Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, मे ३०, २०२१
गुरुवार, मे ०६, २०२१
वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी
वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनालासुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी
वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे कोविड उपचारासाठी वापरल्या जाणा-या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला आजपासून सुरुवात झाली असून आपण स्व:त या प्रक्रीयेची पाहणी केली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा येथे दिली. वर्धा जिल्ह्याच्या एम.आय.डी.सी. भागात जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते .यावेळी वर्धाचे खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
हैदराबाद स्थित हेटरो कंपनीने सदर इंजेक्शन निर्मितीसाठी असणारी परवानगी ही वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सला दिली असून यामध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे सहकार्य मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. अशी परवानगी मिळणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे . या लाइफ सायन्स कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर यांनी कमी वेळात आवश्यक असणारी सामग्री तसेच इतर यंत्रणा विकसित केली. कंपनीद्वारे दर दिवसाला 30 हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता विकसित करण्यात येणार असून सर्व चाचणी यशस्वी झाल्यानंतर आजपासून इंजेक्शन उत्पादन सुरू झाले आहे.रेमेडसवीर इंजेक्शनचे 1 लाख व्हायल्स रविवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत. या इंजेक्शनचे विदर्भात वितरण संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत होईल नंतर राज्यातही त्याचा पुरवठा करण्यात येईल . वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राथमिकता मिळेल असेही गडकरी यांनी नमुद केले.
या प्रकल्पामुळे विदर्भातील करोना रुग़्णांना लाभ मिळणार आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयाला तसेच सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयाला प्रत्येकी 10 वेंटिलेटर देण्यात आले आहेत. वर्ध्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सेवाग्राम येथे 20 टन तर विनोबा भावे रुग्णालय येथे 20 टन ऑक्सिजन संग्रहाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे असेही गडकरी यांनी यावेळी सांगितल.
मंगळवार, मे ०४, २०२१
डॉ. अभय बंग यांच्या आईचे कोरोनाने निधन
मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०२१
सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल
निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· वर्धा जिल्ह्याची अतिरिक्त निधी मागणीचा विचार मुंबईच्या बैठकीत करणार
· जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री सुनील केदारांकडून 272 कोटींची अतिरिक्त मागणी
वर्धा, दि. 8 : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत मंजूर असलेला तसेच आराखड्यातील लोकार्पण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कामे पूर्ण करण्यासाठी घोषित केलेला निधी देण्यासोबतच महिला बचत गटामार्फत राज्यातील पहिल्याच सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पास गती देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली, यावेळी वर्धा जिल्ह्याच्या बैठकित श्री पवार बोलत होते.
या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त संजीव कुमार , जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना 2021- 22 सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्याच्या विकासा साठी प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारती, वर्गखोल्या, धोकादायक इलेक्ट्रिक पोल, पूर संरक्षण भिंत, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी शेड, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस व आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा, अपारंपारिक ऊर्जा विकास इत्यादी बाबींसाठी 272 कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी श्री पवार म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत संपूर्ण कामासाठी मंजूर केलेला निधी देण्यात येईल तसेच या आराखड्यांतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून निधी उभारावा. निधी उभारणे शक्य झाले नाही तर जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामासाठी निधी देण्याचा विचार करण्यात येईल.
वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटांकडून सोलर पॅनल निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागासवर्गीय महिला बचत गटाकडून निर्मित होणारा देशातील अशा प्रकारचा दुसरा व राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे सोलर पॅनलची गुणवत्ता अपारंपारिक ऊर्जा विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा अहवाल सादर करावा. सदर बचत गटामार्फत निर्मित सोलर पॅनलची गुणवत्ता उत्तम असल्यास राज्यातील अपारंपारिक ऊर्जा निर्मिती साठी आवश्यक असलेले सोलर पॅनल महिलांच्या या कंपनीकडून खरेदी करू अशी ग्वाही देत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील तेजस्वी सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पाला गती देण्याची बाब अधोरेखित केली.
यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून त्यांचे अनुदान निधीअभावी प्रलंबित आहे. सदर अनुदानासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जलयुक्त शिवार योजने मधून यशोदा नदी पुनरुज्जीन करण्यासाठी कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे काम केले आहे. त्यातील राज्य शासनाचा प्रलंबित हिस्सा अकरा कोटी रुपये मिळावा, तसेच समृद्धी महामार्गाचे कामाकरता लागणारे गौण खनिजाचे स्वामित्व धनाचे 10% रक्कम जिल्हा खनिज निधी अंतर्गत जिल्ह्याला मिळायला हवी, सदर रक्कम जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने रस्ते विकास महामंडळाशी चर्चा करावी अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत श्री मोपलवार यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे श्री पवार यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याच्या आराखड्यावर मुंबईत होणार निर्णय
गडचिरोलीला 275 गोंदीयाला 165 तर भंडारा जिल्हयाला 150 कोटीचा निधी
· राज्यस्तरीय नियोजन समितीची आढावा बैठक
· उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या जिल्हाला 50 कोटी अतिरिक्त
· कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर खर्च, आराखडयाला मर्यादा
नागपूर, दि. 8 : जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नागपूर विभागातील गडचिरोली, गोंदीया व भंडारा जिल्ह्याला अनुक्रमे २७५, १६५ व १५० कोटी निधीची मंजुरी देण्यात आली. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या अंतीम निधी वाटपाबाबतचा निर्णय मुंबई येथे होणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक आज 8 फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व सर्व विभाग प्रमुख जिल्हानिहाय बैठकीला उपस्थित होते.
नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन 2021-22 चा प्रारुप आराखड्यास संबंधित जिल्हा नियोजन समितीची, शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेतली होती. जिल्ह्यांची गरज विचारात घेता काही योजनांसाठी जिल्ह्यांकडून अतिरिक्त निधीची मागणी नोंदविण्यात आलेली होती. आज त्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
दुपारी चार वाजता सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्याच्या आराखड्यावर चर्चा झाली. जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 187.05 कोटी तर जिल्ह्यांची अतिरिक्त मागणी 320.68 कोटी होती. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी आमदार कृष्णा गजबे, आमदार देवराव होळी, आमदार धर्मराव आत्राम,आमदार अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद उपस्थित होते. चर्चेअंती जिल्हाला निर्धारित आर्थिक मर्यादा १८७.०५ कोटी रुपयांमध्ये अतिरिक्त 88 कोटी मंजूर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यासाठी आर्थिक मर्यादा 149.64 कोटी असून आकांक्षित जिल्ह्यासाठी म्हणून अतिरिक्त 25 टक्के प्रमाणे 37.41 कोटी अनुज्ञेय असून समाविष्ट आहे.
गोंदिया जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 108.39 कोटी रुपये होती तर जिल्हामार्फत अतिरिक्त 140.41 कोटीची मागणी करण्यात आली होती. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुळे आजारी असल्याने अनुपस्थित होते.त्यांच्या अनुपस्थितीत आमदार डॉ.पारिणय फुके, अभिजित वंजारी, विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले यांनी चर्चा केली. मूळ मागणीमध्ये ५७ कोटीची भर घालत एकूण १६५ कोटीच्या आरखड्यास मंजूरी देण्यात आली.
भंडारा जिल्हयासाठी शासन आणि ठरवलेली मर्यादा 94.18 कोटी होती. तर अतिरिक्त मागणी एकूण 210.87 कोटीची होती. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार डॉ.परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनय मून उपस्थित होते. चर्चेअंती जिल्ह्याच्या आराखड्यात 56 कोटीची भर घालत एकूण दीडशे कोटींच्या जिल्ह्याच्या आराखड्यास आज मंजुरी देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 180.95 कोटी होती. तर अतिरिक्त मागणी 321.64 कोटी रूपयांची होती. बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. नागपूर नंतर सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या जिल्ह्यात संदर्भात मुंबई येथे निर्णय घेतला जाणार आहे.
वर्धा जिल्हयासाठी शासनाने कळविलेली आर्थिक मर्यादा 110.76 कोटी आहे.अतिरिक्त मागणी 162.07 कोटीची होती. या जिल्ह्यात संदर्भातील सेवाग्राम विकास आराखडा व राज्यातील महिला बचत गटामार्फत निर्मित होणाऱ्या पहिल्या सोलर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे उपस्थित होते.
नागपूर जिल्हयासाठी 241.86 कोटीची शासनाने आर्थिक मर्यादा कळविली होती. तर जिल्ह्याची अतिरिक्त मागणी 373.72 कोटीची होती. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत महत्त्वाच्या बैठकीमुळे अनुपस्थित होते त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या आराखड्यावर देखील मुंबईत निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीला यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, आमदार ॲड. आशिष जायस्वाल, अभिजित वंजारी, राजीव पारवे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, महानगर पालिकेचे अतिरिक्त सजल शर्मा, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूर विभागातील सहा जिल्हयाची आर्थिक मर्यादा 923.19 कोटी ठरवण्यात आली आहे. विभागासाठी अतिरिक्त मागणी 1388.98 कोटी रूपयांची आहे. यावर्षी विभागात सर्व शासकीय नियमाचे पालन करुन आर्थिक आराखडयाची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हयाला अतिरिक्त 50 कोटी रुपये दिले जाणार आहे.
बुधवार, फेब्रुवारी ०३, २०२१
गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी
उत्तम गलवा कंपनीत गरम राख अंगावर उडल्यामुळे 38 कामगार जखमी
* सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
* जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट
वर्धा दि 3 (जिमाका):- वर्धा तालुक्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये आज सकाळी सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास एक अपघात झाला. स्टील प्लँट वार्षिक देखभालीसाठी काल सायंकाळी बंद करण्यात आला होता. सकाळी 5.30 वाजता फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी 50 कामगार काम करीत होते. फरनेस मधील राख काढत असताना गरम हवे सोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे 38 लोक जखमी झालेत. यातील 28 व्यक्तींना सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 10 व्यक्तींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुणाचाही मृत्यू नाही. तसेच 40 टक्के भाजल्याच्या गंभीर जखमा असलेल्या 6 व्यक्तींना अति दक्षता केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची विचारपूस करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला.
मंगळवार, जानेवारी २६, २०२१
मुलगी चालवित होती कार; भीषण अपघातात तीन ठार
वर्धा : मंगळवारी पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक mh-40 BE8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडी चकनाचूर झाली. या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.