Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, ऑगस्ट २३, २०२३
शुक्रवार, ऑगस्ट १८, २०२३
तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू । Four Drowned In River
तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू ।
Four Drowned In Kanhan River
नागपूर । जिल्ह्यातील वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्रांना नदी पात्रात (Four Drowned In Kanhan River) पोहण्याचा मोह जीवावर बेतला. वाकी परिसरात फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चाैघे कन्हान नदीच्या डाेहात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. विजय ठाकरे (१८), साेनिया मरसकाेल्हे (१७, दाेघेही रा. नारा, नागपूर), अंकुश बघेल (१७) व अर्पित पहाळे (१९, दाेघेही रा. कामठी) अशी बुडालेल्यांची तर साक्षी कनाेजे (१८, रा. पाटणकर चौक, नागपूर) व मुस्कान राणा (१८, रा. जरीपटका, नागपूर) अशी बचावलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. हे सहाही जण मित्र असून, ते दाेन माेटारसायकलींनी ट्रिपल सीट गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाकी येथे फिरायला आले हाेते. त्यांनी ताजुद्दीनबाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले आणि कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले.
LATEST POSTS
- 18/08/2023 - Khabarbat
- 17/08/2023 - Khabarbat
- 17/08/2023 - Khabarbat
- 16/08/2023 - Khabarbat
कन्हान नदीपात्रातील (Four Drowned In Kanhan River) खोल डोहात बुडाल्याने या 4 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये तीन तरूण आणि एक तरूणी आहे. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे शाेधकार्य सुरू करण्यात आले.अंधार हाेईपर्यंत शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.पोलिसांनी एसडीआरएफ व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने चौघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टिम, एक पीआय, दोन पीएसआय, 22 पोलिस शिपायी आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर आणि कामठी येथील सहा जणांचा ग्रुप वाकी (Four Drowned In Kanhan River) येथे सहलीसाठी आला होता. यामध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. विजय ठाकरे, सोनिया मरसकोल्हे, अंकुश बघेल, अर्पीत पहाले ही मृतकांची नावे आहे.कामठी व नागपूर येथील हे सहा मित्र कन्हान नदीच्या पात्रात फिरायला आले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह आवरला नाही. त्यातील सहा पैकी हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.
वर्धा नदीत बुडालेल्या चौघाचे मृतदेह सापडले
वणी : दोन वेगवेगळ्या घटनेत नदीवर पोहण्यासाठी गेलेले चार तरुण वाहून गेले. ही घटना मंगळवारी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी वणी तालुक्यातील नायगाव (खु.) व जुनाडा येथे घडली. ही दोनही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. पैकी जुनाडा येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह तसेच नायगाव येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले असल्याने वणी तालुका या घटनेने हादरून गेला आहे.
रितेश नत्थू वानखडे (१८) व आदर्श देवानंद नरवाडे (२०) दोघेही रा. भद्रावती (जि. चंद्रपूर) अशी येथून वर्धा नदीत वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. नायगाव खुर्द येथील प्रविण सोमलकर (३६) दिलीप कोसरकर (४०) हे दोघे वर्धा नदीत वाहून गेले. असून याचा शोध घेतला दिलीप याचा मृतदेह हा माजरी इथे सापडला असून तर प्रविणचा मृतदेह कोणा येथे वर्धा नदी काठावर आढळून आले आहे .याघटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सुटी असल्याने अनेकजण पर्यटनासाठी नदी तसेच धबधब्यावर जातात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदीच्या जलपातळीत चांगलीच वाढली आहे. या प्रवाहात पोहण्याचा मोह न आवरता आल्याने ही दुर्घटना घडली.ब्युरो रिपोट प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा
माओवादी नेता मल्ला राजिरेड्डी यांचे निधन?
माओवादी नेता आणि केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजिरेड्डी (70) उर्फ सायन्ना यांचे निधन झाल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राजा रेड्डी यांच्या मृत्यूबाबत माओवादी पक्षाने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
मल्ल राजिरेड्डी यांचे मूळ गाव पेड्डापल्ली जिल्ह्यातील मंथनी मंडळातील एगलसपूर अंतर्गत शास्त्रुलापल्ली आहे. छत्तीसगड आणि ओडिशा दंडकारण्यममध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संग्राम, सायन्ना, मीसला सायन्ना, आलोक, उर्फ देशपांडे, सटेना यांना ओळख मिळाली.
गुरुवार, ऑगस्ट १७, २०२३
टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सपासप वार; जीव वाचविण्यासाठी....
मंगळवार, ऑगस्ट १५, २०२३
उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'नागपूर शार्क टँक' घेण्याची आयडिया Deputy Chief Minister gave the idea of 'Nagpur Shark Tank'
शनिवार, ऑगस्ट १२, २०२३
विजया बोरकर बनल्या महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंता
वसंतवादी साहित्य संमेलन म्हणजे काय? आजपासून नागपुरात आयोजन | Vasantist Gor Banjara Sahitya Sangh
बुधवार, ऑगस्ट ०९, २०२३
क्रांतीदिनी राष्ट्रसंतांच्या या कार्याची झाली आठवण | Tukdoji maharaj krantidin
PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi
मंगळवार, ऑगस्ट ०८, २०२३
नागपूरात पहिल्यांदाच होणार महायोगोत्सव; वाचा काय काय कार्यक्रम होणार Mahayogotsava
वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card
सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३
कौतुकास्पद : प्रा. डॉ. रोहित गुप्ता यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी Commendable : Prof. Dr. Rohit Gupta holds a PhD from Cambridge University
शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३
सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime
महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांक किया नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
काळजी घ्या; फ़सवणूक टाळा:
· महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही
· महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/
· (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)
· बिलाच्या पेमेंटसाठी लिक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.
· मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.
· ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका. ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल "https://cybercrime.gov.in" वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.
· अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक 1912/19120/1800-201-3435/1800-
भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit Dev
Nagpur Justice Rohit Dev | नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांनी कोर्टरूममध्येच दिला राजीनामा
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव ( Justice Rohit Dev ) यांनी भर कोर्टरूममधे राजीनामा दिल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नागपुरातील खंडपीठात कोर्टरूममधे आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारी त्यांची मुंबई उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली कऱण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती. त्यावर व्यथित होऊन रोहित देव यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
न्यायमूर्ती रोहित देव हे (Justice Rohit Dev) शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच नागपूर खंडपीठाच्या कोर्ट रूममध्ये आले आणि त्यांनी कोर्टरूममधल्या उपस्थितांसमोर आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेनंतर कोर्टरूममधील सर्वजण आश्चर्यचकित झाले. मी कोर्ट रूममधल्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या वागण्यामुळं कुणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणून न्यायमूर्ती रोहित देव तिथून निघून गेले.
एका वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती देव म्हणाले, “न्यायालयात उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. मी तुमाला शिव्या देतो कारण तू सुधारावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबासारखे आहात म्हणून मला तुमच्यापैकी कोणाचेही मन दुखवायचे नाही परंतु मी माझा राजीनामा सादर केला आहे हे कळविण्यास मला खेद होत आहे. मी माझ्या स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही. तुम्ही लोक खूप मेहनत करा."
न्यायमूर्ती देव rohit deo nagpur highcourt यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, मी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे आणि त्यांचे राजीनामा पत्र राष्ट्रपतींना पाठवले आहे.
गेल्या वर्षी न्यायमूर्ती देव यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांची कथित माओवादी संबंधांच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती देव यांनी महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या शासन निर्णयाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. या प्रस्तावाद्वारे नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकाम किंवा अंमलबजावणीच्या कामात गुंतलेल्या कंत्राटदारांकडून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले. rohit deo nagpur highcourt
न्यायमूर्ती देव यांची जून 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि डिसेंबर 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते.
#nagpur #highcourt #justice #rohitdev #courtroom