Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

नागरी समस्या संघर्ष समितीची
विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.

कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.

वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.

अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.