Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२
रविवार, एप्रिल ०३, २०२२
पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी घसरली; बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली |
शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन | Book Publications
जुन्नर /आनंद कांबळे
नाशिक येथील प्रसिद्ध डाँक्टर संजय दामू जाधव यांच्या मातोश्री तुळसाबाई दामू जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने संघर्ष योध्दा पुरस्कार व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन येत्या १२डिसेंबर रोजी म्हसरुळ (नाशिक) येथे होत आहे.
प्रा. धम्ममसंगिनी रमागोरख ( विभाग प्रमुख ,महिला विकास प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ) यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
संघर्ष योध्दा पुरस्कार भगवानभाऊ ठाकरे (परिवर्धा ता.शहादा जि.नंदूरबार ) यांना देण्यात येत आहे, ठाकरे गेली ५०वर्षे सालदार म्हणून काम करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापित लोकांच्या विरोधात पँनेल उभे करुन निवडून आणले.म्हणून विरोधकांनी त्याचा एक हात व एक पाय तोडला.
तरीसुद्धा न घाबरता ते आदिवाशी व आंबेडकर जनतेचे संघटन व कबीरांचे दोहे म्हणून समाजप्रबोधन करत आहेत असे डाँ.संजय जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१
अंगणवाडीताईंनी एकत्र येवून पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती
पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी मेहनत घेणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका : अन्नपूर्णा जगदीश अडसुळे
नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ हा शहरी भागातील १०० अंगणवाडी केंद्रा़चा प्रकल्प त्यातही नाशिक महानगरपालिका, मनमाड, येवला व भगूर या नगरपालिका क्षेत्रात कार्यक्षेत्र असलेला हा प्रकल्प आहे...या प्रकल्पाने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियानात सातत्यपूर्ण कामकाज केलेले आहे..त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा सेविका, मुख्यसेविका या टिमचा आॕगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर महिला व बाल विकास मंत्री मा. स्मृती इराणी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
.आजही या प्रकल्पातील अंगणवाडीताई याच उत्साहाने कामकाज करत आहेत..याची प्रेरणा या ताईंना अन्नपूर्णा जगदिश अडसुळे या अंगणवाडी केंद्र क्र.६७ मनमाडच्या अंगणवाडीताईने दिली...आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर जनजागृती कशी करावी हा प्रश्न असतांना या प्रकल्पातील ताईंनी एकजूटीने नियोजन करुन हा प्रश्नही मार्गी लावला आहे...काही अंगणवाडीताईंनी एकत्र येवून सोशल मिडियाचा वापर जनजागृती करण्यासाठी करायचे ठरविले व त्यांनी उपयुक्त असे छोटे- छोटे व्हिडीओ तयार केलेत..हे व्हिडीओ लाभार्थी पालकांपर्यंत पोहोचविले जात आहेत..आज ही हे काम सुरु आहे..यासाठी या सर्व ताई आपले अंगणवाडी केंद्राचे मुळ कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवसासह अतिरिक्त वेळ देवून हे व्हिडीओ तयार करत आहेत. यासाठी अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, सविता तायडे, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव, अलका लोखंडे या अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत. आतापर्यंत १२ व्हिडीओंचे काम पूर्ण झाले असून हे सर्व व्हिडीओ सोशल मिडियाद्वारे जनजागृतीसाठी वापरले जात आहेत..लाभार्थी व पालक, परिसरातील नागरिक यांचेकडून या कामाचे कौतुक केले जात आहे..हे सर्व व्हिडीओ बनविणेसाठी या अंगणवाडी सेविकांना पुष्पा वाघ व शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे..राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त अन्नपूर्णाताई अडसुळे यांचे संपूर्ण कुटुंबच नाशिक (नागरी) २ प्रकल्पाला याकामी स्वेच्छेने मदत करत आहे..
गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१
चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत
बुधवार, एप्रिल २१, २०२१
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
महाराष्ट्र शोकमग्न आहे!
मुंबई, दि. 21 : “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-------------
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.
कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.
यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
000
नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख
मुंबई, दि. 21 : नाशिक येथे ऑक्सिजन टाकीतून प्राणवायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत करोना रुग्णांच्या झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध करोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
Breaking: ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा गेला जीव
गुरुवार, मार्च २५, २०२१
नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी
अंतिम मंजुरी करिता केंद्र सरकारडे पाठविला प्रस्ताव
नाशिक ,२५ मार्च : नुकतेच लोकसभेच्या पटलावर घोषित झालेल्या नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी मिळाली असूनसदर प्रस्ताव अंतिम मंजुरी करिता केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे कि, ०१ फेब्रुवारी २०२१रोजी लोकसभेत केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रु. ची घोषणा केली होती ज्याला पीआयबीची देखील मंजुरी मिळाली आहे. नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.
३२ कि.मी. मार्गिकेवर २ कॉरिडॉर असतील व ३० मेट्रो स्थानकांचा समावेश असणार असून रु. २०९२ कोटी रुपयांची गुंतवणुक असणार आहे व सदर प्रकल्पा ४ वर्षात पूर्ण होईल. अत्याधुनिक आणि किफायतशीर मास ट्रांजिट सिस्टम ही टायर बेस्ड कोच असणार असून इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्कशन धावणार आहे. टियर २/३ शहराकरिता अतिशय उपयुक्त वाहतुकीचे साधन आहे. मेट्रो नियो ही नाशिक शहरातील नागरिकांना आरामदायक, सुविधाजन,सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल अशी सेवा सक्षम आहे. केंद्रीय आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
(नाशिक मेट्रो नियो प्रकल्प) :
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रो ला देण्यात आली असून यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश होता. महा मेट्रोने नाशिक शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाचे नियोजन केले, मेट्रो नियो प्रकल्पाची संकल्पना ही नवीन असून देशात पहिल्यांदा या प्रकारचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे. मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून नाशिक आणि तत्सम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. सर्व साधारण पणे २०- ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनकरता वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता योग्य त्या उपायावर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ रोजी टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एक वाक्यता आणन्याकरता या समितीची स्थापना केली होती.महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली त्याच अनुषंगाने ही मेट्रो नियो संकल्पनेची अंबलबजावणी करण्यात आली जे कि, संपूर्ण देशासाठी आदर्श,दिशादर्शक आणि परिवहन क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प असेल.
नाशिकच्या मेट्रो नियो प्रकल्पाचे ठरक वैशिष्ट्ये:
• पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका :
लांबी : १० कि.मी स्टेशन : गंगापूर,जलापूर,गणपत नगर,काळे नगर,जेहाण सर्कल,थटे नगर, शिवाजी नगर,पंचवटी,सीबीएस आणि मुंबई नाका.
• दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड :
लांबी : २२ कि.मी स्टेशन : ध्रुव नगर,श्रामिक नगर,महिंद्र,शनेश्वर नगर,सातपूर कॉलोनी,एमआयडीसी,एबीबी सर्कल,परिजात नगर,मिको सर्कल,सीबीएस,शारदा सर्कल,द्वारका सर्कल,गायत्री नगर,समता नगर,गांधी नगर,नेहरू नगर,दत्त मंदिर,नाशिक रोड तसेच सीबीएस हे दोन्ही मेट्रो कॉरीडोर करता इंटरचेंज स्टेशन असेल.
सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१
मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ शंखनाद आंदोलन

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्याविरोधात रामकुंड नाशिक येथे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने शंखनाद आंदोलन केले. यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांच्यासह प्रमुख साधुसंत उपस्थित होते.
शुक्रवार, जानेवारी २९, २०२१
#Election : बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूकच रद्द

नाशिक : येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करत कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या लिलाव प्रक्रियेनंतर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया जरी संपूर्ण झाली असेल. मात्र, येवला तालुक्यातील कातरणी येथील अकरा सदस्य ग्रामपंचायत बिनविरोध करत हनुमान मंदिरासाठी 11 ते 21 लाख रुपयांदरम्यान लिलावाची बोली लागल्याची ऑडिओ क्लिप तक्रारदाराने निवडणूक आयोगाकडे सादर केली.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले. निवडणूक आयोगाला तपासादरम्यान तथ्य आढळून आल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड विधानाचे प्रकरण 9-अ नुसार, अथवा अन्य कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या कारवाईचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
मोहन सोनवणे यांनी याप्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत हा मोठा निर्णय घेतला. यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत
रविवार, जुलै १९, २०२०
संत नामदेव महाराज ६७० वा संजिवन समाधि सोहळा
रविवार, जुलै १२, २०२०
हरणाचा चारा पाण्याचा प्रश्न सुटला
शनिवार, जून २७, २०२०
दुधाला भाव मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय संकटात; शेतकरी चिंतेत milk nashik
🗯
" पाहतांना जास्त जनावर, मोठा गोठा दिसतं असला तरी याच्या मागील मेहनत, खर्च हाही मोठा असतो.जनावरांचे काम करण्यासाठी वेगळा मजूर कामावर ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी, गोठ्याची स्वच्छ्ता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्व:ताला व घरातील माणसांनाच करावी लागतात. याचा कोणताही हिशोब किंवा वाटा कोठेही गणला जात नाही.येवढी मेहनत करुन ही पाण्या पेक्ष्या कमी भावात दूध विकावे लागत आहे".
- नानासाहेब आहेर दूध व्यवसायिक , गारखेडा.
गुरुवार, जून २५, २०२०
एक हजार पंचवीस बालकांना मिळणार लाभ
येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्याकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किट चे वितरण..!
रविवार, जून १४, २०२०
पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष किंमतीच्या डिझेलवर चोरट्यांचा डल्ला!
सोमवार, मे १८, २०२०
ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी
मंगळवार, मे १२, २०२०
देवळाणे येथे रेशन दुकान व लग्नमंडपाच्या गोडाऊला भीषण आग; लाखोंचे नुकसान
कातरणी येथे PPE किट ,मास्क , Sanitizer, जंतु नाशक साबणचे वाटप
शनिवार, मे ०९, २०२०
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये
सामाजिक कार्यकर्ते इंजि. विजय खैरनार यांचे आवाहन!
येवला : सध्या कोरोना व्हायरसचया भितीने सर्व लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनी विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते विजय खैरनार यांनी केले आहे. सहकार्य करा कोरोना व्हायवरसाला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे असे आहे.आज देशात कोरोना व्हायरस सारखा भयंकर रोग पसरत आहे त्यामुळे सपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहेत या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये कोरोना व्हायरसला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण घरीच थांबावे कोणीही बाहेर फिरू नये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वानी विचार करून घरी थांबून यासाठी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करावे आपण व आपल्या घरातील प्रत्येकाला बाहेर जाऊ देऊ नका स्वत: बरोबर आपण आपल्या परिवाराची सुरक्षितेची काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करावे परिसरातील गावा गावात बाहेरगाव वरून नागरिक आले आहेत त्यांनी तपासणी करून द्यावी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही घराबाहेर निघू नये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर निघू नये त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करून कोरोना रोखण्यासाठी घरातच राहावे इतर गावातील लोकांना आपल्या गावात येऊ देऊ नका तसेच आपण देखील घर सोडू नका घरात राहा काळजी घ्या आपण घरी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते इंजि.विजय खैरनार यांनी नागरिकांना केले आहे.
शुक्रवार, मे ०८, २०२०
विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह
विंचुर ता.०८ येथील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील दोन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात येथील रहिवासी व मालेगाव येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्ट येण्यापूर्वी सदर इसमाचा विंचूर गावातील इतर नागरिकांशी संपर्क आला होता. तपासणी अहवालात पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून शासकीय यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली. संबंधिताच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले, व दोन मजूर यांचे येवला येथील कोविड १९ कक्षात विलगीकरण करण्यात आले. तसेच संबंधिताच्या संपर्कातील ४० जणांना येथील कर्मवीर विद्यालयात व काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. येथील विद्यालयात विलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ११ जणांना मंगळवारी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीस पाठवून पिंपळगाव येथेच विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचे गुरुवारी अकरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्य़ाने विंचूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र शुक्रवारी सकाळी येवला येथे त्याच्या कुटुंबांतील त्याची पत्नी वय ३७ व मुलगा वय १९ हे दोन पॉझिटिव्ह आले तर एक मुलगा व दोन मजुर असे ३ रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने विंचूर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे.त्यामुळे काही दिवसापुर्वी १० मे पर्यंत जाहिर केलेल्या कंन्टेनमेंट झोनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चीन ते विंचूर..
कोरोनाचा प्रवास कसा झाला ?
डिसेंबर पासून चीनमध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा आजाराचा विंचूर प्रवास धक्कादायकच म्हणावा लागेल. लाँकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून प्रशासनाकडून कठोर कारवाई/उपाययोजना करत विंचूरकरांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लासलगाव जवळ जिल्ह्यातला पहिला रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेसह काही ग्रामपालिका सदस्यांनी जीवाची पर्वा न करता गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढणाऱ्या मालेगाव शहरात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा संपर्क विंचूरशी झाला अन विंचूर नगरीत य़ा आजाराने प्रवेश केला. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन खबरदारी घेतल्यास गावातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होतील.


