Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

mahanirmiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mahanirmiti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै २३, २०२३

  सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

नागपूर: 
घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची नागपूर जिल्हातील संख्या तब्बल 16 हजार 192 झाली आहे. व त्यांच्याकडून एकूण 172 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प क्षमतेनुसार 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीज वापरामुळे ग्राहकाच्या वीजबिलात मोठी कपात होते. याशिवाय या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंग द्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते.

ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. सोबतच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. यामुळे ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

मंगळवार, एप्रिल २५, २०२३

 महानिर्मिती कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता परीक्षा २६ ते २८ एप्रिल रोजी

महानिर्मिती कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता परीक्षा २६ ते २८ एप्रिल रोजी

६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवार
राज्यभरात ११८ केंद्रांवर परीक्षा
परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर
नागपूर:
महानिर्मिती जाहिरात क्र.१०/२०२२ व अधिसूचना ३६७१ दिनांक २१ एप्रिल २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा २६ ते २८ , एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी तपशीलवार माहिती, महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

एकूण ६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवारांनी अर्ज केला असून राज्यभरातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.सहाय्यक अभियंता जागा ३३९, एकूण अर्ज प्राप्त ४३३४५. कनिष्ठ अभियंता जागा एकूण ३२२, एकूण प्राप्त अर्ज ३७०९०. एकूण अर्ज ८०४३५ आले असून २६ एप्रिल ला ६३ केंद्रे, २७ एप्रिल ला ११८ केंद्रे, २८ एप्रिल ला २८ केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. २६ एप्रिलला दोन सत्रांमध्ये, २७ एप्रिल ला तीन सत्रांमध्ये तर २८ एप्रिल ला एका सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. देखील पाठविण्यात आले आहे. परिक्षेसंदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीकरिता ०२२- ६९४३५०००, agmhrrc@ mahagenco.in तसेच आय.बी.पी.एस. हेल्प डेस्क नंबर 18001034566 यावर संपर्क साधावा.

महानिर्मितीची भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी कळविले आहे. 

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

चंद्रपूर CTPS आंदोलन प्रकरण:सोमवारी उच्चस्तरीय बैठक लावण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

चंद्रपूर CTPS आंदोलन प्रकरण:सोमवारी उच्चस्तरीय बैठक लावण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश


सिएसटीपीएस येथील प्रगल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा
आंदोलन मागे घेण्याचे आवाहणआंदोलनस्थळी भेटउच्च स्तरीय बैठक लावण्याचे ऊर्जामंत्री यांचे निर्देश

         जमीनीचे अधिग्रहण करुन सुध्दा प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्रात रोजगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आज सिएसटीपीएसच्या चिमनीवर चढून आंदोलन सुरु केले. याची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत ऊर्जामंत्री नितीन राऊतराज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपूरे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या संचालिका शैला ए यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत प्रकल्पग्रंस्तांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. तसेच यावेळी सदर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी या संदर्भात सोमवारी उच्च स्तरीय बैठक लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. तोवर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
    
        सिएसटीपीएस च्या माध्यमातून विद्यूत निर्मीती केल्या जात आहे. हा प्रकल्प सुरु करत असतांना अनेक शेतक-यांच्या शेतजमीनी प्रशासनाच्या वतीने हस्तांतरित केल्या गेल्या. या मोबदल्यात नौकरी व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामूळे संतप्त झालेल्या ९ प्रकल्पग्रस्तांनी आज बुधवारी सिएसटिपीएसच्या चिमनीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोनस्थळ गाठत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी  ऊर्जामंत्री नितीन राऊतराज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपूरे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्यूत केंद्राच्या संचालिका शैला ए  यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत सदर आंदोलनाची माहिती दिली. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या न्यायक मागण्यांबाबत अवगत केले. सदर प्रकल्पग्रस्त हे मागील  अनेक वर्षांपासुन आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. 


मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामूळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष असणे स्वाभाविक आहे. मात्र महाविकास आघाडीचा सदस्य म्हणून या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले. तसेच या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली. मागणीची तात्काळ दखल घेत ना. नितीन राऊत यांनी सोमवारी या संदर्भात मुबंई येथे उच्च स्तरिय बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. तोवर आंदोलकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहण आ. किशोर जोरगेवार यांनी केले.

मंगळवार, जून २३, २०२०

 कोरोनाने मृत्यु झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान:ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाने मृत्यु झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान:ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचा महत्वपूर्ण निर्णय

Goods not arrived, crores of rupees deposited in company account ...
नागपूर (खबरबात):
अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजाविताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला आहे.
महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यू देखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

या पुढे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल. ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय/पालिका/महानगरपालिका/आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

शुक्रवार, जून १९, २०२०

ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प:डॉ.नितीन राऊत

ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प:डॉ.नितीन राऊत

नागपूर(खबरबात):
राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे विद्युत भवन नागपूर येथून व्ही.सी.द्वारे आयोजित बैठकीत दिल्या. 
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते पुढे सांगितले कि, एनटीपीसीने हा वीज प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करावा. 

राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वानी गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञानी विचार करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात असून लवकरच यातून वीजनिर्मिती सुरु होईल अशी माहिती महानिर्मितीतर्फे डॉ. राऊत यांना देण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्याना दिल्या.

या बैठकीस प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैला ए. , महावितरणचे संचालक (वाणिज्य)सतीश चव्हाण, महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) थंगपांडियन , हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजकुमार तासकर, मिलिंद नातू, राजेश पाटील, नागपूर प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण सुहास रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

शुक्रवार, एप्रिल १७, २०२०

Mahavitaran Missed call and SMS Facility for Registering Power Failure Complaints

Mahavitaran Missed call and SMS Facility for Registering Power Failure Complaints

Mumbai:
Mahaviataran is always commited to provide quick and trusted service to its consumers. It has come up with its quick,  missed call and SMS service for its consumers to register their complaints regarding the power failure through their mobile phone.

Due to the Coronavirus pandemic, the state has declared lockdown from 22th March to 3rd May 2020. Therefore, the Hon. Energy Minister Dr.Nitin Raut, instructed Mahavitaran to make it for the consumers to register their  complaints regarding power failure, sitting in their home. This facility is available to the consumers from today onwards.

It is mandatory that the  consumer must have registered his mobile number along with the Consumer number for registering the power failure complaint through missed call. The consumer has to give a missed call from his registered number to Mahavitaran on 022-41078500. On the basis of this missed call, the Consumer number will be identified through a computerised system and accordingly a SMS will be sent to the consumer that the complaint is registered.

The consumers who have not yet registered their mobile number with Mahavitaran for availing the missed call or SMS service, can send SMS through the number which they want to register by typing MREG and sending this SMS on 9930399303. The consumer's mobile number will be registered with Mahaviataran within 24 hours of receiving this message.
It is not mandatory to register the mobile number for registering the complaint through SMS. The complaint can be registered from any mobile number. However, the correct 12 digit Consumer number is mandatory. The complaint will be registered once the Consumer sends a SMS NOPOWER on 9930399303. The details about the SMS format will be sent to consumers. However, the complaint will be accepted only when the 12 digit Consumer number is correct.

Alongwith this new Missed call and SMS service, the consumer can also register power failure complaints through the previously available options such as the Mahavitaran website i.e.  www.mahadiscom.in,  mahavitaran mobile app and also on the 24X7 active Call center having toll free number 1800102343,  18002333435 or 1912.

रविवार, एप्रिल ०५, २०२०

उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला तातडीची भेट

उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला तातडीची भेट

नागपुर/प्रतींनिधी:
आज राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महापारेषणच्या प्रादेशिक भार प्रेषण अंबाझरी नागपूर केंद्राला भेट दिली. 

राज्यभरातील पारेषण विद्युत वाहिनीच्या जाळ्यांच्या सुदृढतेबाबत तसेच रात्री ८ ते १० च्या काळातील करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत सविस्तर आढावा घेतला. ह्या केंद्राचे मुख्य अभियंता श्री.भाऊराव राऊत आणि अधिकारी वर्गास त्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. उर्जामंत्री आज रात्री विद्युत भवन नियंत्रण कक्ष येथून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
राज्यभर अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत निर्देश

राज्यभर अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत निर्देश

व्ही.सी. वर साधला संवाद
नागपूर/प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील दिवे मालवून ९ मिनिटे मेणबत्ती,पणती, मोबाईल फ्लैश लावण्याचे आवाहन केल्यानंतर राज़्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जनतेला या काळात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आज सकाळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आसिम गुप्ता, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैलजा ए. यांच्याशी संवाद साधला. वीज कंपन्यांच्या वतीने करण्यात आलेल्या उपायोजनेचा तपशीलवार आढावा घेतला.

रात्रीच्या वेळी महावितरणचे सर्व वीज उपकेंद्र आणि फिडर सुरू राहतील, जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी यंत्रणेने घेणे गरजेचे आहे.
महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या सर्व वीज वाहिन्या व्यवस्थित कार्यरत असल्याची माहिती महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली.

वीजेची मागणी मागील १० दिवसात कमी झाल्याने सध्या महानिर्मितीचे ५ संच कार्यरत असल्याची माहिती महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैलजा ए. यांनी दिली. आकस्मिक परिस्थितीत कोयना जलविद्युत केंद्र आणि उरण येथील वायु ऊर्जा प्रकल्प, तिलारी,भिरा जलविद्युत केंद्र पूर्णपणे तयार आहे. हे जलविद्युत केंद्र आवश्यकतेनुसार रात्री ८.३० वाजल्यापासून पूर्णपणे सुरू राहणार आहेत, असेही श्रीमती शैलजा ए.यांनी यावेळी सांगितले.

वीजेची वारंवारिता ४९.९ ते ५०.२ या दरम्यान ठेवण्यात सातत्याने प्रयत्न केला जाईल,असे ऊर्जा सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आसिम गुप्ता यांनी सांगितले.


आजच्या बैठकीत नागपूर कार्यालयात महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणच्या मुख्य अभियंता ज्युईली वाघ, अंबाझरी भार प्रक्षेपण केंद्राचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत उपस्थित होते.

बैठकीनंतर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अंबाझरी भार प्रक्षेपण केंद्रास भेट देऊन तेथील कार्यप्रणालीचा आढावा घेतला व अधिकऱयाना सतर्क राहण्याचे आदेश दिले. राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा राहावा म्हणून आज रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत ऊर्जामंत्री विद्युत भवन नागपूर नियंत्रण कक्षातून राज्यभरातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणार आहेत.

शुक्रवार, एप्रिल ०३, २०२०

Energy Minister urges CM to save starving persons not covered under Food Security Act

Energy Minister urges CM to save starving persons not covered under Food Security Act


Nagpur/
The State Energy minister Dr. Nitin Raut has urged the Chief Minister Uddhav Thakarey to provide ration through Public Distribution System (PDS) to the starving persons who do not possess any kind of ration cards and are not covered under National Food Security Act 2013 (NFSA) during the lockdown period.

In a letter sent to the Chief Minister on Thursday, Dr Raut pointed out that there are thousands of people residing in slums who do not have ration cards. They are mostly industrial workers, labourers, cycle richshaw pullers, autorickshaw drivers, sanitory workers, scavengers, homeless persons living on footpath, orphans, brickyard workers, construction workers, boot polishers, porters, hamal, coolie, sugarcane labourers,  etc. They have been ruined due to lockdown as they have lost their employment. As they are living hand to mouth are now starving. As they do not have any type of ration card they are not covered under National Food Security Act 2013.

Hence, it is a desparate situation for them which needs to be addressed at the earliest. So he urges the Chief Minister to make necessary changes in the State policy to cover them under National Food Security Act 2013 with immediate effect.

The beneficiaries covered under this act are provided food security under PDS. They belong to the weaker sections of society including below poverty line,  above poverty line and other economically weaker sections. 

It is to be mentioned here that following the lockdown due to Covid-19, the state government has made several arrangements to provide food supplies to the weaker sections of the society who are in possession of various ration cards including Tricolour Ration Card, Yellow, Saffron, White Ration Card and Priority House Hold Cards.They will be provided ration for a period of three months through the PDS.

Those do not have any kind of ration cards are not rightly covered under the act. They cannot be provided food through the PDS. To save them from hunger and starvation, Dr Raut has further demanded the Chief Minister to allow MLAs to spend Rs 25 lakh from MLA fund to provide them food at the earliest.

He has further demanded the Chief Minister to instruct the cable TV operators not to disconnect the cable on failure of monthly payments from the subscribers which  should be collected after a period of one month.

सोमवार, मार्च २३, २०२०

कामगारांचे वेतन कपात करु नका:पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

कामगारांचे वेतन कपात करु नका:पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन


जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा पुरवठा सुरु राहील
वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम व बळकट करणार
मेडीकलमध्ये 100 बेडचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष 
 नागपूर : 
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तुंची पुरेशी उपलब्धता असून, नागरिकांनी यासाठी गर्दी करु नये तसेच औद्योगिक तसेच खाजगी आस्थापनेवर असलेल्या कामगारांची वेतन कपात करु नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

कोरोनासंदर्भात जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करतानाच वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात  स्वयंसेवी (एनजीओ) संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.   

            विभागीय आयुक्त कार्यालयात आज पालकमंत्री डॉ. राऊत यांनी विविध घटकांशी संवाद साधला. त्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक आणि अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त अभिजित बांगर, वनराई संस्थेचे विश्वस्त गिरीश गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे सुरेश राठी, प्रताप मोटवानी, संतोष अग्रवाल, श्री. वाधवानी, नंदू गौर, अजय पाटील, कौस्तुभ चटर्जी, लिना बुधे, रोटरी क्लबचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

            प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोरोना रुग्णांची संख्या सद्या स्थिर असून, ही सकारात्मक बाब असल्याची माहिती देऊन पालकमंत्री म्हणाले. सध्या नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तुंचा कोणताही तुटवडा नाही. त्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी करु नये. जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले.


कोरोनाला प्रतिबंध हे मानवी जातीशी विषाणूचे असलेले महायुद्ध आहे. त्यात विषाणूला हरवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करणार असल्याचे सांगून पालकमंत्री राऊत म्हणाले

नागपुरातील महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांनी कोरोना साथीविषयी जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यासाठी काम करावे. उद्योजकांनी सॅनिटायझर, मास्क –गाऊनचे उत्पादन करुन पुरवठा करावा. निराधार, बेघर, आजारी व्यक्तीस मदतीचा हात द्यावा. जिल्हा प्रशासनातर्फे हेल्पलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वांनी मिळून काम करु या, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व घटकांनी यथाशक्ती सहयोग दिल्यास कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनासाठी स्वतंत्र सुविधा


कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसह उपचारासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रभावी व परिणामकारक उपचार सुरु आहेत. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनासोबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य आवश्यक आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामध्ये 100 खाटांचे स्वतंत्र अतिदक्षता कक्ष प्राधान्याने पूर्ण करण्यासोबतच दीड हजार खाटा यासाठी आरक्षित ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.

महाविद्यालयात येणा-या दैनंदिन रुग्णांच्या उपचारासाठी तसेच दाखल करण्यासाठी शहरातील रुग्णालयांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक भावनेतून यासाठी सहकार्य करावे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची तसेच साहित्याचीही आवश्यकता भासल्यास ती उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
     आमदार निवास येथे सुरु असलेल्या विलगीकरण केंद्रात स्वच्छतेसह आवश्यक सुविधा तात्काळ पुरविण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी त्यांनी दिल्यात.


संचारबंदीदरम्यान सहकार्याचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी व जिल्हाबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही सद्यसि्थतीचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी  घेतला. या कालावधीत सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत दिली जाणार आहे. मात्र ही वाहने प्रशासनाकडून प्राधिकृत करुन घेणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा या कालावधीत नियमित सुरु राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील, असेही ते म्हणाले.

शनिवार, मार्च २१, २०२०

 (PRSI) Nagpur Chapter नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की करेंगा मदत

(PRSI) Nagpur Chapter नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की करेंगा मदत



नागपूर/
21 मार्च 2020 कोरोना संकट में पीआरएसआई की विनम्र पहल पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफ इंडिया (PRSI) नागपुर चैप्टर ने कोरोना वायरस के वर्तमान संकट के दौरान एक विनम्र पहल की है। पीआरएसआई ने विदेश में रहने वाले नागपुर के नागरिकों से अपील की है कि वे लोग भारत से बाहर हैं और कोरोना वायरस के कारण यदि उनका स्वदेश आना संभव नहीं है तथा उनके कोई बुज़ुर्ग स्वजन संतरा नगरी , नागपुर में रहते हों और उन्हें किसी मदद की ज़रूरत हो तो पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफइंडिया , नागपुर चैप्टर Public Relations Society of India (PRSI) Nagpur Chapter यहां नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की मदद कर सकता है। वरिष्ठ नागरिकों की सहायता के लिए पीआरएसआई के निम्नलिखित पदाधिकारियों से उनके व्हाट्सएप नम्बर पर एस पी सिंह -9422803922 यशवंत मोहिते-9421717247 शोभा धनवटे- 9823183027 एम एम देशमुख - 9423104941 मनोज कुमार- 8275742727 तथा कविता टीबड़ीवाल से 9373108044 सम्पर्क किया जा सकता है।

शुक्रवार, मार्च १३, २०२०

 महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचा अपघाती मृत्यू

महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचा अपघाती मृत्यू

Image may contain: 1 person, closeup and outdoor
नागपूर: महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत कळताच लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यांच्या खिशात पैसे, ओळखपत्र, मोबाइल आदी साहित्य सापडले. त्या आधारेच लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला व या घटनेबाबत कळविले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास शासकीय वाहनाने घुगल रेल्वे स्थानकावर आले. मित्राला घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मुंबईच्या बाजूने असलेल्या रल्वे मार्गावर ते चालत गेले आणि पार्सल ऑफिसच्या थोडे पुढे त्यांनी धावत्या मालगाडीखाली उडी घेतली.घुगल यांनी आत्महत्या केली कि त्यांचा तोल गेला याबाबत चौकशी सुरु आहे. 

घुगल हे काटोल मार्गावरील महावितरणच्या कॉलनीत राहात होते. शुक्रवारी सकाळीही १० ते ११ च्या सुमारास ते रेल्वे स्थानकावर आले होते, अशी माहिती आहे.

बुधवार, मार्च ०४, २०२०

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र बाह्यगृह  क्रीडा स्पर्धा 2020 चे औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे थाटात उद्घाटन

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र बाह्यगृह क्रीडा स्पर्धा 2020 चे औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे थाटात उद्घाटन

भुसावळ:
महानिर्मितीच्या बाहयगृह क्रीडास्पर्धांचे उद्घाटन औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे ३ मार्च रोजी थाटात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे हे होते तर कार्याध्यक्ष म्हणून श्री. विवेक रोकडे मुख्य अभियंता ६६० प्रकल्प यांची उपस्थिती लाभली.

उद्घाटन सोहळ्यामध्ये पारस,खापरखेडा,चंद्रपूर, कोराडी,पोफळी,उरण, नाशीक,नवी करणीय ऊर्जा, भुसावळ,परळी,मुख्यालय इ. महानिर्मितीच्या विविध विद्युत केंद्रांचे संघ सहभागी झाले,त्यात क्रिकेट,बास्केटबॉल,कबड्डी,व्हॉलीबॉल व अथेलेटीक्समध्ये थाळीफेक, गोळाफेक,रनिंग, लांब उडी,उंच उडी इ. खेळांचा समावेश आहे. प्रमुख उपस्थितीत उपमुख्य अभियंता श्री.नितीन पुणेकर,सुनील रामटेके,सुनील इंगळे व प्रभारी उप मुख्य अभियंता श्री मधुकर पेटकर यांची तसेच अधीक्षक अभियंता श्री.चिंतामण निमजे,मदन अहिरकर, दिलीप जाधव,महेश महाजन,गजलरवार ,डाँ. प्रशांत जाधव,शांताराम पाटील,औदयोगिक संबंध अधिकारी श्री मुकेश मेश्राम ,दत्तात्रय पिंपळे,बाबरे,राणे,प्रधान सुरक्षा विभागाचे पाटील यांच्यासमवेत विद्युत केंद्र भुसावळचे विविध विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी,पत्रकार कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांच्या हस्ते महानिर्मितीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, त्यापाठोपाठ मान्यवरांना स्पर्धेमध्ये सहभागी महानिर्मितीच्या विद्युत केंद्राच्या संघांकडून सलामी देण्यात आली.

भुसावळ विद्युत केंद्राच्या राष्ट्रीय खेळाडूंकडून मैदानामध्ये आणलेल्या मशालीद्वारे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांच्या शुभ हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन केले. क्रीडाज्योत राष्ट्रीय खेडाळू श्री मनोज जमदाळे,संदीप वाघ,विनोद भिरुड,विश्वनाथ पावरा, नयन सागर मणी,ज्ञानेश्वर सहारे,दिगंबर गीते,सुभाष राठोड,सचिन भिरुड,राजेश शिंदे,संतोष जिरे यांनी आणली व आकाशामध्ये रंगीबिरंगी फुगे सोडून उत्साह द्विगुणित करण्यात आला.

याप्रसंगी शारदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व सजावट केलेल्या ओपन जीपने आलेल्या प्रमुख अतिथींचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आपल्या भाषणामध्ये ६६० प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.विवेक रोकडे यांनी खेळांचे मुख्य लक्ष्य हार व जीत नसून कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य असल्याचे सांगितले. खेळांमधून स्फूर्ती घेऊन आपल्या आस्थापनेच्या यशात वाटा देण्याचे याप्रसंगी सांगितले तर अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांनी सर्व सहभागी चमू व उपस्थितांचे स्वागत करीत या खेळांमधून कर्मचाऱ्याच्या अंतर्गत गुणांना वाव देत सांघिक भावना सर्वांमध्ये रुजविण्याचा हेतू असल्याचे सांगितले तसेच सर्वांनी खेळ अंगीकरून स्वतःच्या स्वास्थ्यासोबतच विद्युत केंद्राच्या बरोबरच देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आव्हान याप्रसंगी केले तसेच भुसावळ औ.वि.केंद्र हे नफ्यात असलेले केंद्र आहे असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे मार्च पास व ध्वजारोहणाचे संचलन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. पुरुषोत्तम वारजूरकर यांनी केले. प्रास्तविक श्री मुकेश मेश्राम यांनी केले. भुसावळ औ.वि.केंद्राचे संघ व्यवस्थापक श्री मिलिंद खंडारे यांनी उपस्थित खेडाळूंना शपथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले.श्रद्धा कदम,एश्वर्या खोचे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री सचिन कवीतके,राजेंद्र निकम,संजय दराडे,यशवंत शिरसाठ, सुरेंद्र यावले,नितीन मांडवे,प्रफुल्ल आवारे,महेश वारुळकर इतर सर्वांनी परिश्रम घेतले.

मंगळवार, जानेवारी २१, २०२०

४४ वीं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा की चंद्रपूर में शानदार शुरुआत

४४ वीं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा की चंद्रपूर में शानदार शुरुआत


लाइव रिजल्ट अपडेट के लिए मोबाइल एप्प का उद्घाटन

बेहतरीन आयोजन, शानदार मेजबानी की सर्वत्र प्रशंसा 
नामी खिलाड़ियों का खेल देखने का बेहतरीन मौका
चंद्रपूर :
खेलों से स्वास्थ्य अच्छा रहता है और खेल भावना का लाभ स्वयं व संस्था को मिलता है. महाजेनको ने चंद्रपूर में राष्टीय कबड्डी प्रतियोगिता की मेजबानी स्वीकारी और इसे एक बेहतरीन आयोजन में तब्दील कर दिया. यह बात उद्घाटक तथा कार्यक्रम के अध्यक्ष मुख्य अभियंता राजू घुगे ने कही. चंद्रपूर के उर्जानगर स्थित खुले रंगमंच मैदान पर ४४ वीं अ.भा.विद्युत क्रीडा नियंत्रण मंडल कबड्डी प्रतियागिता के उद्घाटन कार्यक्रम में वे बोल रहे थे. 

इस दौरान महाजेनको के उप मुख्य अभियंता अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, राजेश राजगडकर,राजेश कुमार ओसवाल, विजया बोरकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसले, प्रतियोगिता के निरीक्षक ललित गायकवाड, जे.ड्ब्ल्यु. खारपाटे, सी.आय.एस.एफ. कमांडंट पुष्पेंद्र सिंग, पुरुषोत्तम वारजुरकर, जिला क्रीडा अधिकारी बोबडे, जिला कबड्डी असोसिएशन के दिलीप रामेडवार, ऊर्जा मंत्री के विशेष कार्य अधिकारी यशवंत मोहिते विशेष रूप से मंचपर विराजमान थे. 

इसके पश्चात मेधावी खिलाडीयोंको सन्मानित किया गया जिसमे अभिनंदन कुमार, गुरुसेवक सिंग, पी.गणेशन, बी.महेश, त्यागराज, ए.किरण, अनिल कुमार, सुरेश कुमार, अजय शिंदे, धिरज रोकडे शामिल थे. 

शुरुआत में अध्यक्ष राजू घुगे के हाथों क्रीड़ा ज्योत प्रज्जवलन के साथ स्पर्धा उद्घाटन की आधिकारिक घोषणा की गई. खिलाड़ियों ने मार्च पास्ट कर अतिथियों को मानवंदना दी. अनिल मुसले ने प्रास्ताविक रखा और कबड्डी स्पर्धा के आयोजन की भूमिका और बेहतरीन नियोजन के पीछे महाजेनको चंद्रपूर की भावना और प्रयासों के बारे में विस्तृत से जानकारी दी. इस अवसर पर उर्जामंत्री डॉ.नितिन राऊत के शुभकामना संदेश का पठण हूआ. राजू घुगे ने कहा कि विद्युत क्षेत्र में बढ़ती प्रतिस्पर्धा को ध्यान में रखते हुए अब सभी को व्यावसायिकता विकसित करने के साथ अधिक विशेषज्ञता हासिल करने में सक्षम होना चाहिए ताकि आपके छोटे योगदान से आपके संगठन का विकास हो सके.

महाजेनको द्वारा राष्ट्रीय स्तर पर सभी टीमों के अलावा अन्य कबड्डी प्रेमियों को लेटेस्ट रिजल्ट और आयोजन के बारे में ताजी जानकारी उपलब्ध कराने के उद्देश्य हेतू मोबाइल एप्प बनाया गया है. इस राष्ट्रीय विद्युत विभाग कबड्डी स्पर्धा में देशभर से १७ टीमें हिस्सा ले रही है. इनमें दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिलनाडू, तेलंगाना, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र आदि राज्यों की टीमें शामिल है. सभी टीमों को ४ ग्रुप में बांटा गया है. प्रतियोगिता के प्रारंभ में लीग मुकाबले खेले जायेंगे. 23 और 24 जनवरी को क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और फाइनल मैच खेले जायेंगे. 
मैदान पर बलून, विविध राज्यों के पहनावें में सजे बच्चे, उच्चस्तरीय कबड्डी मैदान, आकर्षक सजावट और अनुशासनमय वातावरण उद्घाटन कार्यक्रम की विशेषता रही. देशभर से आई टीमों के प्रशिक्षक और टीम मैनेजरों का विशेष स्वागत किया गया. कार्यक्रम का उत्कृष्ट सूत्र संचालन नासिर खान ने किया. इसके बाद एम.पी.पॉवर विरुद्ध तेलंगाणा जनको तथा पंजाब स्टेट पॉवर विरुद्ध गुजरात पॉवर के बीच उद्घाटन मुकाबले खेले गये. जिनमें क्रमश: तेलंगाणा ने ४० अंकोसे और पंजाब ने २८ अंकोसे बाजी मारी. 

इस शानदार समारोह मे अधीक्षक अभियंता दत्तात्रय सुरजूसे, सी.एम.डांगे, अनिल पुनसे, मारुती महावादी, पुरुषोत्तम उपासे, अनिल गंधे, संजय तायडे, विजय उमरे, राजू सोमकुवर, प्रफुल्ल कुटेमाटे,सुहास जाधव, सुनील कुळकर्णी, इंदर चव्हाण, अधिकारी वर्ग मे संदेश मोरे, डॉ.संगीता बोधलकर, अरविंद वानखेडे, मुकेश मेश्राम,श्रीकृष्ण वायदंडे सभी टीमों के कोच, टीम मैनेजर, खिलाड़ी, चंद्रपूर ताप विद्युत गृह के अधिकारी, अभियंता, संघटन प्रतिनिधि, पत्रकार आदि प्रमुख रूप से उपस्थित थे. कार्यक्रम की सफलता के लिए स्पर्धा आयोजन समिति के पदाधिकारी, सदस्य आदि प्रयासरत हैं.

शनिवार, जानेवारी १८, २०२०

महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खो-खो,व्हॉलीबॉल मध्ये नागपूरची विजयी सलामी

महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खो-खो,व्हॉलीबॉल मध्ये नागपूरची विजयी सलामी

नागपूर/प्रतिनिधी:
आजपासून येथे सुरु झालेल्या महावितरणच्या ३ दिवसीय राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत यजमान नागपूर संघाने व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. रवीनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धा होत आहेत. 

आज झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान नागपूर संघाने पुणे-बारामती संघाचा २५-१८, २५-१२ गुणांनी पराभव केला. नागपूर संघाकडून पियुष गोसेवडे, स्नेहल मेहरखेड यांचा खेळ उत्कृत्ष्ट झाला.

अन्य एका सामन्यात नांदेड परिमंडलाने अमरावती-अकोला परिमंडलाचा २५-१४,२५-२३ गन फरकाने पराभव केला. नांदेड परिमंडलाकडून सय्यद मोबीन, पवन सूर्यवंशी, गजानन नीलपत्रेवार यांचा खेळ उत्कृष्ट झाला.

कब्बडी

पुरुषांच्या कब्बडी स्पर्धेत भांडुप-रत्नागिरी परिमंडळाने औरंगाबाद-जळगाव परिमंडळाचा २८-१५, २९-१० गुणांनी पराभव केला. भांडुप परिमंडलाने पहिल्या डावात २ बोनस गुणाची तर दुसऱ्या डावात औरंगाबाद परिमंडलाने १ बोनस गुणाची नोंद केली. भांडुप-रत्नागिरी परिमंडलाकडून निखिल पटले आणि सुरेश गुंजाळ यांचे विजयात महत्वाचे योगदान राहिले.

खो-खो

खो-खो स्पर्धेत भांडुप परिमंडलाने कल्याण परिमंडलाचा १ डाव ६ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या अन्य एका सामन्यात पुणे परिमंडलाने लातूर परिमंडलाचा १ डाव १५ गाडी राखून पराभव केला. कॊल्हापूर विरुद्ध औरंगाबाद संघ दरम्यान झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने १ डाव ६ गाडी राखत विजय मिळवला. यजमान नागपूर संघाने अमरावती संघाचा १ गाडी आणि अडीच मिनिटे शिल्लक ठेवत विजय संपादन केला. खो-खो महिला गटात नागपूर संघाला लातूर संघाकडून पुढे चाल मिळाली.

मैदानी स्पर्धा

महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईची स्पर्धक प्रिया पाटीलने १४.८ सेकंदाची वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकवला. कल्याण परिमंडलाच्या नम्रता राजपूतने १५ . ६३ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत औरंगाबाद परिमंडलाच्या चेतन केदारने १. ४५ मीटर उडी मारत पहिला क्रमांक तर लातूर परिमंडलाच्या जाकीर अलीने १ . ४० मीटर उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत नागपूरच्या सरिता सोरटे आणि कोल्हापूरच्या अश्विनी देसाई यांनी १. १० मीटर उडी मारली. अखेर नाणेफेक करून निकाल जाहीर करण्यात आला यात नागपूरच्या सरिता सोरटेला विजयी घोषित करण्यात आले.

पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत औरंगाबादच्या चेतन केदार आणि लातूरच्या जाकीर अली यांनी ५. ३३ मीटर उडी मारली. नाणेफेक करून निकाल जाहीर करण्यात आला यात औरंगाबादच्या चेतन केदारला विजयी घोषित करण्यात आले. महिलांच्या स्पर्धेत नागपूरच्या सरिता सोरतेने ३ . ७७ मीटर उडी मारत पहिला क्रमांक पटकावला. मुख्य कार्यालयाच्या प्रिया पाटीलने ३ . ३८ मीटर उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला.
पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पुणे परिमंडलाच्या प्रवीण बोरावकेने १०. ६२ मीटर गोळाफेक करीत पहिला क्रमांक तर कोल्हापूर परिमंडलाच्या इम्रान मुजावरने १०. २५ मीटर गोळाफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला. महिला गटात कोल्हापूरच्या विजया माळीने ७. ७१ मीटर गोळाफेक करीत पहिला तर कल्याण परिमंडलाच्या हर्षला मोरेने ७. ०९ मीटर गोळाफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला.

गुरुवार, जानेवारी ०९, २०२०

 वीज कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वत:मध्ये बदल करून सांघिक भावना जोपासावी:चंद्रकांत थोटवे

वीज कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वत:मध्ये बदल करून सांघिक भावना जोपासावी:चंद्रकांत थोटवे

ऊर्जामंत्र्यांनी दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, लवकरच करणार खापरखेडा दौरा 
३० व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता 
३४५ पिशव्या रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी 
टेक फेस्ट,ऊर्जा प्राद्योगिकी अभिनव उपक्रम 
आनंद मेळावा, क्रीडा,सांस्कृतिक व मनोरंजनातून चैतन्यमय वातावरण  
नागपूर/प्रतिनिधी:

अधिकारी-कर्मचारी-कुटुंबियांशी संवाद साधायला मला नेहमीच आवडते, अश्या संवादातून नवनवीन संकल्पना समोर येतात. स्पर्धेच्या युगात आता प्रत्येकाने थोडे-थोडे बदलले पाहिजे याकरिता ठाम निश्चय, एकमेकांना समजून घेण्याची भावना, प्रेम-भाव, चिकित्सक वृत्तीने काम,उत्तम नियोजन आणि एकत्र मिळून काम करण्याची भावना स्वत:मध्ये निर्माण करा असे महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी खापरखेडा येथील मनोरंजन केंद्र क्रमांक १ सभागृहात ३० व्या वर्धापन दिन समारोपीय समारंभात प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे होते तर मंचावर मुख्य अभियंते प्रकाश खंडारे, धैर्यधर खोब्रागडे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, दिलीप धकाते, उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, शरद भगत, सुनील सोनपेठकर व जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

संचालक पाच सूत्री, अरर, थ्री आर, वर्किंग फॉर बेटर टुमॉरो, पोल सारख्या उपक्रमांतून महानिर्मितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे व त्याचाच परिपाक म्हणजे खापरखेडा वीज केंद्र सातत्याने वीज उत्पाद्नासोबत विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी खापरखेडा वीज केंद्र वर्धापन दिनानिमित्त येथील अधिकारी-अभियंता-कर्मचाऱ्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वीज उत्पादनाच्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने कसोशीने प्रयत्न करावा असे कळविले आहे. मा. उर्जामंत्री लवकरच खापरखेडा वीज केंद्राचा दौरा करणार असल्याचे चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. 

प्रारंभी चित्रफितीतून मागील वर्षभरातील विशेष कामगिरीचा धावता आढावा व नववर्षाचा संकल्प अतिशय प्रभावीपणे प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश खंडारे म्हणाले कि, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने मागील वर्षभरात वीज उत्पाद्नासोबातच विविध क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.  प्रशासन सांभाळत असतांना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र मला येथील लोकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल प्रत्येकाप्रती त्यांनी आभार व्यक्त केले व आता वाणिज्यिक दृष्ट्या आपल्याला अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 
राजेश पाटील म्हणाले कि, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे नवनवीन उच्चांक गाठण्यात नेहमीच अग्रेसर असते. राजकुमार तासकर म्हणाले कि खापरखेड्याच्या मातीत आणि येथील लोकांमध्ये काहीतरी विशेष गुण असावा ज्यामुळे सातत्याने कार्यक्षमता वाढीस लागत आहे. धैर्यधर खोब्रागडे यांनी सांगितले कि प्रकाश खंडारे यांनी वर्धापन दिनानिमित्त अभिनव स्वरूपाचे उपक्रम राबवून येथील लोकांमध्ये कमालीचा उत्साह वाढविला आहे. यानंतर शरद भगत व राजेंद्र राऊत यांची समयोचित भाषणे झाली. 

याप्रसंगी विलास शेंडे, विशाल बनसोडे, गृहिणी प्रतिनिधी- सौ. पूजा बंग, यांनी वर्धापन दिनानिमित्त प्रशंसापर प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर पुरुषांच्या बरोबरीने वीज उत्पादनाची दोरी आता महिला सांभाळण्यास तयार असल्याचे गौरवोद्गार महिला प्रतिनिधी-पल्लवी शिरसाठ यांनी काढले.   

वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट, बॅडमिंटन,टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम, गंमतीशीर खेळ, रस्सा खेच, मॅरेथॉन, बुद्धिबळ, रांगोळी, चित्रकला, परिसर स्वच्छता, आनंद मेळावा, तांत्रिक प्रदर्शनी, ऊर्जा प्रोद्योगिकी परिसंवाद, महिला मंडळ कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. 

समारोपीय समारंभाचे सूत्र संचालन ज्ञानदीप कोकाटे यांनी तर अमरजित गोडबोले यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपीय समारंभाला अधीक्षक अभियंते परमानंद रंगारी, डॉ.अनिल काठोये, जितेंद्र टेंभरे, संदीप देवगडे, रविद्र झलके तसेच सर्व विभाग प्रमुख, अभियंते-तंत्रज्ञ-कर्मचारी-कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिन समारंभाच्या यशस्वितेत आयोजन समिती पदाधिकारी-सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 स्पर्धेच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेला (Artificial Intelligence) अनन्यसाधारण महत्व:आकाश पाटील

स्पर्धेच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेला (Artificial Intelligence) अनन्यसाधारण महत्व:आकाश पाटील

नागपूर/प्रतिनिधी:
परंपरागत पद्धतीच्या कामांना आधुनिकतेची जोड देऊन कृत्रिम बुद्धिमत्ते (Artificial Intelligence) द्वारे कामे अधिक सोपे,स्वयंचलित, वेगवान, अचूक आणि कमी खर्चात करण्यात येत आहेत. स्मार्ट फोन, संगणकाच्या माध्यमातून हि किमया साधली असून या संकल्पनेवर प्रकाश टाकण्यासाठी महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे उच्चविद्याविभूषित आकाश पाटील यांचे “संधींचे जग” या विषयावर दुहेरी संवादात्मक कार्यक्रमाचे ६६० मेगावाट सभागृह येथे आयोजन करण्यात आले.

मानवाला जिथे विशेष बुद्धीची गरज पडते अशी बरीच कामे आता संगणक प्रणाली करू लागल्या आहेत. कृत्रिम अथवा यांत्रिक बुद्धिमत्ताचा आपल्या जीवनावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव जरूर पडणार आहे. अगदी उपजीविकेवरसुद्धा. अंक स्वरुपात रूपांतरित सर्वव्यापी इंटरनेटमुळे उपकरणांमध्ये बसवलेल्या सेन्सर्समुळे खूप डेटा उपलब्ध व्हायला लागला आहे. संगणकाला समजेल अशी भाषा, नियोजन, एकत्रीकरण, गणितीय संकल्पना, शक्याशक्यता, आकडेवारी, गणितीय ठोकताळे,प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसून येते.

प्रमुख मार्गदर्शक आकाश पाटील यांनी सांगितले कि कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रवाह आहेत यामध्ये यंत्र शिक्षण, सांख्यिकी चिन्ह आधारित तर्काधारित रूढ प्रवाह तर संगणकीय निष्णात प्रणालीद्वारे कार्यकारणभाव वापरून निष्कर्ष काढणे व माहितीचे विश्लेषण करणे इत्यादी. त्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली त्यात डीप लर्निंग, सहाय्यकारी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि यंत्र मानवीय कामांचे स्वरूप यांचा समावेश होता.

राजेश पाटील म्हणाले कि वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्या अभियंत्यांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर भरपूर संधी आहेत. केवळ एका अभियांत्रिकी शाखेचा विचार न करता आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा क्षेत्रात भरपूर संधी आहेत. दैनंदिन कामाला आधुनिकतेची जोड देऊन महानिर्मितीच्या शाश्वत विकासात आपल्याला कश्याप्रकारे अधिक योगदान देता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी दिलीप धकाते यांनी कृत्रिम बुद्धेमत्तेवर आधारित अनेक उदाहरणांची उत्तम उकल केली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी भूषविले तर मंचावर मुख्य अभियंते राजकुमार तासकर, दिलीप धकाते प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उप मुख्य अभियंते सुनील सोनपेठकर, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, अशोक भगत, कन्हैयालाल माटे, जगदीश पवार, विराज चौधरी, शिरीष वाठ, सचिन देगवेकर तसेच विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रांजली कुबडे यांनी तर प्रमुख वक्त्यांचा परिचय श्वेता रामटेके आणि आभार प्रदर्शन अजय बगाडे यांनी केले. 
आकाश पाटील अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असून त्याने पदव्युत्तर शिक्षण फ्रांसमध्ये पूर्ण केले आहे व सध्या तो आचार्य पदवी फ्रांस येथून करीत आहे. कमी वयात विपरीत परिस्थितीत आकाश पाटील यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली शैक्षणिक चुणूक दाखवून दिली आहे. विदर्भाच्या अकोला सारख्या शहरातून नासा(अमेरिका), फ्रांस पर्यंतचा खडतर प्रवास निश्चितच स्पृहणीय आहे.

सोमवार, जानेवारी ०६, २०२०

 PhD  awarded to Dr.Anil Onkar, Addl.E.E.(KTC)

PhD awarded to Dr.Anil Onkar, Addl.E.E.(KTC)

Nagpur:
RTM Nagpur University has  recently awarded  Doctoral Degree in Electrical Engineering Stream to Shri Anil B. Onkar, Addl.EE(KTC). He has dedicated this PhD to MSPGCL, in general & KTC Koradi , in particular  for continuous support to pursue research. He has expressed wholehearted thanks to Shri Dilip Dhakate CE(KTC),  Shri Anand  Meshram SE(KTC) & Wife Mangla. 

His PhD topic was "Energy Environment implication by Energy Audit of various systems used in Thermal Power Plant" under the guidance of Dr. Gunawant Dhomne. It is highly appreciable to  mention here that, he has been awarded doctoral degree from Engineering stream in which doctoral degree is very rare.

Dr.Anil Onkar is an excellent faculty for Electrical Testing & Instrumentation, Energy Audit, performance optimization. Dr. Anil Onkar has done  B.E. (Elect.), M.Tech.(E.M.S.). D.C.M. (CSI), M.I.E. (India) &  Certified Energy Auditor (B.E.E.),Lead Auditor ISO50001 (EnMs) ,Certified Elect.-Supervisor, Fellow (SEEM), Associate (QCFI).

Till date, he has published 15 Research paper in  International, National, Scopus indexed & conference journal.  

Dr. Anil’s painstaking efforts, patience, perseverance and fighting spirit has brought him outstanding laurels, which is the dream of many researchers.

रविवार, डिसेंबर १५, २०१९

MAHAGENCO GETS   NATIONAL AWARD FOR BEST EMPLOYEE COMMUNICATION PROGRAM

MAHAGENCO GETS NATIONAL AWARD FOR BEST EMPLOYEE COMMUNICATION PROGRAM

INNOVATIVE CONCEPT THROUGH SOCIAL MEDIA 

NEW TOOL OF EFFECTIVE COMMUNICATION
NAGPUR:

A three-day National convention was held on December 13 to 15  at Hotel "The Manohar" in Hyderabad. It was organized by  Public Relations Society of India exclusively for Public Relation professionals .

On the occasion of the convention, a scheme of National awards for various categories were announced. About 52 Corporates, companies, organizations from across the country were participated and it was duly examined by renowned juries. 

 Inspite of tough  competition, Power Generation Giant MAHAGENCO has bagged National award with second prize in the category “Best Employee Communication Program”.
  
On behalf of MAHAGENCO, Executive Director (HR)  Bhimashankar Manta and Additional Public Relations Officer Yashwant Mohite accepted the award from the hands of  Telangana Home Minister Mohammad Mehmood Ali. On this occasion, the National President of PRSI Dr. Ajit Pathak, Secretary General Nivedita Banerjee were prominently present on the dias.  About 300 Public Relations professional  across the country were participated in the National convention. 

"ConnectMSPGCL" Whatsaap broadcast groups has been created to connect 3500 officers and employees of MAHAGENCO. Power Sector related daily happenings in and around MAHAGENCO, Day special, Drama,Sports, Quality circle, Training, article on individual inherent talent etc. information &  updates created team building, healthy competition, online feedback system, individual motivation, customer satisfaction & happiness  amongst employees  & subsequently strongly connected 3500 people through this innovative concept. 

It is to point out that Innovative, rigorous and tireless  efforts of MAHAGENCO Additional Public Relations Officer  Yashwant Mohite is  behind success of this Program.
Moreover,Programmer(IT) Sumit Patil has extended IT support to this program. 

With due support of MAHAGENCO top management, this innovative concept has become the fastest medium of effective communication throughout MAHAGENCO.
उत्कृष्ट कर्मचारी संवादासाठी महानिर्मितीला राष्ट्रीय पुरस्कार

उत्कृष्ट कर्मचारी संवादासाठी महानिर्मितीला राष्ट्रीय पुरस्कार

समाज माध्यमातून साकारली अभिनव संकल्पना 
प्रभावी संवादाचे नवीन आयुध 
नागपूर/प्रतिनिधी:

कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शासकीय तथा खाजगी कंपन्यांमध्ये जनसंपर्क-जाहिरात-प्रकाशन क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने हैद्राबाद येथील हॉटेल “द मनोहर” येथे १३ ते १५ डिसेंबर तीन दिवसीय  ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.  

ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध संवर्गासाठी राष्ट्रीय पुरस्कारांची योजना जाहीर करण्यात आली होती. देशभरातील नवरत्न तसेच नामांकित अश्या सुमारे ५२ कंपन्या/संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या हस्ते परीक्षण करण्यात आले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत “उत्कृष्ट कमर्चारी संवाद” ह्या संवर्गामध्ये महानिर्मितीला दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. 

महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) भीमाशंकर मंता आणि अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी हा पुरस्कार या समारंभाचे प्रमुख पाहुणे तेलंगणा शासनाचे गृह मंत्री नामदार मोहम्मद मेहमूद अली यांचे हस्ते स्वीकारला. याप्रसंगी मंचावर पि.आर.एस.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सेक्रेटरी जनरल निवेदिता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर देशभरातील सुमारे ३०० जनसंपर्क अधिकारी-व्यावसायिक सहभागी झाले होते. 

महानिर्मितीतर्फे प्रभावी कर्मचारी संवादासाठी व्हॉटसअप या समाज माध्यमाद्वारे "कनेक्ट एम.एस.पि.जी.सी.एल.” ब्रॉडकास्ट ग्रुप करून जनसंपर्कातील नवनवीन आयुधांच्या सहाय्याने सुमारे ३५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट वीज क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी, व्यक्ती विशेष, दिन विशेष, कला,क्रीडा, नाट्य, सेवानिवृत्ती, प्रशिक्षण विषयक गतिमानतेने माहिती दररोज दिल्याने संघभावना, सुदृढ स्पर्धा, वैयक्तिक प्रोत्साहन, ग्राहक समाधान आणि ऑनलाइन फीडबॅक यांसारख्या अनेक बाबीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तमरीत्या जोडण्यात आले.

 या अभिनव उपक्रमाच्या यशस्वितेमागे महानिर्मितीचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांचे अथक परिश्रम आहेत तर या उपक्रमाला माहिती तंत्रज्ञान विषयक सहाय्याचे काम महानिर्मितीचे प्रोग्रामर सुमित पाटील हे कुशलतेने सांभाळत आहेत.

महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सहकार्यातून हि अभिनव संकल्पना आज संपूर्ण महानिर्मितीमध्ये प्रभावी संवादाचे माध्यम ठरली आहे.