Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जनरल नॉलेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनरल नॉलेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर १६, २०२०

म्युचुअल@ फंड म्हणजे काय

म्युचुअल@ फंड म्हणजे काय

 म्युचुअल फंड म्हणजे काय? 

''
 तारीख  16  सप्टेंबर 2020

फेसबुक लिंक https://bit.ly/3c1CEEQ
म्युच्युअल फंड म्हणजे काय?म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली.

म्युचुअल फंड म्हणजे काय?

आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी.@ १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात ३२ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. आपल्या पैशानी मोठ काम कराव आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात.@तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. @तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स।डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात.

त्याला कॉर्पस या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य NAV जाहीर केले जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला @तुलनात्मक दॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.@

मंगळवार, सप्टेंबर १५, २०२०

होय! भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

होय! भारतात एक लाखाची व दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

   होय! भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.  


.         दि. १५  सप्टेंबर  २०20 

फेसबुक लिंक https://bit.ly/32wTBUx
  .       ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या ऐतिहासिक निर्णयाची अगदी गल्लीबोळात चर्चा सुरु होती. पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, वापरत असलेले चलन हद्दपार करण्याचा निर्णय हा काही पहिल्यांदाच घेण्यात आलेला नव्हता.एके काळी आपल्या देशात एक लाख रुपयांची नोट छापण्यात आली होती.


एक लाख रुपयांची नोट नेताजींच्या आझाद हिंद सरकारच्या काळात छापण्यात आल्याची माहिती त्यांचा चालक कर्नल निजामुद्दीन यांनी दिली होती. दहा देशांची मान्यता १९४३ ला स्थापन करण्यात आलेल्या आझाद हिंद बँकेकडून चलनात आणलेल्या या नोटेला होती.
भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.
ही नोट आझाद हिंद सरकार आणि सैनिकांना पाठिंबा देणाऱ्या दहा देशांत व्यवहारात वापरता येत होती. बर्मा, क्रोएशिया, जर्मनी, नानकिंग(चीन), मंचूको, इटली, थायलंड, फिलिपाइन्स, आयर्लंड या देशांचा यामध्ये समावेश होता. या नोटेशिवाय आझाद हिंद बँकेने दहा रुपयांचे नाणेही चलनात आणले होते.ही झाली स्वातंत्र्यपुर्व घटना.पण देशाला स्वातंत्र्य मिळालेनंतर १०,००० व ५,००० च्या नोटा वापरात होत्या.

१९४६ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा, सर्वप्रथम १००० आणि १०००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९४९ मध्ये नवनिर्वाचित भारत सरकारने १००० आणि १०००० च्या नोटा पुन्हा वापरत आणल्या.
१९७८ साली मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने  १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा वापरातून बंद करण्याचा निर्णय ‘तत्कालीन’  जाहीर केला आणि अर्थकारणाच्या पटलावर तो एक चर्चेचा विषय होऊन बसला होता.
भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

देशाचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर १६ जानेवारी १९७८ च्या रात्री १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. तेव्हाही दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९७८ रोजी सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.
आणीबाणी प्रकरणावरून जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या कॉंग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आणि नवीन सरकार म्हणून जनता पक्ष सत्तेत आला होता.  तेव्हा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत होते – ‘एच.एम. पटेल’ ते देखील गुजरातचेच.
सरकारच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये ही देखील कुजबुज सुरु होती की, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडे असणाऱ्या सीक्रेट फंड्स ना चाप बसवण्यासाठी नवनिर्वाचित जनता सरकारने निर्णयाच्या आडून ही नवी युक्ती लढवली आहे.
पण तेव्हाच्या आणि मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या परि तीमध्ये खूप मोठा फरक होता. मोदींनी घेतलेल्या निर्णयाला विद्यमान आरबीआय गव्हर्नर उर्जित  पटेल यांचा पाठींबा लाभला होता. प्रत्येक नोटेवर एक प्रकारचे चित्र छापलेले असते. हे चित्र एखाद्या प्राणी, भौगोलिक रचना, मनुष्य किंवा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित असते
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

सोमवार, सप्टेंबर १४, २०२०

रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?

रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?

 रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ? 

रेल्वे मार्ग म्हटल्याबरोबर आपणासमोर रेल्वे रूळ व त्याखाली खडी असे चित्र उभे राहते., रेल्वेच्या गाडीचे वजन ट्रॅकवर तोलले जाते. साहजिकच यासाठी रेल्वेचा रुळ मजबूत असणे गरजेचा असतो. रुळांची दुरुस्ती, देखभाल सातत्याने करत राहावी लागते. जेव्हा रेल्वे धावत असते. तेव्हा जमीन आणि रेल्वे रुळांमध्ये कंपन निर्माण होते. उष्ण तापमानात रूळ प्रसरण पावतात. आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. वातावरणातील बदलांमुळे रेल्वे रूळांच्या आसपास रानटी गवत उगवते.
रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?
या सर्व गोष्टींना उपाय म्हणून रेल्वे रुळांमध्ये दगडी खडी टाकली जाते. जेव्हा ट्रेन रुळावर धावते तेव्हा ट्रॅकमध्ये कंपन तयार होतात आणि यामुळे ट्रॅक पसरण्याची शक्यता वाढते. ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…!  तसेच हवामान बदलण्याच्या वेळीही ट्रॅक पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे कंपन कमी करण्यासाठी रुळांच्या कडेला दगडी खडी ठेवण्यात येते. त्यामुळे ट्रॅकच्या आसपास गवत किंवा झाडे लावली जात नाहीत. छोट्या दगडांना (एकत्रितपणे) तांत्रिक भाषेत ट्रॅक ब्लास्ट असे संबोण्यात येते. हे मूलतः ट्रॅकबेड (एक प्रकारची खडीची गादी) तयार करते ज्याच्यावर स्लीपर ठेवलेले असतात.
ट्रॅकखाली लाकडी प्लेट(आता काही ठिकाणी लोखंडी किंवा सिमेंट प्लेट असतात.)ठेवण्याचे दुसरे कारण असे आहे की जेव्हा ट्रेन फिरते तेव्हा संपूर्ण भार ट्रॅक ऐवजी लाकडावर पडतो आणि आजूबाजूच्या दगडांमुळे, त्यास बरेच बळ मिळते जेणेकरून ते घसरत नाही.

शनिवार, सप्टेंबर १२, २०२०

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

⭕ उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये? ⭕

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌷 तारीख  12 सप्टेंबर 2020 🌷_*
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

फेसबुक लिंक https://bit.ly/3kdbApc
आजकाल कॉफीशिवाय आपलं पानच हलत नाही. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल किंवा झोप घालवायची असेल@ तर एक कप कॉफी पुरेशी ठरते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. पण आता कॉफी निर्मितीमध्ये भारताने एका पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे. @तेव्हा लवकरच भारत जगातील सर्वात महागडी कॉफी निर्यात करणार आहे. या कॉफीची भारतातील@ किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल.आता तुम्हाला ही किंमत ऐकून धक्का बसला असेल. एवढी किंमत असण्यामागचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल.
ही महागडी कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासूनतयार केली जाते. हे वाचून तुम्ही नाक वगैरे मुरडलं असेल यात काहीच शंका नाही. पण ही कॉफी अशाचप्रकारे तयार केली जाते. @उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही.@ तिच्या विष्ठेमार्फत बियाबाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. @मांजरीच्या पोटात असलेल्याद्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते.@



तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात
@आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ‘कूर्ग कन्सॉलिडेटेड कमॉडिटिज’ या कॉफीची निर्मिती करत असून,@ *‘अॅनिमेन’* या ब्रँडखाली तिची विक्री होणार आहे. अनेक ठिकाणी उदमांजरांना पकडून @त्यांना बळजबरीने कॉफीची फळं खाऊ घालण्याची सक्ती केली जाते. पण कुर्गमध्ये मात्र या प्राण्यांवर कोणतीही बळजबरी न करता नैसर्गिक मार्गानेचे तिची निर्मिती करण्यात येणार आहे.
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*              
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२०

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड ;

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड ;

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड 




.        दि. ११ सप्टेंबर  २०१८ 

फेसबुक लिंक https://bit.ly/3bMY34t

आता पडेल की मग पडेल असे वाटणारा हा दगड १२०० वर्षांपासून एका सिद्धपुरुषासारखा एकाच ठिकाणी हा दगड टिकून आहे. तेव्हापासून आजपर्यंत एकही सजीव प्राणी या दगडाला हलवू शकलेला नाही. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरममध्ये ठाण मांडून बसलेला हा दगड आजही तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.या दगडाला स्थानिक भाषेत Vaan Irai Kal (Krishna’s Butterball) अर्थात कृष्णाचा प्रचंड चेंडू म्हणून ओळखले जाते. 

चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र असा गोल दगड आहे. यालाच श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा किंवा चेंडु या नावाने ओळखले जाते. हा दगड सुमारे १ सहस्र २०० वर्षांपासून तेथे असल्याचे समजले जाते.या भल्यामोठ्या दगडाकडे पाहिल्यावर सर्वप्रथम तुम्हाला वाटेल की तो पडायला आलंय की काय? पण तसं अजिबात नाहीये. अहो ७ हत्ती एकत्र आले तरी हा दगड हलत नाही.एका उतारावर हा प्रचंड दगड टिकून आहे. हा दगड जवळपास १२०० वर्षे जुना असून त्याची उंची २० फुट आणि रुंदी ५ फुट इतकी आहे. याचे वजन तब्बल २५० टन इतके आहे.

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड

१९०८ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे राज्यपाल (गव्हर्नर) आर्थर लॉली यांनी ७ हत्ती वापरून हा दगड हलवण्याचे असफल प्रयत्न केले होते.
इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकाच चिंता लागून राहिलेली असते की दुर्दैवाने जर हा गडद कोसळला तर त्यामुळे काय हाहाकार होईल सांगता येत नाही.असाच प्रयत्न पल्लव वंशातील नरसिंह वर्मन राजानेही केला होता; मात्र त्याचा उद्देश या दगडाला शिल्पकारांनी हात लावू नये, असा होता.हा दगड वर्षानुवर्ष एवढा स्थिर आणि तोल राखून कसा उभा आहे हे एक न सुटलेलं कोडं आहे.सध्या हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारच प्रसिद्ध असून रोज शेकडो पर्यटक या दगडाची भेट घेण्यासाठी येतात.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

बुधवार, सप्टेंबर ०९, २०२०

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

फेसबुक लिंकhttps://bit.ly/2ZkgfO6

अंग्रेजों के जमाने के’ अनेक किस्से आजही चर्चेत असतात. अशाच एका किश्श्याशी संबंधित वृक्ष पाकिस्तानात आहे. या वृक्षाला १२१ वर्षांपासून साखळदंडात बांधून ‘अटके’त ठेवण्यात आले आहे. 1898 मध्ये त्याला ‘अटक’ करण्यात आली होती.♍हा वृक्ष पाकिस्तानच्या लांडी कोटल आर्मीमध्ये आहे. त्याच्या ‘अटके’चा किस्साही अजबच आहे. एक ब्रिटिश अधिकारी जेम्स स्न्वेड या झाडाजवळ बागेत मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. तो या झाडाजवळ आला असताना त्याला हे झाड आपल्याकडे येत असल्याचे दारूच्या नशेत वाटले. झाड आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून तो घाबरला आणि त्याने तत्काळ सैनिकांना आदेश दिला की, या झाडाला अटक करण्यात यावी. सैनिकांनी तत्काळ झाडाला साखळदंडात बांधले. त्यावेळेपासून हे झाड असेच साखळदंडात आहे. ब्रिटिश काळातील क्रौर्याचे प्रतीक म्हणून अजूनही हे साखळदंड हटवलेले नाहीत. आता हे एक पर्यटनस्थळ बनले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते हे झाड ड्रेकोनियन फ्रन्टिअर क्राइम रेग्युलेशन(एफसीआर) कायद्याचं उदाहरण आहे. हा कायदा ब्रिटीश शासनावेळी करण्यात आला होता. यानुसार ब्रिटीश सरकारला हा अधिकार होता की, ते पश्तून जनजातीच्या कोणत्याही व्यक्ती किंवा परिवाराने काही अपराध केला तर ते त्यांना शिक्षा देऊ शकतात.२००८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी एफसीआर कायदा रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावर पुढे काही झालं नाही

१२१ वर्षांपासून ‘अटके’त असलेला वृक्ष

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

‘हा’ तांदूळ न शिजवताही खाता येतो !

‘हा’ तांदूळ न शिजवताही खाता येतो !

  

"बोका चाऊल":न शिजवता खाल्ला  जाणारा तांदूळ

   


.        📯 दि. ८ सप्टेंबर  २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/3haqR80
आशियाई देशांमधील लोकांच्या आहारात भात महत्त्वाचा घटक आहे. भारतातही जेवणात भाताचे स्थान नेहमीच अबाधित राहिलेले आहे. प. बंगाल, कोकण यासारख्या काही भागात तर ते अधिकच महत्त्वाचे आहे. भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात. मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो.
    आपल्याकडील भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात.
मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो. आसाममध्ये हा तांदूळ पिकत असून ‘बोका चाऊल’ असे या तांदळाचे नाव आहे. हा तांदूळ फक्त पाण्यात भिजवला तरी खाण्याजोगा बनतो. या तांदळाला आता जीआय (जिऑग्रॉफिकल इंडिकेशन) चा टॅग मिळाला आहे. त्यामुळे आता या तांदळावर आसामचा कायदेशीर अधिकार असणार आहे.  

‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरूप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता, असे बोलले जाते.
17 व्या शतकात मुघलांसोबत लढताना आसाममधील सैनिक याच तांदळाचा भात तयार करायचे. पोहे जसे पाण्यात भिजवून लगेच खाता येऊ शकतात तसाच हा तांदूळ आहे. आसाममध्ये ‘बोका चाऊल’ तांदळापासून तयार केलेला भात हा दही, दूध, ताक, साखर, गूळ अशा पदार्थांसोबत खाल्ला जातो.


‘हा’ तांदूळ न शिजवताही खाता येतो !

‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरुप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’ असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता असे बोलले जाते

सोमवार, सप्टेंबर ०७, २०२०

हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे !

हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे !

हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे !  


.        📯 दि. ७ सप्टेंबर  २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/325UyD0
  .        हिसार :हरियाणातील हिसार गावातील राखीगढीमध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातील काही अवशेष सापडले होते. त्यामध्ये मानवी सांगाड्यांचाही समावेश होता. हे सांगाडे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचे डीएनए दक्षिण भारतीय लोकांच्या डीएनएशी साधर्म्य दाखवणारे आहेत. तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या उत्खननात हे सांगाडे सापडले होते. 


हरियाणातील ‘ते’ सांगाडे साडेचार हजार वर्षांपूर्वीचे !

.
या उत्खननावेळी सात हजार वर्षांपूर्वीच्या काही वस्तूही सापडल्या आहेत. आता या नव्या संशोधनाने सिंधू संस्कृतीबाबत काही नवे शोध
लागू शकतात. येथील सांगाड्यांमधून जर्मनीतील काही संशोधकांनी डीएनएचे नमुने घेतले होते. हे सांगाडे हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ठेवून त्यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यामधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. हडप्पाकालीन लोक व्यापारासाठी देशाच्या विविध भागांत जात असावेत, असेही यामधून दिसून आले आहे. त्यांचे डीएनए द्रविड लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहेत.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

तुम्हाला  माहिती आहे का,  आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?

तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?

 तुम्हाला  माहिती आहे का,  आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?   


फेसबुक लिंकhttps://bit.ly/2ReuteZ
        चांद्रयान २ चे यान चंद्रावर उतरण्यास अयशस्‍वी ठरल्‍याने देशावर एक प्रकारची निराशा पसरली. मात्र, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्‍था नासाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास गेल्‍या सहा दशकांमध्ये चंद्र मोहिमांमध्ये 60 टक्के यश आले आहे. नासाच्या मते या दरम्‍यान १०९ चांद्र मोहिमा सुरू करण्यात आल्‍या. यातील ६१ मोहिमा यशस्‍वी ठरल्‍या, तर ४८ मोहिमा अयशस्‍वी ठरल्‍या.

तुम्हाला  माहिती आहे का,  आतापर्यंत चांदोमामाला भेटण्याचा कितीवेळा प्रयत्न झाला ?

भारतीय अंतराळ संशोधन संस्‍था इस्रोकडून चांद्रयान २ मोहिमेतंर्गत चंद्रावर सोडलेले विक्रम लँडर काल मध्यरात्री चंद्राच्या पृष्‍ठभागावर उतरणार होते. मात्र, दुर्दैवाने काही वेळ आधीच या लँडरचा पृथ्‍वीशी असलेला संपर्क तुटला. यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्‍का बसला. मात्र इस्रोच्या अधिकार्‍यांच्या म्‍हणण्यानुसार चांद्रयान - २ चा ऑर्बिटर पुर्णपणे सुरक्षित आहे.
या आधी अनेक राष्‍ट्रांनी चांद्रमोहिमा आखल्‍या. इस्राईलने २०१८ मध्ये चांद्र मोहिम सुरू केली. मात्र, ती एप्रिलमध्ये नष्‍ट झाली. नासाच्या मते, १९५८ पासून २०१९ पर्यंत भारतासह अमेरिका, रशिया, जपान, युरोपीय संघ, चीन आणि इस्राईल या देशांनी विविध चंद्र मोहिमा आखल्‍या. पहिली चंद्र मोहिमेची योजना अमेरिकेने १७ ऑगस्‍ट १९५८ मध्ये आखली. मात्र, पायोनियर लॉंच करणे अयशस्‍वी ठरले.
*पहिले यशस्‍वी चंद्र अभियान चार जानेवारी १९५९मध्ये सोव्हिएत संघाचे लूना १ होते. हे यश सहाव्या चंद्र अभियानामध्ये मिळाले. यानंतर ऑगस्‍ट १९५८ पासून नोव्हेंबर १९५९ च्या दरम्‍यान अमेरिका आणि सोव्हिएत संघाने १४ अभियाने सुरू केली. यामधील लूना-१, लूना-२, लूना-३ हे तीनच यशस्‍वी ठरले. हे सर्व सोव्हिएत संघानेच सुरू केले*
*यानंतर जुलै १९६४ मध्ये अमेरिकेने रेंजर ७ मिशन सुरू केले. ज्‍याने पहिल्‍यांदा चंद्राचा जवळून फोटो घेतला. रशियाकडून जानेवारी १९६६ मध्ये सुरू केलेल्‍या लूना-९ मोहिमेने पहिल्‍यांदा च्रंद्राच्या जमिनीला स्‍पर्श केला. यावेळीच चंद्राच्या पृष्‍टभागाची पहिल्‍यांदा छायाचित्रे मिळाली. पाच महिन्यातच १९६६ मध्ये अमेरिकेने यशस्‍वीरित्‍या सर्वेयर-1 हे अभियान यशस्‍वी केले.
अमेरिकेची अपोलो ११ ही एक महत्‍वाची मोहिम होती. या माध्यमातून मानवाचे पहिले पाऊल चंद्रावर पडले. या तीन सदस्‍यीय मोहिमेचे संचलन नील आर्मस्‍ट्रांगने केले. १९५८ ते १९७९ या काळात अमेरिका आणि युएसआरनेच चंद्र मोहिमा सुरू केल्‍या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० मोहिमा सुरू केल्‍या. यानंतर जपान, युरोपीय संघ, चीन, भारत, इस्राईलनेही या क्षेत्रात आपले पाऊल ठेवले.**जपान, यूरोपीयन युनियन, चीन, भारत आणि इस्राईल या देशांनी या क्षेत्रात उशिरा पदार्पण केले. जपानने १९९० मध्ये आपली पहिली चंद्र मोहिम हिटेन लॉन्च केली. सप्टेंबर २००७ मध्ये जपानने आणखी एक ऑर्बिटर मोहिम सेलेन लॉन्च केले. सन २००० पासून २००९ च्या दरम्‍यान आतापर्यंत ६ लूनार मिशन लॉन्च करण्यात आल्‍या. यूरोप स्‍मार्ट -१ जपान सेलेन, चीन- शांग ई १, भारत - चांद्रयान, अमेरिका-लुनार.*२००९ पासून २०१९ च्या दरम्‍यान १० मोहिमा लॉन्च करण्यात आल्‍या. ज्‍यामधील ५ भारताने, ३ अमेरिकेने, चीन आणि इस्राईलने प्रत्‍येकी १ मिशन लॉन्च केले. १९९० पासून आतापर्यंत अमेरिका,जपान, भारत, यूरोपियन युनियन, चीन आणि इस्राईलने १९ लुनार मोहिमा लॉन्च केल्‍या.
____________________________

रविवार, सप्टेंबर ०६, २०२०

या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं

या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं

 या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं 
-
🦀  ११ लाख रूपये लिटर  🦀
--------------------------------------------
प्रत्येक जीवाचं रक्त हे लाल असतं.पण एक असा खेकडा आहे की त्याचं रक्त निळ्या रंगाचे असते. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर सधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे. हॉर्स शू खेकडे प्रामुख्याने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरांच्या किनाऱ्यावर आढळून येतात. मे ते जून ह्या प्रजननकाळात पौर्णिमेच्या रात्री भरतीच्या वेळेला ते किनाऱ्यावर दाखल होतात. वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच ह्या खेकड्यांचा फस्ता पडणाऱ्या पक्षांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.
या खेकड्याचे रक्त असते निळया रंगाचं

(प्रयोगशाळेत रक्त काढत असताना ) 
हॉर्स शू खेकड्याच्या अनोख्या निळ्या रक्ताचा वापर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे जीवाणूरहित करण्यासाठी केला जातो. तसेच काही औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.लाखोंच्या संख्येने खेकडे पकडून प्रयोगशाळेत नेले जातात. तिथे ह्या खेकड्यांचा हृदयाला छोटेसे छिद्र पाडून त्यांच्या शरीरातील अंदाजे ३०% रक्त काचेच्या भांड्यात जमा केले जाते. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.खेकड्याच्या शरीरातील रक्ताला निळा रंग त्यातील तांब्यामुळे मिळतो. मानवी शरीरात याप्रकारे लोह असतं. त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण शास्त्रज्ञांचा यात इतका इंटरेस्ट असण्याचं कारण फक्त निळा रंग नाही.

तांब्याप्रमाणेच हॉर्सशू खेकड्यांच्या रक्तात एक विशिष्ट रसायन असतं. यामुळे आजूबाजूच्या बॅक्टेरियांना शोधण्यास मदत होते.
अत्यंत कमी प्रमाणात वापरुन सुद्धा हे बॅक्टेरियाची उपस्थिती शोधू शकतं. क्लोटिंग एजंट चाचणी करण्यासाठी वापरला जातो.सध्या जगात हॉर्सशू खेकड्यांच्या फक्त चार प्रजाती उरल्या आहेत.
वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत.

कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती

कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती

 कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती  


.        📯 दि. ६ सप्टेंबर २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/3lTNMrY
खूप आधीपासून माणसाने गर्भधारणा होऊ नये म्हणून अनेक पद्धतीचा उपयोग केला आहे आणि त्याचेच अपडेटेड व्हर्जन म्हणजे आजकाल बाजारात मिळणार कंडोम. पूर्वीच्या इजिप्त मध्ये अकासिया या झाडाची पाने, मध एका मऊ कापडासोबत गर्भधारणेच्या मार्गात ठेवले जायचे जेणेकरून ते शुक्राणूला अडवतील. 


कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती

        आजच्या काळात नको असलेली गर्भधारणा होण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय आहे. त्यातल्या त्यात कंडोम हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणून वापरला जातो. पण ज्या काळात कंडोम किवा आजच्या आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या सुरक्षित पर्यायांपैकी हे सर्व साधनं उपलब्ध नव्हते तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.

तेव्हाचे लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धतींचा वापर करायचे जाणून घेऊया कोणत्या होत्या त्या पद्धती ग्रीसमध्ये नको असेलेली गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्रियांना लोखंडाचे पाणी प्यायला द्यायचे  असे पाणी ज्यात लोहार आपले अवजार थंड करतो. हे पाणी पिल्याने शुक्राणू हे योनीतच नष्ट होऊन जात. तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिक्श्चर प्यायला दिले जात होते. हे मिक्श्चर इतके घातक होते की यामुळे गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.,इंडोनेशियामध्ये कंडोमचा शोध लागण्याआधी स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत. गर्भधारणा होण्यापासून थांबिण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असतं. असे मानल्या जाते की, ह्यामध्ये सायट्रस अॅसिड जे स्पर्म ला नष्ट करू शकतात. पण हा उपाय ही धोकादायक आहे.
पूर्ण इतिहास वाचताना आणि इथे लिहिताना आधीच्या स्त्रियांनी किती त्रास सहन केलाय याची प्रचिती येते. पिल्स ठीक आहे पण संततीनिरोधनाची साधन खूपच विचित्र होती. बहुतेकांमुळे संसर्ग आणि शारीरिक वेदना व्हायच्या.
आतापर्यंत झालेल्या सुधारणेला सलाम

शनिवार, सप्टेंबर ०५, २०२०

या गावात ६००० हजार  लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक

या गावात ६००० हजार लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक

🔹 शिक्षकदिन विशेष 🔹

 या गावात ६००० हजार  लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक   



.        📯 दि. ५ सप्टेंबर  २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/2Zaux3x
  .      अहमदाबाद- शिक्षकांचे गाव म्हणून गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हडियोलची ओळख आहे. गावातील प्रत्येक घरात एक तरी शिक्षक मिळेलच. गावची लोकसंख्या ६ हजार असून यात एक हजार जण तर शिक्षकच आहेत. त्यातील ७९० लोक आजही अध्यापनाचे कार्य करत आहेत. उर्वरित २०० शिक्षकांनी निवृत्ती घेतली. हडियोलमधील शिक्षक शिकवत नसेल असा गुजरातमध्ये एकही जिल्हा उरला नाही. जिल्ह्यातील कुठल्या ना कुठल्या गावात येथील शिक्षक आहेच.

साबरकांठा प्राथमिक शिक्षक संघाचे प्रमुख संजय पटेल म्हणाले की, शिक्षकांचे गाव अशी ओळख हडियोलला पहिल्यांदा १९५५ मध्ये मिळाली. त्या वेळी गावातील ३ लोकांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,याच वेळी गोविंदभाई रावल व त्यांच्या पत्नी सुमती यांनी विश्व मंगल संस्थेमार्फत शिक्षणाचे महत्त्व पटवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्या वेळेपासून आजवर गावातून शिक्षक निर्माण होण्याचा पायंडा पडला आणि आजही तो कायम आहे. १९५९ मध्ये रावल दांपत्याने गावात एका मंदिरात पहिली शाळा उघडली. त्यानंतर शिक्षणासाठी “विश्व मंगलम् अनेरा’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ५ हजार मुलींना शिक्षण घेता आले. हडियोल गावचा आदर्श घेऊन गठोडा, आकोदरा आणि पुराल गावांमध्येही शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:

या गावात ६००० हजार  लोकसंख्ये पैकी १००० शिक्षक
°•❀°━━━━━┛

रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचे काय केले जाते?

रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचे काय केले जाते?

 रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचे काय केले जाते?  


 
.       दि. ५  सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंकhttps://bit.ly/32Yltjn
  .       भारतीय रेल्वे खात्याच्या गाड्यांचे डबे हे जवळपास 30 वर्षे वापरले जातात. तर काहींची दुरुस्ती करून ते जास्त काळही वापरले जातात. पण ज्या डब्यांची सर्व्हीस पूर्ण झाली असेल त्या डब्यांचे काय होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे. याबाबत कोणालाही माहिती नाही. आपण आज जाणून घेणार आहोत अशा डब्यांचे नेमके काय होते.

तसे पाहता रेल्वे या जुन्या डब्यांचा वापर अनेक कामांसाठी करत असते. पण प्रामुख्याने दोन कामांसाठी यांचा वापर करत असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्या पैकी पहिले काम म्हणजे, हे डबे मॉडिफाय करून असे तयार केले जातात की ते पुन्हा प्रवासासाठी वापरता येतील आणि दुसरा वापर म्हणजे, या जुन्या डब्यांना कर्मचाऱ्यांचे घर बनवले जाते.
जे कर्मचारी आपल्या घरापासून दूर राहून काम करतात त्यांच्यासाठी या डब्यांनाच त्यांचे घर बनवले जाते. अशा घरांना कॅम्प कोचेस म्हटले जाते. कॅम्प कोचेस मध्ये राहणारे सर्व कर्मचारी रेल्वेच्या इंजिनीअरींग विभागाअंतर्गत काम करणारे असतात. अनेकदा कामाच्या निमित्ताने या लोकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार या कोचेसमध्ये फ्रिज, कुलर, टिव्ही, बेड अशा सामानाची व्यवस्थाही केली जाते. रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था करायची असेल तर अशा कॅम्प कोचेसमध्ये एसीही लावला जातो.

रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचे काय केले जाते?

शुक्रवार, सप्टेंबर ०४, २०२०

अजब रेल्वे स्थानक - अर्धे महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये आहे

अजब रेल्वे स्थानक - अर्धे महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये आहे

 अजब रेल्वे स्थानक - अर्धे महाराष्ट्रात, अर्धे गुजरातमध्ये आहे 


           तिकीट खिडकी महाराष्ट्रात तर रेल्वे मास्तरचे कार्यालय गुजरात मध्ये 

    
.        दि. ४ सप्टेंबर २०१९

फेसबुक लिंकhttps://bit.ly/32YS1tF
        एखादी नदी, डोंगर रांगा, जंगल आदींचा अर्धा भाग दोन वेगवेगळ्या राज्यांत विभागला गेल्याचे अनेकदा ऐकिवात आहे. परंतु, चक्क एका रेल्वे स्थानकाचा काही भाग महाराष्ट्रात तर काही भाग गुजरातमध्ये आहे. या स्थानकावरील एक बाक असा आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे, तर उर्वरित अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. त्यामुऴे हे एक आश्चर्यच आहे.
'नवापूर' असे या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. हे स्थानक महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात आहे

हे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर येत असल्याने त्याचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या सीमेत तर अर्धा गुजरातच्या सीमेत आहे.जेव्हा नवापूर स्टेशन बांधले गेले तेव्हा महाराष्ट्र व गुजरातचे विभाजन नव्हते. त्यावेळी नवापूर स्टेशन संयुक्त मुंबई प्रांताच्या अखत्यारीत होते. जेव्हा मुंबई प्रांताचे विभाजन झाले तेव्हा नवापूर स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांत विभागले गेले. तेव्हापासून या स्थानकाची स्वतःची वेगळी ओळख आहे. या स्थानकातील तिकीट खिडकी महाराष्ट्रामध्ये आहे, तर स्टेशन मास्तरांचे ऑफिस गुजरातमध्ये आहे. नवापूर स्थानकावर 4 वेगवेगळ्या भाषांमधून घोषणा होत असतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या स्थानकातील तिकीट खिडकी, रेल्वे पोलीस स्थानक, केटरिंग नंदुरबारमधील नवापूर गावात येतात. तसेच स्टेशन मास्तरचे कार्यालय, वेटिंग रूम, पाण्याची टाकी आणि शौचालय गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामध्ये येते. विशेष म्हणजे या स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अर्धा भाग गुजरातमध्ये, तर अर्धा भाग महाराष्ट्रात आहे. अनेकदा रेल्वे स्थानकात होणाऱ्या अपघातांवरून दोन्ही राज्याच्या पोलीस व्यवस्थेत कायम गोंधळ निर्माण होतो.
जरी नवापूर स्थानक हे दोन राज्यांत असणारे स्थानक असले तरी भारतातील ते असे एकमेव स्थानक नाहीय. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सिमेवरही भवानी मंडी नावाचे स्थानक आहे. या स्थानकाचा अर्धाभाग राजस्थानमध्ये आहे तर अर्धा मध्य प्रदेशमध्ये.
____________________________




गुरुवार, सप्टेंबर ०३, २०२०

बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय ?

बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय ?

  बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय ? 


.        दि. ३ सप्टेंबर  २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/3btMkb2
आता डिजिटल युगात पंच करणारी तिकीटे कालबाहय झाली आहेत. तरीही लहानपणापासुन उत्सुकता होती. तिकीटाला पंच का करतात?
  .         एस. टी. बसमधुन प्रवास  करताना तिकिटांना छिद्रे पाडण्यामागे काय कारण किंवा लॉजिक असेल ह्याचे आपल्यापैकी अनेकांना कायम कुतूहल वाटते.

आता तर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आल्यापासून ते साधे तिकीट मिळणे फार कमी झाले आहे. परंतु जेव्हा जेव्हा साधे तिकीट मिळते तेव्हा त्यांना छिद्रे पाडलेली असतात.आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ह्यामागे कारण असू शकेल?
वेगवेगळ्या शहरांत किंवा महामंडळातील तिकिटे वेगवेगळ्या प्रकारची असतात. परंतु सर्वच तिकिटांवर काही माहिती मात्र सारखीच असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, ती म्हणजे एकूण प्रवास भाडे, सिरीज नंबर (प्रत्येक सिरीजमध्ये ९९९९९९ इतकी तिकिटे असतात), सिरीयल_*  *_नंबर, तिकीटाची वैधता दर्शवण्यासाठी काहीतरी खुण व बस सेवा देणाऱ्यांची माहिती. तसेच तिकीट काढतानाची तारीख व वेळ अश्या गोष्टी तिकिटावर असतात.मॅन्युअल तिकिटांवर स्टेज नंबर असतात. प्रवासी जितक्या स्टेजेस प्रवास करतील त्यानुसार प्रवाश्यांना भाडे आकारणी होते. ह्या स्टेजेसचे भाडे साधारणपणे महामंडळ ठरवते. दोन स्टेजेस मध्ये किती अंतर आहे ह्यावर हे भाडे ठरते._*
*_तसेच बस सेवा कुठली आहे म्हणजे साधी आहे की आराम की निमआराम बस आहे ह्यावर सुद्धा भाड्याचा दर ठरतो._*
ह्या प्रवासाच्या स्टेजेसना नंबर दिलेले असतात. आणि हे स्टेज नंबर्स बदलत नाहीत. म्हणजेच बस जर मुंबईहून नागपूरला जात असेल तर मुंबई स्टेज १ असेल आणि नागपूर स्टेज १० (फक्त उदाहरण म्हणून बघा).
आता हीच बस नागपूरहून मुंबईला परत जात असेल तरी स्टेज नंबर बदलत नाहीत. मुंबई ही स्टेज १ व नागपूर हे स्टेज १०च राहील.
कंडक्टरला प्रत्येक स्टेजच्या शेवटच्या थांब्यानंतर ती स्टेज “क्लोज” करावी लागते. उदाहरणार्थ A ते J असा दहा थांब्यांचा एक सेक्शन आहे. त्यात A स्टेज १ आहे , D ही स्टेज २ आहे , G ही स्टेज ३ आहे व J ही स्टेज ४ आहे. तर कंडक्टरला C ह्या थांब्यानंतर स्टेज क्लोज करावी लागेल.
स्टेज क्लोज करण्यासाठी कंडक्टर C ह्या थांब्यापर्यंत विकल्या गेलेल्या तिकिटांचा सिरीयल नंबर त्याच्याकडच्या नोंद वहीत लिहून ठेवतात. ही सिस्टीम तिकीट विक्रीचा एक विशिष्ट पॅटर्न कायम ठेवण्यासाठी वापरली जाते.
परंतु बेस्ट आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील बस सेवा ही क्लोज करण्याची सिस्टीम वापरत नाहीत. हे कंडक्टर जितक्या तिकिटांची विक्री झाली आहे त्यांची एन्ट्री अगदी शेवटी त्यांच्याकडच्या नोंदवहीत करतात.
काही महामंडळात तिकिटांवर “फ्रॉम” स्टेज आणि “टू” स्टेज लिहिलेली असते तर काही तिकिटांवर फक्त “फ्रॉम” स्टेज लिहिलेली असते.
तर काही महामंडळातील तिकिटांवर स्टेज नंबर दिलेलेच नसतात. आपले महाराष्ट्र राज्य महामंडळाचे व KSRTC चे बस तिकीट जवळपास सारखेच असते. ह्यात जे एक ते नऊ हे जे नंबर आहेत ते स्टेज नंबर आहेत.
ह्या तिकिटावर कंडक्टर १९९ व्या स्टेज पर्यंत पंच करू शकतात. १९९ साठी ते डावीकडे सर्वात वरच्या १ ह्या आकड्यावर पंच करतात.
उदाहरणार्थ एखाद्या प्रवाष्याचे तिकीट हे १०३ ते ७५ ह्या स्टेजपर्यंतचे असेल तर कंडक्टर तिकिटावरील डाव्या बाजूला “पासून”च्या बाजूला जो १ हा आकडा आहे त्यावर पंच करतील तसेच त्याच कॉलममधील ० व ३ ह्या आकड्यांवर पंच करतील आणि उजवीकडे “पर्यंत” चा जो कॉलम आहे त्यातील ७ व ५ ह्या आकड्यांवर पंच करतील.
अनेक महामंडळात फक्त “फ्रॉम” स्टेज पंच करण्याची पद्धत आहे. ह्यातसुद्धा अनेक पद्धती आहेत. मुंबईत बेस्टमध्ये प्रवास करणाऱ्यांनी पाहिले असेल तर तुमच्या अप च्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते तर त्याच दोन ठिकाणांदरम्यानच्या डाऊनच्या प्रवासात वेगळ्या ठिकाणी पंच केलेले असते.
इनमराठी वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

संगीत ऐकल्यावर माणसाला नाचावेसे का वाटते ?

संगीत ऐकल्यावर माणसाला नाचावेसे का वाटते ?

संगीत ऐकल्यावर माणसाला नाचावेसे का वाटते ?   


. दि. २ सप्टेंबर २०२०
. 💃🏻🕺🏻 चांगल्या ठेक्याचे संगीत ऐकताच नाचता न येणार्यांनाही नाचावेसे वाटत असते. अनेकजण लग्नसमारंभात किंवा अगदी गणपतीच्या मिरवणुकीतही नाचत असतात. नृत्यकला अवगत नसतानाही आपण नाचावे असे का वाटत असते, याचेही कुतुहल संशोधक मंडळींना वाटत होते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आणि याला संगीताचा ‘बास’ जबाबदार आहे, असे त्यांना दिसून आले.

क्ष💃🏻🕺🏻या संशोधनासाठी त्यांनी कमी आणि उच्च आवृत्तीच्या आवाजांचा म्हणजेच लो-फ्रीक्वेन्सी आणि हाय-फ्रीक्वेन्सी साऊंडचा मेंदूवर होणार्या परिणामाचा अभ्यास केला. याच आवाजांनी संगीताची ‘र्हिदम’ तयार होत असते.मेंदूमधील याबाबतच्या हालचाली समजून घेण्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफीचा वापर करण्यात आला. संशोधकांना असे दिसून आले की, मेंदूची प्रत्येक क्रिया संगीताच्या धूनच्या आवृत्तीवर अवलंबून असते. जर एखाद्या गाण्यात वरचा बास असेल तर पाय थिरकण्यासाठी उत्सुक होतात आणि लोक अधिक नाचतात! हे संशोधन काही विशिष्ट वैद्यकीय स्थितीला समजण्यासाठी आणि उपचारासाठीही उपयुक्त ठरू शकते, असे त्यांना वाटते.
____________________________


संगीत ऐकल्यावर माणसाला नाचावेसे का वाटते ?
समजा, आजच्या २ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

समजा, आजच्या २ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

समजा, आजच्या २ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

फेसबुक लिंक https://bit.ly/3jHozzb
होय, हे म्हणजे डोक्याला ताप आहे पण हे इतिहासात खरोखर झालेले आहे. हे म्हणजे आपण २ सप्टेंबरला झोपलो आणि थेट १४ सप्टेंबरला जागे झालो की काय असे वाटण्याची शक्यता आहे. ब्रिटनने ग्रेगेरियन कॅलेंडर स्वीकारल्यानंतर, २ सप्टेंबर १७५२ नंतर थेट पुढील तारीख ३ सप्टेंबर १७५२ ऐवजी १४ सप्टेंबर १७५२ मानण्यात यावे असे ठरविण्यात आले होते. नक्की असे काय झाले होते की हा कायदा करण्यात आला ??*
ज्युलियस सीझर :
आज आपण ज्याला इंग्लिश कॅलेंडर म्हणून ओळखतो ते पूर्वी १० महिन्यांचे आणि ३०४ दिवसांचे होते. मार्च महिन्यापासून वर्ष सुरू व्हायचे. मार्च, एप्रिल, मे, जून झाले की पाचवा महिना क्विंटिलिस, सहावा सेस्क्विड, सातवा सप्टेंबर, आठवा ऑकटोबर, नववा नोव्हेंबर आणि दहावा डिसेंबर असायचा. त्याची कालगणना चंद्राच्या कलांशी जुळायची नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा रोमन सम्राट ज्यूलियस सीझरने कालगणनेमध्ये अमूलाग्र बदल केले. ज्यूलियस सीझरने चांद्रऐवजी सौर कालगणना वापरण्यास सुरुवात केली;  मग ज्युलियस सीझरने ते कॅलेंडर १२ महिन्यांचे आणि ३५५ दिवसांचे केले. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने वाढवले. तर क्विंटिलिसचे नाव ज्युलियस सीझरवरून जुलै केले आणि सेस्क्विडचे नाव एम्परर ऑगस्टस् वरून ऑगस्ट केले. ख्रिस्तपूर्व ४६ हे वर्ष त्यामुळे ४५५ दिवसांचे केले. ख्रिस्तपूर्व ४५ पासून वर्ष १२ महिन्यांचे गणले जाऊ लागले. या कालगणनेला ज्युलियन कॅलेंडर म्हणतात. तसेच प्रत्येक चवथे वर्ष ३६६ दिवसांचे म्हणजे लीप वर्ष म्हणून मानण्याची प्रथाही त्यानेच सुरू केली. पण ज्यूलियन वर्ष ३६५.२५ दिवसांचे असल्याने प्रत्यक्ष माध्य सौर वर्षापेक्षा ते ०.००७८ दिवसाने (११ मिनिटे १५ सेकंद) मोठे होते. यामुळे १२८ वर्षात ही तफावत १ दिवसाइतकी होते आणि ही तफावत अखंडपणे वाढत गेल्याने दीर्घकालानंतर त्रासदायक ठरेल, असे लक्षात आले.
२ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

सोळाव्या शतकात पोप ग्रेगरी तेरावे यांच्या पुढाकाराने कॅलेंडरमध्ये सुधारणा करण्याचे ठरले. या सुधारणेमुळे सांपातिक वर्ष व कॅलेंडर वर्ष यांतील फरक कमी होऊन कॅलेंडर वर्ष ३६५.२४२५ दिवसांचे झाले. त्या काळी वर्षारंभ २१ मार्चला (वसंतसंपाताच्या दिवशी) धरीत असत; परंतु या सुधारणा होईपर्यंत पडलेल्या फरकामुळे हा वर्षारंभ २१ मार्चऐवजी ११ मार्चला होणार होता; परंतु पोपनी एका आदेशान्वये सेंट फ्रॅन्सिस उत्सवानंतरचा दिवस म्हणजे ५ ऑक्टोबर १५८२ या दिवशी १५ ऑक्टोबर १५८२ हा दिवस मानावा, असे सांगितले. पोप ग्रेगरी तेरावे यांनी हे कॅलेंडर प्रचारात आणल्यामुळे त्यांचा सन्मानार्थ याला 'ग्रेगेरियन कॅलेंडर' हे नाव देण्यात आले आहे. या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात.
इटलीप्रमाणेच स्पेन, लक्सेंबर्ग, फ्रान्स व पोर्तुगाल यांनी १५८२ सालीच तर बेल्जियमसारख्या रोमन कॅथलिक राज्यांनी १५८३ साली व हंगेरीने १५८७ साली सुधारित ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली. डेन्मार्क तसेच डच व जर्मन प्रॉटेस्टंट देशांनी १६९९-१७०० साली हे कॅलेंडर स्वीकारले. ब्रिटन आणि त्याच्या वसाहतीत १७५१ साली हे कॅलेंडर कायदेशीर व सार्वजनिक बार्बींसाठी वापरण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत ज्यूलियन व ग्रेगरियन कॅलेंडरमधील वर्षांत १२ दिवसांची तफावत पडली होती. म्हणून २ सप्टेंबर १७५२ नंतरच्या दिवसाला ३ सप्टेंबर १७५२ ऐवजी १४ सप्टेंबर १७५२ मानण्यात यावे असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे लोकांचा गैरसमज होऊन ‘आमचे अकरा दिवस आम्हाला परत द्या’ या घोषणेसह आंदोलन झाले होते. तसेच याच वर्षापासून वर्षारंभ १५ मार्च ऐवजी १ जानेवारीला मानावा, असा कायदा करण्यात आला.
रशियात १९१७ साली तर ग्रीसमध्ये १९२३ साली हे कॅलेंडर प्रचारात आले. या कॅलेंडरनंतरही लहान प्रमाणात बदल करून ते सांपातिक वर्षाला अधिक जवळ आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि अजूनही ही दोन्ही वर्षे एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. सध्या ग्रेगरियन वर्ष माध्य सौर वर्षापेक्षा २६.३ सेंकंदांनी मोठे आहे. त्यामुळे ३३२३ वर्षांत ते १ दिवसाने मोठे होईल. ही १ दिवसाची तफावत भरून काढण्यासाठी ४०००, ८००० इ. वर्षे ही लीप वर्षे न मानता सर्वसामान्य वर्षे मानावीत. मात्र ही सुधारणा केली, तरी वरील दोन्ही वर्षामध्ये २०,००० वर्षात १ दिवसाची चूक राहीलच.....✍🏻

सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

फेसबुक लिंक https://bit.ly/34K9GI1
आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात.
तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो?
या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?
तर तुमचे मेमोरी कार्ड बाहेर कडून जरा नीट पहा. त्यावर काहीतरी लिहिलेले दिसेल.
प्रत्येक मेमरी कार्ड चा क्लास असतो. हा क्लास ठरवतो कि तुमच्या कार्ड च स्पीड. जेवडा मोठा क्लास तेवढा तुमच्या कार्ड च स्पीड जास्त.
मेमरी कार्ड चे क्लास , क्लास २ , क्लास ४, क्लास ६,क्लास १० असे आहेत.
बहूतांश स्वस्त मिळणारी मेमरी कार्ड हि क्लास २ ची असतात. त्यामुळे ती स्वस्त देखील मिळतात.
तुम्ही तुमच्या गरजे नुसार कोणते कार्ड घ्याचे हे ठरवू शकता. जर तुम्ही साधा मोबाइल वापरत असाल तर क्लास २ पुरेसे आहे.पण जर तुम्ही HD व्हिडीवो शूट करत असाल तर क्लास १० कार्ड तुम्हाला चांगला अनुभव देईल.
आता तुम्हा वाटल क्लास ओळखायचा कसा?
मेमरी कार्ड वर ४ हा अंक "C" मध्ये लिहिला असतो  , ते म्हणजे त्या कार्ड चा क्लास.
आता कदाचित तुम्हाला कळाल असेल कि काही मेमोरी कार्ड स्वस्त आणि काही मेमरी कार्ड महाग का असतात.♍
मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

शनिवार, ऑगस्ट २९, २०२०

विमानाबद्दची अपरिचित माहिती

विमानाबद्दची अपरिचित माहिती


विमानाबद्दची अपरिचित माहिती

.       दि. २९ आॅगष्ट २०२०
फेसबुक लिंक https://bit.ly/3bb5hPp
        बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, विमान प्रवासादरम्यान लोक जास्त गॅस सोडतात. त्यामुळे विमानातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कोळाशाच्या फिल्टरचा वापर केला जातो.
विमान प्रवासादरम्यान आपली जेवणाची टेस्ट बदलते. कारण एअरलाइन्समध्ये देण्यात आलेल्या अन्नात जास्त मीठ टाकलेलं असतं. पण विमानाच्या दबावामुळे जास्त मीठ असल्याचं आपल्या खाताना लक्षात येत नाही.

विमान प्रवासात इमरजन्सीवेळी प्रवाशांना ऑक्सिजन मास्क दिले जातात. हे तुम्हालाही माहीत असेलच. पण याची दुसरी बाजू म्हणजे या मास्कच्या माध्यमातून तुम्ही केवळ १५ मिनिटेच ऑक्सिजन घेऊ शकता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,१९५३ च्या आधी विमानाच्या खिडक्या चौकोणी आकाराच्या असायच्या. पण एका दुर्घटनेनंतर खिडक्यांचा आकार गोल किंवा अंडाकृती केला गेला. कारण गोल आकाराच्या खिडक्यांचे कॉर्नर हवेला जास्त विरोध करत नाही. त्यामुळे विमानावरही जास्त दबाव पडत नाही.
हे फार कुणाला माहीत नसेल पण विमानात पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं जेवण दिलं जातं. असं करण्याचं कारण म्हणजे दोन्ही पायलट एकसारखं जेवण करून आजारी पडू नयेत. म्हणजे समजा पायलटला जे जेवण दिलं गेलं, त्यात काही गडबड असेल तर दोन्ही पायलट एकसारखं खाऊन आजारी पडू शकतात. अशात हे विमानातील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतं.


विमानाबद्दची अपरिचित माहिती


शरीरात दिसू लागले हे संकेत की समजा लवकरच होणार आहे तुमचा मृत्यू !

शरीरात दिसू लागले हे संकेत की समजा लवकरच होणार आहे तुमचा मृत्यू !


.    दि.  २९ जूलै २०२०
फेसबुक लिंकhttps://bit.ly/31BnYbS
      मृत्यू हा अटळ आहे,तरीही प्रत्येकाला मृत्यूचे भय असते.धर्मग्रथांमध्ये महादेवाला महाकाल म्हटले गेले आहे. महाकालचा म्हणजे ज्याच्या हाती मृत्यू असतो तो. खुद्ध महादेवानेच मृत्यूचे असे संकेत सांगितले आहेत जे शरीरात आढळल्यास समजावे आपला मृत्यू जवळ आला आहे. 

जर तुम्हाला अचानक गोमाशानी घेरलं असेल तर समजा तुमचं आयुष्य केवळ एकच महिना शिल्लक राहिले आहे.तसेच डोक्यावर गिधाड, कावळा किंवा कबुतरा येऊन बसला तर त्या मनुष्याचा एका महिन्यातच मृत्यू होतो.,जर तुमचे शरीर अचानक पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल निशाण दिसायला लागले तर समजा ६ महिन्याच्या आत मृत्यू होईल.तसेच ज्या मनुष्याचे तोंड, कान, डोळे आणि जीभ काम करत नसले तर, त्याच्या मृत्यू ६ महिन्यांमध्ये होतो.
जर चंद्र अथवा सूर्याच्या आसपासचा भाग काळा दिसत असेल तर मृत्यू १५ दिवसांत होतो. जर तेल, पाणी आणि तूपात आपले प्रतिबिंब दिसत नसेल ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नाकातून पाणी येते, त्याचे आयुष्य केवळ पंधरा दिवसांचे असते. जेव्हा सर्व अंग दुखत असून टाळू कोरडी पडली असेल तर तो व्यक्तीचा एका महिन्यात मृत्यू होऊ शकतो.

शरीरात दिसू लागले हे संकेत की समजा लवकरच होणार आहे तुमचा मृत्यू !