Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

महानिर्मिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महानिर्मिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जानेवारी १४, २०२२

२५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी महानिर्मितीतर्फे वीज खरेदी करार | #Maharashtra @Mahagenco

२५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी महानिर्मितीतर्फे वीज खरेदी करार | #Maharashtra @Mahagenco

दोंडाईचा, जि. धुळे येथे एकाच ठिकाणी उभारण्यात येत असलेला राज्यातील सर्वात जास्त क्षमतेच्या २५० मेगावॅट सौर प्रकल्पासाठी महानिर्मितीतर्फे वीज खरेदी करार 



मुंबई : -अपारंपारिक ऊर्जास्त्रोत्तांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत महानिर्मितीच्या दोंडाईचाजि. धुळे येथील २५० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठीचा वीज खरेदी करार आज १४ जानेवारी २०२२ रोजी महानिर्मिती व मे. टाटा पॉवर सौर्य लिमिटेड या दोहोंमध्ये मुख्यालयमुंबई येथे संपन्न झाला. सदर करारांवर प्रकल्प विकासक या नात्याने महानिर्मितीचे वतीने सुनील इंगळे,मुख्य अभियंता (सौर) यांनी तर मे. टी.पी.सौर्य लिमिटेडचे वतीने   राकेश सिंग ,चीफ बिझिनेस डेव्हलपमेंट यांनी स्वाक्षरी केली.  


या प्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारेसंचालक (प्रकल्प)  व्ही. थांगपंडीयनसंचालक (संचलन)  चंद्रकांत थोटवेसंचालक (माईनिंग) पुरुषोत्तम जाधवसंचालक (वित्त) बाळासाहेब थिटेसंचालक (मा.सं) मानवेंद्र रामटेके तसेच  कार्यकारी संचालक (सौरअपारंपारिक ऊर्जा (प्रकल्प) आणि सां.नि. व सु.) राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महानिर्मितीतर्फे विकसित करण्यात येत असलेले सदर सौर पार्क हे सुमारे ५०४.७१ हेक्टर क्षेत्रफळाचे असून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे.  तब्बल २५० मेगावॅट क्षमतेच्या या मोठ्या सौर प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण न्यूनतम राखण्यात यश येणार असून महावितरणला अपारंपारिक ऊर्जेचे अनिवार्य प्रमाण (RPO) राखण्यास देखील मदत होणार आहे.  या सौर प्रकल्पातून महानिर्मितीच्या माध्यमातून महावितरणला रु. २.५८ प्रति युनिट इतक्या रास्त दरात वीज प्राप्त होणार असल्याने वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे.  या प्रकल्पातून प्रतिवर्षी सुमारे ५.६७ दशलक्ष युनिट्स एवढी वीजनिर्मिती अपेक्षित आहे.

या मोठ्या प्रकल्पामुळे दोंडाईचा परिसरातील स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार उपलब्ध होणार असून परिसराचा कायापालट होण्यास त्यायोगे मदत होणार आहे. 
 
महानिर्मिती तर्फे महाराष्ट्र हरित करण्याकरिता मोठे योगदान देण्यात येत आहे. या प्रकल्पाबरोबरचमहानिर्मितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सौर उर्जा उत्पादन करण्यासाठी मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे. यामुळे,  आजपर्यंत २०७ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे निर्देश आणि उद्दिष्टांच्या अनुषंगाने पुढील क्षमता वाढीसाठी महानिर्मिती  मार्फत  प्रयत्न करण्यात येत आहेत. आजमितीस एकूण २७९५  मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प अंमलबजावणीची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच महानिर्मिती मार्फत ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याकरिता आनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत.

Signing of Power Purchase Agreement (PPA) for 250 MW Dondaicha Solar Park by Mahagenco the largest solar project at single location in Maharashtra
 
Power Purchase Agreement (PPA) is signed between MAHAGENCO and M/s. T.P. Saurya Ltd. For 250 MW Capacity Dondaicha Solar Park at Head Office, Mumbai.
 
Brief of 250 MW Dondaicha Solar Park.
•             MAHAGENCO is developing 250 MW Dondaicha Solar Park on 504.71 Ha land at Dist. Dhule under Ministry of New and Renewable Energy's (Gol) Solar Park Scheme under the guidance of Hon. Energy Minister Dr. Nitin Raut.
 
•             The project will provide a huge impetus to solar energy generation in the State of Maharashtra and will also enable the State to fulfill the RPO, reduce its carbon footprint by avoiding emission equivalent to the solar park's installed capacity and generation. Further, the State will also avoid procuring expensive fossil fuel to power conventional power plants.
•             Considering installed capacity of 250 MW, it will reduce the annual carbon emission by approx. 5, 86,671 Tonnes and reduce annual coal consumption of approx. 4, 45,825 Tonnes.
•             MAHAGENCO is the Solar Power Park Developer (SPPD) and is entrusted with responsibility of developing essential solar park facilities as per the solar park scheme.
•             The expected annual generation from this project is approx. 56,79,30,000 kWh.
•             Letter of Award is placed on M/s TP Saurya Ltd. on dated 17.12.2021. MAHAGENCO will supply power to MSEDCL @ Rs. 2.58/kWh, which is going to give relief to power consumers.
•             The project will be commissioned within 15 Months from signing of PPA i.e. by April-2023 and the project life will be 25 Years from the date of commissioning.
The PPA was signed by  Sunil Ingle ,Chief Engineer (Solar) and Rakesh Singh , Chief Business Development ,  M/s T.P.Saurya in presence of Hon .CMD, Mahagenco  Sanjay Khandare, Director (Operations)  Chandrakant Thotwe, Director (Mining)  Purushottam Jadhav, Director (Finance)  Balasaheb Thite, Director (H.R) Manvendra Ramteke and Executive Director ( Solar) Rajesh Patil .
Further, the project will enable local area development and also generate employment opportunities to the local population.
•             MSETCL is developing 220/33kv Pooling Substation & 220kV LILO transmission line for 250 MW capacity on behalf of MAHAGENCO on depository basis.
Mahagenco is contributing towards Green Maharashtra with 207 megawatt solar projects are commissioned and working satisfactorily. In line with GoI and GoM directives and targets further capacity addition of 2795 MW are under various stages of implementation. Mahagenco is also developing Green Hydrogen Projects for which work is in progress.

मंगळवार, ऑक्टोबर १६, २०१८

 चंद्रपूर वीज केंद्रात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह यशस्वीरीत्या संपन्न

चंद्रपूर वीज केंद्रात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह यशस्वीरीत्या संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ९ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले व ५०० मेगावाट संच क्रमांक ८ येथे मॉक ड्रील प्रात्याक्षिके घेण्यात आली. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन प्रात्याक्षिके घेण्यात आली तसेच चेम्ररी प्रशिक्षण केंद्र येथे मानवी जीव वाचविण्याचे कौशल्य या संदर्भात इंडियन सोसायटी फॉर अॅनेस्थॉलॉजी चंद्रपूर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे होते. त्यांनी सप्ताह निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व यथोचित मार्गदर्शन केले व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र वितरीत केले.
याप्रसंगी उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, राजेशकुमार ओसवाल, अधीक्षक अभियंते सुहास जाधव, अनिल पुनसे, अनिल गंधे, कार्यकारी अभियंते शालिक खडतकर, बाळू इंगळे, शिवशंकर पडोळे, इंदल चव्हाण, सराग, अजय बगाडे, सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, अभियंता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरक्षितता अधिकारी चव्हाण व आभार प्रदर्शन प्रशांत कठाळे यांनी केले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विद्युत विभाग, सुरक्षा विभाग, प्रशिक्षण विभाग व अग्निशमन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले

शुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८

महानिर्मिती क्रिडास्पर्धा 2018 उद्घाटन थाटात

महानिर्मिती क्रिडास्पर्धा 2018 उद्घाटन थाटात

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र आंतरगृह क्रिडास्पर्धा
 2018 उद्घाटन समारंभ जल्लोषात संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र राज्यस्तरीय आंतरगृह क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन 04.10.2018 रोजी सकाळी शक्तीमान क्रिडा संकुल नाशिक औष्णिक केंद्र येथे श्री. कैलाश चिरुटकर, कार्यकारी संचालक (संचलन व सुव्यवस्था -१) महानिर्मिती यांच्या हस्ते जल्लोषात झाले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरगृह क्रिडा समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता श्री. उमाकांत निखारे यांनी भुषविले. मान्यवरांचे खुल्या जिप्सीमधून ढोल पथकासोबत क्रिडासंकुलात आगमन झाले. विविध विद्युत केंद्रातील एकूण ११ संघानी मार्च पास करत बॅण्डपथकाच्या तालावर मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर श्री. कैलाश चिरुटकर, यांच्या हस्ते महानिर्मितीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सोबत महानिर्मितीचे गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले व मान्यवरांनी क्रिडास्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

यानंतर राष्ट्रीय पातळीवरील नामांकीत खेळाडू सर्वश्री मनोज माळवे, तुलसीराम शेजवळ, गणेश शिंदे व सौ. लिना पाटील यांनी रिले पध्दतीने क्रिडा ज्योत मैदानात आणली. त्यानंतर मुख्य क्रिडा ज्योतीचे मान्यवरांचे हस्ते प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी श्री. कैलास चिरूटकर, श्री. नितिन चांदुरकर, कार्यकारी संचालक (माहिती तंत्रज्ञान), श्री. उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.कें., श्री. एन. एम. शिंदे, मुख्य अभियंता (सौर ऊर्जा), श्री. आनंद भिंताडे, मुख्य महाव्यवस्थापक (ना.प्र.कें.), श्री. नितिन वाघ, मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण व सुरक्षितता), श्री. अनिल मुसळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, श्री. सुनील इंगळे, उप मुख्य अभियंता (प्रशासन), श्री. राकेशकुमार कमटमकर, अधिक्षक अभियंता, श्री. शशांक चव्हाण, अधिक्षक अभियंता, श्री. मनोहर तायडे, अधिक्षक अभियंता (स्था), श्री. आर. पी. कुमावत, अधिक्षक अभियंता (नवकरणीय ऊर्जा), श्री. राहुल दुबे, कंपनी सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी श्री.अनिल मुसळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले त्यामध्ये त्यांनी खेळामुळे उर्जा निर्माण होते तसेच महानिर्मितीची ओळख राष्ट्रीय स्तरावर होईल तसेच महानिर्मिती कंपनी ही विज निमिर्तीमध्ये अग्रेसर आहेच पण तरी खेळामध्ये महानिर्मिती ठसा उमटवेलच असे त्यांनी सांगीतले. तद्नंतर श्री. नितिन चांदुरकर, यांनी, खेळामुळे कामामध्ये उर्जा निर्माण होऊन महानिर्मिती अजुन उंच पल्ला गाठेल असे सांगीतले तसेच सांघिक भावना जोपासुन खिलाडुवृत्तीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संघ व्यवस्थापक व कल्याण अधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.कैलाशजी चिरुटकर, यांनी या खेळाच्या माध्यमातून सांघिक कामगीरी करुन सर्वांमध्ये सुसंवाद साधून विजय कसा मिळवता येतो याचबरोबर काही कारणांनी पराभव झालाच तर तो पचवता येणे गरजेचे आहे असेही सांगीतले. खेळामुळे मन व शरीर कणखर बनते याचाच उपयोग दैनंदिन कामकाजात होतो व क्षमता वाढते तसेच महानिर्मितीची भरभराट होते. खेळाडुंनी खिलाडुवृत्तीने खेळावे व सुसंवाद साधुन विजय मिळवावा यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषण श्री.उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.केंद्र, एकलहरे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यालयाने आमच्यावर विश्वास ठेवून क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानले. तसेच खेळाडु, विभाग प्रमुख, आयोजन समिती यांचे आभार मानले. या खेळासाठी खेळाडूंना अनेक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या असुन ना. औ. वि. केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्याची माहिती घेउन आपल्या केंद्रात त्याची अंमलबजावणी करावी जेणेकरून महानिर्मितीची प्रगती होईल.
त्यानंतर श्री. उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.केंद्र, एकलहरे यांचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. कैलाश चिरुटकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कल्याण अधिकारी श्री.निवृत्ती कोंडावले यांनी आभार प्रदर्शन केले. ना.औ.वि.केंद्र एकलहरेचे मुख्य अभियंता श्री. उमाकांत निखारे हे आयोजनाचे प्रेरणास्त्रोत असून संघामध्ये व आयोजन समितीमध्ये एकोप्याची भावना निर्माण केली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. सुर्यकांत पवार, कार्यकारी अभियंता यांनी केले. आयोजन समितीमधील सर्वांनीच खुप मेहनत घेतली त्यामुळे या क्रिडास्पर्धांचे आयोजन दिमाखदार होवू शकले. याप्रसंगी विविध संघटना, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार वसाहतवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

रविवार, सप्टेंबर १६, २०१८

मानवाच्या कल्याणासाठी अभियंत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे हाच सर विश्वेशरय्यांचा आदर्श:राजेश पाटील

मानवाच्या कल्याणासाठी अभियंत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे हाच सर विश्वेशरय्यांचा आदर्श:राजेश पाटील

खापरखेडा/प्रतिनिधी:

 शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांना प्रत्यक्षात उतरवून मानवाच्या कल्याणासाठी अभियंत्यांचे कार्य असून अभियंत्यांचे उत्पन्न हे देशाच्या तथा मानवाच्या प्रगतीवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी केले.
मनाप्रमाणे विभाग बदलवून मिळण्याची अपेक्षा न बाळगता, मिळालेल्या कार्यास देशसेवेची संधी समजून उत्तम कार्य केल्यास निश्चितच व्यक्तिगत प्रगती साधनें सुकर होते.
नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांपैकी दोन अभियंत्यांना मंचावर स्थान देण्याच्या संकल्पनेचे विशेष कौतुक करीत, पर्यावरण रक्षणाचे आवाहन आजच्या अभियंत्यांनी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आर. सूब्रमणिअन, कार्यकारी संचालक, भेल यांनी केले.
याप्रसंगी,नाविन्यपूर्ण संकल्पनांचे विशेष कौतुक करीत, चौकटीच्या बाहेर पडून विचार केल्याशिवाय नवनवीन कल्पना सुचूच शकत नाहीत असे वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी मत मांडले.प्रारंभी, दीप प्रज्वलन व भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 
नाविन्यपूर्ण संकल्पना स्पर्धेतील दोन विजेत्या अभियंत्यांच्या संकल्पना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रस्तुत करण्यात आल्या. मंचावर उपस्थित व नव्यानेच रुजू झालेले दोन अभियंते कु. प्रिती कोला व विशाल बनसोडे यांनी महानिर्मिती मधील कार्यप्रणाली, खुले वातावरण व स्त्रीयांना मिळणारी सन्मानजनक वागणूक याची भरभरून स्तुती केली.सैनिकांप्रमाणे देशाकरीता प्राण देण्याची संधी नसली, तरी देशाचा मान उंचावण्याची संधी महानिर्मितीमधे निश्चितच उपलब्ध आहे, असे भावनात्मक वक्तव्य विशालने आपल्या भाषणातुन केले.
तोलामोलाच्या तब्बल छत्तीस चमुंच्या सहभागामुळे व वारंवार विविध स्तरांवर बरोबरी साधल्यामुळे अत्यंत चुरशीच्या व प्रेक्षणीय ठरलेल्या, मात्र आयोजकांचीच परीक्षा घेणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर आधारित व महानिर्मिती बद्दल प्रेरणादायी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आल्या. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, प्रदीप फूलझेले व मनोहर खांडेकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच BHEL चे महाव्यवस्थापक टी लाल, बी स्वायन, एस मंडल तर वरिष्ठ उप महाव्यवस्थापक एस एम बोरकर, वेकोलीचे जनसंपर्क अधिकारी आशिष तायल हे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन स्नेहा लालमुंडे व ज्ञानदीप कोकाटे यांनी केले.

शनिवार, सप्टेंबर १५, २०१८

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चंद्रपूर वीज केंद्राचा दौरा

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चंद्रपूर वीज केंद्राचा दौरा

चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम 
शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करा
ईज ऑफ डुइंग बिजनेस संकल्पना साकारा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रीतीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन,महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. उप मुख्य अभियंता स्तराच्या अधिकाऱ्याने वीज उत्पादनासाठी चांगला कोळसा मिळविण्याकरिता कसोशीने पाठपुरावा करावा शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करावे. वीज उत्पादनाच्या दैनंदिन कामकाजात अधिक व्यावसायिक सुलभतेची अंमलबजावणी करून अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासंबंधी त्यांनी वीज अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 
बंद झालेल्या दोन संचाच्या जागेवर ऊर्जा प्रकल्प
वयोमानपरत्वे चंद्रपूर वीज केंद्राच्या बंद केलेल्या प्रत्येकी २१० मेगावाट संच क्रमांक १ व २ च्या जागेवर सुमारे १००० मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा ६६० मेगावाट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारता येईल काय यादृष्टीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माननीय उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले. संच क्रमांक १ व २ साठी आरक्षित असलेल्या राख बंधारा परिसरात १०० मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीची स्वारस्य अभिरुची सूचना प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे ऊर्जावान उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली, आढावा बैठक घेतली व अधिकारी-अभियंते-कामगार, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार-कंत्राटी कामगार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींशी संवाद साधला. ऊर्जामंत्र्यांची चंद्रपूर वीज केंद्राला प्रथमच भेट असल्याने येथील अधिकारी-कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर ५०० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ८ व ९ प्लांट कंट्रोल रूम, ई.एस.पी. परिसर, उपाहार गृह, कुलिंग टॉवरला भेट दिली व तंत्रज्ञ आणि कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधला. त्यानंतर, ५०० मेगावाट सेवा इमारत येथील सर्च सभागृह येथे आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वीज केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. मागील वर्षी पाउस कमी झाल्याने पाणी बचतीसह वीज उत्पादन कायम राखल्याबद्दल त्यांनी वीज अधिकाऱ्यांचे कौतुक केले व चंद्रपूर वीज केंद्राचे कार्य उत्तम असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी याबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. ज्यामध्ये संचालक पाच सूत्री कार्यक्रम अंतर्गत केलेल्या अभिनव तथा कल्पक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
हिराई अतिथीगृह येथील बैठकीत आमदार नाना श्यामकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर दौऱ्यात महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, सल्लागार तथा संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते जयंत बोबडे, अनंत देवतारे, ज्ञानोबा मुंडे, मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय पाटील तसेच वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
(बातम्यांच्या अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१७५९३७९२५)

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

महानिर्मितीला मानव संसाधन विषयक उत्कृष्ट कार्यपद्धतीचा आशियास्तरीय पुरस्कार

महानिर्मितीला मानव संसाधन विषयक उत्कृष्ट कार्यपद्धतीचा आशियास्तरीय पुरस्कार

विनोद बोंदरे, कार्यकारी संचालक बेस्ट एच.आर.प्रोफेशनल पुरस्काराने सन्मानित
यशाचे श्रेय महानिर्मिती व्यवस्थापन व टीम मानव संसाधनचे
    नागपूर/प्रतिनिधी:
    टाईम्स असेंट द्वारा आयोजित आशिया पॅसेफिक एच.आर.एम. कॉंग्रेस २०१८ शिखर परिषदेत महानिर्मितीला दोन आशियास्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट(पी.एस.यु.) संस्थात्मक पातळीवर बेस्ट एच.आर. प्रॅकटीसेसकरिता महानिर्मितीला तर वैयक्तिक पातळीवर बेस्ट एच.आर. प्रोफेशनल पुरस्काराने महानिर्मितीचे कार्यकारी संचालक विनोद बोंदरे यांना गौरविण्यात आले.
    पुरस्काराचे मुल्यांकन विशेषत: प्रकल्पग्रस्त विषयक धोरणांची अंमलबजावणी, प्रकल्पबाधित गावांतील तरुण-तरुणींसाठी शिष्यवृत्ती योजना, ऑनलाईन व पारदर्शकतेने भरती प्रक्रियेचा दृष्टीकोन, भरती ते सेवानिवृत्ती एक खिडकी योजना, क्रीडा/नाट्य स्पर्धा, सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत प्रत्यक्ष उपक्रम इत्यादींवर आधारित आहे. मागील काही वर्षांत वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सहकार्याने महानिर्मितीमध्ये नवनवीन बदल स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण आहे व हे दोन पुरस्कार त्याचीच पावती असल्याचे विनोद बोंदरे यांनी सांगितले.
    ऊर्जा,कोळसा, पेट्रोलियम, ऑईल,खनिकर्म, टेलीकॉम, बँकिंग, आय.टी., वस्त्रोद्योग, फूड, आरोग्य, रियल इस्टेट मधील नामांकित कोर्पोरेट जगताचा या परिषदेमध्ये सहभाग होता. शिखर परिषदेचे संयोजक डॉ. आर. एल. भाटीया,आय.आय.एम. अहमदाबादच्या माजी डीन डॉ. इंदिरा पारीख, डॉ.न्यूटन व डॉ.लक्ष्मी यांचे हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी महानिर्मितीचे महाव्यवस्थापक(मासं) आनंद कोंत, वरिष्ठ व्यवस्थापक(मासं) रणधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
    कॉर्पोरेट जगतात मानव संसाधन विषयक नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यावसायिकांची, त्यांच्या नेतृत्वगुणांची, बुद्धिमत्तेची चुणूक जगासमोर आणून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने “प्रत्यक्षात, दृष्टीकोन आणि गरज” या संकल्पनेवर दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन हॉटेल ताज व्हिवांटा यशवंतपूर बेंगलुरू(कर्नाटक) येथे ४ व ५ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आले होते.
    आशिया खंडातील भारत, बांग्लादेश,श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि मालदीव अशा कॉर्पोरेट क्षेत्रातील ४५० मानव संसाधन विषयक प्रतिनिधी ह्यामध्ये सहभागी झाले होते. सुमारे ५० तज्ज्ञ/सुप्रसिद्ध वक्ते, मानव संसाधन विषयक अभिनव २० प्रभावी सत्रे अशी या शिखर परिषदेची भव्यता होती. संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० कॉर्पोरेटसची परीक्षकांनी निवड करून मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे ह्या शिखर परिषदेत वितरण करण्यात आले.
    महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, संचालक तथा सल्लागार(खनिकर्म) श्याम वर्धने तसेच सर्व कार्यकारी संचालक व वीज केंद्रांचे मुख्य अभियंते यांनी विनोद बोंदरे व टीम महानिर्मिती मानव संसाधनचे ह्या निमित्ताने विशेष अभिनंदन केले आहे.

    सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८

    सण-उत्सवात राज्याचे वीज उत्पादन सुरळीत व्हावे याकरिता ऊर्जामंत्र्यांनी घेतली संयुक्त बैठक

    सण-उत्सवात राज्याचे वीज उत्पादन सुरळीत व्हावे याकरिता ऊर्जामंत्र्यांनी घेतली संयुक्त बैठक

     ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश : 
    वेकोलिने कोळसा पुरवठा वाढवावा. महानिर्मितीने कोळसा रस्ते वाहतूक समस्येचे निरसन करावे. वेकोली, महानिर्मिती व रेल्वेने योग्य समन्वय ठेवावा. 
    रेल्वेद्वारे कोळसा वाहतुकीतील समस्येवर दिल्ली येथे लवकरच उच्चस्तरीय बैठक 
    कोराडी/प्रतिनिधी:
     वेकोलिने अधिक चांगल्या दर्जाचा कोळसा महानिर्मितीस उपलब्ध करून द्यावा, महानिर्मितीने रस्ते वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, सिंफरने कोळसा नमुना परीक्षण करताना तपासणी पद्धतीत योग्य तो बदल करावा व आगामी काळात महानिर्मिती, वेकोली, रस्ते वाहतूक कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष खदानस्थळी, अधिक समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त बैठकीत दिले. 
    पावसाळा अंतिम टप्प्यात आहे व आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज उत्पादन सुरळीत व्हावे तसेच महानिर्मितीच्या वीज उत्पादनासाठी रेल्वे व रस्ते वाहतुकीने वेकोलिच्या विविध कोळसा खाणींतून कोळशाचा पुरवठा आवश्यक त्या मात्रेमध्ये वेळीच उपलब्ध व्हावा या दृष्टीने उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली महानिर्मिती, वेकोली, सिंफर, धारिवाल एनर्जी, आयडियल एनर्जी व कोळसा वाहतूक कंत्राटदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन महानिर्मितीच्या ३ X ६६० मेगावाट क्षमतेच्या सभागृहात करण्यात आले. 
    बैठकीला महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, सल्लागार तथा संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, कार्यकारी संचालक राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, अनंत देवतारे तर वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक(कर्मचारीवर्ग) डॉ. संजय कुमार, संचालक (प्रकल्प व नियोजन) टी.एन.झा, संचालक(वित्त) एस.एम. चौधरी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक गोखले, सिंफरचे डॉ. सिंग, धारिवाल एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक रबी चौधरी, आयडियल एनर्जीचे एस.ओ.देशपांडे तसेच महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा व नागपूर कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
    महानदी कोल फिल्ड्स लिमिटेड व साउथ इस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेडच्या खदानीतून रेल्वेद्वारे कोळसा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत कोळसा पुरवठ्यासंबंधी ह्या आठवड्यात सदस्य (वाहतूक) रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 
    पावसाळ्यात खदानीत पाणी साठल्याने कोळसा उत्पादनावर व पर्यायाने कोळसा पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे. वेकोलीच्या विविध खाणींतून आगामी काळात नियमित कोळसा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे व आगामी काळात महानिर्मितीला अधिकाधिक कोळसा पुरवठा करण्यात येणार असल्याचे राजीव रंजन मिश्र यांनी सांगितले. आयडियल एनर्जी व धारिवाल एनर्जी यांनी मांडलेल्या समस्येचे निरसन करण्यात आले.
    बैठकीनंतर महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे व मुख्य अभियंते कोराडी व खापरखेडा यांनी भानेगाव व सिंगोरी खदान येथे तर कार्यकारी संचालक राजू बुरडे यांनी दिनेश,गोकुल व मकरधोकडा खदानस्थळी भेट देऊन कोळसा साठा, रस्ते वाहतूक विषयक समस्या जाणून घेतली व संबंधितांना योग्य ते निर्देश दिले.

    रविवार, ऑगस्ट २६, २०१८

    प्रभावी संवादासाठी आदर,सभ्यपणा,स्पष्टता, समयसूचकता व सकारात्मकता हिच गुरुकिल्ली:श्वेता शेलगावकर

    प्रभावी संवादासाठी आदर,सभ्यपणा,स्पष्टता, समयसूचकता व सकारात्मकता हिच गुरुकिल्ली:श्वेता शेलगावकर

    खापरखेडा/प्रतिनिधी:
    महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत “३६० डिग्री संवाद व मल्टी टास्किंग (बहुकामे)” या विषयावर मध्य भारतातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका तसेच प्रेरणादायी प्रशिक्षक श्वेता शेलगावकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. महानिर्मितीच्या खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्रामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात “३६० डिग्री संवाद” तर दुसऱ्या सत्रात मल्टी टास्किंग (बहुकामे)” या उपयुक्त विषयांवर त्यांनी प्रभावी सादरीकरण केले. याप्रसंगी खापरखेडा वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते मनोहर खांडेकर, राजेंद्र राउत आणि प्रशिक्षक श्वेता शेल्गावकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 
    ३६० डिग्री संवादाविषयी श्वेता शेलगावकर म्हणाल्या कि, सुप्त कलागुण प्रत्येकामध्ये आहेत त्याचा योग्य वापर करून यशाचा मार्ग निवडायला हवा. अनेक व्यक्ती तर दुसऱ्याने आपल्या शक्ती स्थानांची /प्रतिभेची ओळख करून दिल्यानंतर प्रयत्न करायला सुरुवात करतात. नेतृत्व विकासात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे. योग्य संवाद नसल्याने वारंवार समस्या निर्माण होतात. कामकाजाच्या ठिकाणी, दिवसभर सोबत असणाऱ्यांना आपण किती ओळखतो ? औद्योगिक सुरक्षिततेसोबतच भावनिक-मानसिक व भौतिक सुरक्षा देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. 
    प्रभावी संवादासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. सांस्कृतिक मूल्यांचा संवादावर उत्तम प्रभाव पडतो. आज माहितीचे विश्व खुले झाल्याने नवनवीन ज्ञान, शिकण्याची उर्मी/वृत्ती जागृत ठेवून, विचारांची स्पष्टता असायला हवी. बोलण्यात स्पष्टता नसल्यास, पाहिजे तसा प्रभाव पाडता येत नाही. विशेष म्हणजे, वागणुकीतून निर्णय क्षमता दिसून यायला हवी. संवादासाठी श्रवण कौशल्य चांगले ठेवल्यास बुद्धी आणि हृद्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. भाषेच्या गोडव्यातून संवादात आपुलकी वाढते, संवाद मोकळा असायला हवा. शब्द आणि शारीरिक हालचाल वचनबद्ध असायला हवी. आभासी दुनियेत जास्त रममाण होण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनाचा आंनंद घेतल्यास तणावरहित जीवन जगता येईल. एकूणच संवादात आदर, सभ्यपणा, स्पष्टता, समयसूचकता, सकारात्मकता असायला हवी असे त्यांनी सांगितले. 
    स्पर्धेच्या युगात कामाचा भार सातत्याने वाढतच आहे. कोर्पोरेट क्षेत्रात कमी मनुष्यबळाकडून जास्तीत जास्त कामे करून घ्यायची संकल्पना रूढ झाली असल्याने प्रत्येकाला मल्टी-टास्किंग (बहुकामे) करावी लागतात. मल्टी-टास्किंग करिता शरीर आणि मन सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. विविध कामांचे नियोजन करताना रोजच्या कामाची यादी तयार करून प्राधान्यक्रम ठरवा, छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कामाची विभागणी करा, आळस झटका, बुद्धी आणि शरीराचा आंतरिक आवाज ऐका, समाज माध्यमांच्या मोजका वापर करा, सांघिक भावना जोपासून इतरांच्या योग्यतेवर विश्वास टाका, योग्य वेळी विश्रांती घ्या व विशेषत: सराव, निरीक्षण व अनुसरण करा असे श्वेता शेलगावकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्नेहा लालमुंडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय अढाऊ यांनी केले. 
    खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, बंडावार, जितेंद्र टेंभरे, अर्जुन वानखेडे, कार्यकारी अभियंते, विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

    मंगळवार, ऑगस्ट २१, २०१८

    महानिर्मितीची डिजिटलतेकडे वाटचाल

    महानिर्मितीची डिजिटलतेकडे वाटचाल

    नागपूर/प्रतिनिधी:
     महानिर्मितीच्या जमीन मालमत्तेची (संपत्ती व्यवस्थापन) माहिती जी.आय.एस.,जी.पी.एस., सॅटेलाईट इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश-रेखांशासह डिजिटल स्वरूपात संग्रहित केल्याने महानिर्मिती-महाजेम्सच्या आगामी प्रकल्प नियोजन आणि विकासात अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान ठरणार असल्याचे महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल यांनी सांगितले. ते महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग नागपूर कार्यालयात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. 
    याप्रसंगी मंचावर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर तसेच महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. सुब्रतो दास प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याचे उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर ह्या स्वायत्त संस्थेसोबत महानिर्मिती व महाजेम्सने नोव्हेंबर २०१७ मध्ये ह्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 
    पथदर्शी प्रकल्प म्हणून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र व परिसराचे काम अत्यंत परिश्रम घेऊन काळजीपूर्वकरीत्या सात महिन्यात पूर्ण करण्यात आले. ज्यामध्ये वारेगाव, खसाळा, नांदगाव राख बंधारा, प्रस्तावित वारेगाव-कोराडी-खसाळा राख आधारीत उद्योग समूह, प्रकाशनगर व विद्युत विहार वसाहत, कोराडी पॉँड ३, कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्र व परीसिमेचा यामध्ये समावेश आहे.
    कार्यशाळेत कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे म्हणाले कि, अश्या पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आगामी काळात जमीन,संपत्तीविषयक प्रश्न सहज सुटतील, व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल, गतिमानतेने वाटचाल करणे सुकर होईल तर राजकुमार तासकर यांनी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंगच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग नागपूर केंद्र प्रमुख डॉ. सुब्रतो दास म्हणाले कि, आगामी काळात नियोजनाकरिता हा डिजिटल डाटा महानिर्मिती-महाजेम्सला निश्चितच सहाय्यकारी ठरेल.
    महानिर्मिती व महाजेम्सच्या वैविध्यपूर्ण विकास प्रकल्पांच्या नियोजनाकरिता जसे वीज प्रकल्प, राखेवर आधारित उद्योग समूह, सौर ऊर्जा प्रकल्प, खाणकाम प्रकल्प इत्यादींसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) व अनुषंगिक कागदपत्रे तयार करताना प्रकल्पाची संभाव्य जागा, जागेचा वापर, जागेचे आच्छादन,प्रकल्पासाठी आवश्यक निरनिराळे स्त्रोत,लगतची साधन सामग्रीविषयक माहिती तातडीने मिळणे आवश्यक असते. परंपरागत पद्धतीमुळे या कामाला भरपूर वेळ लागत होता. मात्र आता, प्रकल्प व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात हि प्रणाली/तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.प्रारंभी प्रास्ताविकातून अमित मूर्तडक यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्र संचालन तथा प्रभावी संगणकीय सादरीकरण महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राचे सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. विवेक काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. अजय देशपांडे यांनी मानले. 
    याप्रसंगी महाजेम्सचे उप मुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंते परमानंद रंगारी, शैलेन्द्र गारजलवार, महानिर्मिती-महाजेम्सचे मुंबई तसेच कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, अभियंते, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते.

    गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

    विद्यार्थ्यांना शिक्षण मांडता आले पाहिजे, जगभरात संधी उपलब्ध:चंद्रशेखर बावनकुळे

    विद्यार्थ्यांना शिक्षण मांडता आले पाहिजे, जगभरात संधी उपलब्ध:चंद्रशेखर बावनकुळे

    महानिर्मितीच्या निधीतून ११ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

    २ कोटींच्या खसाळा भूमिगत नाल्याद्वारे मलनिसा:रण योजनेचे उद्घाटन
    कोराडी,पांजरा,खापरी,खसाळा,नांदा गावांमध्ये चौफेर विकास

    कोराडी/प्रतिनिधी:
    जगण्याचे स्वातंत्र्य हुतात्म्यांमुळे मिळाले, त्याची आठवण म्हणून हा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे, जगभरात भारतीय विद्यार्थ्याना संधी आहे, घेतलेले शिक्षण मांडता आले पाहिजे, सादर करता येणे गरजेचे आहे. जगात भारताला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. २१ व्या शतकात सुसंस्कृत समाज, संस्कारित पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते महानिर्मितीच्या निधीतून पुनर्वसित गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी कोराडी येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर सभागृहात बोलत होते. 

    भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर,खोबे, देवराव डाखोळे,संजय मैंद, विठ्ठल निमोने, सरपंच रवींद्र पारधी, उपसरपंच सुनिता वैरागडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, सरपंच सुनिता चिंचूरकर, उप सरपंच उमेश निमोने,पंचायत समिती सदस्या केशरताई बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना मैंद,अर्चना दिवाणे,नरेंद्र धानोले,कल्पना कामटकर,निर्मला मोरई,रवींद्र मोहनकर,देवेंद्र सावरकर,राजकुमार शिवणकर,हेमराज चौधरी,जितेंद्र बानाईत,श्रावणी वाघमारे,बेबी खुबेले,कैलास सोमेश्वर, सोनाली वानखेडे,वंदना रामटेके, मुख्य अभियंते अनंत देवतारे, राजकुमार तासकर, अभय हरणे, राजेश पाटील, उप मुख्य अभियंता राजेश कराडे, कार्यकारी अभियंता शिरीष वाठ, खसाळा ग्रामपंचायत सदस्य मुकेश इंगोले, अश्विन गभने, अमोल वाघमारे, देवेंद्र टेकाम, छाया सावरकर, छबी रोकडे, अरुणा तभाणे, मीना चौधरी, सरपंच तसेच उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य खसाळा,पांजरा,खापरी,नांदा आणि कोराडी प्रामुख्याने उपस्थित होते. 
    मातीशी नाळ, समाजाप्रती बांधिलकी, जन्मदात्याप्रती आदर व निसर्गाचे ऋण फेडण्याची भावना अंगी असायला हवी, प्रत्येकाने किमान चार झाडे लावून,जगविण्याचा संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. आगामी काळात कोराडी येथे अत्याधुनिक इंडोअर स्टेडियम, अद्ययावत व्यायामशाळा,मंदिर परिसर विकास, कोराडी पर्यटन, तलाव सुशोभिकरण, विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास कामे, अंतर्गत रस्ते, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रारंभी १० वी,१२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. 
    महानिर्मितीच्या खसाळा, पांजरा, खापरी, नांदा कोराडी या पुनर्वसित गावांमध्ये सुमारे १३.३० कोटींच्या विविध सोयी सुविधा कामांचे भूमिपूजन व उद्घाटन नामदार चंद्रशेखर बावनकुळे उर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपूर यांचे शुभहस्ते करण्यात आले. महानिमितीच्या व राज्य वीज नियामक आयोगाच्या रीतसर मंजुरीनंतर सुमारे ११.१८ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन तर महापारेषणच्या निधीतून खसाळा येथे २.१० कोटी रुपयांचे भूमिगत नाल्याद्वारे मलनि:सारण योजनेच्या कामाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर करण्यात आले. 
    खसाळा गावामध्ये जिल्हा परिषद शाळा स्वच्छतागृह, क्रीडांगण, बगीचा, बौद्धविहार स्तूप व संरक्षण भिंत बांधकाम, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, पथदिवे, हायमास्ट लाईट व नाली बांधकामाचा समावेश आहे.
    पांजरा गावामध्ये अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण-सिमेंटीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत १.५० लक्ष लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईटच्या कामांचा समावेश आहे.
    नांदा गावामध्ये हनुमान मंदिर संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत १.५० लक्ष लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईट व बाजार ओटा बांधकामाचा समावेश आहे.
    कोराडी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय अतिरिक्त मजला, सुगत वाचनालय अतिरिक्त बांधकाम,तेजस्विनी विद्यालय पेवमेंट,शेड,स्वच्छतागृह, सिद्धार्थनगर मैदान व गुरांच्या दवाखान्याजवळ संरक्षण भिंत,प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राजवळ मैदान, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत, ५० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईट, वक्रतुंड प्रिंटर जवळील नाला सिमेंटीकरण कामांचा समावेश आहे.
    खसाळा २.११ कोटी, पांजरा १.५३ कोटी, खापरी १.७३ कोटी, नांदा २.१६ कोटी, कोराडी ३.६५ कोटी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन बंडू शंभरकर, विठ्ठल निमोने आणि उत्तम झेलगोंदे यांनी केले. कार्यक्रमाला खसाळा, पांजरा, खापरी, नांदा, कोराडी परिसरातील नागरिक महिला-पुरुष-मुले-मुली संबंधित भूमिपूजन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८

    कोराडी तलाव साफसफाई, खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ

    कोराडी तलाव साफसफाई, खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ

    ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते राठोड-१ जहाज कोराडी 
    जलाशयात सोडण्यात आले 
    कोराडी/प्रतिनिधी:
    कोराडी तलावाचे पुनर्जीवन, खोलीकरण/सौन्दर्यीकरण, आई जगदंबा मंदिर परिसर विकास, जलक्रीडा, पर्यटन क्षेत्र विकास असा ऊर्जामंत्र्यांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. या कामामधील अत्यंत महत्वाकांक्षी अश्या तलाव साफ सफाई, गाळ काढणे व खोलीकरण कामाचा शुभारंभ आज उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते करण्यात आला. 
    याप्रसंगी सुनिता चिंचूरकर सरपंच कोराडी, उमेश निमोने उप सरपंच कोराडी, सीमा जयस्वाल नगराध्यक्षा नगर पंचायत महादुला, राजेश रंगारी नगर पंचायत उपाध्यक्ष महादुला, अर्चना दिवाणे माजी उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कोराडी हेमराज चौधरी, नरेंद्र धनोले, बंडू मोहनकर, निर्मला मोरे तर महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, मुख्य अभियंते अनंत देवतारे, राजकुमार तासकर, उप मुख्य अभियंते राजेश कराडे, प्रदीप फुलझेले, अधीक्षक अभियंता शैलेन्द्र गजरलवार, कार्यकारी अभियंता शिरीष वाठ, ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार शेखर अमीन, अभी इंजिनियरिंग तर्फे संजय व शलभ विजयवर्गी प्रामुख्याने उपस्थित होते. 
    २० मीटर लांबी,७ मीटर रुंदी व सुमारे ९० टन वजनाच्या या महाकाय तरंगत्या फलाटाची लोखंडी पत्रे जोडून कोराडी येथील भारतीय विद्याभवन्स शाळेजवळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली निर्मिती करण्यात आली आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड बांद्रा, मुंबई येथील पोर्ट अधिकाऱ्यांच्या रीतसर परवानगीनुसार माननीय उर्जामंत्री यांचे शुभहस्ते राठोड-१ जहाज अत्यंत सुरक्षितरीत्या कोराडी जलाशयात आज सोडण्यात आले. 
    कोराडी तलावाची जागा १९४ हेक्टर परिसरात व्यापलेली आहे. महानिर्मितीतर्फे कोराडी तलाव पुनर्जीवन, साफसफाई, गाळ काढणे, खोलीकरण व सौन्दर्यीकरणाचे काम मेसर्स अभी इंजिनियरिंग कोर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात आले असून सदर कामाची किमत ५५.०६ कोटी इतकी आहे. हे काम १८ महिन्यात पूर्ण करायचे आहे. प्रथम टप्प्यात कोराडी तलावातील शेवाळ, टायफा, गवत तसेच विविध प्रकारच्या अनावश्यक वनस्पती काढण्यात येणार आहेत याकरिता राठोड-१ तरंगत्या फलाटावर पोकलेन ठेवून ह्या अनावश्यक वनस्पती काढण्यात येणार आहे. रोज सुमारे १६ तास काम करून एक हेक्टर परिसरातील वनस्पती काढण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ मीटर बाय ३.५ मीटर आकाराच्या हॉलंड बनावटीच्या ब्रूट या कटर सक्शन ड्रेजरच्या सहायाने पाण्याखालील सुमारे ३ ते ५ मीटर खोलीतील गाळ २०० एम.एम. पाईपद्वारे बाहेर काढण्यात येणार आहे.अनावश्यक वनस्पती काढल्याने पाणी स्वच्छ राहील, मासे तसेच जलचर प्राण्यांना पर्यावरणपूरक संरक्षण मिळेल. तलाव परिसर नयनरम्य दिसेल, गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढेल. औष्णिक विद्युत केंद्राच्या वीज उत्पादनासाठी पाण्याची उपलब्धता राहील, गाळमिश्रित मातीचा कृषीक्षेत्राला लाभ होईल किंवा खोलगट भागात या मातीचा भरणा करून जमिनीचा समतोल राखणे सुकर होईल. प्रारंभी, महेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकातून राठोड-१ बाबत संक्षिप्त माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरूर हक यांनी केले. हा नाविन्यपूर्ण सोहळा बघण्यासाठी कोराडी महादुला परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, परिसरातील नागरिक, महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


    बुधवार, जुलै २५, २०१८

    महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रात ३७८७ झाडांचे वृक्षारोपण

    महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रात ३७८७ झाडांचे वृक्षारोपण

    नागपूर/प्रतिनिधी:
    महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्र, प्रकल्प आणि कार्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत असून ३१ जुलै पर्यंत निर्धारित ध्येय पूर्ण करण्याकरीता प्रत्येक कर्मचारी सामाजिक दायीत्वातून वृक्षारोपणात हिरीरीने सहभागी होत आहे. 
    महानिर्मितीच्या पारस औष्णिक विद्युत केंद्रात यावर्षी ३००० वृक्षांचे ध्येय निर्धारित करण्यात आले होते व आतापर्यंत ३७८७ वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये आंबा, चिकू, फणस, चिंच, जांभूळ, वड, पिंपळ, कडूनिंब, बांबू इत्यादी वृक्षांचा प्रामुख्याने सहभाग आहे.
    वृक्षारोपण मोहीम संदर्भात, मुख्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली किंवा कसे याची प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करण्याकरीता पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश खंडारे, उप मुख्य अभियंता श्री. मनोहर मसराम, अधीक्षक अभियंते श्री. राहुल सोहनी, श्री. एस.एम.पाटील, श्री. बोदे, श्री. आर.व्ही.गोरे,विभाग प्रमुख यांनी वृक्षारोपण झालेल्या स्थळांना भेट दिली. वीज केंद्र परिसर, वसाहत परिसर, अतिथी गृह परिसर, कोळसा हाताळणी विभाग सभोवताल परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, झाडांसाठी संरक्षक कुंपण, आवश्यक खत, ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा इत्यादीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची निगा राखण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश खंडारे यांनी सांगितले.

    सोमवार, जुलै २३, २०१८

    ५५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण करत महानिर्मिती साकारणार हिरवागार डोंगर

    ५५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण करत महानिर्मिती साकारणार हिरवागार डोंगर

    नागपूर/प्रतिनिधी:

    वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल आणि मानवी जीवनावरील प्रतिकूल परिणामांची गंभीरता लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी, महानिर्मितीला यावर्षी सुमारे ५५००० वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित करून देण्यात आल्याने महानिर्मितीच्या विविध वीज केंद्र व प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड उत्साहात करण्यात येत आहे. मात्र, मुंबई शहरातील नागरिकांनी वृक्षारोपण कुठे करायचे, जागेचा अभाव असल्याने इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करता येत नाही. नेमके या समस्येवर महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी उत्तर शोधले, ते म्हणजे "मानव निर्मित हिरवागार डोंगर".  
    मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या टेटावली, रबाळे(नवी मुंबई) येथील ओसाढ डोंगराळ जमिनीवर पर्यावरण क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या हरियाली फाउंडेशन ठाणे या संस्थेच्या सहकार्याने महानिर्मितीच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील सुमारे ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपूर्ण डोंगरावर १३८ झाडे लावली यामध्ये आंबा, जांभूळ, फणस, वड, पिंपळ तसेच फळझाडांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. 
    मुंबईतील वातानुकुलीन वातावरणात काम करणाऱ्या मनुष्यबळाची निसर्गाविषयीची विलक्षण आत्मीयता, मातीशी असलेली नाळ या उपक्रमातून दिसून आली. आपणही, निसर्गाला काही देणं लागतो या दातृत्व भावनेतून आगामी काळात या ओसाढ जमिनीवर मानव निर्मित महानिर्मितीचा हिरवागार डोंगर साकारणार असल्याचे समाधान व सार्थ अभिमान श्री. नितीन चांदूरकर यांनी व्यक्त केले. एरवी संगणक किंवा सॉफटवेअरचे काम करणारी हि नव्या पिढीची तज्ज्ञ मंडळी कुदळ, फावडे हातात घेऊन तर खतांच्या पिशव्या खांद्यावर घेऊन वृक्षारोपणाचा मनस्वी आनंद लुटताना दिसून येत होती. प्रारंभी, हरियाली फाउंडेशनचे श्री. अशोक गोंधळे आणि श्री.श्रीनिवास साठे यांनी झाडांचे महत्व,जमीन,खत,वृक्षारोपणाची शास्त्रीय पद्धत याची उपस्थितांना माहिती सांगितली व त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.विशेष म्हणजे, हरियाली फाउंडेशनतर्फे या झाडांची निगा राखल्या जाणार आहे व याकरिता महानिर्मितीला कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार देखील येणार नाही. अभिनव संकल्पनेवर आधारित या वृक्षारोपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि निश्चितच हा उपक्रम प्रेरणादायी देखील आहे. 
    महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) श्री. नितीन चांदूरकर यांच्या कुशल नेतृत्वात श्री.अविस मिर्झा, श्री.प्रशांत रंगदाळ, श्री.सुशील साखरे, सौ.रचना साळुंखे, श्री.सुमित पाटील, श्री.गणेश गुल्हाने, श्री.राजू खारूल, श्री.अण्णा बागडे, श्री.गौरव क्षीरसागर, श्री.हर्षद संख्ये, श्री.जयेश ठाकरे, श्री.सौरभ चिंचणकर, श्री.राजेश पौडवाल व टीम महाजेनको माहिती तंत्रज्ञान यांचा सदर वृक्षारोपणात सक्रीय सहभाग होता.

    शनिवार, जुलै २१, २०१८

    महानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल

    महानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल

    चित्रफितीचे विमोचन          ई-लर्निंग संकेतस्थळाचे उदघाटन            ई-लायब्ररी पोर्टल सुरु

    प्रशिक्षणार्थीचे मूल्यमापन ऑनलाईन परीक्षेद्वारे 
    कोराडी/प्रतिनिधी:
    वीज उत्पादनाचे कार्य खडतर व जिकीरीचे असल्याने तरुण अभियंत्यांनी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा सुयोग्य वापर करावा. यंत्रसामग्री व त्याची कार्यप्रणाली समजून घ्यावी,नवनवे तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, विश्लेषणात्मक दृष्टीकोन ठेवावा, प्रत्यक्ष साईटवर काम करावे, डिजिटल क्रांतीचे फायदे-तोटे व संरक्षण याबाबत सावधानता बाळगावी व परिश्रमाची सवय अंगीकारावी असे मोलाचे मार्गदर्शन महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव यांनी केले. 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, सतीश चवरे, मुख्य अभियंते सुनील आसमवार, अभय हरणे, अनंत देवतारे, पंकज सपाटे, राजेश पाटील व राजकुमार तासकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
    प्रारंभी, कोराडी प्रशिक्षण केंद्राची चौफेर कामगिरी दर्शविणाऱ्या “ऊर्जा निकेतन” या चित्रफितीचे उदघाटन विकास जयदेव यांचे हस्ते करण्यात आले. कोराडी प्रशिक्षण केंद्राने मागील वर्षभरात डिजिटल स्वप्न उराशी बाळगले होते व त्यादृष्टीने टीम प्रशिक्षण केंद्र कोराडी यांच्या अथक परिश्रमातून डिजिटल स्वप्न साकार झाले त्यामध्ये प्रशिक्षणार्थीची मोबाईलवर प्रतिक्रिया घेणे, प्रशिक्षणार्थीचे ऑनलाइन परीक्षेद्वारे मूल्यमापन करणे, ई-लायब्ररी पोर्टल सुविधा, ई-लर्निंगच्या माध्यमातून महानिर्मितीच्या इतर विद्युत केंद्रांना तसेच प्रशिक्षण उप केंद्रांना व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जोडण्यात आले. त्याची सुरुवात, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रशिक्षण उपकेंद्राशी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉन्फरंसिंग करून झाली हे विशेष. डिजिटल क्रांतीसाठी कोराडी प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक अनुदेशक विपिन दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले. लवकरच (इंटर अॅकटीव्ह ) ई-क्लास रूम सुविधा देखील सुरु करण्यात येणार आहे. याप्रसंगी, डॉ.अतुल बनसोड लिखित “टर्बाईन गव्हर्निंग सिस्टीम” या अनुभवसंपन्न पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अतुल बनसोड, मिलिंद रहाटगावकर व विपिन दुबे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. 
    दैनंदिन कामकाजात नवीन अभियंत्यांनी सहभाग वाढवावा व यंत्राला समजून घेतले तर यशवी अभियंते व्हाल असे प्रतिपादन राजू बुरडे यांनी केले. सौर ऊर्जा क्षेत्रातील संचालन व सुव्यवस्था विषयक कामे महानिर्मितीच्या मनुष्यबळाने करावी याकरिता आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती सतीश चवरे यांनी व्यक्त केली. वीज उत्पादनाचे कार्य हे सांघिक स्वरूपाचे आहे व त्याचे उत्तम बीजारोपण कोराडी प्रशिक्षण केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार कैलाश चिरूटकर यांनी काढले. कोराडी प्रशिक्षण केंद्राला डिजिटल करण्याचे स्वप्न टीम प्रशिक्षण केंद्राचे होते व त्यादृष्टीने आज मैलाचा दगड गाठलेला असल्याचा सार्थ अभिमान सुनील आसमवार यांनी व्यक्त केला. कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे मनुष्यबळाला आकार देण्याचे सर्वोत्तम कार्य सुरु असल्याचे विनोद बोंदरे यांनी अध्यक्षीय भाषणातून गुणगौरव केले. याप्रसंगी सुभाष कुटे या प्रशिक्षनार्थीने मनोगत व्यक्त केले. श्रीपाद पाठक यांच्या समर्पक सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला अधिकच गोडवा आला. आनंद मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
    कार्यक्रमाला महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते तुकाराम हेडाऊ, जगदीश पवार, पांडुरंग अमिलकंठावार, विराज चौधरी, चंद्रदीपक डांगे, सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) प्रकाश प्रभावत,सुरक्षा अधिकारी सुधाकर इंगळे, कोराडी प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी व कर्मचारीवृंद, के-८४ व ८५बॅचचे प्रशिक्षणार्थी, कोराडी व खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्राचे अधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उदय मुठाळ यांच्या सुमधुर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


    गुरुवार, जुलै १९, २०१८

     नैसर्गिक संसाधनांच्या बचतीसह महानिर्मितीची वीज उत्पादन क्षमता अधिक वाढीस लागणार:चंद्रशेखर बावनकुळे

    नैसर्गिक संसाधनांच्या बचतीसह महानिर्मितीची वीज उत्पादन क्षमता अधिक वाढीस लागणार:चंद्रशेखर बावनकुळे

    तीन अभिनव वीज प्रकल्प देशाला प्रेरणादायी ठरणार 
    उर्जावान मंत्र्यांचा वीज क्षेत्रात विकास कामांचा झंझावात 
    नागपूर/प्रतिनिधी:
    कोळसा पाईप कन्व्हेयरमुळे कोळशाचा दर्जा अधिक उत्तम मिळणार असल्याने वीज उत्पादनातील भारांकात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. सुमारे ६५०० मेगावट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पांसाठी अशाप्रकारची योजना साकारत असल्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. वेकोलिच्या नागपूर जिल्ह्यातील पाच कोळसा खाणींतून एकत्रितरित्या पाईप कन्व्हेयरद्वारे कोराडी व खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करण्याबाबत नामदार पीयूष गोयल केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी स्वत:हून महानिर्मिती मुंबई मुख्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. हा देशातील पहिला व प्रेरणादायी असा प्रकल्प असून अत्याधुनिक पद्धतीने रिमोटच्या साहाय्याने मॉनेटरिंग करण्यात येणार आहे. 
    कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीचे हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत असल्याचा सार्थ अभिमान बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे गुणगौरव करताना ऊर्जावान उर्जामंत्री असे गौरवोद्गार काढले. 
    नागपूर जिल्ह्यातील महानिर्मितीच्या तीन प्रकल्पापैकी, भांडेवाडी येथील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातून १५० दशलक्ष घनलिटर पाणी कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला घेण्यात येणार आहे. यामुळे नागनदीत शून्य निसरा, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषण कमी होण्यास मदतच होणार आहे. आगामी काळात उमरेड येथील प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्पासाठी देखील सांडपाण्याचा वापर करण्यात येणार आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करुन वीज निर्मिती करण्यासोबतच उद्योगांना देखील हे पाणी देण्याचे काम नागपूरमध्ये होत आहे. पाण्याचा पुनर्वापर, या पाण्यापासून महसूल आणि प्रदूषणमुक्तीचे काम करण्यात येणार आहे. कोळसा खाणीतील पाण्याच्या पुनर्वापरामुळे नागपूर जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
    कार्यक्रमाला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महानिर्मिती, वेकोली, महामेट्रो, रेल्वे, आणि महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

    बुधवार, जुलै ११, २०१८

     कोराडी वीज केंद्रात रक्षक स्वयंचलित वृक्षारोपण

    कोराडी वीज केंद्रात रक्षक स्वयंचलित वृक्षारोपण

    नागपूर/प्रतिनिधी:
    महानिर्मितीच्या १९८० मेगावाट कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात यंदा ४३५० झाडे लावण्यात येत असून यामध्ये २२०० बांबू व २१५० सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. नुकतेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी यांच्या शुभहस्ते रक्षक स्वयंचलित वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महानिर्मितीचे सर्व उपस्थित संचालक, कार्यकारी संचालक व मुख्य अभियंते यांनी देखील वृक्षारोपण केले. 
    प्रारंभी रेनबो ग्रीनर्सचे श्री. मनोज टावरी यांनी रक्षक स्वयंचलित वृक्ष संकल्पनेची उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. याप्रसंगी श्री. चंद्रकांत थोटवे संचालक(संचलन), श्री. विकास जयदेव संचालक (प्रकल्प), श्री. संतोष आंबेरकर संचालक(वित्त), कार्यकारी संचालक श्री. विनोद बोंदरे, श्री. कैलाश चिरूटकर, श्री. राजू बुरडे, श्री. प्रदीप शिंगाडे, मुख्य अभियंते श्री. अभय हरणे, श्री. राजकुमार तासकर, श्री. राजेश पाटील, श्री. अनंत देवतारे, श्री. प्रमोद नाफडे, श्री. सुनील आसमवार, श्री. पंकज सपाटे, श्री. डी.सी.पाटील, उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    रक्षक वृक्ष संकल्पना :
    रक्षक संरक्षण व झाडांना पाणी देण्याची स्वयंचलित प्रणालीतून पाणी बचत, शत प्रतिशत झाडे जिवंत राहण्याची संभावना तर जनावरांपासून संरक्षण होते. आठ ते दहा फुट उंचीच्या झाडाला साधारणपणे ६ फुटी आवरण करण्यात आल्याने त्यात सुमारे १५ लिटर पाणी साठवण क्षमता असून झाडालगतच्या दोन फुट परिघात ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पोहचते, त्यामुळे रक्षक झाडांना १५ ते २० दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते. कोणत्याही मौसमात वृक्षारोपण करता येते, यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. रक्षक झाडे हि संकल्पना भारतात प्रथमच नागपुरातील रेनबो ग्रीनर्सचे प्रोप्रायटर श्री. मनोज व श्री. सतीश टावरी यांनी सुरु केली हे विशेष. विदर्भात व अन्य राज्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि उर्जामंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हि संकल्पना अधिक लोकाभिमुख होत असल्याचे श्री. मनोज टावरी यांनी सांगितले.

    सोमवार, जून ११, २०१८

    महाराष्ट्र वीज नियामक आयोग सदस्य इकबाल बोहरी यांची कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास भेट

    महाराष्ट्र वीज नियामक आयोग सदस्य इकबाल बोहरी यांची कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास भेट

    कोराडी/प्रतिनिधी:
    महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे नवनियुक्त सदस्य व कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त प्रधान न्यायाधीश इकबाल बोहरी यांनी नुकतेच महानिर्मितीच्या ३ x ६६० मेगावाट क्षमतेच्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. अवजड संयंत्रे, वीज उत्पादनाची गुंतागुंतीची तांत्रिक पद्धती, विपरीत परिस्थिती, अखंडित वीज उत्पादनासाठी महानिर्मितीच्या मनुष्यबळाची कटीबद्धता याबाबत इकबाल बोहरी यांनी कोराडी वीज केंद्राच्या टीमचे विशेष कौतुक केले. 
    इकबाल बोहरी यांच्या प्रथम नगर आगमनाप्रसंगी मुख्य अभियंता अभय हरणे यांनी त्यांचे रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी महानिर्मितीची चित्रफित बघितली. याप्रसंगी अभय हरणे यांनी संगणकिय सादरीकरणाद्वारे विस्तृत आढावा घेतला त्यात महाराष्ट्रातील वीज उत्पादन क्षेत्र,स्पर्धा,महानिर्मितीची वैविध्यपूर्ण क्षेत्रातील वाटचाल, महावितरण,महापारेषण, राज्य भार प्रेषण केंद्रे कार्य व भुमिका, राज्यातील विजेची मागणी,पुरवठा, एम.ओ.डी.,विद्युत कायदा २००३, वीज नियामक आयोग संबंधित निकषे इत्यादीबाबत इकबाल बोहरी यांनी माहिती जाणून घेतली. 
    विशेष म्हणजे त्यांनी कोराडी वीज केंद्राच्या वॅगन टीपलर,एन.डी.सी.टी.,बॉयलर परिसर,पी.सी.आर., येथे प्रत्यक्ष भेट देऊन तांत्रिक माहिती जाणून घेतली तर जलप्रक्रिया विभाग परिसरात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता राजकुमार तासकर, उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, किशोर उपगन्लावार, अधीक्षक अभियंते तुकाराम हेडाऊ, श्याम राठोड, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ धनंजय मजलीकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतुल गावंडे, सहाय्यक अभियंता प्रवीण बुटे, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी समाधान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

    बुधवार, जून ०६, २०१८

    कोराडी औष्णिक वीज केंद्रात पर्यावरण दिन साजरा

    कोराडी औष्णिक वीज केंद्रात पर्यावरण दिन साजरा

    कोराडी/प्रतिनिधी:
    पर्यावरण हि निरंतर व लोकचळवळ बनावी, प्रत्येक गोष्ट शासनावर न ढकलता, प्रत्येकाच्या योगदानाची गरज आज निर्माण झाली आहे कारण भौतिक व आर्थिक विकासाच्या नादात मानवाकडून सातत्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व हे थांबविणे आपल्या हातात आहे असे मत महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी मांडले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. 
    महाराष्ट्रातील जनता सजग आहे, पर्यावरण संरक्षण प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वापरलेल्या कपड्यांच्या पिशव्या केल्या तर प्लास्टिकला एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पूर्वी गावात स्वागताला झाडे, हिरवाई असायची आता गावाच्या वेशीवर प्लास्टिक स्वागत करताना दिसते, आता कचऱ्यातून संपत्ती निर्माण करावी लागेल असे परखड मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी मांडले. 

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता अभय हरणे तर प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे, पर्यावरण तज्ज्ञ श्रीकांत कानेटकर, मुख्य अभियंते राजकुमार तासकर, सुनील आसमवार, निरीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पद्मा राव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उप मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांनी तपशीलवार अहवाल वाचन केले. याप्रसंगी राजकुमार तासकर, सुनील आसमवार यांची समयोचित भाषणे झाली तर पद्मा राव यांनी हवेचे प्रदूषण व नियंत्रण यावर उत्तम सादरीकरण केले. सर्वसाधारणपणे प्रत्येक माणूस २१६०० वेळा श्वास घेतो. त्यातून त्याच्या फुफ्फुसांमध्ये जवळजवळ १६ ते१७ हजार लिटर हवा वापरली जाते. हवेत २० टक्के प्राणवायू असतो. म्हणजे प्रत्येक माणसाला रोज ३२०० ते ३४०० लिटर प्राणवायू लागतो. जर या प्राणवायूचे वजन केले तर आपण दररोज २.६ ते २.८ किलो प्राणवायू घेतो. आज बाजारात याची व्यापारी किंमत २० ते २१ हजार रुपये आहे. म्हणजे आपल्या दर श्वासाची किंमत एक रुपया आहे! निसर्गाने आपल्याकडून ही किंमत वसूल करायचे ठरविले, तर आपल्या सगळ्यांनाच अवघड होईल असे श्रीकांत कानेटकर म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे म्हणाले कि, वीज उत्पादनाच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे, सोबत पर्यावरणीय मानके अतिशय कडक झाली आहेत या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्राने पर्यावरण रक्षण करण्याची सामाजिक जबाबदारी समजून नैसर्गिक स्त्रोतांचा हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. हि सुंदर सृष्टी निर्माण करण्यात जर आपले योगदान नाही तर हि सृष्टी खराब करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नसल्याचे हरणे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता ढेपे (बहाळे) यांनी तर आभार प्रदर्शन राहुल सोहनी यांनी केले. याप्रसंगी चित्रकला,निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. 
    याप्रसंगी उप मुख्य अभियंते अरुण वाघमारे, किशोर उपगनलावार, गिरीश कुमारवार, अधीक्षक अभियंते राहुल सोहनी, विराज चौधरी, श्याम राठोड, तुकाराम हेडाऊ, भगवंत भगत, जे.बी.पवार, शैलेन्द्र गजरलवार, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेमा देशपांडे, संकेत शिंदे, मुकेश मेश्राम, धनंजय मजलीकर, दिलीप जाधव, मिलिंद धर्माधिकारी, कोराडी वीज केंद्राचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सोमवार, जून ०४, २०१८

    “अनुभूती” या सांगीतिक ऊर्जेसह महानिर्मितीचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    “अनुभूती” या सांगीतिक ऊर्जेसह महानिर्मितीचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    नागपूर/प्रतिनिधी:
    वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा व भविष्यातील आव्हानांना पेलण्याकरिता महानिर्मितीच्या मनुष्यबळाने अद्ययावत ज्ञानासोबत स्मार्टवर्क करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केले. प्रकाशगड मुख्यालय, वांद्रे,मुंबई येथे महानिर्मितीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “अनुभूती” या मराठी-हिंदी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वीज उत्पादनाशी निगडीत असलेले अधिकारी-कर्मचारी तणावमुक्त राहावेत,त्यांच्यामध्ये नवा जोश निर्माण व्हावा यादृष्टीने “अनुभूती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोळसा, पाणी व तंत्रज्ञान यांच्या सुयोग्य नियोजनातून महानिर्मितीच्या मनुष्यबळाने सातत्याने ६५०० मेगावाट वीज उत्पादन केल्याने यावर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील राज्यातील जनतेला भारनियमनमुक्तीचा दिलासा देण्यास मोठा हातभार लावल्याबद्दल चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 
    महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, महावितरणचे संचालक(संचलन) अभिजित देशपांडे, संचालक(प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक(वित्त) जयकुमार श्रीनिवासन इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मराविम सूत्रधारी,महानिर्मिती व महावितरणच्या सर्व संचालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकातून, कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली. वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन सोनाली चुगडे यांनी तर आभार प्रदर्शन महाव्यवस्थापक(मानव संसाधन) आनंद कोंत यांनी केले.
    विनोद बोंदरे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या “अनुभूती” या सांगीतिक कार्यक्रमासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके, योगेंद्र रानडे, इशा रानडे, सारंग जोशी, वादक मंडळींमध्ये नंदू गोहणे(ऑकटोपॅड), राजा राठोड(कि बोर्ड), परिमल जोशी(कि बोर्ड),रॉबिन विलियम(गिटार),प्रशांत नागमोते(तबला) तर श्वेता शेलगावकर यांच्या अर्थपूर्ण बहारदार सूत्रसंचालनाने रसिकांना दर्जेदार “अनुभूती” मिळाली. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे,कुमार शानू, अरुण दाते, लता मंगेशकर,आशा मंगेशकर यांची अजरामर गाणी त्यांच्या हुबेहूब आवाजात सादर केल्याने एकाहून सरस एक जुनी-नवी गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. ज्यामध्ये “मोरया-मोरया”, “जयोस्तुते”, “या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा मंद वारा” सारख्या सुमधुर मराठी गीतानंतर “आओ हुजूर तुमको”, “मेरे सपनो कि रांनी”, “फिर वही रात है”, “आप कि नजरो ने समझा”, “गाता रहे मेरा दिल”, “न जा कहि अब ना जा”, “लाखो है निगाह मे”, “इशारो इशारो” , “कुहू कुहू बोले”, “बेखुदी मे सनम”, “जिंदगी कैसी है पहेली हाये”, “यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी”,”बाबू समझो इशारे”, “तुम मुझे यु भुला ना पाओगे”, “जाईये आप कहा जाएंगे”, “होटो मे ऐसी बात मै”, “तुम दिलकि धडकन हो”, “बचना ए हसीनो”, “प्यार तुम्हे इस मोड पे ले आया”, “लागा चुनरी मे दाग” या भैरवीने “अनुभूती” या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली. 
    विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर,राजू बुरडे,सतीश चवरे,विनोद बोंदरे, नितीन चांदुरकर, प्रदीप शिंगाडे, चंद्रशेखर येरमे तर मुंख्य अभियंते अभय हरणे,राजेश पाटील, जयंत बोबडे, पंकज सपाटे,अनंत देवतारे, सुनील आसमवार, प्रभाकर निखारे, उमाकांत धामणकर, रवींद्र गोहणे, चंद्रशेखर सवाईतुल,धैर्यधर खोब्रागडे, प्रमोद नाफडे, श्यामसुंदर सोनी, संजय मारुडकर, बाबर, मुख्य महाव्यवस्थापक पंकज शर्मा, लाबडे,नितीन वाघ, कंपनी सचिव राहुल दुबे,वरिष्ठ अधिकारी, अभियंते,कर्मचारी,कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी “टीम अनुभूती महाजनकोचे” महत्वाचे योगदान लाभले.