Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्धा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा | Latest and Breaking News in Marathi

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा | Latest and Breaking News in Marathi

मंदिरावर चढलेल्या तिघांचा मृत्यू; रक्षाबंधनच्या दिवशी या गावात शोककळा


वर्धा, 30 ऑगस्ट 2023: वर्धा जिल्ह्यात पिपरी मेघे गावात बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. (Latest and Breaking News in Marathi | Live Marathi )

अशोक सावरकर (55), बाळू शेर (60) व सुरेश झिले (33) अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. मंदिराच्या झेंड्याचा खांब जवळपास 25 फूट उंच होता. मंदिरावर झेंडा लावताना अचानक खांब कलंडला आणि शेजारून जाणाऱ्या 33 केव्ही विजेच्या तारेवर पडला. यामुळे अशोक सावरकर, बाळू शेर व सुरेश झिले या तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. ते तिघेही मंदिराच्या शेडवर पडले. तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Rakshabandhan)

LATEST POSTS




या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी विजेच्या धोक्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विजेच्या कामात कुशल कर्मचाऱ्यांनाच हाताळावे. स्वतःहून विजेच्या कामात हात घालू नये. Rakshabandhan रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. त्यात सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.




3 People Killed in Electric Shock in Maharashtra

Three people were killed in an electric shock while putting up a flag at a temple in Pimpri Meghe village in Wardha district, Maharashtra on Wednesday morning.


The deceased have been identified as Ashok Sawarkar (55), Balu Shere (60) and Suresh Jile (33). They were all trying to put up a flag on the temple's 25-foot-tall flagpole when the pole suddenly fell and came in contact with a 33 kV overhead power line. The three men were electrocuted and fell to the ground. One of them died on the spot, while the other two died in hospital.

The police have registered a case and are investigating the matter.

  • Violence - 3 people died due to electric shock.
  • Temple - the incident happened at a temple.
  • Flag - the people were trying to put up a flag.
  • Electricity - the people died due to electric shock.
  • Death - 3 people died in the incident.
  • Accident - the incident was an accident.
  • Warning - the article warns people to be careful around electricity.

Pipri Meghe Wardha Pin Code

'या' गावात रक्षाबंधनाच्या दिवशी बांधत नाही 'राखी'
Rakshabandhan : रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या बहिणीने मनगटावर बांधलेली राखी अभिमानाने दाखवतो. या दिवशी क्वचितच कोणी लहान मूल, वृद्ध किंवा तरुण असेल ज्याच्या मनगटावर राखी बांधलेली नाही. पण, उत्तर प्रदेशातील एक असे गाव आहे, जिथे गेल्या अनेक शतकांपासून नव्हे तर अलीकडच्या वर्षांत रक्षाबंधन हा सण साजरा केला जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी या गावातील प्रत्येक भावाचे मनगट खाली राहते. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीमुळे दोन्ही गावांमध्ये रक्षाबंधन साजरे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवार, मार्च २२, २०२३

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित

सनशाईन स्कूलमध्ये गुढी प्रदर्शनी आयोजित


उमेश तिवारी/ कारंजा:
21 मार्च मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर सनशाईन स्कूल कारंजा (घा )येथे पूर्व दिवसाला गुढी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.

या प्रदर्शनी मध्ये वर्ग 5वी व वर्ग ६वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यामध्ये पलक पालीवाल ,फाल्गुनी ढगे ,प्रांजली खवशी ,सांझी मोटवानी,मृणाली केवटे ,समृद्धि भांगे,काव्या भिंगारे,आराध्या ढबाले,श्रुति एकापूरे,शर्लिन घागरे,रुधवी दळवी , अक्षरा चाफले,हर्शिका बन्नागरे,हेमांगी बारंगे,मोनिका डंढाळे,स्वरा वानखेडे,अलिजा शाह,राम शेखार,आदित्य वाघ,कृष्णा पाठे,सानिध्य दिढेकर या विद्यार्थांनी सहभाग घेतला.

या प्रदर्शनीचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमसिंग महीले यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना गुढी पाडवा चे महत्व थोडक्यात समजवून सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गुढी प्रदर्शनीचा अनोखा आनंद अनुभवला.व गुढी प्रदर्शनाची सांगता झाली.

गुरुवार, सप्टेंबर ०१, २०२२

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित:कारंजातील विजेचा लपंडाव थांबवा

नागरी समस्या संघर्ष समितीची
विद्युत वितरण कंपनीकडे मागणी
प्रतिनिधी:कारंजा (घाडगे)/जगदीश कुर्डा:
कारंजा ( घा ) कारंजा शहरातील गेल्या कित्येक दिवसापासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा थांबवावा आणि ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातील फोन लाईनमे न नी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी उचलावा अशा मागण्यांचे निवेदन उप कार्यकारी अभियंता ए. डी. राजुरकर विद्युत वितरण कंपनी कारंजा यांच्याकडे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने केली आहे.

कारंजा वरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या २२० के. व्ही. उपकेंद्र हेटीकुंडी पारेषण कंपनी येथून कारंजा करीता वीज पुरवठा घेतलेला आहे. तरीपण कारंजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सणासुदीच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती आहे. थोडासा वादळ- वारा आला तरी वीज खंडित होते, कधी वीज ट्रीप झाल्यासारखी पाच- पाच मिनिटा करीता खंडित होते त्यामुळे घरातील विद्युत उपकरणावर त्याचा परिणाम होतो. कधी रात्रीलाही वीज जाते, कधी तास- दोन तासाकरीता वीज खंडित राहते. त्यामुळे नागरिकांना, गृहिणींना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, सरकारी कार्यालयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील स्थानिक विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी वीज ताराच्या खाली झाडे वाढलेली आहेत, त्या झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करते. त्यामुळे कधी कधी ताराची स्पार्किंग होऊन त्या परिसरातील वीज खंडित होते. त्याकरीता नेहमी तत्परतेने वीज ताराखालील झाडाच्या फांद्या कापण्यात याव्या.

वीज संदर्भात ग्राहकांना कोणती अडचण आली. तर त्या संबंधित तक्रार करण्याकरीता स्थानिक संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन स्वीकारून तत्परतेने सेवा द्यावी.

अशा विविध समस्या नागरी समितीने उप कार्यकारी अभियंता ए.डी. राजूरकर यांच्यापुढे मांडल्या व निवेदन सादर केले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

सिंदीजवळ वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब | INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI

सिंदीजवळ वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब | INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI

आझादी का अमृत महोत्सव
विदर्भाची जिल्हानिहाय क्षमता

वर्धा

१) नियोजन - सिंदीजवळ भारतातील सगळ्यात मोठे वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब

कारण - 
अ) मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे तयार झाला अस्ल्याने बर्ध्याजवळ अनेक व्यवसाय संधी. मुंबई, नाशीक, पुणे यासह मुंबई जवळील शहरांमध्ये वेयरहाऊसिंग व वितरण बरेच खर्चिक, महाग आहे. योग्य धोरणाचा पाठिंबा मिळाला तर विदर्भ प्रदेशातील वर्धा व्यवसाय आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मुंबई, पुणे, नाशिक हा प्रवास काही तासांचा असल्याने तसेच मनुष्यबळ, वेयरहाऊसिंग आणि वितरणाचे दर बरेच कमी असल्याने लॉजिस्टिक्स, वेयराहाऊसिंग, वितरण कंपन्यांसाठी प्रचंड बचत.
ब) जीएसटी लागू झाल्यामुळे, विदर्भाच्या आस्थापनेतून, नागपूर, जबलपूर, रायपूर, भोपाळ, इंदूर, हैदराबाद, पुणे मुंबई नाशिकसह अनेक मेट्रो शहरांशी वर्ध्यातून संपर्क करत अधिक दुप्पट लोकसंख्या समाविष्ट होऊ शकते. कमी वेयरहाऊसिंग खर्चामुळे वितरणाचे प्रमाण अनेकपटींनी वाढू शकते आणि चांगल्या गुंतवणूक अनुकूल धोरणांमुळे मोठी गुंतवणूक येणे शक्य. हजारो कुशल आणी अकुशल मनुष्यबळाला रोजगार मिळेल.
क) देशाभरातून माल घेणार्‍या ऑनलाईन रिटेल मार्केटिंग कंपन्यांना असे मोठे वेयरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स, वितरणाचा लाभ होईल. नागपूर जवळील वर्धा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने उत्पादक कंपन्यांना कमी किंमतीत जलद वितरण करता येईल.
ड) या प्रयत्नांमुळे राज्य शासनाचा जीएसटी महसूल अनेक पटींनी वाढेल तचे एमएसआरडीसीसाठी होणार्‍या टोल संकलनात मोठी वृद्धी होईल आणि गुंतवणुकदारांना धोरण पाठिंब्यातून दिलेले प्रोत्साहनाची भरपाई होईल.

२) नियोजन - एकात्मिक स्टील प्रकल्पाजवळ सरकारच्या क्लस्टर धोरणांतर्गत मोठे स्टील क्लस्टर
कारण - १२० किमीच्या त्रिज्येत जवळपास २ एमएमटीपीए क्षमतेचे ३ मोठे स्टील प्रकल्प. या प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त प्राकारच्या स्टीलचे उत्पादन केले जाते. स्टील क्लस्टरमध्ये विद्युत, फॅब्रिकेशन, कृषी उपकरणे, साधने, टॉगल्स, हार्डवेयर वस्तू, बांधकाम उपकरणे, वस्तू हाताळण्याची उपकरणे तयार केली जाऊ शकतात. जवळपासच्या आघाडीच्या सर्व स्टील उत्पादकांच्या डेपोमध्येही स्टील उपलब्ध.

याचप्रकारे, या प्रकल्पांसाठी अलगणारे अनेक इनपुट्स या क्लस्टरमध्ये तयार केले जाऊ शकतात. स्टील प्रकल्पाच्या साहाय्याने शहराचा विकास कसा होऊ शकतो याचे भिलई हे उदाहरण आहे. या इनपुट क्लस्टरसाठी कच्चा माल म्हणून अनेक खनिजे, कोळसा, वीज आणि मनुष्यबळ जवळपास उपलब्ध आहे. सतत दुरुस्ती, दुरुस्ती-तपासणी देखभाल, उपभोग्य वस्तूंसारख्या उत्पादनांची प्रचंड आवश्यकता असते. राज्याकडून पुन्हा योग्य धोरण आवश्यक आहे.

आदरणीय नितीन गडकरी सर आधीच सिंदी ड्राय पोर्टला शक्य तितका सर्वोत्कृष्ट पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबई-नागपूर एक्सप्रेस-वेमुळे वर्धा जिल्ह्यात नाशवंत नसलेल्या वस्तूंसाठी मोठी संधी आहे.

प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने


*AZADI KA AMRIT MAHOTSAV IN VIDARBHA*

*DISTRICT WISE POTENTIAL IN VIDARBHA*

*WARDHA*

1)PLAN- INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI 

LOGIC--A)With MumbaiNagpurExpressway ready many Business Opportunities near Wardha. Warehousing&Distribution much more costly near Mumbai covering Mumbai Nasik Pune Cities.With right policy support Wardha in VIDARBHA region most suitable place to attract this business. As Mumbai Pune Nasik few hours journey huge savings for Logistics, Warehousing and Distribution companies due to much lower rates of Manpower,Warehousing and Distribution. 

B)With GST in place VIDARBHA establishment can cover double population with more MetroCities from Wardha like Nagpur,Jabalpur,Raipur,Bhopal,Indore,Hyderabad,With Pune Mumbai Nasik. Manifold increase in Distribution volume with lower Warehousing costs and better investor friendly policies huge investments may come.Thousands of Skilled,Unskilled manpower get engaged. 

C)Such large Warehousing,Logistics Distribution mostly benifit Online Retail Marketing Companies where Procurement done from all over country.Wardha near Nagpur Most Centrally located City helps manufacturing companies to deliver fast at lower costs.

D)With this efforts State Govt GST revenues may increase manifold as well as Huge increase in Toll Collection for MSRDC will compensate incentives given by policy support to investors. 

2)PLAN---LARGE STEEL CLUSTER UNDER GOVT CLUSTER POLICY NEAR INTEGRATED STEEL PLANT. 


LOGIC---3 Large Steel plants with approx 2MMTPA capacity working in 120KM Radius.Maximum Varities of Steel Produced by these plants.From Electricals,Fabrication,AgriEquipments,Tools&Toggels,Hardware items,Construction Equipments,Materials Handling Equipments can be Made in Steel Cluster.Steel also available from Depot of all leading Steel Producers nearby. 

2)Same way many inputs required in these plants can be made in this cluster. Bhilai an example how City developed With Steel Plant Support. Many minerals,Coal,Electricity, Manpower nearby as Raw materials for this Input Cluster.Constant Repair Overhaul maintenance,Consumables like products having huge requirements. Again suitable policy from State must. 

3)ADVANCED TECHNOLOGY VEHICLE SCRAPPING PLANT 

LOGIC--A)Govt of India few months back announced VEHICLE SCRAPPING POLICY Where 15 years old vehicles must be scrapped.Advanced technology plant in Wardha can handle huge number of Old Vehicles coming from 20-25districts.Mechanical Seperation of different items possible by latest technology plants only. 

B)Different types of Scrap like Castings,Forgings,MildSteel,Rubbers,Plastics,Cables and many more items need nearby users.In Wardha itself large Steel plant working.Nearby districts Chandrapur,Nagpur,Bhandara also having bulk consumers.Win Win Situations for all.

C)As Shri Nitin Gadkari Sir saying with such Recycling cost of Auto Component will come down substantially will help M&M and attract new Automobile Companies to invest.Employments&Opportunity for Entrepreneurs both. 

Respected Nitin Gadkari Sir already trying hard to ensure best possible support to SINDI dry port.With MN Expressway huge opportunity for Perishable Non Perishable items here in Wardha dist. 

TOMORROW *AMRAVATI*

PRADEEP MAHESHWARI STRATEGIST NATURAL RESOURCES NAGPUR



बुधवार, जुलै २०, २०२२

 वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam

वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam

 चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. लष्कराचे एक पथक, एनडीआरएफचे एक पथक, एसडीआरएफच्या दोन तुकड्या व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.




नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सध्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच जिल्ह्यात नागपूरचे एसडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ टीम व तालुका प्रशासन यांनी २ हजार २४७ लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविले आहे.
कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलैपर्यंत सकाळी सहा वाजतापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती
राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले असून आतापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०९ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर १८९ प्राणी दगावले आहेत.पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत: तर २०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १८ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड-१ महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ तुकड्या तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१, चंद्रपूर -२, यवतमाळ-१ अशा एकूण पाच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात येत आहे.

Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam