्थळं) वर भेट देणे.
१) Welder(संधाता) -४०
२) COPA-२४
३)Dress macking--२०
४)Basic Cosmotology -२०
एकूण---१०४ जागा
या वर्षी वरील प्रमाणे व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहेत.


सदर व्यवसायात प्रवेश घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना नामांकित कंपन्या मध्ये apprentice तसेच नोकरीची संधी उपलब्ध होते.
तरी सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटात वाढत्या बेरोजगरीला अनुसरून आय.टी. आय.प्रशिक्षण हे नोकरी / व्यवसायची हमी देत आहे. तरी, या शिक्षणाच्या संधीचा लाभ युवक/युवतींनी घ्यावा.
पात्रता -:10 वि.पास.नापास


*सदर मॅसेज प्राप्त झालेल्या सर्वांनी सामाजिक व राष्ट्रीय कार्य समजून सर्व 'whatsapp' ग्रुप /फेसबुक ला फॉरवर्ड करण्याचे करावे ही विनंती.*
राकेशकुमार कोडापे साहेब
प्राचार्य,
आय.टी .आय .
हिंगणघाट,जिल्हा वर्धा



रविवार, मे ३०, २०२१

वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या

वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या

 

कारंजा,(घाडगे) : 
आर्वीी मतदारसंघाच्या तीनही तालुक्यातील रुग्णालयाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी करण्यासाठी आज पाहणी केली.

कारंजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जुनी इमारतसह, ट्रामा केअर इमारत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी उपयोगात घ्या असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत व ट्रामा केअर इमारत खाली असल्याने येथेच चांगल्याप्रकारे १०० खाटाचे कोविड सेंटर सुरू करता येणार आहे. येथे तशी जागा उपलब्ध आहे. आणि आष्टी व कारंजासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बाजूला ऑक्सिजन प्लॅन्ट तयार करू असे यावेळी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले. ट्रामा केअर इमारतीला लिफ्ट नसल्याने त्वरीत मागणी करा तात्काळ लिफ्ट लावण्यात येणार असेही यावेळी सांगण्यात आले.रुग्णाच्या सोयीसाठी लवकरात लवकर सूरु केलं तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार , मुख्याधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक , तहसीलदार सचिन कुमावत , गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रभाकर वंजारी ,डॉ .महेंद्र घागरे, डॉ राजेंद्र कोटेवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

प्रशांत धारपूरेच जिल्हाधिकारीनी केलं कौतुक
ग्रामीण रुग्णालयात मोठमोठ्या इमारत असताना येथे जनरेटर उपलब्ध नसल्याने तालुक्यातील राजनी येथील ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापक असलेला प्रशांत उत्तम धारपूरे याने ५ लाख ४० हजार किंमतीचे ६२.५ केव्हीचे जनरेटर व पाच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले याची आज जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाहणी केली यावेळी या युवकाचा कौतुक करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात भेट दिलेल्या वॉटर प्लॅन्टच उद्घाटन

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघाकडून ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी पैसा गोळा करून दोन लाख 50 हजाराचे वॉटर प्लॅन्ट लावण्यात आले याचे आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उद्घाटन केले. यावेळी शिक्षक संघ उपस्थित होते.