Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२
शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२
अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival
अंबाडीत एक गाव एक गणपती अंतर्गत गणेशोत्सव शांततेत साजरा करा.- पो. नि. अभिमन्यू साळुंके
किनवट (प्रतिनिधी):-
कोरोना कालावधी ओसरल्यामुळे यंदा ग्रामीण भागात गणेशोस्तव ठिकठिकाणी साजरा करण्यात येत आहे.यावर्षी किनवट पोलिस स्टेशन हद्दिमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.
जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या,नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपचायती तसेच मागील निवडणूकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपचायती अशा किनवट तालुक्यातील एकुण 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषगाने किनवट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गणेशोत्सवामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके हे आपल्या सहकाऱ्यांसह अनेक ठिकाणी गाव भेटी देवून सूचना करीत आहेत.
दिनांक 1 सप्टेंबर रोजी आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत राजगड बिटमधील मौजे कमठाला,नीचपुर,अंबाडी तांडा,राजगड व अंबाडी येथे भेट देवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून मार्गदर्शन केले.यावेळी अंबाडीचे माजी सरपंच श्री कैलाश सिलमवार यांनी अंबाडी ग्रामस्थाच्यावतीने पोलिस निरीक्षक श्री अभिमन्यू साळुंके साहेब यांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी बिट जमादार श्री पुंडलिकराव बोंडलेवाड यांचेही यावेळी श्री परमेश्वर मुराडवार यांनी सत्कार केला.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबाडीत वास्तव्यास असलेल्या बौद्ध,गोंड, मन्नेरवारलू,परधान,भोई, बेलदार,मातंग,मराठा या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असून गावात एक गाव एक गणपती या संकल्पनेतून शांततेत दरवर्षी बसविणाऱ्या सवारी बंगला येथील बसविलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकार्यासह गावकऱ्यांचे कौतुक करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्या हस्ते सत्कार केले.यावेळी त्यांच्यावतीने गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम आणि मिरवणूक शांततेत व्हावे व कुठलेही गालबोट लागू नये यासाठी सूचना केल्या.
यावेळी अक्षय पंडलवार,गजानन बावणे, जुनघरे,यांच्यासह रामप्रसाद जैस्वाल,सुधीर काळुंके, रवी मुराडवार,अक्षय वानखेडे,पोषट्टी नक्कावार,निलेश कोतापेलिवार,भुमंना मिसालवार,विनोद जोगुलवार आदीं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंगळवार, मे ११, २०२१
शासनाच्या कृषि विभागाकडून एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ
गुरुवार, मे ०६, २०२१
शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध
किनवट :(प्रतिनिधी) बालाजी सिलमवार
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याच्या निषेधार्थ शिवणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
नुकतेच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे.याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
तसे पाहिले तर निवडणुकीत कुणाचे तरी जय-पराजय होतच असतो.पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्या कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध म्हणून किनवट तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
आज शिवणीत भाजपचे तालुका सरचिटणीस श्री बालाजी आलेवार यांच्या उपस्थीतीमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोव्हिड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून भाजपाच्या पदाधिकारी यांना सोबत घेवून श्री आलेवार यांनी तोंडाला काळे मास्क व हाताला काळे रिबीन बांधून आपल्या भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध करण्यात आला भाजपचे यावेळी भाजपचे श्री बालाजी किशनराव आलेवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते शंकर पटेकर भाजप युवक कार्यकर्ता नागेश बेलयवार युवा कार्यकारणी बुच्यागौड रेड्डीवार,राजू भुसिवाड, पवण कार्लेवांड,रवी मैदेवाड,सूर्यकांत कार्लेवांड,विनोद अनंतवार,श्रीकांत कट्टा,सदानंद रेकुलवाड,विनोद मेंढेवाड,आदी कार्यकर्त्यांनी शिवनीत निषेध व्यक्त केला.
शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१
तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओचे टॉवर कार्यान्वित
सोमवार, एप्रिल २६, २०२१
आदिवासी समाजसेवक काळाच्या पडद्याआड!स्व. सिलमवार काकांना श्रध्दांजली- जिल्हाध्यक्ष पपुलवाड
बुधवार, मार्च २४, २०२१
जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली
बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१
पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक
मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१
खून करणाऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने दिड तासात पकडले
नांदेड:दि.2- शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुंबईच्या लोखंडवाला कॉम्लेक्स मधून 15 वा आरोपी पकडून आणला आहे.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याने जवळपास 20 लाख रुपये बँक घोटाळ्यातील विविध आरोपीना वळती करून दिले आहेत.
शंकर नागरी सहकारी बँकेचा 14 कोटी 46 लाख रुपयांचा घोटाळा त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खाते हॅक करून करण्यात आला. याबाबतचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणातील सर्वाधिक गुन्हेगार नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहेत.पण पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात बँक घोटाळ्याकडे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांचेही भरपूर लक्ष आहे.सोबतच नांदेड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि अनेक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहेत. कारण पोलीस विभाग एक टीम वर्कच असते.
या गुन्ह्यात आज पंधरावा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव आणि पोलीस कर्मचारी लोखंडे आणि बालाजी केंद्रे यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधून पकडून आणला आहे. त्याच्याकडे कर्नाटक बँकेचे धनादेश पुस्तक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड आणि अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत.आज सकाळी पकडून आणलेल्या अभिजित अंदानी शेट्टी (45) यास वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बँक घोटाळ्यात पकडलेला हा 15 व्या क्रमांकाचा आरोपी आहे.
नांदेड पोलीस दलातील अनेक पोलीस पथके अद्याप देशातील विविध भागातील राज्यांमध्ये या प्रकरणातील आरोपींचा माग काढत आहेत.289 बँक खात्यांमध्ये बँकेतील रक्कम वळती झालेली आहे.बँकेचे खाते विक्री करण्याचा नवीन प्रकार या गुन्ह्यांमुळे समोर आला आहे.
मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०
शेती विरोधी कायद्यांनी हिरावून घेतले शेतकऱ्याचे स्वातंत्र्य
रविवार, एप्रिल ०५, २०२०
गुरुद्वारा बोर्डातर्फे भव्य घरपोच लंगर सेवा
बुधवार, जून १३, २०१८
मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी
भागातील युवक त्यांच्या कार्याने प्रेतीत झाला असता.जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली पाहिजे, मदत करन्या इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे.असेही ते यावेळी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू,असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.यावेळी मदत म्हणून खोब्रागडे कुटुंबियांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली.
![]() |
एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केलेल्या वाणाची पाहणी करतांना राहुल गांधी![]() |
मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

अपघातात सात ठार
लातूर : क्लूजर वाहनाने रस्त्यावर उभारलेल्या आयशर टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्लूजर वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार तर तेराजण जखमी झाले आहेत.
लातूर - नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा (ता. लातूर) गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७
नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र जवळकर यांना गावकऱ्यांनी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक काशीनाथ बालाजी शिरगिरे (वय 37, रा गोंडेवाडी ता. लोहा) व क्रुझर जिप मधील राजू कुंडलीक वागलवाडे ( वय 60, रा. राशनवाडी) गंभीर जखमी असून प्रथोमचारानंतर त्यांना उपचारांसाठी नांदेडमध्ये हलवण्यात आले. अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.






