Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जिल्हा परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिल्हा परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

गावाला पायाभूत सुविधांसाठी निधी : सरपंच करणार नियोजन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील पंधराशेच्यावर गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सरपंचांच्या भरगच्च मेळाव्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज केले. 
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आज झालेल्या जिल्हाभरातील सरपंचांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत गावागावांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती उपस्थित सरपंचांना दिली. लक्षावधीचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणार आहे. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दिपक सातपूते, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या गावाच्या समस्या मांडल्या. याशिवाय काही प्रलंबित विषयावरही यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. 
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फत क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ही योजना आखली आहे. ही योजना बाधीत क्षेत्रातील (खाणीमुळे बाधीत झालेली गावे) सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसंख्या व बाधित क्षेत्र, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबवताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थिती वरील आघात कमी करणे, क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घमुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठी या निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी या योजनेअंतर्गत चंद्रपूरला मिळाला आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी या योजनेत प्रत्येक गावाला लक्षावधी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. या रुपयांचा विनियोग योग्य कामांसाठी झाला पाहिजे, असे आवाहन उपस्थित सरपंचांना केले. यावेळी त्यांनी खर्च करण्यासाठी सर्वाधिक प्राथमिकता त्या गावातील शुद्ध पेयजलासाठी प्रत्येक गावाने स्वतःच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण करताना एटीएम आरो मशीन लावावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय सर्व बाधित गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा शुद्ध पेयजल पुरवणाऱ्या आरो मशीनचे एटीएम लावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा यालाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक गावाच्या शेजारील नाल्याला खोलीकरण करण्यासाठीही या निधीचा खर्च करण्यात यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक सरपंचाने ग्रामस्थांना गावाच्या विकासाचा कृती आराखडा सादर करावा व यामध्ये प्राथमिकता पेयजल व शाश्वत ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्याला देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कुठले काम घेतले जाऊ शकते. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.जी.डी.कांमडे यांनी केले. यावेळी सरपंचांनी केंदीय गृहराज्य मंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली
प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर

प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर

चंद्रपूर जिल्ह्यातील स्वच्छता अभियानासाठी तयार
 राहण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छता अभियानांतर्गत गुणांकन ठरविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 1 ते 31 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचाने यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आव्हान केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज येथे केले. 
चंद्रपूर येथे नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत कार्यक्रमांमध्ये उपस्थित सरपंचांना या संदर्भातील माहिती त्यांनी दिली. देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला असून ऑगस्ट महिन्यात यासंदर्भातील यंत्रणा कधीही आपल्या गावामध्ये येऊ शकते. त्यामुळे गावातील सार्वजनिक स्थळे, शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे या सर्व ठिकाणची स्वच्छता पुढील काळात अद्यावत राहील यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर 50 लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व ऑनलाईन सहभाग नोंदवून घेतला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या निरीक्षणाचा देखील यामध्ये समावेश आहे. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छ आग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा आणि शिक्षक यांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. या प्रतिक्रिया देताना गावातील स्वच्छता अभियानातील लक्षणीय उपलब्धी, संबंधित सर्वेक्षण करणाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गावातील प्रतीष्ठीतांकडूनही ही समिती प्रतिक्रिया घेणार आहे. गाव स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण संस्थेच्या प्रतिनिधी सोबतही बैठकी करणार आहेत. केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाईलवरील ॲपद्वारे नोंदवलेल्या प्रतिक्रिया सुद्धा याबाबत विचारात घेतल्या जाणार आहेत. वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता व वापर, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर करण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छतेबाबत गावातील प्रत्येकाला असणारी माहिती, त्यादृष्टीने त्यांचे असणारे वर्तन, या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावात योग्य प्रकारे सूचना देण्याबाबतही या बैठकीत सरपंचांना सांगण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक गुण स्वच्छताविषयक सद्यस्थितीला देण्यात आले असून यासाठी 35 गुण ठेवण्यात आले आहे. तर चर्चेद्वारे व ऑनलाईनद्वारे नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी 35 गुण ठेवण्यात आले आहेत. यासोबतच सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेसाठी 30 गुण ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पाहणी चमूला योग्य प्रतिसाद द्यावा व त्या पद्धतीने गावागावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असे आवाहनही ना.अहिर यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील सरपंचांनी यासंदर्भात ग्राम सचिवांना देण्यात आलेल्या सूचना नुसार गावांमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना होत आहेत अथवा नाही याबाबत तपासणी करावी. गावामध्ये स्थानिक स्तरावर या उपक्रमाबाबत जनजागृती होईल यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी कोणत्या प्रकारासाठी किती गुण आहेत व कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलचे सादरीकरण केले.

गुरुवार, जुलै ०५, २०१८

जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

विद्यार्थ्यांना दिले वृक्षरोपण व संवर्धनाचे धडे;वृक्ष माझा सांगाती एक अभिनव उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
लहान मुल ही देवा घरची फुले असे म्हणतात. शाळेतील बालगोपाळांवर सुध्दा शालेय जीवनापासून वृक्षाचे महत्त्व पटवून दिल्यास उद्याची वृक्षसंवर्धन करणारी संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वच्छता व वृक्षदिंडीसह जिवती तालुक्यात भ्रमंती करतांना, जिवती तालुक्यातील चिखली या गावातील शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज करून वृक्षाचे आपल्या जिवनात काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात आले. 
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण मोहिमेत शाश्वत सहभाग वाढावा व खऱ्या अर्थाने वृक्षाची जोपासणा व्हावी यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून ̎̎वृक्ष माझा सांगाती ̎̎ हा अभिनव उपक्रम राबवित असून, या उपक्रमाद्वारा शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून एक वृक्ष चार वर्षाकरीता दत्तक म्हणून जबाबदारी दिल्या जाणार आहे. यासह प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा वृक्षाचे निरीक्षण करून, वृक्षाची होणारी वाढ या विषयाच्या नोंदी चार वर्षाच्या रिपोर्ट कार्ड मध्ये नोंदवायच्या आहे. या विशेष उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कार्यानूभव या विषयात पाच गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. 
भावी पिढीला पर्यावरण पुरक वातावरण निर्माण करण्याकरीता आजचा शालेय विद्यार्थी वृक्षसंवर्धन मोहिमेतील महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या जन्मापासून तर जिवनाच्या शेवटच्या घटकापर्यंत वृक्ष कसा साथ देतो या विषयी विविध उदाहरणांचे दाखले देत अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्हयात स्वच्छता व वृक्षलागवडीच्या वातावरण निर्मीती करीता जिल्हा परिषद अध्यक्ष गावा-गावात जावून विविधांगी मार्गाने ग्रामस्थानांना वृक्षलागवडी विषयीची विनंती करीत आहेत. जिवती तालुक्यात दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी स्वच्छता व वृक्षदिंडीसह महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. अर्चना जिवताडे, जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकाने, सुरेश केंद्रे, पोंभूर्णा पंचायत समितीचे सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

भावी पिढी सक्षम करण्यासाठी ग्राम नियमित स्वच्छ राखा - जितेंद्र पापळकर

भावी पिढी सक्षम करण्यासाठी ग्राम नियमित स्वच्छ राखा - जितेंद्र पापळकर


चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 23/11/2017 सावली तालुक्यातील निमगाव येथे नुकतीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत  ग्राम हागणदारीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली. भारतात उघड्यावरच्या हागणदारी मुळे दर वर्षी डायरीयामुळे एक लक्ष मुलांचा मृत्यु होतो. ही योग्य बाब नसुन, भावी पिढी ख-या अर्थाने सक्षम करायची असेल तर गावातील प्रत्येकांनी आपले ग्राम नियमीत स्वच्छ राखले पाहिजे. असे मत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना सभेद्वारा मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
जिल्हा हागणदारी मुक्त च्या अंतीम टप्प्यात असुन, गावक-यांचा स्वच्छतेच्या कामात सहभाग वाढावा म्हणुन, गावा-गावात जनजागरणपर कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असुन, याच प्रकारे सावली तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात  मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर सहभागी झाले. यावेळी जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,गटविकास अधिकारी अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविंद्र मोहिते,निमगावच्या सरपंच व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावातील उघड्यावरची हागणदारीची प्रथा ही काही भुषणावह बाब नसुन, गावातील प्रत्येक घराचा परीसर तसेच सार्वजनिक परिसर नियमित स्वच्छ राहल्यास त्यागावातील लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होते, यातुनच गावाचा विकास होत असतो. यासाठी गावातील प्रत्येकांनी गाव शाश्वत स्वच्छ राखण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी ग्रामविकासाची खरी सुरुवात ही ग्राम स्वच्छतेतुनच होते . ग्राम शाश्वत स्वच्छ करणे ही ग्रामविकासाचे पहिले पाऊल असुन, याकामात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे . असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी केले. कार्यक्रमात स्थानिक कलावंताचा कलापथकाचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला .याद्वारा स्वच्छतेचे महत्व मनोरजनांच्या माध्यमातुन माडंण्याचा प्रयत्न केला गेला .याशिवाय  एका शौचलयाचे भुमिपुजन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

गावागावात होणार शौचालय दिन

गावागावात होणार शौचालय दिन

चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक - 17 / 11 / 2017 दर वर्षी ''19 नोव्हेंबर '' हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हा परिषद कडुन सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार 19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.
स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्हा हागणदारी मुक्तच्या अंतिम टप्प्यात असुन, हागणदारी मुक्तीकडे मार्गक्रमण करित आहे . जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी,मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आले असुन, प्रत्येक गावाकरिता तालुका पातळीवरुन संपर्क अधिकारी नेमण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.