Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

यवतमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यवतमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे ०१, २०२३

 आईने दिली पाच लाखांची सुपारी; पोटच्या पोराला संपवलं |  Latest Crime News in Marathi

आईने दिली पाच लाखांची सुपारी; पोटच्या पोराला संपवलं | Latest Crime News in Marathi

स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन हत्या

यवतमाळ | (yavatamal) मध्ये एक हत्येचा प्रकार घडलाय. या प्रकाराने पोलीस देखील चक्राहून गेलेत. एका आईसह कुटुंबाला स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. (Latest Crime News Live Updates from India and World)आईने सुपारी देवून आपल्या मुलाची हत्या केली. पोलीस तपासादरम्यान, धक्कादायक कारण समोर आले आहे. योगेश विजय देशमुख (25 रा. नेरपिंगळी ता. मोर्शी जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. (police crime news)


यवतमाळ लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने पोलीस देखील चक्राहून गेलेत. कारण एका आईनेच स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन त्याला संपवून टाकण्याचा धक्कादाय प्रकार समोर आलेला आहे. पाच लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडून आणली उघडकीस आली असून, याप्रकरणी लोहारा पोलीस सहा जणांना अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकची तपासणी केली तेव्हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  (Latest Crime News in Marathi)


मुलाचा प्रचंड त्रास होता. त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले, असे मृत मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलाला त्याच्या गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहिण उषा चौधरी हिच्या घरी जावून योगेशच्या खुनाचा कट रचला. तसेच पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले होते. त्यापैकी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स देण्यात आले होते. यानंतर विकी भगत आणि राहुल पठाडे या दोन्ही आरोपींनी योगेशला 20 एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेत त्याची हत्या केली. (Latest Crime News in Marathi)


मृताची आई, वडील, चुलत भाऊ आणि अन्य काही कुटुंबांनी आरोपींना मुलाची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. चौसाळा जंगलात नेऊन खून केल्याचा निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी हत्या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेतलेला आहे  या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी तिघे रा. देवीनगर यवतमाळ यांना अटक केली. तर सुपारी घेवून योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे रा. देवीनगर लोहारा यांनाही ताब्यात घेतले आहे. (crime in maharashtra News: Latest and Breaking News on crime in maharashtra)


गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

कशी मिळाली प्रेरणा? जिथून घडली प्रणाली! #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali

कशी मिळाली प्रेरणा? जिथून घडली प्रणाली! #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali


पर्यावरणविषयक जागृतीसाठी प्रणालीने (Pranali Chikte ) महाराष्ट्र भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. तिने दीड वर्ष प्रवासात नागरिकांना दिवसेंदिवस वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम याचा संदेश दिला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट येथे प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी प्रणालीने महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास केला. या विषयावर हा व्हिडीओ

Watch video on YouTube here: https://youtu.be/7FVSYrdFk0I

Pranali Chikte travel All maharashtra For Environmental Conservation #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali #
विदर्भ  Maharashtra,यवतमाळ,विदर्भ,

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

 दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे.गेल्या आठवडाभरापासून वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.दरम्यान कोलार पिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा वाघ आज जेरबंद करण्यात आला. आज जेरबंद केलेल्या वाघाला नागपुरच्या #गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. tiger 



यवतमाळ च्या वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून #वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. 


वणी तालुक्यात मागील पंधरवाडयात भुरकि (रांगणा) येथील अभय मोहन देउळकर व कोलेरा (पिंपरी) येथील रामदास जगन्नाथ पिदुरकर या दोन्ही व्यक्तीला नरभक्षी वाघाने ठार केले होते. त्याची गंभीर दखल घेउन खासदार बाळुभाउ धानोरकर यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकरी, तहसिलदर वणी, वणी येथील विश्रामगृहात सकाळी 07.30 वाजता तातडीची बैठक लाउन सर्व अधिका-यांना धारेवर धरले. खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या पाठपुरावानंतर या वाघाला जेरबंद करण्यात यश आले आहे.  tiger 


 या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती मरण पावले. लोक मरण पावल्यानंतर तुम्ही वाघाला पकडणार का? असा दम अधिका-यांना दिला. त्यात वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरात आस्टेलियन बाभळीचे जंगल मोठया प्रमाणात वाढल्यामुळे नरभक्षी वाघाचा वावर गेल्या दोन वर्षापासून या परिसरात आहे. ऑस्टेलियन बाभळी तात्काळ साफ करून परिसरातील रस्ते मोकळे करण्यात यावे. व तात्काळ वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावावे व वाघ जेरबंद करावा अशा सुचना बाळुभाउंनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. त्यात वाघाचा बंदोबस्त करत नसेल तर वेकोलिच्या अधिका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे अशी मागणी केली. त्यात प्रत्यक्ष दोनही गावात जाउन कुटुंबियाना मदत व सांत्वना केली. गावक-यांना धिर देउन तात्काळ समस्या मार्गी लावून वाघाला पकडण्यासाठी सर्व संबंधित वनविभाग तालुका प्रशासन वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना सुचना दिल्या. 

 खासदार यांच्या सुचनेनंतर तेवढयाच वेगाने प्रशासनाने चक्र फिरविले व त्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद केले. त्यामुळे खासदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे तालुक्यातील जनता आभार मानत आहे.

 tiger Wani   #tiger #wildlife #animals #nature 

दरम्यान #कोलारपिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा #वाघ आज जेरबंद करण्यात आला. याठिकाणी वेकोलीच्या कोळसा खाणी असून त्यांनी डम्पिंग वर लावलेल्या ऑस्ट्रेलियन बाभळीच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढला आहे, हे वाघ मानवी वस्तीत येऊन मानवावर व पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.  झुडपी वृक्ष कापावे व वाघांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.     #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb

रविवार, नोव्हेंबर १३, २०२२

गांधींमुळे प्रसिद्धीस आलेली कलावती सध्या काय करतेय?

गांधींमुळे प्रसिद्धीस आलेली कलावती सध्या काय करतेय?


शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतमजूर महिलेची सतरा वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावी जाऊन कलावती बांदुरकर (Kalawati Bandurkar) यांची भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदुरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा देखील सुरू झाला आणि यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातला जळका गाव प्रसिद्ध आला. या घटनेला सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी कलावती बांदुरकर सध्या काय करतेय? असा प्रश्न उपस्थित केला.


यानिमित्त चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बांदुरकर कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि असलेल्या समस्यांविषयी देखील चर्चा केली.

गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२

श्री जगदंबा देवस्‍थानासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत |

श्री जगदंबा देवस्‍थानासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत |

केळापूरच्‍या श्री जगदंबा देवस्‍थानाच्‍या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत


सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनोखी भेट

राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने यवतमाळ जिल्‍हयातील जगदंबा संस्‍थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाने दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्‍थानच्‍या भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनुपम भेट दिली आहे.


यवतमाळ जिल्‍हयातील पांढरकवडा तालुक्‍यातील जगदंबा संस्‍थान केळापूर हे अतिशय जागृत देवस्‍थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्‍ये या धार्मीक स्‍थळाच्‍या ठिकाणच्‍या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्‍त होता. हा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तब्‍बल दोन वर्षे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन देखील हा मुद्दा त्‍यांनी रेटला. अखेर दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये जगदंबा संस्‍थान येथील विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. याठिकाणी भक्‍त निवास, फर्निचर, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता, आंतर व बाह्यविद्युतीकरण, अग्‍नीशमन व्‍यवस्‍था, अंतर्गत रस्‍ते बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट नाली बांधकाम, वातानुकुलीकरण, आर. ओ. सिस्‍टीम, सिसिटिव्‍ही सिस्‍टीम, वृक्ष लागवड, ट्री गार्ड आदी व्‍यवस्‍थांचा अंतर्भाव आहे.


मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्री जगदंबा संस्‍थान येथे येणा-या भाविकांसाठी या माध्‍यमातुन सोयीसुविधा उपलब्‍ध होणार असून, यंदाच्‍या नवरात्रोत्‍सवात भाविकांना त्‍यांच्‍या माध्‍यमातुन अनोखी भेट देण्‍यात आली आहे. The remaining Rs. 4 crore for various development works at Sri Jagdamba Devasthana in Kelapur. Funds disbursed

शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०२२

वणीतील पायाभूत सोयीसुविधेकरिता २१ कोटी |

वणीतील पायाभूत सोयीसुविधेकरिता २१ कोटी |

वणी तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधेकरिता निधी कमी पडू देणार नाही


खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते २१ कोटी च्या विकास कामांचे भूमिपूजन


यवतमाळ : वणी तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. अनेक प्रश्न या भागात प्रलंबित आहेत. मागील दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु आता मात्र सत्ता नसताना देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. 


याप्रसंगी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन २०२१-२२ रामा -३१५ चिखगाव रेल्वे गेट, बस स्टॅन्ड, टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत चार पदरी सिमेंट कॉक्रीट रस्ता, नाली आणि पथ दिव्यांचे बांधकाम करण्याकरिता २१ कोटी १५ लक्ष ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. आज या कामाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

 Balu Dhanorkar  Wani Yavatmal

यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, झरी तालुका अध्यक्ष आशिष कुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा,  शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, प्रवीण काकडे, तेजराज बोडे, बंटी ठाकूर, पालाश बोडे, संजय सपाट यांची उपस्थिती होती.

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

 विदर्भातील माजी खासदारांचा आम आदमी पक्षात प्रवेश...!

विदर्भातील माजी खासदारांचा आम आदमी पक्षात प्रवेश...!



यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील माजी खासदार ओ.बी.सी नेते आणि प्रमुख ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) आणि धनराज वंजारी, भाई अमन यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी पक्ष प्रवेश केला आहे. 

हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत. तसेच ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. तर धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी आणि विदर्भाचे नेते आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष होते. आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी याबाबत माहिती दिली. धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी, विदर्भाचे नेते आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्षही राहिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कार्याची सर्वदूर प्रशंसा झाली आहे. त्यांच्या ‘काम की राजनीती’मुळे प्रभावित होऊन मी आज आम आदमी पार्टीत सामील झालो आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तसेच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिली आहे.


सामाजिक कार्य :

* राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची स्थापना सन 1991

* भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष 1999-2004

* रेणके आयोग स्थापन करण्यामध्ये महत्वाची भुमिका

* तिसर्या सुचीसाठी संसदेध्ये प्रायव्हेट बिल 2008

* देशातील 22 कोटी भटक्या विमुक्त समाजाला संघटीत करण्याचे काम

* महाराष्ट्रभर शाखा तसेच इतर राज्यात शाखा

* पहीली शाखा बुलढाणा जिल्हयातील घाटबोरी ता. मेहकर येथे स्थापन करण्यात आली.

Haribhau Rathod

उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार :

1) राष्ट्रपती मा. प्रणव मख्w यर्जी याच्ं या हस्त o प्रदान 2012 इद्रं प्रस्थ इटंरनशॅनल नवी दिल्ली या प्रतिष्ठीत संस्थेचा कवी दिनकर साहित्य सेवा पुरस्कार

2) महाराष्ट्र शासनतर्फे वसंतराव नाईक समाजभूषण-पुरस्कार राज्यपाल मा.के.शंकर नारायनन यांच्या हस्ते प्रदान (सन2014)

3) सामाजिक योगदानाबददल राज्यातील अनेक सामाजिक संस्थार्फत विविध पुरस्काराने सन्मानित. समाज भूषण, बंजारा भूषण. 

haribhau rathod(MLC). @HaribhauRathod. Ex M.P and M.L.C, Maharashtra. Mumbai, India haribhaurathod.com Born February 4, 1954 Joined Aam-adami-party-arvind-kejariwal



गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२

पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका

पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका

 वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्यतेमुळे 

पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका- हंसराज अहीर
वेकोलि माजरी क्षेत्राची जबाबदारी निश्चित करुन नुकसानभरपाई वसूल करावी. 



चंद्रपूर / यवतमाळ:- (Chandrapur, Yavatmal) वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे भद्रावती तालुक्यातील पाटाळा, माजरी वस्ती, माजरी कॉलरी, नागलोन, कुचना, राळेगाव, थोराणा, चालबर्डी व अन्य गावांना महापुराचा तडाखा बसुन हजारो हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच पुरामूळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या अभुतपूर्व नुकसानीस वेकोलिव्दारा मनमानीने टाकलेले ढिगारेच कारणीभूत असल्याचा आरोप पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यानी केला असून झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वेकोलि माजरी प्रबंधनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. Hasnraj Ahir

माजरी-पाटाळा क्षेत्र समस्या निवारण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी हंसराज अहीर  यांना निवेदन सादर करून लोकांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. माजरी वेकोलि प्रबंधनाने मनमानीपणे नदीकाठी जागोजागी ओव्हरबर्डनचे ढिगारे उभे केल्याने नागरिकांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले असून शेतीच्या अभुतपूर्व नुकसानीला वेकोलि प्रबंधन जबाबदार असल्याची व्यथा या शिष्टमंडळाने अहीर यांच्यासमोर कथन केली पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत. तसेच घरांचे, अन्नधान्यांचे व बि-बियाणांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने न झाल्यामुळे या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. (Flood 2022)

पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करावे, शेतीवर निर्भर लोकांना रोजगार द्यावा. 

हंसराज अहीर यांनी राज्य शासनाने पुरपिडीतांना नुकसान भरपाई देण्याची भुमिका घेतली असल्याचे सांगत अहीर यांनी प्रशासनाने पुरपिडीतांना तातडीची मदत उपलब्ध करावी अशी मागणी केली. आजपावेतो या तालुक्यातील अनेक गावांना कधीही पुराचा स्पर्श झाला नसतांना यावेळी अनेक गावांना पुराने वारंवार वेढून पुराचा तडाखा दिला. त्यामुळे या मागील निश्चित कारणांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी व अन्य कारणांची शहानिशा करुन उपाय योजावेत अशी मागणीही हंसराज अहीर यांनी केली आहे. प्रशासनाने पुरप्रभावित शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे, शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेल्याने त्यांना कंपनी किंवा अन्यत्र रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात तातडीच्या आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्या व आवश्यकतेनुसार सोईसुविधा पुरवाव्यात अशी सुचनाही अहीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. जिल्ह्यांत सर्वत्र पुरामूळे शेतीचे. घरांचे अन्नधान्यांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने दिलासादायक कार्यवाही करावी असेही पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

जि प चे माजी सदस्य प्रविण सुर यांच्या नेतृत्वात हंसराज अहीर यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात कुसनाच्या सरपंच सुचिता ताजणे, नागलोनचे सरपंच रवि ढवस, विस्लोन चे सरपंच अशोक सातपुते, पाटाळाचे सरपंच विजेंद्र वासनखेडे, चालबर्डीचे सरपंच विजय खंगार, मनगावचे सरपंच सुनिल खामनकर, हेमंत महातळे, प्रफुल्ल ताजणे, अरविंद ठेंगणे, भारत वांडरे, प्रदिप हेकाड, विकास उपरे, नामदेव गोंडे, मारोती पंधरे, दिलीप चवले, बळीराम मंधारे, सुभाष लांडगे, अनिल खामनकर, बबन बदकी, सुनिल साबडे, मनोरमा बड, ज्योती लांडगे, प्रमोद आस्वले, प्रवेश ताकसांडे, सचिन पाचभाई, पत्रकार राजू रेवते, रवि भोगे, रवि कुद्दुला व अमृता सुर आदींचा समावेश होता.

Chandrapur, Yavatmal Hasnraj Ahir Flood 2022

शनिवार, जुलै ३०, २०२२

आझादी का अमृत महोत्सव |  विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

आझादी का अमृत महोत्सव | विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA


1)Large Integrated SteelPlant 4-5MMTPA JSW Group,JSPL,Arcelor Mittal TATA Steel,

2)Complete Acquisition of MIHAN Land for Containers Making,DataCenters,MROs,5STAR hotel,Defense  TATA Group 

3)Country's largest FerroAlloys Cluster at Bhandara by TATA GROUP, JSWGROUP and MOIL 

4)Largest Private Freight Terminal to handle Road,Rail and Air Logistics. Private and Railways as PPP model

5)Country's Largest Commondo Training Institute by Ministry of Home affairs and Defense 

All these proposals having strong viability and logic for investors to explain

*Most of Mumbai Based Group if UP CM can attract them Our DCM can attract for sure only honest efforts must*
------------------------------


 1) GADCHIROLILarge Integrated Steel Plant 4-5MMTPA capacity
 
LOGIC- Best quality IronOre,LimeStone,Coal

Country's Largest Commondo Training Institute. 

LOGIC - Best location with Mountains,Rivers,Insurgency ,3StateBorders. 

१) गडचिरोली - मोठा एकात्मिक स्टील प्रकल्प ४-५ एमएमटीपीए क्षमता
​कारण - उत्तम दर्जाचे लोहखनिज, चुनखडी, कोळसा
  देशातील सगळ्यात मोठी कमांडो प्रशिक्षण संस्था
​कारण - पर्वत, नद्या, बंडखोरी आणि ३ राज्यांच्या सीमांसह सर्वोत्तम स्थान
------------------------------


2) BHANDARA |  Country's Largest Auto Component Park 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

B)All 3 leading Automobile Manufacturing hubs Delhi,Pune,Chennai on equal distance. 50%OEM,20%Replacement 20%Exports through Best export infrastructure created

Country's Largest FerroAlloys Manufacturing Cluster 

LOGIC- Country's largest Manganese Ore producer Navratna PSU MOIL having mines in Bhandara,All other major inputs with electricity nearby 

12MMTPA SteelPlants in Maharashtra as FerroAlloys consumers ensure 3-4Times more revenues to state.Huge savings with Exports demands also. 
 
२) भंडारा - देशातील सगळ्यात मोठा ऑटो कॉम्पोनंट पार्क
​कारण - अ) उत्तम दर्जाचे लांब, सपाट मिश्रधातू स्टील, जवळच उपलब्ध मनुष्यबळ
​​ ब) दिल्ली, पुणे चेन्नई ही तिन्ही अग्रगण्य ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रे समान अंतरावर. ​​ निर्माण केलेल्या सर्वोत्तम पायाभूत निर्यात सुविधांद्वारे ५०% ओईएम, २०% बदली, २०% निर्यात | देशातील सगळ्यात मोठे फेरो-अलॉय उत्पादन क्लस्टर
      कारण - देशातील सगळ्यात मोठे मँगनीज खनिज उत्पादक नवरत्न पीएसयू मॉइलच्या भंडार्‍यात खाणी. वीजेसह  
              सगळे महत्त्वाचे इनपुट्स (आवश्यक सामग्री) जवळ उपलब्ध
              महाराष्ट्रात १२ एमएमटीपीए स्टील प्रकल्प कारण फेरो-अलॉय ग्राहक राज्याला ३-४पट महसूलाची ​​​ सुनिश्चिती देतात.
 
 --------------------------
 

3) *GONDIA* World's first of its own kind International Tiger Tourism Center where Gondia Airport must be developed as Tiger Gateway of India. 
 
LOGIC-  Three Side four best Tiger Sanctuaries with maximum Tiger population KanhaKisli,Pench,Nagzira and Tadoba. These attractions must be marketed aggressively in high income cities like Pune Banglore,Hyderabad,Delhi,Mumbai.3-4days packages will attract many tourists. Huge income for locals 

10000-15000 Tourists good number may help all local small and big tourists points revival.Local food,Tribal Arts,Bomboo items may help vibrant economy. Hotels,Tours&Travel industry will flourish again huge employments.

2)Most Modern Rice Research Center near Gondia 

LOGIC - Will help improving Rice Varities to earn more Forex.Like Punjab over the years quality and realizations improved manifold. Gondia with huge forex earnings by RiceExports deserve this institution. Infact 3 states CG MP and Maharashtra will be benefitted. 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

3)LARGE SOLAR POWR PARK NEAR GONDIA 

LOGIC- Lots of land available in Gondia at much cheaper rates where no agriculture activities.Such large land parcels must be made productive by inviting investments in Solar Power Generation.Cities where thermal power generated must be given priority for Solar Power. 

3) गोंदिया
A)जगातील अशाप्रकारचे पहिले आंतरराष्ट्रीय व्याघ्र पर्यटन केंद्र; गोंदिया विमानतळ टायगर गेटवे ऑफ इंडिया म्हणून विकसित करणे आवश्यक आहे.
​कारण - तीन बाजूंना कान्हाकिसली, पेंच, नागझिरा आणि ताडोबा ही कमाल वाघ-संख्या असलेली चार उत्तम व्याघ्र अभायण्ये. 
 पुणे, बंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, मुंबई अशा उच्च उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये या आकर्षणांचे ​अतिशय जोमाने मार्केटिंग करायला हवे. ३-४ दिवसांचे पॅकेज अनेक पर्यटकांना आकर्षित करेल. स्थानिकांसाठी ​उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी होईल.
 
​१००००-१५००० अशा चांगल्या संख्येने पर्यटक आल्यास स्थानिक लहान-मोठ्या पर्यटन स्थळाम्चे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल. स्थानिक खाद्यपदार्थ, आदिवासी कला, बांबूच्या वस्तू अर्थव्यवस्थेला चालना देतील. मोठा रोजगारासह हॉटेल्स, टुर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योग पुन्हा बहरेल
 
२) गोंदियाजवळ सगळ्यात आधुनिक तांदूळ संशोधन केंद्र
​कारण - तांदळाचे प्रकार सुधारण्यासाठी आणि अधिक फॉरेक्स मिळवण्यास मदत होईल. पंजाबसारखे दर्जा आणि ​पैशात रुपांतर अनेकपटींनी सुधारेल. तांदूळ निर्यातीने मोठे परकीय चलन कमावण्यास पात्र असलेले गोंदिया या ​संस्थेसाठी पात्र आहे. किंबहुना, छत्तीसगढ़ , मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या ३ राज्यांना फायदा होईल.
 
३) गोंदियाजवळ मोठा सौर ऊर्जा पार्क
​कारण - कृषी उपक्रम नसलेली जमीन मोठ्या प्रमाणावर गोंदियात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी गुंतवणूक ​आमंत्रित करून असे असे मोठे भूखंड उत्पादक करायला हवे. ज्या शहरांमध्ये औष्णिक उर्जा निर्मिती होते त्यांना ​सौर ऊर्जेसाठी प्राधान्य द्यायला हवे.
 --------------------
4) CHANDRAPUR 
Must be converted&declared as *WorldClassIndustrialCity*
 
LOGIC -- Chandrapur the highest Revenue Contributing District ignored by local leaders.With Cement,Steel,FerroAlloys,CoalMining,Electricity Generation all polluting industries.Chandrapur must be given equally clean green industries to ensure Citizens get better opportunities.

 2)Chandrapur must be considered for Cross Subsidy Waiver for cheaper electricity. 

LOGIC- Power plants near CoalMines generating electricity at much lower rates but given to consumers at much higher price by loading highT&D losses and Cross Subsidy fr farmers. But Citizens health,Air quality,Poor Roads due to excessive Transport activities needs to be compensated by lower electricity costs, Better amenities for citizens and world class facilities. Highest Revenue paying by Minerals Royalty,Highest rate GST by Cement&Steel,Cess,Tiger and wildlife tourism like many levies Chandrapur deserve special package to become world class industrial city.

3)Chandrapur must have large *Indian School of Mines*equilent to IIT like Dhanbad 

LOGIC--Chandrapur and Surrounding areas full of Ferrous,Nonferrous and Coal Mines need high class mining professionals as world wide new technologies coming.As most of the non forest Minerals now almost finished.Forest and underground mining need different technology and such prestigious institutions opens up lots of opportunities for local talented youth. Such graduates having huge demand in foreign countries also.


१) चंद्रपूर - "जागतिक दर्जाचे औद्योगिक शहर" म्हणून रुपांतरित व घोषित करायला हवे.
​कारण - चंद्रपूर हा महसूलात सगळ्यात जास्त योगदान देणारा जिल्हा आहे, मात्र स्थानिक नेत्यांकडून दुर्लख्सःईट. ​सिमेंट, स्टील, फेरोअलॉय, कोळसा खाणी, वीज निर्मिती असे सगळे प्रदूषण करणारे उद्योग. नागरिकांना अधिक ​चांगल्या संधी मिळाव्या म्हणून चंदपूरला तेवढेच स्वच्छ, हरित उद्योग द्यायला हवेत.
 
२) स्वस्त विजेसाठी क्रॉस सबसिडी माफीसाठी चंद्रपूरचा विचार करणे आवश्यक आहे.
​कारण - कोळसा खाणीजवळील वीज प्रकल्पात अतिशय कमी दरात वीज निर्मिती होते पण ग्राहकांना ती पारेषण व ​वितरण नुकसानीचे ओझे लादून आणि शेतकर्‍यांसाठी क्रॉस सबसिडी लावून बर्‍याच जास्त दराने दिली जाते.पण ​नागरिकांचे आरोग्य, हवेची गुणवत्ता, मोठय प्रमाणावरील वाहतुकीमुळे खराब रस्ते याची भरपाई वीज दर कमी ​करुन, सुखसोयी व जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन करायला हवी. खनिज रॉयल्टीमुळे सगळ्यात जास्त महसूल ​देणारे, सिमेंट व स्टीलवर सगळ्यात जास्त जीएसटी दर, सेस, व्याघ्र व वन्यजीव पर्यटन असे अनेक अकारण ​लादलेले कर यामुळे जागतिक दर्हाचे औद्योगिक शहर होण्यास चंदपूर विशेष पॅकेज मिळण्यासाठी पात्र आहे.
 
३) धनबादसारखे आयआयटीला समकक्ष "इंडियन स्कुल ऑफ माइन्स" चंद्रपूरला असायला हवे.
​कारण - चंद्रपूर व आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लोह व गैर-लोह आणि कोळशाच्या खाणी आहेत, आता ​जगभरात नवीन तंत्रज्ञान येत असल्याने तिथे उच्च श्रेणीच्या खाणकाम व्यावसायिकांची गरज आहे. आता बहुतांश ​गैर-वन्य खनिजे संपली आहेत. जंगलांमध्ये आणि भूमिगत खाणकामासाथी वेगळ्या तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ​अशा प्रतिष्ठित संस्था स्थानिक प्रतिभावंत युवकांसाठी अनेक संधी निर्माण करतात. अशा पदवीधारकांना परदेशातही मोठी मागणी आहे.
   -----------------------


5)YEOTMAL
 Large Minerals Processing Zone at Wani.
 
LOGIC -- Wani Taluka in YEOTMAL district having best quality of Minerals like Dolomite,Limestone in bulk quantities. Specifications and Whiteness after calcination making it more precious.Large Steel Companies already buying from Wani but huge potential there to expand manifold. 

Minerals&Coal nearby Wani only area in country.Lime&Dolomite both precious and after processing it is used in bulk quantities for Steel,Chemicals,Construction and Wall care products.All these sectors growing with huge capacities additions. 

Wani having such many small Minerals processing units but with old polluting process plants needs replacement.These plants must be converted into latest technology plants with cluster formation nearby. Manifold value additions ensure huge earnings for state. 

2)Large Coal Gasification Plants 

LOGIC-- NitiAayog and Ministry of Coal started promoting Coal Gasification in bigway. Wani area in YEOTMAL having best quality Coal Deposits can be converted into Synthetic Natural Gases. Through this process new generation fuels like Ethanol Methanol DME can be produced.DME is the replacement of LPG presently imported. 

Coal Gasification route can be used for Large quantities of Fertilisers making like Urea,Ammonium Nitrate presently coming from long distance plants or Imported.

3)Cotton and Cotton Seed Processing

LOGIC--YEOTMAL district having best quality Cotton as main crop.This long Fibre cotton having good Domestic and Exports demands.Under MITRA Scheme one Large Textile Cluster proposed in Amravati. Best prices can help farmers to double their income. 

After processing Cotton seed can be used for Oil extraction used as edible oil.DeOiledCake can be used for cattle feed ensure very high percentage of Fat in milk. This way Cotton Ginning,Pressing,OilExtraction,Milk Processing like many opportunities there for youth in YEOTMAL district. 

4)Large Scale Solar Power Generation 

Logic-Whole YEOTMAL dist with maximum radius having ample land available at much lower cost.Jhhudpi forest where small Shrubs can be used for Solar Power Generation.Infact in Coal Mining Districts Solar plants must be given on priority.Climatic Conditions always suitable for proposed industries. 

5)Large Textile Park Under MITRA Scheme 

Yeotmal equally suitable district for large investments in Textiles.All Conditions laid by Central Govt for MITRA Scheme can be easily fulfilled. Shri Devendra Fadnavis Sir trying hard for this.Amravati and Yeotmal both locations suitable with best cotton crop.Socially large employments generating opportunities must in YEOTMAL. 

All these investments in YEOTMAL must as district witnessed maximum farmer suicide in last two decades. CoalMining,Gasification, Minerals Processing Industry having huge potential can ensure one assured job with fixed income in small farmers family. 


- प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने
(Pradeep Maheshwari | Strategist Natural Resources Nagpur)

रविवार, मे २९, २०२२

गोदावरी अर्बन वणी शाखेचा पाचवा वर्धापन दिन थाटात संपन्न

गोदावरी अर्बन वणी शाखेचा पाचवा वर्धापन दिन थाटात संपन्न





वणी :- उत्कृष्ठ कार्य करणारऱ्या दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधींचा सन्मान
वणी :-
 सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान प्रतिनिधींचा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. 


     गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर तसेच वरिष्ठ व्यवस्थापक रविजी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन वसंत जिनिंग हॉल वणी येथे दिनांक 27/05/2022 ला मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेशजी खुराणा, प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ अर्बन को ऑप बँकेचे संचालक प्रशांत जी मादमशेट्टीवार, कायदेशिर सल्लागार ऍड सुरज महारतळे, रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष संजय जी खाडे, केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखरजी खोंड साहेब, व्यापारी मित्र सहकारी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग लांजेवार, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. 


       यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, तसेच दैनिक व आवर्त प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या वणी शाखेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यात सौ हिरल जितेंद्र मुनोत, मनोज लुक्का, सौ. चित्रा विवेक देशपांडे, विजेंद्रजी तातेड, बंडू कडुकर यांचा सन्मान करण्यात आला, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीतील मेंबर्स यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.


     या कार्यक्रमाचे संचालन राजुभाऊ गव्हाणे, प्रास्ताविक वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, चंद्रपूर शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे,  सुरज चाटे, तुषार ठाकरे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार यांनी प्रयत्न केले तर यावेळी समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता, ठेवीदार उपस्थित होते.

The fifth anniversary of Godavari Urban Wani branch was celebrated

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

घाटंजी तालूक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा

घाटंजी तालूक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा



यवतमाळ दि.७
    घाटंजी तालूक्यातील मौजे शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे नवीन रूग्णवाहीकेचे लोकार्पण सौ.सरीता मोहणराव जाधव यांच्या शुभ हस्ते दि.७ सप्टें. रोजी पार पडले, शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे, आदिवासी, बंजारा बहूल समाजातील जनतेसाठी संजीवन ठरणारे  आरोग्य केंद्र आहे, ४० वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राची इमारत अतिशय निकृष्ट दर्जाची जिर्ण झाली असून ही इमारत कधीही कोसळून जिवीत हाणी होवू नये, यासाठी सतत पाठपुरावा करून जि.प. सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्या सौ.सरीताताई मोहनराव जाधव यांनी इमारतीचे निर्लेखनाचे (पाडण्याचे) ठराव पास करून घेतले आहे, तसेच नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी संबंधित मंत्री, C.E.O., D.H.O. शासन यांचेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मत भाजपा व्हीजेएनटी आघाडी, जिल्हाध्यक्ष मोहण जाधव यांनी रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सांगितले, तर याप्रसंगी प्रमुख उपस्थीती म्हणून शिवणी येथील ग्रा.प. सरपंचा सौ.मनीषा अनील मेश्राम, उपसरपंच नरेंद्र चव्हाण, तालूका आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश चव्हाण, श्री.अतिशजी देशमुख, मोहनभाऊ राठोड़ घाटूंबा, देवदत्तभाऊ जाधव, तुकारामभाऊ राठोड़, रामधनजी राठोड़ महाराज, सामाजिक कार्यकर्ता विलासराव पवार, प्रा.आ.केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद आयोजित रूग्णवाहीका लोकार्पण सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित होते.

Dedication of ambulance at Health Center  

गुरुवार, जून १०, २०२१

वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

 कुंभारकिन्ही, मोरगव्हान येथे वीज पडल्याने दोघांचा मृत्यू

दारव्हा  : तालुक्यातील कुंभारकीन्ही आणि मोरगव्हान येथे अंगावर विज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार ता १० जूनला दुपारी घडली. आकाश प्यारेलाल जाधव (३०) रा. कुंभारकीन्ही व अशोक रायसिंग राठोड रा. मोरगव्हान असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.

कुंभारकीन्ही येथे गावातील शेतकरी गुलाब किसन चव्हाण यांच्या शेतात आकाश कामाला होता. शेतीचे काम सुरु असतांना दुपारी वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी अचानकपणे दुपारी ३ वाजता वीज आकाशच्या अंगावर कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो विवाहित असून त्याच्या मागे मोठा आप्त परिवार आहे. तर मोरगव्हान येथील अशोक राठोड यांचा लाडखेड शिवारात दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. दोघांकडेही शेतजमीन नसल्याने मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित तलाठ्यांनी या घटनेचा अहवाल तहसीलदारांना दिला आहे.




शनिवार, एप्रिल २४, २०२१

 दारुऐवजी सॅनिटायझर प्राशन केल्याने  सात जणांचा मृत्यू

दारुऐवजी सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू





यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खळबळजनक घटना


यवतमाळ (प्रतिनिधी): 24 एप्रिल 2021
 जिल्ह्यातील वणी येथे सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील 2 व्यक्तींचा तर रात्रीच्या सुमारास आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे. यांचा सर्व व्यक्तींचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याचा संशय आहे.

 मृतकांमध्ये दत्ता कवडू लांजेवार (47) मु.तेली फैल वणी, नुतन देवराव पाटणकर रा, ग्रामीण रुग्णालय जवळ वणी, संतोष उर्फ बालू मेहर (35) रा. एकता नगर, विजय बावणे रा. वणी असे मृतकांचे नाव आहेत. काल संध्याकाळी सुनील महादेव ढेंगळे व गणेश उत्तम शेलार या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच दत्ता लांजेवार याचा मृत्यू झाला. तर पहाटे आणखी तिघांचा घरीच मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या व्यक्तींनी सोबतच नशा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या 24 तासांमध्ये 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीवरून, दत्ता लांजेवार, नुतन पाटणकर, संतोष उर्फ बालू मेहर, विजय बावणे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार,दत्ता लांजेवार हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांना मद्य प्राशनाची सवय होती. लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री बंद झाल्याने यांनी पिण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतली. दरम्यान त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर एकाएकाची तब्येत बिघडू लागली. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सुनील ढेंगळे, गणेश शेलार व दत्ता कवडू लांजेवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नूतन देवराव पाटणकर याला अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. मात्र तिथून तो उपचार न घेताच निघून आला. त्याचा पहाटे घरीच मृत्यू झाला. संतोष उर्फ बालू मेहर (35) व विजय बावणे हे मजुरी करायचे. बालू हा आधी पुण्यात मजुरीचे काम करायचा. मात्र दोन तीन वर्षांआधी तो वणीत परत आला. बालू याचा पहाटे साडे तीन वाजताच्या दरम्यान घरी मृत्यू झाला. तर विजयचा देखील रात्रीच घरी मृत्यू झाला. सुनील ढेंगळे आणि दत्ता लांजेवार यांचा मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम सुरु आहे. या दोघांचा मृत्यू सॅनिटायझर पिल्याने झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.


 एकत्रच केले सॅनिटायझरचे सेवन
सात मृतकांव्यतिरिक्त यात आणखी 3-4 व्यक्ती असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारू मिळत नसल्याने त्यांनी सॅनिटायझर पिण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसांआधी यांनी नशा करण्यासाठी 5 लीटरची सॅनिटायझरची कॅन विकत घेतल्याची माहिती आहे. कॅन विकत घेऊन त्यांनी एकत्रच सॅनिटायझरचे सेवन केल्याचा संशय आहे. यातील सात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यांच्यासोबत आणखी किती लोकांनी सॅनिटायझरचे सेवन केले हे तपासात उघड होणार. यातील केवळ दोघांच्या मृत्यूची सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

केवळ दोघांचे पोस्टमॉर्टम
काल संध्याकाळपासून एकेकाची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. संध्याकाळी सुनील ढेंगळे व दत्ता लांजेवार व गणेश शेलार यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. त्यामुळे भीतीने यातील तिघे दवाखान्यात गेलेच नाही व घरीच त्यांचा मृत्यू झाला. गणेश शेलार यांच्या मृतदेह पोस्टमार्टम न करता कुटुंबीय घेऊन गेले. पोस्टमार्टम करणार नाही असे दवाखान्यात लिहून दिले. सुनील ढेंगले आणि लांजेवार यांच्या मृतदेहावर पोस्टमार्टम सुरू आहे. तर इतर 3 जण घरीच मरण पावल्यामुळे त्यांची दवाखान्यात किंवा पोलिस ठाण्यात नोंद नाही. चोवीस तासांच्या आत 7 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवार, एप्रिल ०९, २०२१

कोरोनाने घेतले ११ बळी, ५१८ पॉझिटीव्ह

कोरोनाने घेतले ११ बळी, ५१८ पॉझिटीव्ह

कोरोनाने घेतले ११ बळी, ५१८ पॉझेटिव्ह




सतीश बाळबुुुधे
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे ११ बळी गेले असून, ५१८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. ५०५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६५ व ८३ वर्षीय पुरुष तसेच ८० व ९० वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ४७ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ७२ व ७९ वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला, दिग्रस शहरातील ५८ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ५५ वर्षीय पुरुष आणि बाभुळगाव तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या ५१८8 जणांमध्ये ३४० पुरुष आणि १७८ महिला आहेत. यवतमाळ येथील १७९ पॉझेटिव्ह रुग्ण, वणी ६३, पांढरकवडा ४७, पुसद ३५, नेर २७, दिग्रस २५, राळेगाव २२, आर्णि २१, दारव्हा २१, घाटंजी १८, महागाव १८, मारेगाव १०, बाभुळगाव ८, झरीजामणी ७, उमरखेड २ आणि इतर शहरातील १५ रुग्ण आहे.


प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद
जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याकरीता उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार यवतमाळ शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात प्रतिबंधित क्षेत्र मौजा खरद, शिवाजी नगर प्रभाग क्र.14, लोहारा येथे तीन ठिकाणी, जे.एन.पार्क, प्रभाग क्र.26 लोहारा, पोलिस मित्र कॉलोनी प्रभाग क्र.26, दत्तात्रय नगर प्रभा क्र.26 लोहारा, मीया नगरी, राधेनगरी प्रभाग क्र.26 लोहारा, जवाहर नगर प्रभाग क्र.14 लोहारा, जे.एन.पार्क प्रभाग क्र.13, वाघापूर ता. यवतमाळ तसेच देवी नगर, प्रभाग क्र. 26 येथे तीन ठिकाणे, मुंगसाजी नगर प्रभाग क्र.28, रेणूका नगर प्रभाग क्र.28, राजहंस सोसायटी प्रभाग क्र.28, रोहिणी सोसायटी प्रभाग क्र.28, महावीर नगर प्रभाग क्र.14, मौजा वरझरी येथे दोन ठिकाणी, मौजा सालोड, मौजा बोथबोडण या प्रस्तावित भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.
यवतमाळात 167 शाळाबाह्य मुले

यवतमाळात 167 शाळाबाह्य मुले




यवतमाळ/ सतीश बाळबुधे
गेल्या महिन्यात दहा दिवस चाललेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणात जिल्हाभरात एकूण 167 मुले आढळून आले आहेत. त्या बालकांना लगतच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यात सर्वाधिक 93 मुले, तर 74 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाळाबाह्य आढळून आलेल्या 41 जणांनी आतापर्यंत शाळेचे उंबरठेसुद्धा ओलांडले नव्हते. केवळ दहा दिवसांतच एवढी बालक आढळून आले, तर ही मोहीम नियमित ठेवल्यास आणखी शाळाबाह्य मुले सापडण्याची शक्यता आहे.
शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशांनुसार 1 ते 10 मार्चपर्यंत 6 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत दाखल करावयाचे होते. त्या अनुषंगाने शासनाने विविध समित्यांचे गठण केले होते. या सर्वेक्षणासाठी शाळांतील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींना प्रगणक, तर मु‘याध्यापकांना सनियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ऐन कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्हाभरात एकूण 167 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. यात एकूण 93 मुले आणि 74 मुली आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गट पाडण्यात आले होते. कधीही शाळेत दाखल न झालेले (ई 1) आणि शाळेत अनियमित येत असलेले (ई 2) असे दोन गट होते. यात शाळेत दाखल न झालेली 41 मुले आहेत. तर उर्वरित 126 मुलांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे शाळेत अनियमित उपस्थिती होती. सर्वेक्षणात आढळून आलेल्या 167 मुलांना आता नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये आर्णी 5, बाभुळगाव 16, दारव्हा 34, दिग‘स 27, घाटंजी 33, कळंब 2, नेर 13, पुसद 1, राळेगाव 2, उमरखेड 2, वणी 11 आणि यवतमाळ येथे 21 बालक आढळून आले आहे. यानंतरही शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम चालूच ठेवण्यात येणार असून, अशा स्वरूपाचे बालक आढळून आल्यास नजीकच्या शाळेत त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

बालरक्षकांवर मुले शोधण्याची जबाबदारी
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम करण्याच्या दृष्टीने बालरक्षक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळास्तरावर करण्यात आलेल्या ह्या बालरक्षकांना वर्षभरात कुठेही शाळाबाह्य बालक आढळून आल्यास त्यांना थेट शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतची जबाबदारी बालरक्षक म्हणून त्यांच्यावर शिक्षण विभागाने सोपवली आहे.
यवतमाळात कोरोनाचा स्फोट; केंद्रीय पथकाद्वारे पाहणी

यवतमाळात कोरोनाचा स्फोट; केंद्रीय पथकाद्वारे पाहणी


यवतमाळात केंद्रीय पथकाद्वारे लसीकरण व कोरोना केंद्र पाहणी




यवतमाळ/ सतीश बाळबुधे

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची सं‘या तसेच मृत्युंचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक गुरुवारी यवतमाळ येथे दाखल झाले. पथकातील राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्रा. डॉ. जयंत दास आणि राममनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी शहरातील पाटीपुरा येथील लसीकरण केंद्र व वाघापूर मार्गावरील कोविड केअर सेंटरची पाहणी केली.
यावेळी डॉ. दास व डॉ. भारती यांनी लसीकरण केंद्रातील नोंदणी कक्ष, लसीकरण प्रतीक्षा कक्ष, निरीक्षण कक्षाची पाहणी करून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करायला सांगितले. केंद्रीय पथकाच्या समक्ष उपस्थित नर्सने लाभार्थ्याचे लसीकरण केल्यानंतर संबंधित नागरिकाला शासनाच्या सूचना समजावून सांगितल्या. लसीकरणानंतर एखाद्याला रिअ‍ॅक्शन आली तर काय उपाययोजना करता, लसीकरणाबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले का, अशी विचारणा केली. शहरी व ग‘ामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तसेच एखाद्याला रिअ‍ॅक्शन झाली तर संबंधित व्यक्तीला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले जाते. यासाठी लसीकरण केंद्रावर रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.
यानंतर केंद्रीय पथकाने वाघापूर रोडवरील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथे कशाप्रकारे टेस्ट केली जाते. सध्या किती रुग्ण या केंद्रात भरती आहेत, त्यांना लक्षणे आहेत का, याबाबत माहिती घेतली. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे यांनी पथकाला माहिती दिली. या केंद्रावर 70 टक्के नागरिकांचे आरटीपीसीआर व उर्वरित 30 टक्के लोकांची अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जाते. सद्यस्थितीत येथे 58 रुग्ण दाखल असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच रुग्णांची सकाळ, संध्याकाळ आणि रात्री नियमित तपासणी केली जाते. यात ताप, ऑक्सिजन स्तर तपासण्यात येत असल्याचेही डॉ. खोडवे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तडपल्लेवार, डॉ. विजय अग‘वाल, डॉ. रमा बाजोरिया, आयएमएचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे थंड हवेला फटका

लॉकडाऊनमुळे थंड हवेला फटका



कुलर व्‍यावसायिकांसमोर संकट : वाढलेल्या उन्हाने नागरिक त्रस्त


सतीश बाळबुधे
यवतमाळ : शहरातला वाढलेला उकाडा पाहता कूलरची गरज भासू लागली आहे. बहुतांश घरी कूलर सुरू झाले आहेत. तर काहींनी कूलरची विक्री, दुरुस्तीचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने कुलरविक्री, दुरुस्तीच्या नियोजनाचे तिनतेरा वाजले आहेत. त्यामुळे थंडी हवा खान्यासाठी नागरिकांना लॉकडाऊन उघडण्याची वेळ बघावी लागणार आहे. जुगाड जमवून खरेदी विक्री केल्यास शिक्षेलाही नागरिकांना समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कुलरची थंडी हवेला लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसणार आहे. कूलर अत्यावश्यक सेवेमध्ये यायला हवेत, अशी मागणी व्‍यापारी करू लागले आहेत.
'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कूलरची दुकाने बंद आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

यवतमाळ जिलह्यात वाढलेल्या तापमानाने घामाच्या धारांना आमंत्रण देऊ लागले आहे. साधा पंखा लावून रात्री झोपणे कठीण होऊन बसले आहे. दुपारीसुद्धा पंख्याने काहीच फरक पडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कूलरची गरज भासू लागली आहे. पुढील काही दिवसांत विशेषत: एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेनंतर उन अधिक असणार आहे. सरकारचे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत असल्याने याकाळात उष्माघाताने वृद्ध तसेच कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्यांचा मृत्यू होण्याची भीती आहे. उन्हाळ्यात लागणारे कूलर ही बाब चैनीची नसून अत्यावश्यक होऊन बसल्याची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.


विदर्भातील नागपूरातील कॉटन मार्केट मार्केटमध्ये मध्य भारतातील सर्वांत मोठी कूलरची बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतून राज्यासह छत्तीसगड, रायपूर, राजस्थानला कूलरचा पुरवठा होतो. विदर्भात कूलरचे पन्नासहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत, सर्व कूलरची निर्मिती कारखान्यात होते. सध्याच्या निर्बंधांमुहे हे मार्केट पूर्णत: थंडावले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यांत जवळपास १५ कोटींहून अधिकची उलाढाल नागपूरच्या बाजारपेठेत होते. मागील वर्षापासून सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा बाजारपेठेला होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आता या अपेक्षांवर पुरते पाणी फेरले आहे, अशी माहिती स्थानिक व्‍यापा-यांनी दिली आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०२१

 अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा  परदेशी स्ट्रेन नाही

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही



                                                                    - आरोग्य विभाग

 

मुंबईदि.19: अमरावतीयवतमाळसातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.  या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे काया संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

            आतापर्यंत अमरावती,यवतमाळसातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.

            पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.

            या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोलाअमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थापुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.