Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नाट्य समिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाट्य समिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी १४, २०१८

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
 महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन राणी लक्षमीनगर नागपूर येथील सायंटीफ़ीक सोसायटी सभागृह येथे सोमवार दि. 15 जानेवारी 2018 पासून करण्यात येत आहे.
या स्पर्धेउद्घाटन सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी सकाळी 9 वाजता महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे आणि प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, चंद्रपूर परिमंडळाचे परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर व मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. या स्पर्धेत सोमवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता अमरावती परिमंडलातर्फ़े प्रशांत शेंबेकर लिखित ‘काही सावल्यांचे खेळ’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल, दुपारी 2.30 वाजता जयंत पवार लिखित ‘अधांतर’ हा नाट्यप्रयोग चंद्रपूर परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल, तर सायंकाळी 7 वाजता चंद्रकांत शिंदे लिखित ‘एक क्षण आयुष्याचा’ हा नाट्यप्रयोग अकोला परिमंडलातर्फ़े सादर करण्यात येईल. मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नागपूर परिमंडलातर्फ़े देवेंद्र वेलणकर लिखित ‘ते दोन दिवस’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी 4 वाजता श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा” चा नाट्यप्रयोग गोंदिया परिमंडलातर्फ़े सादर केला जाईल.

महावितरण कर्मचारी हा ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ग्राहक सेवेचे कर्तव्य अहोरात्र बजावत असतो, अश्यावेळी तो अनेकदा आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो, कर्मचारी सुदृढ असला की ग्राहकसेवा अधिक प्रभावी होईल याची जाणिव लक्षात घेता महावितरणने त्यांच्यासाठी या नाट्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभापुर्वी दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. प्रशांत जगताप आणि मानसोपचारतज्ञ डॉ. प्रवीण वराडकर यांचे ‘हृदयरोग आणि तणाव व्यवस्थपन’ या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजनही केले असून सोबतच विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्ताने वीज कर्मचारी आणि सामान्य वीज ग्राहकांचे प्रबोधन करणा-या ध्वनिचित्रफ़ीतीचे सादरीकरण यावेळी करण्यात येईल. त्यानंतर लगेच महावितरणचे संचालक (संचलन) अभिजीत देशपांडे यांच्या शुभहस्ते आणि जेष्ठ नाटककार व महाकवी सुधाकर गायधनी, प्रादेशिक संचालक भालचंद्र खंदाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान केली जातील.

या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य असून नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धा आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

‘‘ रंगबावरी’’ ने भरले स्पर्धेत रंग, सर्वांग सुुंदर सादरीकरण

‘‘ रंगबावरी’’ ने भरले स्पर्धेत रंग, सर्वांग सुुंदर सादरीकरण


चंद्रपूर- दि. 22 नोव्हेंबर 2017 रोजी नवोदिता चंद्रपूर या संस्थेने श्रीपाद प्रभाकर जोषी लिखित रंगबावरी या नाटकाचा प्रयोग सादर केला. रंगबावरीच्या सर्वांगसुंदर सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली व स्पर्धेत रंग भरले. रंगबावरी ही दिवाकर वैद्य या हौषी रंगभुमीवरील एका रंगकर्मीची कहाणी आहे. अनेक वर्शापासून राज्य नाटय स्पर्धेत आपल्या नटराज ग्रुपतर्फे सातत्याने सहभाग नांेदविणारे दिवाकर वैद्य नाटकाषी समर्पित आहे. आपली मुलगी नेहासाठी ते व्यावसायिक रंगभूमीचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी तिच्या लहानपणापासून ते तिच्यावर मेहनत घेत आहेत. कलावंतांचे बेहिषेबीपण त्यांच्यातही रुजलेलं आहे. त्यांचा संसार ठिकठाक असला तरी समृध्द नाही. भविश्याची काळजी कर असं सूचन त्यांची पत्नी मेघना त्यांना करीतही असते. नेहासुध्दा वडीलांच्या स्वप्नाला प्रतिसाद देवून व्यावसायिक रंगभूमीचे स्वप्न जोपासत आहे. यावर्शी त्यांच नाटक राज्य नाटय स्पर्धेत प्राथमिक फेरीला पहिलं आलं आहे. त्यात नेहाला रौप्यपदक मिळालं आहे. दिवाकरभाऊंनी नेहासाठी खास भूमीका लिहून घेतली आहे. अंतिम फेरीसाठी त्यांची तयारी जोराहने सुरु आहे. एकेदिवषी तालीम सुरु असताना सगळयांसाठी समोसे आणायला गेलेल्या दिवाकरचा अपघात होतो आणि हाॅस्पीटल मध्ये काही दिवस संघर्श केल्यावर त्यांचा मृत्यु होतो. या काळात अपुÚया पैषांमुळे आपण आपल्या वडीलांना वाचवण्यात कमी पडलो या जाणीवेनं नेहाचं भावविष्व बदलते आणि ती नाटकात कधीही काम करणार नाही अषी भूमीका घेते. नेहाचं नाटक नाकारणं, दिवाकरचा वारसा चालू ठेवण्यासाठी मेघनाची धडपड आणि निर्धार आणि नेहाचं अखेरीस पुन्हा आपल्या भूमीकेत आगमन हा या नाटकाच्या संघर्शाचा भाग आहे. या नाटकात होणारी नाटकाची तालीम हा अतिषय रंजक भाग असून त्याने प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतलानाटकाची प्रकाष योजना लक्षवेधी होती तर त्याला संगीताची अनुरुप जोड लाभली. एका रंगकर्मीचा घराचा तालीम हाॅल, नेहाची अभ्यासाची खोली या बाबी नेपथ्यकाराने सुरेख खुलविल्या. दिग्दर्षक डाॅ. जयश्री कापसे गावंडे यांनी आपल्या दिग्दर्षकीय कौषल्याने प्रत्येक प्रसंग जिवंत उभा केला. तालमीदरम्यान प्रकाष योजनाकार व संगीत नियोजक ही दोन पात्रे त्यांनी मंचाच्या समोरील भागात बसवून जो अचूक परिणाम साधला तो निष्चितच कौतुकास्पद आहे. नाटकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कलावंतांचा अभिनय. नाटकातील प्रमुख पात्र असलेली नेहा बकूळ धवने हिने प्रभावीपणे साकारली. आपल्या प्रगल्भ अभिनयाने तिने प्रसंगी पे्रक्षकांच्या डोळयात पाणी आणले. श्रीपाद जोषी, नूतन धवने, जयंत वंजारी, चैताली बोरकुटे, जयेष देषमुख, सुरज रंगारी, सर्वेष जुमडे, अक्षय नल्लुरवार या कलावंतांनी प्रभावी अभिनय करत नाटकाला उंची बहाल केली. लेखक श्रीपाद जोषी यांनी या नाटकाच्या माध्यमातून हौषी रंगभूमीचे महत्व अधोरेखीत करत त्यामाध्यमातून रंगकर्मींना दिलेला संदेष व रसिक मनाचा घेतलेला वेध अतिषय महत्वपूर्ण आहे. एकूणच नवोदिताचे रंगबावरीचे सादरीकरण स्पर्धेत रंग भरत वेगळी उंची गाठलीरंगबावरी या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद ही आणखी एक उल्लेखनिय बाब. या नाटकाला लाभलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व झालेली तिकीट विक्री राज्यभरातील तिकीट विक्रीचे उच्चांक मोडले. निकालाअंती
रंगबावरी बक्षिसांच्या मालिकेत किती रंग भरेल हे वेळच ठरवेल.

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

कार्पोरेट जगतामधील वास्तवावर भाष्य करणारे ‘चाहुल’

कार्पोरेट जगतामधील वास्तवावर भाष्य करणारे ‘चाहुल’


चंद्रपूर- कलारसिक यवतमाळ या संस्थेने मंगळवारी प्रशांत दळवी लिखीत ‘चाहुल’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. दोन पात्रांनी अभिनय करत प्रवास करणा-या चाहुलने प्रेक्शकांच्या मनाचा अपेक्षीत वेध घेतला नाही हे मात्र खरेकार्पोरेट जगतामध्ये प्रमोशनसाठी कोणत्याही पातळीवर तडजोड करत स्पर्धेला सामोरे जाण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती प्रशांत दळवी यांना लेखनातुन प्रभावीपणे मांडली आहे. मकरंद आणि माधवी ही पात्रे मात्र या दोन पात्रांचा मानसिक संघर्श दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न सतिश पवार यांनी केला. नेपथ्य, संगीत व प्रकाशयोजना यांच्या माध्यमातुन अनेक प्रसंग दिग्दर्शनाला उठावदार करता आले असते मात्र या बाजु अतिशय सुमार होत्यामकरंदच्या  भूमिकेत सतिश पवार तर माधवीच्या भूमिकेत शितल राऊत हे कलावंत होते. सतिश पवार अभिनयात कमी पडले तर शीतल राऊत यांना भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि बहुतांशी तो त्यांनी चांगल्या प्रकारे निभवीला नाटकाची काठिण्यपातळी अतिशय जास्त असल्याने नव्या कलाकरांना ते स्वतःला पूर्ण झोकून लागले . ‘चाहूल’ सारखी यशवंत संहिता हाताळताना दिग्दर्शकाची झालेली दमछाक क्षणोक्षणी दिसत होती. शीतल राऊत यांच्याकडे चांगला अनुभव असल्याने त्यांनी आपल्या पात्राला अतिशय चांगले प्रेक्षकांसमोर मांडले. 

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

‘‘ रंग्या रंगीला रे’’ स्पर्धेतील पाचवे पुश्प ‘‘हाऊस फुल’’

‘‘ रंग्या रंगीला रे’’ स्पर्धेतील पाचवे पुश्प ‘‘हाऊस फुल’’

चंद्रपूर - 57 वी महाराश्ट्र राज्य हौषी नाट्य मराठी नाटय स्पर्धा चंद्रपूर केंद्रात दि. 18 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 7.00 वा. श्री. योगेष सोमण लिखित व श्री. सुधाकर पाटील दिग्दर्षित ‘रंग्या रंगीला रे’ हे नाटक
सादर झाले. सादरकर्ती संस्था कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपूरने स्पर्धेतील पाचवे पुश्प सादर झाले आणि
स्पर्धेतील पहिले हाऊस फुल नाटक ठरले. रसिक प्रेक्षक उभे राहुन व मधल्या रांगांमध्ये बसून नाटकाचा
आस्वाद घेत होते. हे बघता प्रेक्षकांच्या पसंतीस ‘रंग्या रंगीला रे’ उतरले असे म्हणता येईल.


थोडक्यात कथानक असे आहे की, रंग्या हा बंगल्यावर फुकट राहात असतो. त्या बंगल्याचे मालक
परदेषात राहात असतो आणि हा त्या बंगल्यात चोरुन राहात असतो. त्याचं सिमा नावाच्या मुलीवर प्रेम
असते आणि ती स्वतःचे घर सोडून बंगल्यावर येते आणि रंग्याची डोके दुखी वाढते आणि त्याच दिवषी
तिथे मालकाचे कामा-काकु येतात. तिथुन नाटकाची सुरवात होते. एक प्रकरण संपत नाही तर रंग्याची
पे्रयसी सिमा ही प्रकाष व त्याच्या बायकोला पैसे घेवून त्यांना राहायला बंगल्यावर बोलावते. या एकाच
वेळी आलेल्या तिन्ही संकटाला पार करण्यासाठी रंग्याची तारंबळ उडते. ऐकीकडे प्रेयसी तर दुसरीकडे
बंगल्याचा मालकाचे काका - काकु, व किराया देवून आलेले प्रकाष आणि बायको आणि मध्ये बिचारा
रंग्या हा या नाटकाचा मुळ गाभा आहे.
गाजलेले नाटक स्पर्धेमध्ये सादर करणे हे आवाहन चंद्रपूरच्या कामगार मनोरंजन केंद्र या संस्थेने स्विकारले आणि पडदा उघडताच दिगांबर इंगळे यांनी उभारलेलं नेपथ्य व्यवसायीक नाटकापेक्षाही
उत्तमपणे उभारले होते ही यषाची बाब होती. पण कलाकारांनी अभिनयाच्या बाजुने ते षिवधनुश्य
उचलण्याचा प्रयत्न केला. गमतीदार प्रसंगामुळे प्रेक्षकांच्या हष्या मिळवत पसंतीसही उतरलेले दिसलेनेपथ्य,
प्रकाष योजना, संगीताने नाटक बहारदार बनले. फाॅर्सिकल अंगाने जाणाने नाटक
श्री. सुधाकर पाटील, दिग्दर्षक यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांची गर्दी बघता नाटकाचा प्रयोग
चांगला झाला आणि प्रेक्षकांना आवडला असचं म्हणावं लागेल. हाऊस फुलचा बोर्ड ‘रंग्या रंगीला रे’
या नाटकाला निकालाअंती किती बक्षिसांची गर्दी जमवू षकेल ही वेळच ठरवेल

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

‘‘ ज्याचा शेवट गोड’’

‘‘ ज्याचा शेवट गोड’’


चंद्रपूर- 57 वी महाराश्ट्र राज्य हौषी मराठी नाटय स्पर्धा चंद्रपूर केंद्रात दि. 16 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 7.00 वा. श्री. रत्नाकर मतकरी लिखित व श्री. राजाभाऊ भगत दिग्दर्षित ‘ज्याचा षेवट गोड’ हे नाटक सादर झाले. सादरकर्ती संस्था सहयोगी कलावंत पंचमवेद बहुउद्देषिय संस्था, यवतमाळने स्पर्धेतील चैथे पुश्प सादर झाले.
थोडक्यात कथानक असे आहे की, या नाटकामध्ये एकच कथानक नाही. प्रथम अंकामध्ये चार तर दुसÚया अंकामध्ये चार असे एकुण आठ कथानक आहे. जीवन आणि मरण ही जीवनाचे दोन महत्वपूर्ण
बिंदु. नाटकाची सुरुवात ‘मरण’ च्या संवादाने होते.
या नाटकात काॅमेडी ते ट्रॅजेडी असा विशय मांडला. या नाटकात एकच विशय षेवटपर्यंत हाताळण्यापेक्षा वेगवेगळया व्यक्तींची कल्पना भिन्न भिन्न अर्थात
व्यक्ती नमूने सादर करण्याचा आणि एकाच व्यक्तीचा सादरीकरणामध्ये विविधता आणण्याचा आगळा
वेगळा प्रयत्न केला आहे. हे नाटक सादर करणं दिग्दर्षकासाठी आव्हाणात्मक आहे आणि कलावंतालाही
आपली ताकद पणाला लावावी लागते पण संपूर्ण नाटकावर दिग्दर्षक आणि कलावंत पूर्ण न्याय देवू
षकले नाही. हे जरी खरं असलं तरी चांगल सादरीकरण करण्याचा प्रयत्न निष्चितच केला गेला आहेतांत्रि
क बाजूची कमतरता नाटकात जाणवत होती. पण नाटकाला पूरेसा साथ देण्याचा प्रयत्न नेपथ्य,
प्रकाष योजना व संगीत यांनी केला आहे.स्पर्धेच्या निकालाच्या वेळी पंचमवेद बहुउद्देषिय संस्था, यवतमाळ या संस्थेला पारितोशिक मिळून त्यांचा षेवट गोड होते का ही वेळच ठरवेल.