Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३
गुरुवार, जुलै २७, २०२३
पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध
रविवार, जुलै २३, २०२३
सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती
बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०
लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी
मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

अचूक बिल व इतर सुविधेसाठी ग्राहकांनीही स्वतः मीटर रिडींग पाठवावे:ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार

गुरुवार, सप्टेंबर ०३, २०२०
पूर्व विदर्भातील पुरामुळे महावितरणला ९ कोटीचा फटका
बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०
राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावाटने वाढ:ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
नागपूर (ख़बरबात):
गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावाट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावाटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावाट क्षमतेचा संच क्रमांक ८ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावाट क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ मधून वीज उत्पादन सुरु झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ.राऊत यांनी दिले आहेत. राज्यभर पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून युद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने “मिशन बिगीन अगेन” अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगाची चाके देखील वेग घेत आहेत. एकूणच कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पुरामुळे महावितरणचे अडीच कोटीचे नुकसान
अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत
गडचिरोली/ख़बरबात:
पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यात महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.या पुरामुळे जिल्ह्यात महावितरणचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील आठ्वड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीतीमुळे चिचडोह , गोसेखुर्द,धारण पूर्ण भरले तसेच वैनगंगा तसेच प्राणहिता व इतर उपनद्यांना महापूर आल्यामुळे महावितरणच्या यंत्रांचे सुमारे २ कोटी ३१लाखाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे सुमारे ५६० गावे बाधित झाले असून सुमारे ८७ हजार ८०२ ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला होता. ब्रम्हपुरी व किन्ही उपकेंद्र पूर्णपणे पाण्यात बुडाले होते . या भागातील ग्राहकांना इतर उपकेंद्रांद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे महावितरणच्या आरमोरी, वडसा, कुरखेडा येथील प्रत्येकी २, ब्रम्हपुरी येथील ३ विज उपकेंद्रात पाणी शिरल्याने ते बंद ठेवण्यात आले होते. सोबतच सुमारे २,८०० रोहित्रांना पुराचा फटका बसल्याने वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवावा लागला. आरमोरी उपविभागातील सुमारे २५ हजार आणि वडसा येथील २० हजार वीज वीज ग्राहकांचा वीज पुरवठा या काळात बंद ठेवण्यात आला होता. तो टप्याटप्याने सुरळीत करण्यात आला.
पुराचे पाणी वाढू लागताच महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद केल्याने जी हानी टाळणे शक्य झाले. पुरामुळे बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे तसेच या साठी युद्धस्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी कमी होताच या ठिकाणी महावितणकडून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
बुधवार, ऑगस्ट १९, २०२०
वीज गळती व वीज चोरीळा आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार :डॉ. नितीन राऊत
खाजगी हॉस्पीटल्सने सामाजिक जाणीवेतून उत्तमत्तोम रुग्ण सेवा द्यावी:डॉ.नितीन राऊत
मंगळवार, ऑगस्ट १८, २०२०
औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार उत्सर्जित राखेचा वापर सिमेंट व रस्ते निर्मितीसाठी करणार - ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत
बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०
चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणने केला १३०० तक्रारींचा निपटारा
“एक गाव एक दिवस”
चंद्रपूर (खबरबात)
थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून चंद्रपूर जिल्ह्यात मोहिमेच्या सुरुवातीलाच १३२८ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
यात वीज देयकाशी निगडित ११०० तर तांत्रिक,देखभाल दुरुस्ती संदर्भातील ४८ तक्रारींचा समावेश होता. महावितरण कडे आलेल्या जवळपास सर्व सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. शिल्लक तक्रारीचा निपटारा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. चंद्रपूर विभागात वीज देयकाशी निगडित १४८ , बल्लारशा विभागात २१३ तर वरोरा विभागात १०५३ तक्रारी प्राप्त झाल्यावर त्याचा निपटारा करण्यात आला. वरोरा विभागात काही तक्रारीचा निपटारा करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वरोरा शहर उपविभागात वीज देयकाच्या ३९५तक्रारी प्राप्त झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात मीटर नादुरुस्त किंवा खराब मीटरच्या एकूण ७९ तक्रारी प्राप्त झाल्यावर ७१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
२२ जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दहा दिवसात जिल्ह्यातील ६५ गांवाना भेटी देऊन झाल्या आहेत. महावितरणच्या शाखा कार्यालय, उपविभाग कार्यालय, विभागीय कार्यालयातील २७८ अधिकारी- कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.
महावितरणकडून चंद्रपूर विभागातील मरवा,पडम्पर,आडगाव,टेकाडी ,चिचाळा,भादूर्णी, मारोडा, हिरापूर, व्याहाड भुज, बल्लारशा विभागातील विसापूर, कोठारी, गौरी, मानोली,हिरापूर, आर्वी,विठ्ठलवाडा, टेमरा, भिशी,शेडगाव येथे थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी ही त्रिसुत्री मोहिमेनुसार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्याी झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गावात येऊन गावकऱ्यांसोबत येऊन चर्चा करतात, तेथील समस्यांचे निराकरण करतात. याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या मोहिमेच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन चिरकुटराव जयस्वाल यांना पीएचडी प्रदान
नागपूर,(खबरबात):
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण ) च्या नंदनवन उपविभागात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन चिरकुटराव जयस्वाल यांना नागपूर विद्यापीठाकडून विद्युत अभियांत्रिकी मध्ये नुकतीच पीएचडी प्रदान केली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
"वितरण ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणार्या रिमोट कंडिशन मॉनिटरिंग सिस्टमसाठी डेटा आधारित मॉडेल " हा गजानन जयस्वाल यांच्या संशोधनाचा विषय होता . श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनॅजमेन्ट येथे त्यांनी संशोधनासाठी नोंदणी केली होती. संशोधन काळात त्यांचे शोध प्रबंध आयईईई, आयईटी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले.त्यांनी ११ उच्च दर्जेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला आहे तसेच संशोधन विषया संदर्भात रिअल टाइम प्रॉडक्ट यावर त्यांचे एक पेटेंट मान्य झाले असून उर्वरित दोन पेटेंट मान्यतेसाठी पाठवलेले आहे . गजानन जयस्वाल यांनी एम.टेक (आयपीएस) आणि एमबीए (मार्केटिंग आणि फायनान्स ) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते मागील २० वर्षांपासून विद्युत क्षेत्रात कार्यरत आहेत
गजानन जयस्वाल यांना व्हीएनआयटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. मकरंद बल्लाळ तसेच श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अँड मॅनॅजमेन्ट नागपूरच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. धनंजय आर. तुटकाने यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गजानन जयस्वाल यांचे नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
महावितरण उप केंद्र सहाय्यक(२००० जागा) आणि विद्युत सहाय्यकाच्या(५००० जागा) भरतीचा मार्ग मोकळा
गुरुवार, जुलै १६, २०२०

दुर्गम भागाचे विद्युतीकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा-डॉ.नितीन राऊत

सोमवार, जुलै १३, २०२०

ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन करावा:महावितरणचे आवाहन

शुक्रवार, जुलै १०, २०२०

महावितरणच्या कामाला येणार गती:उर्जा विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना मिळणार अधिकार:डॉ. नितीन राऊत

शुक्रवार, जुलै ०३, २०२०
The State Energy Department Has asked for 10 Thousand Crore Funds From Centre' Energy Minister Dr. Nitin Raut

प्रस्तावित वीज विधेयक घटना विरोधी असून सर्व राज्यांना विश्वासात घेऊनच वीज बिल विधेयकात सुधारणा करावी: डॉ.नितीन राऊत
बुधवार, जुलै ०१, २०२०


