Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १९, २०२०

भरपेट जेवल्यानंतर का येते झोप ?

⭕  भरपेट जेवल्यानंतर का येते झोप ?  ⭕

____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. १९ आॅगष्ट २०२०_* 📯
      *_जेवणावर आडवा हात मारला की अनेकांना आडवे होण्याची इच्छा होतेच. दुपारच्या झोपेला आपल्याकडे ‘वामकुक्षी’ वगैरे गोंडस शब्द आहेत. मात्र, जेवल्यानंतर ही झोप हटकून का येते या खोलात आपण कधी शिरत नाही. संशोधकांनी याबाबतही संशोधन केलेले आहे. जेवल्यानंतर जी झोप येते तिला शास्त्रीय भाषेत ‘फूड कोमा’ असे म्हटले जाते._
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=576571422740785&id=100011637976439


____________________________
फूड कोमा अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये ट्रिप्टोफॅन हा एक प्रकार आहे. अधिक मांसाहारी जेवण जेवल्यानंतर ट्रिप्टोफॅनचा शरीरातील स्तर वाढतो. त्यामुळे झोप येऊ लागते. हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड बनते. काही दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावरही असेच होत असते. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,ज्या वेळी आपण भात आणि बटाट्याचे पदार्थ अधिक खातो त्यावेळी शरीरात सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. ते एक न्युरोट्रांसमिटर आहे आणि त्याचा स्त्राव सुरू झाला की लोक अधिक सुस्तावतात. जर एखादी व्यक्ती भाताबरोबर मांसाहारी पदार्थ खाते (उदा. बिर्याणी) तर ट्रिप्टोफॅन मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होते. हे हार्मोन शरीराला झोपण्याचे निर्देश देऊ लागते. जर माणूस झोपला नाही तर त्याचे मन बेचैन होऊन जाते! अधिक तळलेले, चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यावर शरीराला कार्बोहायड्रेटस् अधिक प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे मेंदूला झोपेचे सिग्नल्स मिळतात.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.