चंद्रपूरमध्ये महिलांनी मोठ्या लढ्यानंतर दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, मे ३१, २०२१
शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०
विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले
शनिवार, सप्टेंबर १४, २०१९
जैन समाजाला तब्बल सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष
शनिवार, ऑगस्ट ३१, २०१९
बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
बुधवार, ऑगस्ट ०७, २०१९
बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात
सोमवार, ऑगस्ट ०५, २०१९
बळसाणे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांडून बुराईला साडी, चोळी खणाचा आहेर भेट
शुक्रवार, जुलै १२, २०१९
पत्रकार गणेश जैन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विमलनाथाच्या जयजयकारात जैन मुनींचे चातुर्मास प्रवेश
- शोभायात्रे ने वेधले लक्ष
- लेझीम पथक, भजनीमंडळ, कलशधारी महिला
- बँड पथक जैन स्तवनांनी दुमदुमले बळसाणे गाव
सोमवार, जुलै ०८, २०१९
भाविकांचे श्रध्दास्थान बनले बळसाणे गावाचे विठ्ठल मंदिर
बळसाणे तीर्थोध्दारख जैनमुनिंच्या चातुर्मासाची जय्यत तयारी
रविवार, जून ०९, २०१९
राहुल जैनने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख
संडे स्पेशियल : दहावीत मिळविले ९६ टक्के गुण
गणेश जैन, खबरबात / धुळे
बळसाणे : शिरपूरात वडिलांचे ललित स्विट म्हणून गोळ्या बिस्किट चे दुकान स्विट मार्ट चालवून राहुल ला शिक्षणसाठी त्याचे मामा पंकज कर्नावट व योगेश कर्नावट यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासून पुणे शहरात नर्सरीत राहुल चे अँडमिशन केले तसेच शिरपूरात वडिल गोळ्या बिस्कीट चा व्यवसाय करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलांचा स्वप्नांना पंख देत राहुल ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले
घराची परिस्थिती साधारण असली तरी मुला मुलींना चांगले शिक्षण द्यावे असे स्वप्न पाहत वडील ललित जैन हे रात्रंदिवस एक करीत मुलगा आणि मुलगी व भावाच्या मुलगा आणि मुलगीला शिक्षण देत आहेत ललित जैन यांचा मोठा मुलगा राहुल हा शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील दाजीकाका गाडगीळ शाळेचा विद्यार्थी आहे यंदा दहावी चे वर्ष त्यात शिक्षणाचा खर्च अन् संसाराचा गाडा चालविणे सोपी गोष्ट नाही पण काही असो माझ्या चौघ्या लेकरांना शिकवीण अशी मनाशी जिद्द ठेवली आणि राहुल ने ते स्वप्न अखेर आई बाबांसह मामा मामींचे पुर्ण केल्या चे आजच्या परिस्थितीत जाणवयाला लागले आहे राहुल ला कुठल्याही प्रकारचे ट्यूशन देखील नाही सेल्फ स्टडी करून शाळेत प्रथम क्रमांका ने उत्तीर्ण झाल्याचे कौतुक परिवारातील सदस्य व आप्तगणांना होत आहे बापाने काटकसर व दिवसाची रात्र करीत ललित जैन हे शिरपूरात छोटेसे गोळ्या बिस्कीटाचे व्यापार करीत आहेत माझ्या दोघी मुलांसह लहान भावाच्या दोघी मुलांनी उच्च शिक्षणापर्यंत मंजील गाठावी व ते उच्च पदापर्यंत जावे असे नात , नातीं चे स्वप्न आजी आजोबांना लागले आहे तसेच राहुल च्या आई सविता ने ही तितकीच साथ दिली आई बाबांचे स्वप्न साकारत राहुल ने इयत्ता दहावीत ९६ टक्के गुण मिळवून शिक्षणाच्या पहिल्या प्रवासाची बलाढ्य झेप घेतली राहुल च्या यशामुळे पुणे येथील मामा मामी , आजी आजोबा व त्याचे शिरपूर शहरातील आजी आजोबा , आई , वडील , काका काकू यांच्या स्वप्नांना नवे पंखे फुटले असून राहुल ने आणखी जास्तीत जास्त शिकावे अशी अपेक्षा राहुलच्या नातेवाईकांनी व्यक्त केली
राहुल चे ध्येय डॉक्टर बनवून समाजसेवा करण्याची जिद्द
आई बाबांच्या स्वप्नांना पंख देत इयत्ता दहावीत उत्तीर्ण होऊन गगन भरारी घेणाऱ्या राहुल ला समाजा ला डॉक्टर बनून समाजसेवा करायची तयारी दाखवली आहे सध्या तरी राहुल ने एम.बी.बी.एस.करण्याची मनाची तयारी दाखवली आहे राहुल चे हे ध्येय असून या दिशेने त्याची वाटचाल राहणार असल्याचे राहुलने कौतुकाने सांगितले आणि याप्रसंगी मला लहानपणापासून च माझ्या मामा मामींनी व आजी आजोबानी खूपच मार्गदर्शन दिले हा श्रेय त्यांचा असल्याचे कौतुकात सांगितले.
गुरुवार, जून ०६, २०१९
ऐचाळे ग्रामपंचायतीवर गोकुळबाई बागलेंचे पुन्हा वर्चस्व
अविश्वासाचा ठराव नामंजूर , बागले गटात जल्लोष
गणेश जैन,खबरबात / धुळे
बळसाणे : माळमाथा परिसरातील ऐचाळे ता.साक्री ग्रामपंचायतीवर सौ. गोकुळबाई आप्पा बागले हे सरपंच पदावर कार्यरत असताना काही विरोध्दक सदस्यांनी त्यांच्या वर अविश्वास ठराव दाखल केला परंतु ता. ६ जून रोजी ऐचाळे ग्रामपंचायतीत साक्री चे नायब तहसीलदार संदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली होती मात्र सौ.बागलेंच्या विरोधात बहुमत सिध्द न झाल्याने नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी हा ठराव रितसर पडताळणी करून नामंजूर केला दरम्यान विरोध्दकांनी साक्री तहसीलदाराकडे सरपंच मनमानी कारभार करीत असतात व कार्यालयीन कामासाठी वेळ देत नाहीत आदी कारणांसह विरोध्दक सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता याप्रसंगी नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी ऐचाळे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष सभा घेतली आणि सर्व सदस्यांची मत जाणून घेतली व सोनवणे यांनी सौ.गोकुळबाई बागले यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर नामंजूर केल्याचे जाहीर केले याबाबत ना.जयकुमार रावल व ना.सुभाष भामरे तसेच माळमाथा परिसराचे नेते नारायण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले सौ गोकुळ बागले ह्या आप्पा दादा बागले यांच्या पत्नी असून त्या सरपंच पदाच्या धुरा सांभाळत आहेत पुन्हा त्यांना दिलासा मिळाल्याचे समाधान गावातून होत आहे
शनिवार, मे ११, २०१९
मुख्यमंत्र्यांनी साधला धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
तालुक्याचे नाव
|
टॅंकरची संख्या
|
1. सिंदखेडा
|
16
|
2. धुळे
|
11
|
3. साक्री
|
4
|
एकूण
|
31
|
सोमवार, मे ०६, २०१९
शिरपूरच्या साईराम कंट्रक्शनची महेश आँटो इंजिनिअरिंगकडून फसवणूक
अशोक लेलैंड मार्फत शिरपूर च्या मनोज जाधव , मुकेश बाफनांसह पार्टनरांनी घेतले सहा न्यू माँडेलचे डंपर
दाद मागण्यासाठी ग्राहक मंचात जाणार
खबरबात न्यूज/गणेश जैन , धुळे
शिरपूर : शिरपूर शहरातील मनोज जाधव , मुकेश बाफना यांच्यासह चार पार्टनर मिळून ३५ लाखा प्रमाणे *साईराम कंट्रक्शन च्या कंपनी ने एक नव्हे , दोन नव्हे तब्बल अशोक लेलैंड कंपनी चा नव्याने ब्रँच झालेल्या ६ ट्राला ( डंपर) एक महिनापूर्वीच खरेदी केल्याचे साईराम कंट्रक्शन च्या संचालकांनी सांगितले.
साईराम कंट्रक्शन चे मलकापूर येथे धरणाचे काम मोठ्या उमीदेने चालू होते सहा मालवाहू डंपरातून एका डंपराचे काम निघाले डंपर पुढे हालत नसल्याचे धुळे येथील अशोक लेलैंड चे डिलर महेश आँटो इंजिनिअरिंग यांना दुरध्वनीवर डंपर चालकाने कळविले नव्याने खरेदी केलेला डंपर महिन्याच्या कालावधीतच बिघाड झाल्या चा संताप साईराम कंट्रक्शनाच्या संचालकांना आजही कायम आहे डंपराचा बिघाड झाल्यामुळे त्यावर डंपर ला जळगाव च्या अशोक लेलैंड च्या शोरूम ला घेऊन जा जळगाव च्या शोरूम शी बोलतो धुळे येथील महेश आँटो चे सेल्स मँनेजर अकबाल शेख यांनी सांगितले सदर डंपर दुरुस्ती झाल्यावर परत मलकापूर येथे रवाना झाला लगेच दोन दिवसांनी दुसऱ्या डंपराची तीच समस्या निर्माण झाली परत त्या डंपरालाही जळगावात आणण्यात आले असे सहा नि सहा डंपारात तांत्रिक बिघाड झाल्याचे कंट्रक्शनाच्या संचालकांनी सांगितले आज जळगाव च्या अशोक लेलैंड च्या शोरूमाला चार डंपर दुरुस्ती साठी ठेवण्यात आले आहे एका महिन्यात नव्या डंपराला दुरुस्ती साठी मँकनिकल लागत असेल तर मग नव्याने डंपर खरेदी केलेले काय कामाचे दलाला कडून जूने डंपर खरेदी केलेले पुरवडले असते सदर सहा डंपराची किंमत एकूण दोन करोडाच्या वरती आहे याकारणाने च संताप निर्माण होत आहे जर साईराम कंट्रक्शन कंपनीच्या सांगण्याप्रमाणे अशोक लेलैंड कंपनी ने व महेश आँटो इंजिनिअरिंग न केल्यास प्रिंट मिडिया व टिव्ही मिडिया यांची मदत घेऊन ग्राहक मंचात रितसर गुन्हा दाखल करण्याचा व धुळे येथील अशोक लेलैंड च्या शोरूमाला आत्मदहनाचा इशारा संचालकांनी दिला आहे
आगरपाड्यात उन्हाळ कांदा काढून चाळीत साठवणूक सुरु
माळमाथा परिसरातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त
खबरबात , धुळे/गणेश जैन
बळसाणे : बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकरी सध्या उन्हाळी कामात व्यस्त आहे ठिकठिकाणी उन्हाळी कांदा काढून चाळीत किंवा शेतातच ढिग करून ठेवणे व शेतातील निंदणी व फवारणी फुटवा बांधणी , भाजीपाल्याची काढणी आदी माळमाथ्याचा शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल, मे च्या दरम्यान काढला जातो बळसाणेसह आगरपाडा , दुसाने , इंदवे , हाट्टी , ऐचाळे , सतमाने , कढरे , छावडी , अमोदा , घानेगाव , लोनखेडी , फोफरे , आखाडे ,फोफादे , परसुळे आदी परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे आणि उर्वरित भागात अजून कांदा काढणे सुरु आहे ज्या शेतकऱ्याचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन ,वारा व अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी कांद्याच्या ढिगावर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवली आहेत आणि काही ठिकाणी अजूनही उशीराने लावलेले कांदे मजूरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात कांदे निवडून मजूरांकडून साठवण्याची लगबग सुरु आहे मजूरांची टंचाई असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे उरकली जात नाही
सध्या अधिक तापमानामुळे दिवसभर उकाडा जाणवतो त्यातच आकाशात काळ्या ढगांची गर्दी लक्षणे घेता बेमोसमी पाऊस कोसळण्याची शक्यता राहते अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे माळमाथा भागातील शेतकऱ्यांची कांदा चाळीत साठवणूक करण्याची धावपळ सुरू आहे
भागवत भिवा ठेलारी , शेतकरी (आगरपाडा)
रविवार, मे ०५, २०१९
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आदरणीय बापूसाहेब आपल्याला लोकमत परिवारा तर्फे व कोचर परिवारामार्फत आजच्या वाढदिवसाच्या आमच्या मनापासून शुभेच्छा
माझे मार्गदर्शक व जेष्ठ पत्रकार आदरणीय राजू बापू यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा
आज आमचे प्रिय मित्र म्हणजे पित्रुतूल्य पत्रकार श्री राजेंद्र पाटील उर्फ राजू बापू यांचा वाढदिवस. आज बापूंना अहो काहो न म्हणता.संबध शिरपूर शहरासह तालुकाभर फक्त बापू म्हणतात कारण एकेरी उल्लेखाने माणूस मनापासून जवळ येतो. परकेपणा राहत नाही
तसे बापू वयाने माझ्यापेक्षा कितीकपट मोठे आहेत. पण कर्तृत्वाने बापासारखे मार्गदर्शन देत राहतात
सतत हसत मुख असणारे, रोख-ठोक बोलणारे पण संत तुकाराम म्हणून हळव्या मनाचा, त्यांच्या गळ्यात सरस्वतीचे वात्सव्य असल्याने गोड गळ्याचा, मिठास आवाजाचा, म्हणूनच त्यांनी स्वतःचे काही वर्षापूर्वीच साप्ताहिक खान्देश पथक नावाचे व्रुत्तपत्र सुरू केले स्वतः संपादकीय लेखातून सतत वाचा फोडत असतात*
आशा या राजा दिलाच्या पत्रकार व आमचे जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय बापूंना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
शुभेच्छूक
ललित जैन
अँड गणेश जैन
महावीर जैन
शिवसेना तालुका उपप्रमुख व बळसाणे सरपंचासह ग्रामपंचायत
गुरुवार, एप्रिल २५, २०१९
विमलनाथाने वाचवले भाविकांचे प्राण
- मुंबईचे भाविक झाले विमलनाथाला नतमस्तक
- लक्झरीतले ५० जैन भाविक अपघातातून बचावले
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे जैन तीर्थक्षेत्रावर मुंबई येथून बळसाणे तीर्थावर विमलनाथ भगवंताच्या दर्शनार्थ येत असताना लक्झरी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील चारीत बस उतरली
बळसाणे येथील जैन धर्मियांचे मंदिर जगभर प्रसिद्ध असल्याने लांबलांबहून जैन भाविक दर्शनासाठी येत असतात असेच मुंबई येथील अमित भाई गांधी हे नियमितपणे यात्रिक लोकांना देव दर्शनासाठी घेऊन जात असतांनाच सायंकाळी सहा साडेसहा वाजता ट्रँव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने बस ही रस्त्यावरील चारीत जाण्याच्या मागावर असतांनाच ब्रेक मारून जैन भाविकांना बचावले व कुठल्याही प्रकारची इजा नव्हता सुखरूप पणे ट्रँव्हल्स मधून बाहेर आलेत परंतु भाविकांचा डर मात्र निघत नव्हता दुसऱ्या खासगी गाडीतून जैन भाविकांना बळसाणे येथे रवाना करण्यात आले होते पण जैन भाविक निघाले ट्रँव्हल्स मात्र अडकली दरम्यान विश्वकल्याणकाचे ट्रस्टी व ग्रा.पं.सदस्य महावीर जैन यांनी दुसाणे येथील शिवसेना कमलेश वाघ कार्यकर्त्यांसह पदधिकारी होळदाणे ता.साक्री येथे जमा झाले याकामी बळसाणे बापू पारधी तसेच विहीरगाव येथील डॉ. गिरासे व शिवसैनिकांसह आदींनी ट्रँव्हल्स काढण्यास मोठे सहकार्य केल्याचे महावीर जैन यांनी सांगितले बसमध्ये विमलनाथ जाप महिला मंडळाच्या ५० महिला जैन भाविक होते पण कुणालाही इजा न झाल्याचे भाविकांनी सांगितले.
शुक्रवार, एप्रिल १९, २०१९
ओसवाल जैन समाज संघपती विना पोरका
- ओसवाल जैन समाजात संघपती नसूनही; सकल समाज बांधवांनी विविध कार्य केले पार
मंगळवार, मार्च २६, २०१९
वृक्षांसाठी झटणारा अवलिया
आजच्या तापमानाची नोंद पाहता कोणीही आपल्याला बाहेर फिरताना सुद्धा दिसत नाही किंवा पक्षी सुदधा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जागतिक तापमान वाढीला सम्पूर्ण पणे मनुष्य जबाबदार आहे. त्याच प्रमाणे मनुष्याने चालवलेली जंगलतोड हे देखील प्रमुख कारण आहे.
विकास मराठे |
रविवार, मार्च १०, २०१९
फफूटा चित्रपटाचे प्रोमोशन
भूमिपुत्र शेतकरी संघटना धुळे जिल्हा व ड्रीम इव्हेंट्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने शहराजवळ असलेल्या निकम इन्स्टिटयूट मध्ये सत्कार व पुरस्कार प्रदान सोहळा घेणयात आला .
ह्या वेळी आपल्या खान्देशात निर्मित होत असलेला शेतकरी जीवनावरील प्रश्नांना उजाळा देणारा मराठी चित्रपट फफूटा ह्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यात आले ह्यावेळी चित्रपटातील कलाकार मा. प्रमोद पाटील उपस्थित होते . ह्यावेळी चित्रपटाविषयी विकास मराठे ह्यांनी थोडक्यात माहिती देताना सांगितले कि सदर चित्रपट हा शेतकऱयांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारा चित्रपट असणार आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ह्या चित्रपटात मांडण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.ह्या कर्यक्रम प्रसंगी भूमिपुत्र शेतकरी सांघटना जिल्हा अध्यक्ष विकास मराठे , उपाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते. ह्यावेळी प्रा.रवींद्र निकम सर , आनंद पवार सर , भूपेंद्र मालपुरे सर ह्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ह्यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या मा. किरणताई नवले ह्यांचा युवा रणरागिणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विकास मराठे ह्यांना युवा प्रेरणा पुरस्कार व प्रसाद पाटील ह्यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार देण्यात आला . ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील , विवेकानंद कॅरियर अकादमी चे संचालक प्रशांत खुले सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सौ.शुभांगी निकम ह्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोष पाटील ह्यांनी केलॆ.