Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणने केला १३०० तक्रारींचा निपटारा

एक गाव एक दिवस


चंद्रपूर (खबरबात)

   थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून चंद्रपूर  जिल्ह्यात मोहिमेच्या सुरुवातीलाच  १३२८ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे  यांनी दिली.

    यात वीज देयकाशी निगडित ११०० तर तांत्रिक,देखभाल दुरुस्ती संदर्भातील  ४८ तक्रारींचा समावेश होता. महावितरण कडे आलेल्या जवळपास सर्व सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. शिल्लक तक्रारीचा निपटारा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. चंद्रपूर  विभागात वीज देयकाशी निगडित १४८ बल्लारशा  विभागात २१३ तर वरोरा  विभागात १०५३ तक्रारी प्राप्त झाल्यावर त्याचा निपटारा करण्यात आला. वरोरा विभागात काही तक्रारीचा निपटारा करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वरोरा शहर उपविभागात वीज देयकाच्या ३९५तक्रारी प्राप्त झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात मीटर नादुरुस्त किंवा खराब मीटरच्या एकूण ७९ तक्रारी प्राप्त झाल्यावर ७१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

  २२ जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दहा दिवसात जिल्ह्यातील ६५ गांवाना भेटी देऊन झाल्या आहेत. महावितरणच्या शाखा कार्यालयउपविभाग कार्यालयविभागीय कार्यालयातील २७८ अधिकारी- कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.

महावितरणकडून चंद्रपूर विभागातील मरवा,पडम्पर,आडगाव,टेकाडी ,चिचाळा,भादूर्णीमारोडाहिरापूरव्याहाड भुजबल्लारशा विभागातील विसापूरकोठारीगौरीमानोली,हिरापूरआर्वी,विठ्ठलवाडाटेमराभिशी,शेडगाव येथे थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी ही  त्रिसुत्री मोहिमेनुसार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणेतारांमधील झोल काढणेवीजखांबाला रंगकामस्पेसर्स बसविणेवीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्याी झाडाच्या फांद्या तोडणेपीन व डिस्क इन्सूलेटर बदलणेवितरण रोहित्रांना अर्थिंग करणेडिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता  व आवश्यक दुरुस्तीकिटकॅट बदलणेसडलेले वीजखांब बदलणेवाकलेले वीजखांब सरळ करणेनादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणेवीजबिलांची दुरुस्तीवीजमीटरची तपासणीनावात बदलसदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणेवीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणेमीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची  कामे करण्यात  येणार आहेत. महावितरणच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गावात येऊन गावकऱ्यांसोबत येऊन चर्चा करताततेथील समस्यांचे निराकरण करतात. याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 या मोहिमेच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.