Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८

विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

अनुप सेठ 
आयुर्विमा ही एक अत्यावश्यक बाब असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विम्याच्या एकूण हप्त्यांचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ पावणेतीन टक्के असल्याचे चालू वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींनी विमा घेतलेला असतो त्यातील बहुतांश व्यक्ती या अंडरइन्श्युअर्ड म्हणजे सोप्या भाषेत, अपुऱ्या रकमेचा आयुर्विमा घेतलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी आयुर्विमा घेण्याची प्रक्रिया ही काहीशी प्रदीर्घ व वेळखाऊ होती. मात्र आता अनेक कंपन्यांचे पर्याय असल्याने तसेच, ऑनलाइन विम्याची सुविधा असल्याने आयुर्विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. तरीही संपूर्ण कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणाऱ्या आयुर्विम्याला आजही प्राधान्य दिले जात नाही. एवढेच नव्हे तर आयुर्विम्याविषयी बहुतांश मंडळी गैरसमजूती बाळगतात. मी अतिशय निरोगी आहे, माझ्याकडे बरीच संपत्ती आहे, मला बिलकूल वेळ नाही आदी असंख्य कारणे आयुर्विमा टाळण्यासाठी पुढे केली जातात. ही मानसिकता अतिशय घातक असून त्यात बदल होणे गरजेचे आहे. आयुर्विम्याविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुतींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 

Image result for विमा
केवळ करबचतीचे साधन 

आयुर्विमा हे केवळ करबचतीचे साधन आहे ही फार चुकीची समजूत सर्वत्र दिसून येते. आयुर्विमा खरेदी केल्याने तुम्हाला करबचतीचे लाभ मिळतात यात काही शंका नाही. परंतु हे काही विमा खरेदीचे एकमेव कारण असू शकत नाही. योग्य सल्ल्यानुसार आयुर्विमा घेतल्यास ते केवळ तुमच्या कुटुंबाचे सुरक्षाकवच ठरत नाही, तर अर्थसंकलनाचे साधनही होऊ शकते. गंभीर आजार, अपघात आदी अप्रिय प्रसंगी तुमच्या बचतीला धक्का लागणार नाही याची काळजी आयुर्विमा पॉलिसी घेते. त्यामुळे याकडे केवळ करबचतीच्या दृष्टीने पाहू नये. 

गरज केवळ कर्त्या व्यक्तीला 

आयुर्विम्याची गरज ही केवळ घरातील कर्त्या व्यक्तीला असते हा समजही चुकीचा आहे. घरातील प्रमुख कमावत्या व्यक्तीवर पूर्ण घर अवलंबून असते व त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुर्विमा असणे हे गरजेचेच असते. मात्र गृहिणीदेखील तितकीच महत्त्वाची असते. गृहिणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते. या जबाबदाऱ्यांचे मूल्य किती याचा विचार आता सरकारी स्तरावरही होऊ लागला आहे. त्यामुळे गृहिणीला आयुर्विम्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढणे साफ चुकीचे ठरते. उलटपक्षी, घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा विमा उतरवून त्याच्या सुरक्षाकवचाची खातरजमा करून घेतली पाहिजे. तुमच्या गैरहजेरीत जोडीदारावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. अशा स्थितीत त्यांच्याकरिता एखादा टर्म प्लॅन घेणे हा योग्य निर्णय ठरू शकतो. 

आयुर्विमा महाग आहे 

आयुर्विम्यावर फार मोठी रक्कम खर्च करावी लागते, असे काहींना वाटते. मात्र त्यात तथ्य नाही. योग्य संशोधन आणि योग्य सल्ल्यानुसार, तुम्ही वर्षाला पाच हजार रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांचे विमाकवच मिळवू शकता. आयुर्विमा कमी वयात खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्सचा खर्च आणखी कमी होईल. तरुण ग्राहक हा अधिक सुदृढ असतो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय व जुजबी तपासण्यांच्या आधारे या व्यक्तीला कमी शुल्कात मोठे विमाकवच मिळू शकते. 

प्रकृतीविषयक समस्यांमुळे अपात्रता 

प्रकृतीच्या समस्या असल्यास आयुर्विमा घेता येत नाही असे नाही. परंतु, त्यामुळे तुम्ही भरत असलेल्या पॉलिसी प्रीमियमवर परिणाम होतो. तरीही विमाकवच हे मिळतेच. प्लानमध्ये आधीच नमूद असलेल्या काही गंभीर आजाराचे निदान झाल्यास विमाधारकाला ठरावीक रक्कम मिळते हे नक्की. आपण सर्वजण ज्या धकाधकीचे जीवन जगत आहोत ते पाहता अतिरिक्त खर्च करून आयुर्विमा खरेदी केल्यास ते स्वत:सह कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी चांगलेच ठरते. 

कर्ज नसल्याने विम्याची गरज नाही 

पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज असल्यास त्याने आयुर्विमा घेणे अत्यावश्यकच आहे. परंतु एखाद्या कर्त्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज वा अन्य कोणतेही कर्ज नसले तरी त्यानेही आयुर्विमा घेणे अत्यावश्यक ठरते. जीवनातील अनिश्चिततेचा विचार करता आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विम्याला पर्याय नाही. विमाधारकाच्या बाबतीत दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास विम्याच्या आधारे त्या कुटुंबाचे राहणीमान पूर्वीप्रमाणेच चांगले राहू शकते.
(सदर माहिती महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातून 
घेण्यात आली आहे)
विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

विम्याविषयी आजही अनेक चुकीचे समज

अनुप सेठ 
आयुर्विमा ही एक अत्यावश्यक बाब असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आयुर्विम्याच्या एकूण हप्त्यांचे प्रमाण हे जीडीपीच्या केवळ पावणेतीन टक्के असल्याचे चालू वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ज्या व्यक्तींनी विमा घेतलेला असतो त्यातील बहुतांश व्यक्ती या अंडरइन्श्युअर्ड म्हणजे सोप्या भाषेत, अपुऱ्या रकमेचा आयुर्विमा घेतलेल्या असतात. काही वर्षांपूर्वी आयुर्विमा घेण्याची प्रक्रिया ही काहीशी प्रदीर्घ व वेळखाऊ होती. मात्र आता अनेक कंपन्यांचे पर्याय असल्याने तसेच, ऑनलाइन विम्याची सुविधा असल्याने आयुर्विमा खरेदी करणे सोपे झाले आहे. तरीही संपूर्ण कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणाऱ्या आयुर्विम्याला आजही प्राधान्य दिले जात नाही. एवढेच नव्हे तर आयुर्विम्याविषयी बहुतांश मंडळी गैरसमजूती बाळगतात. मी अतिशय निरोगी आहे, माझ्याकडे बरीच संपत्ती आहे, मला बिलकूल वेळ नाही आदी असंख्य कारणे आयुर्विमा टाळण्यासाठी पुढे केली जातात. ही मानसिकता अतिशय घातक असून त्यात बदल होणे गरजेचे आहे. आयुर्विम्याविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुतींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 

Image result for विमा
केवळ करबचतीचे साधन 

आयुर्विमा हे केवळ करबचतीचे साधन आहे ही फार चुकीची समजूत सर्वत्र दिसून येते. आयुर्विमा खरेदी केल्याने तुम्हाला करबचतीचे लाभ मिळतात यात काही शंका नाही. परंतु हे काही विमा खरेदीचे एकमेव कारण असू शकत नाही. योग्य सल्ल्यानुसार आयुर्विमा घेतल्यास ते केवळ तुमच्या कुटुंबाचे सुरक्षाकवच ठरत नाही, तर अर्थसंकलनाचे साधनही होऊ शकते. गंभीर आजार, अपघात आदी अप्रिय प्रसंगी तुमच्या बचतीला धक्का लागणार नाही याची काळजी आयुर्विमा पॉलिसी घेते. त्यामुळे याकडे केवळ करबचतीच्या दृष्टीने पाहू नये. 

गरज केवळ कर्त्या व्यक्तीला 

आयुर्विम्याची गरज ही केवळ घरातील कर्त्या व्यक्तीला असते हा समजही चुकीचा आहे. घरातील प्रमुख कमावत्या व्यक्तीवर पूर्ण घर अवलंबून असते व त्यामुळे त्या व्यक्तीचा आयुर्विमा असणे हे गरजेचेच असते. मात्र गृहिणीदेखील तितकीच महत्त्वाची असते. गृहिणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते. या जबाबदाऱ्यांचे मूल्य किती याचा विचार आता सरकारी स्तरावरही होऊ लागला आहे. त्यामुळे गृहिणीला आयुर्विम्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढणे साफ चुकीचे ठरते. उलटपक्षी, घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा विमा उतरवून त्याच्या सुरक्षाकवचाची खातरजमा करून घेतली पाहिजे. तुमच्या गैरहजेरीत जोडीदारावर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. अशा स्थितीत त्यांच्याकरिता एखादा टर्म प्लॅन घेणे हा योग्य निर्णय ठरू शकतो. 

आयुर्विमा महाग आहे 

आयुर्विम्यावर फार मोठी रक्कम खर्च करावी लागते, असे काहींना वाटते. मात्र त्यात तथ्य नाही. योग्य संशोधन आणि योग्य सल्ल्यानुसार, तुम्ही वर्षाला पाच हजार रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांचे विमाकवच मिळवू शकता. आयुर्विमा कमी वयात खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्सचा खर्च आणखी कमी होईल. तरुण ग्राहक हा अधिक सुदृढ असतो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय व जुजबी तपासण्यांच्या आधारे या व्यक्तीला कमी शुल्कात मोठे विमाकवच मिळू शकते. 

प्रकृतीविषयक समस्यांमुळे अपात्रता 

प्रकृतीच्या समस्या असल्यास आयुर्विमा घेता येत नाही असे नाही. परंतु, त्यामुळे तुम्ही भरत असलेल्या पॉलिसी प्रीमियमवर परिणाम होतो. तरीही विमाकवच हे मिळतेच. प्लानमध्ये आधीच नमूद असलेल्या काही गंभीर आजाराचे निदान झाल्यास विमाधारकाला ठरावीक रक्कम मिळते हे नक्की. आपण सर्वजण ज्या धकाधकीचे जीवन जगत आहोत ते पाहता अतिरिक्त खर्च करून आयुर्विमा खरेदी केल्यास ते स्वत:सह कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी चांगलेच ठरते. 

कर्ज नसल्याने विम्याची गरज नाही 

पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज असल्यास त्याने आयुर्विमा घेणे अत्यावश्यकच आहे. परंतु एखाद्या कर्त्या व्यक्तीच्या नावे गृहकर्ज वा अन्य कोणतेही कर्ज नसले तरी त्यानेही आयुर्विमा घेणे अत्यावश्यक ठरते. जीवनातील अनिश्चिततेचा विचार करता आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी आयुर्विम्याला पर्याय नाही. विमाधारकाच्या बाबतीत दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास विम्याच्या आधारे त्या कुटुंबाचे राहणीमान पूर्वीप्रमाणेच चांगले राहू शकते.
(सदर माहिती महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातून 
घेण्यात आली आहे)

शनिवार, जून ०९, २०१८

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 24 जुलै अंतीम मुदत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 24 जुलै अंतीम मुदत

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील शेती प्रामुख्याने पर्जन्य आधारीत असून,85 टक्के क्षेत्र कोरडवाहू पीकाखाली आहे.कधी अवर्षण तर कधी अतीवृष्टी,तसेच पावसातील खंड,किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येते.या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम 2018-19 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात निर्णय घेतला असून, या योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2018 व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतीम मुदत 24 जुलै 2018 अशी आहे.
तरी अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे, कुळाने अगर भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजने भाग घेण्यास पात्र आहेत. चंद्रपूर जिल्हयातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता आयसी आयसी आय लोंबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीची शासनामार्फत नेमणूक करण्यात आली आहे.या योजनेअतंर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयांची विमा हप्ता रक्कम तपशील खालील प्रमाणे आहे.
पिकाचे नाव भात (तांदूळ) विमा संरक्षित एकूण 4000, शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 800 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (ज्वारी) विमा संरक्षित एकूण 24000 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 480 रुपये /प्रति हेक्टर पिकाचे नाव (सोयाबीन) विमा संरक्षित एकूण 42000/- शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 840 प्रती हेक्टर. पिकाचे नाव (मूग) विमा संरक्षित एकूण 18900 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता – 378 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (उडीद) विमा संरक्षित एकूण 18900 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 378 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (तुर) विमा संरक्षित एकूण 31500 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 630 रुपये प्रती हेक्टर. पिकाचे नाव (कापूस) विमा संरक्षित एकूण 42000 शेतकऱ्यांनी भरावयाची हप्ता 2100 रुपये प्रती हेक्टर या प्रमाणे भरणा करावयाची आहे.
विमा संरक्षणी बाबी:- पीक पेरणी पासून काढणी पर्यतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट.पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गीक आपती, खरीप हंगाम 2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बॅकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेले बॅक खाते पुस्तकांची प्रत,तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत खालीलपैकी कोणतेही एक फोटो असलेला ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडिटकार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बॅकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बॅकेशी संपर्क करावा अर्ज भरण्यासाठी बॅकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अर्ज भरण्यांसा सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामपासून शेतकऱ्यांचे अर्ज व विमा हप्ता COMMON Service Centre( सीएससी) मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.याकरीता जिल्हयात सी.एस.सी.ई.गव्हेनंस सर्व्हीसेस इंडीया लिमीटेड द्वारे कार्यान्वीत आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरण्यास मदत करतील व विमा हप्ता स्विकारतील याकरीता प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राचे चालक विमा योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरतील.विमा प्रस्ताव करीता आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12 उतारा,आधारकार्ड,बॅकखात्याचा तपशील इत्यादी अर्जास ऑनलाईन पध्दतीने जोडतील.शेतकऱ्यांना विमा अर्जाची प्रत व पोहोच उपलब्ध करुन देतील.
राज्य शासनामार्फत राज्यात महावेध प्रकल्पातर्गत चंद्रपूर जिल्हयात 50 स्वयंचलीत हवामान केंद्रा द्वारे प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीचा मुख्यत: पीक विमा योजना तसेच शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी कृषी व हवामान संशोधनासाठी,आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि अन्य क्षेत्रामध्ये उपयोग होणार आहे.महावेध प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान,पर्जन्यमान,सापेक्ष आर्द्रता,वाऱ्याचा वेग व दिशा या हवामान विषयक घटकांची (रिअल टाईम)माहितीची नोंद दर 10 मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी पीक विमा सरंक्षण मिळणेस्तव : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी 31 जुलै 2018 व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 24 जुलै 2018 या पुर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे,आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी, कार्यालयाने केले आहे.