Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, जुलै २८, २०२२
सोमवार, जुलै २५, २०२२
येत्या ३ दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस.
गुरुवार, जुलै २१, २०२२
सावरटोला परिसरात अतिवृष्टीचा भात पिकाबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका.
गरजू विद्यार्थ्यांसाठी नवेगावबांध पोलीस ठाण्यात मार्गदर्शन शिबिर.
अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूर, सावरटोला -पिंपळगाव मार्गावरील वाहतुक दुसऱ्यांदा बंद
प्रफुल पटेल यांच्या इमारतीचे चार मजले जप्त |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. आज ईडीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांचं वरळीतील घर जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत.
#Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel
वरळी येथे सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली असल्याची माहिती आहे. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची प्रकरणी हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.
#Maharashtra, #Mumbai #Gondia #NCP leader #Praful Patel
शनिवार, जुलै १६, २०२२
बिबट्याने बोरटोला येथे दोन शेळ्यांचा पाडला फडशा |
संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध | आज १६ मे रोज शनिवारला रात्री दोन अडीच वाजेच्या दरम्यान बोरटोला येथील पतीकुमार रणदिवे यांच्या घरी गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला. एक शेळीचा करडू व शेळीला ठार मारले अंदाजे दोन ते तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.
रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास बोरटोला निवासी पतीकुमार रणदिवे यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून शेळीचा एक कर्डलू (पाटरु) घेऊन बिबट गेला. बिबट आल्याची चाहूल लागताच पतीकुमार रणदिवे हे रात्रीच घराच्या बाहेर पडले. बिबट्याला हाकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु उलट बिबटया त्यांच्या अंगावर चालून आला. भीतीमुळे पतीकुमार हे आपल्या घरात शिरले. त्यावेळी त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता.
पुन्हा बिबट आला व त्याने गोठ्यात खुंटाला बांधलेल्या शेळीचा फडसा पाडला. घरातून रणदिवे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता,बिबट तिथून पसार झाला.
शेळी व बिबट्याचे पायाचे ठसे गोठ्याच्या आजूबाजूला उमटलेले दिसले. अंदाजे दोन ते तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रणदिवे यांच्या येथील घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.त्यानंतर याच बिबट्याने गोविंदा ब्राह्मणकर यांच्या घरी गोठ्यात रात्रीच आपला मोर्चा वळविला.
गोठ्यात बंद असलेल्या शेळ्या वर हल्ला करण्यासाठी,गोठयाच्या दाराला बिबट्याने धक्का दिला.परंतु गोविंदा ब्राह्मणकर यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने, तिथूनही बिबट्याने काढता पाय घेतला. ब्राह्मणकर यांचे अंगणात बिबट वाघाच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. गेल्या ७-८ दिवसापासून गावातील अनेक कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.मागील महिन्यात उमरी,सावरटोला येथीलही दहा ते बारा कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या होत्या.
बोरटोला, उमरी सावरटोला या तिन्ही गावातील लोक गाई,म्हशीं, शेळया, बकरे पाळत आहेत. त्यामुळे गोपालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यांच्या आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सायंकाळ झाली की या तिन्ही गावच्या नागरिकात धाक धुक वाढत असते. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गावात बिबट वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आतापर्यंत बिबट्याने दहा-बारा कोंबड्या फस्त केल्याची माहिती आहे.शेताच्या बाजूने गावात हा बिबट प्रवेश करीत असतो. बहुतेक तो भिवखिडकी, पिंपळगाव,बोरटोला, इंजोरी च्या जंगलातून येत असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. वन्यजीव मानव संघर्ष होऊ नये. म्हणून वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बोरटोला ग्रामवासियांनी केली आहे.
बुधवार, जुलै १३, २०२२
सावरटोला -पिंपळगाव मार्ग वाहतुक बंद |
नवेगावबांध परिसरात दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपले
संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि.१३ जुलै:-
गोंदिया जिल्ह्यात काल दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत. धान पिकांची रोवणी खोळंबली आहेत. धानपिकांचे पऱ्हे पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon