Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०

वाघाचा हल्ल्यात शेतमजूर महिला ठार




मूल- तालुक्यातील मोरवाई-बेलघाटा रोडला लागून असलेल्या शेतात काम करीत असतांना अचानक वाघाने हल्ला केला. सरिता श्रीकृष्ण पाल वय 34 वर्षे राह. मोरवाई ता. मूल असे म्रूतक महिलेचे नाव असून आपल्या शेतात सरिता एकटीच काम करीत होती. वाघाने सरीतावर हल्ला केला त्यावेळी शेजारचा शेतात इतर महीला काम करीत होत्या. परंतु केवळ महीलाच असल्याने त्यासगळ्या घाबरून गेल्या. वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने स्वाबचावासाठी सरिताला संधीच मिळाली नाही. तिने आरडाओरडा केला. मोरवाई-बेलघाटा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा कामावर असलेल्या मजुरांना सरीताचा ओरडण्याच्या आवाज आला. ते सगळे आवाजाचा दिशेने धावत गेले. मात्र तो पर्यंत वाघाने सरीताचे प्राण घेतले. लोक धावून आल्याने वाघ तिथून पळून गेला. मोरवाई गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. म्रूतक महिलेचा पती ट्रक्टरवर हमालीचे काम करतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.