Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जुन्नर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुन्नर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद
बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद


जुन्नर /आनंद कांबळे

: आदिवासींचे खोटे जमात प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा लोकांची नोकरीतून हकालपट्टी करणे आवश्यक आहे. ज्या खऱ्या आदिवासींसाठी संविधानाने आरक्षण दिलेले आहे, त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेऊन त्या जागा बळकावणे म्हणजे संविधानाच्या प्रती गुन्हा आहे. कोणतेही सरकार एखादा शासन निर्णय किंवा परिपत्रक काढून अशा बोगस व्यक्तींना संरक्षण देऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदविले आहे. असे असूनही राज्यात अशा बोगस आदिवासींना संरक्षण देणारा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, सिटू, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, सरकारच्या, या कृतीचा धिक्कार करत आहे. या निर्णयाविरोधात नवीन कांदा मार्केट, जुन्नर येथे दिनांक 23 डिसेंबर 02022 रोजी भव्य राज्यस्तरीय एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे व किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे यांनी दिली.

या परिषदेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू चे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, तलासरी नगरपंचायत चे सभापती नंदकुमार हडाळ, सुरगाणा पंचायत समिती माजी सभापती इंद्रजित गावित, माकपचे जिल्हा सचिव गणेश दराडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे संजय साबळे आदींसह उपस्थित रहाणार आहेत.

राज्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२,५०० पदांवर बोगस लोकांना आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. संघटनांनी व जागरूक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर यापैकी केवळ ३,०४३ पदे रिक्त करण्यात आली आहेत. रिक्त केलेल्या या पदांपैकी केवळ ६१ पदे भरण्यात आलेली आहेत. उर्वरित ९,४५७ पदे रिक्त करून ही पदे खऱ्या आदिवासींमधून भरण्याबाबत निर्णय शासनाकडून त्वरित घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद होत असून राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

बुधवार, डिसेंबर १४, २०२२

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करा

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करा

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करावा



-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई |   जुन्नर तालुक्यात होणारा बिबट सफारी प्रोजेक्ट स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीनेच या प्रकल्पाची आखणी व्हावी. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.



जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे नियोजित बिबट सफारीच्या अनुषंगाने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव  यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.




यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. याठिकाणी बिबट सफारी प्रकल्प केला तर त्यामुळे स्थानिक भागात रोजगार आणि पर्यटनाच्या अधिकच्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय, या परिसरात इतर अनेक पर्यटनस्थळेही आहेत. या प्रोजेक्टमुळे या पर्यटनक्षेत्रांकडेही पर्यटक आकर्षिले जाणार आहेत. त्यामुळेच बिबट सफारीच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतांना या सर्व बाबींचा विचार केला जावा. बिबट सफारीचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होताच तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करावी. विहित वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.



Prepare a detailed project report of Junnar Bibat Safari by 15 February


यावेळी माजी खासदार श्री. आढळराव व माजी आमदार श्री. सोनवणे यांनी, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे सांगितले. 

गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२

खटकाळे तेथे शेतकरी बचत गटातील महिलांना भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप

खटकाळे तेथे शेतकरी बचत गटातील महिलांना भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप



जुन्नर : खटकाळे (ता.जुन्नर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या आत्मा अंतर्गत पौष्टिक आहार योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय जाधव व कृषी पर्यवेक्षक बापूसाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक अमोल मोरे यांनी महिला शेतकरी बचत गटातील महिलांना जवळजवळ दहा प्रकारचे भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची वाटप करण्यात आले. Department of Agriculture Government of Maharashtra

तसेच एकात्मिक फलोत्पादन अभियान या योजनेची महिला शेतकरी बचत गट यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे शेततळे अस्तरीकरण कांदा चाळ पॉलीहाऊस ग्रीन नेट याबद्दल माहिती देण्यात आली‌. तसेच परसबागेमुळे महिलांना महिलांना आपल्या परसबागेमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करून घरच्या घरी ताजा व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या ताज्या भाजीपाल्यामुळे महिलांची रोजच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.

यावेळी सरपंच शकुंतला मोरे, उपसरपंच भरत मोडक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे तसेच शेतकरी मित्र विलास मोरे, शेतकरी बचत गटाच्या महिला अध्यक्ष लताबाई केदारी आणि गटातील सर्व शेतकरी महिला उपस्थित होत्या.

Distribution of seeds of vegetable crops to the women of farmers' self-help groups at Khatkala

शुक्रवार, ऑक्टोबर २१, २०२२

'एसएफआय'चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

'एसएफआय'चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

जुन्नर : 'एसएफआय' चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

जुन्नर/आनंद कांबळे
: स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जुन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर "शाळा वाचवा आंदोलन" करण्यात आले.

यावेळी २० पटसंंख्येपेक्षा कमी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे, सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देत पंचायत समिती परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलतांना एसएफआय चे जिल्हा सचिव नवनाथ मोरे म्हणाले, राज्य सरकार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरण राबवत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1054 शाळांचा समावेश आहे. यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असून मोठ्या संख्येने मुली शिक्षणाच्या बाहेर फेकली जाणार आहेत. भारतीय संविधानाने 1 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलेला मुलभूत शिक्षणाचा अधिकार पायदळी तुडविण्याचा सरकार प्रयत्न करतात आहे. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घ्यावे.

तसेच किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे म्हणाले, शाळा बंद करणारे धोरण हे विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारे आहे, अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. परंतु ते एकामेकांचवर टिका टिप्पणी करण्यात आणि पक्ष प्रवेश करण्यात मश्गूल आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे नाही, त्यामुळे जनतेने योग्य वेळी त्यांची जागा दाखविली पाहिजे.

तसेच डीवायएफआय चे गणपत घोडे म्हणाले, तालुक्यातील 84 शाळांवर टांगती तलवार असताना आपण विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी एकत्र येत आहे. परंतु सर्व विद्यार्थी पालकांना एकत्र करून शिक्षणाचा मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे.

यावेळी पांगरी तर्फे मढ, चिल्हेवाडी, कवटेवाडी, सितेवाडी, हडसर, उच्छिल, कालदरे, आंबे या गावातील ग्रामपंचायती ठराव, शालेय व्यवस्थापन समितीचे ठराव घेण्यात आले.

यावेळी एस.एफ.आय चे राज्य समिती सदस्य राजेंद्र शेळके, जिल्हा सचिव नवनाथ मोरे ,जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली खमसे, तालुका सचिव अक्षय घोडे , डी.वाय.एफ.आय. चे तालुका सचिव गणपत घोडे, किसान सभा चे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, किसान सभा तालुका सचिव लक्ष्मण जोशी, ज्ञानेश्वर गवारी, मंगल सांगडे, दिलीप मिलखे, शितल भवारी, सुदामा लांडे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Protest against 'SFI' school ban in front of Panchayat Samiti

शनिवार, सप्टेंबर १७, २०२२

 दिशाभूल व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा |

दिशाभूल व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा |



जुन्नर /आनंद कांबळे 

११२ नंबरला फोन करून दिशाभूल करणारी व खोटी माहिती दिल्या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका विरुद्ध कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

घडलेली हकीगत सविस्तर अशी की पोलीस खात्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तात्काळ मदत उपलब्ध होण्याच्या हेतून ११२ हा नंबर जारी केला असून आपत्कालीन स्थितीत अथवा संकटाच्या वेळी हा नंबर डायल केला असता सदर व्यक्तीला तातडीने मदत उपलब्ध होते दरम्यान आज जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये ९५५२९७६८८५ या मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात इसमाने मी घोगरेवाडी, सुराळे ता जुन्नर येथील रहिवासी असून आमच्या इथे खूप सारे लोक नदीत वाहून गेले असून त्यात माझा भाऊ देखील आहे व आम्हाला मदत हवी आहे अशा आशयाचा फोन केला. बाब गंभीर असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ मदतीसाठी रवाना झाले मात्र सदर ठिकाणी जाऊन  स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांना  घटनेची माहिती विचारली असता ही बाब खोटी असून अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही अशी माहिती प्राप्त झाली.

त्यामुळे सदर इसमाने ११२ क्रमांकावर खोटा व दिशाभूल करणारा फोन केल्याचे सिद्ध झाल्याने त्या व्यतिविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Misleading and false information by calling 112 number

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

रतिलाल बाबेल यांना इंडिया एज्युकेशनल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

रतिलाल बाबेल यांना इंडिया एज्युकेशनल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर



जुन्नर /आनंद कांबळे
प्रसिद्ध वक्ते ,जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर ,नारायणगाव येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक यांना हाय पेज मीडिया जयपुर (राजस्थान) यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा इंडिया एज्युकेशनल पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे सीईओ गौरव गौतम यांनी दिली.


रतिलाल बाबेल यांनी विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने शिक्षकांसाठी शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन ,विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व ,निबंध स्पर्धेचे आयोजन यासारखे उपक्रम राबविले असून पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात ते सक्रिय सहभागी असतात.


ग्रामोन्नती मंडळ नारायणगावच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात गेली तीस वर्षे ते विज्ञान व गणित अध्यापनाचे कार्य करीत असून उत्तम निकालाची परंपरा त्यांनी कायम राखली आहे .त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत.

 शिक्षकांसाठी असणाऱ्या वरिष्ठ श्रेणीसाठी व नवीन अभ्यासक्रमासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे .आदिवासी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाबरोबर त्यांनी मोफत मार्गदर्शन केले आहे .पुणे जिल्ह्यात त्यांचा उत्कृष्ट वक्ते म्हणून नावलौकिक आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन हायपेज मीडिया, जयपुर यांनी देशातील शंभर शिक्षकांमध्ये रतिलाल बाबेल यांचा समावेश केला आहे ही जुन्नर तालुक्यातील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी जयपूर या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या निवडीबद्दल ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे ,कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहर, सर्व संचालक ,जुन्नर तालुका विज्ञान व गणित शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

जुन्नरच्या संस्कृती दहीहंडी उत्सवास नागरिकांची मोठी गर्दी

जुन्नरच्या संस्कृती दहीहंडी उत्सवास नागरिकांची मोठी गर्दी




चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

जुन्नर : आनंद कांबळे

जुन्नर शहरातील शंकरपुरा पेठ येथे संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये जुन्नर शहरातील आबाल-वृद्धासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.
संस्कृती प्रतिष्ठान जुन्नर यांनी केलेल्या नियोजनातील छत्रपती संघर्ष ढोल-ताशा पथकाने विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
 या उत्सवास ओतुर, जुन्नर शहर व परिसरातील गोविंदा पथकांनी मानवी साखळी रचत दहीहंडीला सलामी दिली तर मयूर महाबरे यांच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.
    याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज नानावटी, उपाध्यक्ष सनी कर्पे, सेक्रेटरी सुरज खत्री, माजी अध्यक्ष सुमित लांडे, मार्गदर्शक अनिल रोकडे, सल्लागार राजेंद्र खत्री, सतिष कवडे, अरुण तांबे, रुपेश दुबे, दीपक वाळुंज, शरद भगत, गौतम सुरडकर आदी उपस्थित होते.


Krishna Janmashtami Gokul ashtmi dahihandi

शनिवार, ऑगस्ट १३, २०२२

Local News | डिसेंट फाउंडेशनचा "कळी उमलताना" उपक्रम कौतुकास्पद : प्राचार्य डॉ. उत्तम शेलार

Local News | डिसेंट फाउंडेशनचा "कळी उमलताना" उपक्रम कौतुकास्पद : प्राचार्य डॉ. उत्तम शेलार





जुन्नर /आनंद कांबळे
Pune News
डिसेंट फाउंडेशन जुन्नर, माजी विद्यार्थी संघ- श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर व विद्यार्थिनी कल्याण मंडळ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे किशोरवयीन मुलींसाठी "कळी उमलताना" किशोरवयीन मुली, वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियान तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी "कळी उमलताना".....
किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जाणीव जागृती अभियान हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यात सुरू केला असून या तीनही तालुक्यातील जवळपास ३० महिला डॉक्टर या उपक्रमासाठी आपला वेळ देऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, शारीरिक व मानसिक आरोग्य, आहार व व्यायाम या विषयावर मोफत मार्गदर्शन करत आहेत. तसेच डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार मुली व माता पालकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून त्यांना मोफत मार्गदर्शक पुस्तिका व सॅनिटरी पॅडचे वाटप देखील केलेले आहे.

किशोर अवस्थेत मुलींनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य, मासिक पाळी, शरीरात होणारे बदल, आहार ,व्यायाम वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण पूरक व योग्य सॅनिटरी पॅड चा वापर, कॅन्सर अशा अनेक विषयांवर डॉक्टर संपदा तोडकर व डॉक्टर कल्याणी पुंडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले .

ग्रामीण भागात समाजामध्ये आजही मासिक पाळी विषयी अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. तसेच आई आणि मुली यांच्यात संवाद नसल्यामुळे अनेक संकटांचा सामना किशोरवयीन मुलींना करावा लागतो. त्यामुळे वयात येणाऱ्या मुला मुलींसोबत आई-वडिलांनी निसंकोच पणे संवाद साधला पाहिजे असे मत डिसेंट फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक एफ.बी.आतार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

डिसेंट फाउंडेशन च्या वतीने यावेळी इयत्ता अकरावीतील कला शाखेच्या २०० विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल विभागात प्रथम तीन क्रमांकात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम शेलार, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई ,जूनियर कॉलेज च्या उपप्राचार्य प्राध्यापिका पी.एस.लोढा, जुनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक प्राध्यापक एस. ए. श्रीमंते, माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्राध्यापक शरद मनसुख, विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या प्रमुख प्राध्यापिका कविता शिंदे, तसेच सर्वच प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

maharashtra education | School Junner

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

तालुका अध्यक्षपदी माधुरी कोरडे तर सचिवपदी लक्ष्मण जोशी यांची निवड 


जुन्नर /आनंद कांबळे(वार्ताहर) (junnar Khabarbat)  : नाशिक येथील ऐतिहासीक १ लाख लोकांचे महामुक्काम असेल, वाडा येथे आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला घातलेला ७० हजार आदिवासी जनतेचा महाघेराओ, शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठीचा ऐतिहासीक शेतकरी संप. नाशिक ते मुंबई असे झालेले दोन लाँगमार्च. आणि दिल्लीच्या चारही सीमांवर वर्षभर आंदोलन करुन मोदी सरकारला मागे घ्यायला लावलेले तीन काळे कायदे. दुध ऊस दराबाबतची आंदोलने अशी देशभर आणि राज्यभर शेतकरी, शेतमजुर आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी मांडून काम करणाऱ्या किसान सभेचे आज जुन्नर तालुक्याचे तिसरे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना आंनद वाटतो आहे, असे उद्गार शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी काढले.

अखिल भारतीय किसान सभा, जुन्नर तालुका समितीचे त्रेवार्षिक अधिवेशन आज (दि.७) रोजी प्रभाकर संझगिरी भवन, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी अधिवेशनास उद्घाटनापर ते बोलत होते. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

पुढे लांघी म्हणाले, सरकारी यंत्रणांच्या चौकशीला घाबरुन शांत बसलेले विरोधक आणि भांडवलदारांच्या बाजुने निर्णय घेणारे केंद्र सरकार. यामुळे महागाई, बेरोजगारीने कळस गाठलेला आहे. याला विरोध करण्यासाठी किसान सभेला बळ देण्याचे आवाहन ही त्यांनी केले. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी सत्रात 2016 - 2022 या वर्षातील कार्यात्मक, संघटनात्मक अहवाल अधिवेशनासमोर ठेवण्यात आला. यावेळी अहवालावर चर्चा आणि सूचना होऊन अहवाल पारीत करण्यात आला. तसेच या अधिवेशनादरम्यान विविध प्रश्नांना घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आला ‌‌.

या अधिवेशनाने शेतमालाला हमीभाव देणार कायदा करा, शिक्षण, आरोग्य आणि अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भातील लढा तीव्र करा, मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी करा, आदी ठरवा एकमताने पारीत करण्यात आले. तसेच या अधिवेशनाने पुढील तीन वर्षांसाठी 19 नवीन कार्यकारिणीची निवड केली.  Junnar Taluka All India Kisan Sabha

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

अध्यक्ष - माधुरी कोरडे
सचिव - लक्ष्मण जोशी
कार्याध्यक्ष - कोंडीभाऊ बांबळे
उपाध्यक्ष - मुकुंद घोडे
सहसचिव - शंकर माळी
खजिनदार - नारायण वायाळ
सदस्य - विश्वनाथ निगळे, संदीप शेळकंदे, मंगल रढे, मनीषा कोकणे, दीपक डामसे, अनिल ढेंगळे, मारूती महाराज सुपे, अशोक दिवटे, विनायक सरोगदे, गणेश मराडे, सचिन मोरे, किसन घोडे, सुनीता भोईर.

समारोप सत्रात बोलताना किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांवरील अन्याय, शोषणाविरुद्ध किसान सभा लढा देत आहे. आजही इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांनीही हाती घेता आला नाही, तो किसान सभेने तडीस नेला. आता पर्यावरण नियमावलींचे कारण देत पुन्हा आदिवासींनी जमिनीवरून हद्दपार करण्याचा डाव आहे. 

मनरेगा कायदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दबावामुळेच देशात अस्तित्वात आला, मनरेगा ची कायद्याची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे. हिरडा हे आपल्या तालुक्यातील पश्चिम आदिवासी जनतेचे उत्पादनाचे स्त्रोत आहे, हिरड्याला योग्य भाव आणि आदिवासी महामंडळाकडून हिरडा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या काळात लढा तीव्र करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुढारी हे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार व जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासकीत पातळीवर मांडण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी पाठविण्याचा निर्धार करूयात, असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.




(junnar Khabarbat)  


गुरुवार, जुलै १४, २०२२

आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद

आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद


 

आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद


जुन्नर /आनंद कांबळे 

     बाळांनो , आई -बाबांनी हे सुंदर जग आपल्याला दाखविल आहे, जीवन खूप सुंदर व अनमोल आहे.असेच यशवंत , गुणवंत व्हा,चांगल्या मित्रांची संगत करा,आई ,वडील व गुरूंचा आदर करा , त्यांची स्वप्नं पूर्ण करा ,असे ऑस्ट्रेलिया निवासी संतोष काशिद यांनी मुलांना मार्गदर्शन केले. Santosh kashid

         चिंचोली ( काशिद ) ता.जुन्नर येथील श्री समर्थ मधुकरराव विद्यालयात एस. एस. सी.चा १००% निकाल लागल्याबद्दल गुरूदक्षिणा फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून काशिद बोलत होते .

     संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव काशिद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .या वेळी विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक - शिक्षकेतर वृंद यांना सन्मान चिन्ह , शाल , गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच अनया या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व बिस्किटे वाटण्यात आली .

     या प्रसंगी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ .बी.आतार , संतोष काशिद ,सामाजिक कार्यकर्ते संदिप पानसरे ,संचालक अजित काशिद , तुकाराम चव्हाण , भास्कर काशिद ,मनिषा काशिद आदि मान्यवरांसह पालक , विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल गडगे यांनी तर उपशिक्षक विठ्ठल भोर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

-----------------------

ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक 

https://www.khabarbat.in/2022/07/santosh-kashid-house.html

Santosh kashid  

Australian

रविवार, जुलै १०, २०२२

ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमातून साजरा

ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमातून साजरा



जुन्नर /आनंद कांबळे 

   सावरगाव ( ता.जुन्नर )येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय चे माजी विद्यार्थी संतोष शांताराम काशिद नोकरीच्या निमित्ताने परिवारासह ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत.  जवळपास ३/४ वर्षानंतर मायभूमीत आल्यानंतर प्रथम शाळेला भेट दिली. मुलगी अनया हिचा वाढदिवस मुला-मुली समवेत साजरा केला.

    एस. एस. सी.च्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन  कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

  चिंचोली ( काशिद ) येथील हा विद्यार्थी ऑस्ट्रेलिया येथे अभियंता म्हणून काम करतो .तेथे भारतीय लोकांना एकत्र करून मुलांसाठी चार मराठी शाळा सुरू केल्या आहेत त्याचबरोबर सर्वांना एकत्र करून शिवजयंती , गणेशोत्सव ,स्वातंत्र्य दिन साजरा करतात. पत्नी मनीषा ही देखील अभियंता असून महिला दिन , हळदी कुंकू , रक्षाबंधन कार्यक्रम घेतात .

    या प्रसंगी संचालक माधवराव बाळसराफ , डिंसेंट फाउंडेशन चे प्रकल्प समनव्यक फकिर आतार ,मुख्याध्यापक साळुंके , माजी सनदी अधिकारी शंकर कचरे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश भागवत , संतोष काशिद , संदिप पानसरे , मनिषा काशिद आदि मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक , कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश ढमढेरे , स्वागत अरुणाआल्हाट मॅडम तर आभार ज्येष्ठ शिक्षक जयकुमार कडाळे यांनी व्यक्त केले 

माजी विद्यार्थी संतोष यांनी किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग व डिस्ट्रॉय मशिन , ई-लर्निंग सॉफ्टवेअर,कोरोना ग्रस्त मुलांना मदत , हे खरोखर कौतुकास्पद आहे असे मुख्याध्यापक अनिल साळुंके यांनी सांगितले .

https://www.khabarbat.in/2020/06/kashid-family-of-chincholi-gave-free.html

        #sagarkashid #sapnapatil #marathibeatz

Santosh Kashid |

सोमवार, जुलै ०४, २०२२

 दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू



 जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर शहरालगतच्या सोमतवाडी येथील पद्मावती तलावाच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडल्याने तेथील गाळमध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. 


पवन दुर्गेश ठाकूर वय 13 , सम्राट देवेंद्र परदेशी वय 14 दोघेही राहणार परदेशपुरा जुन्नर असे हा घटनेत मयत झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. रविवारी दुपारी हे दोघे जण सोमतवाडी येथील पद्मावती तलाव येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी फोटो काढीत असताना त्यांचा पाय घसरून ते दोघेही तलावात पडले. तेथे असलेल्या खोल खड्ड्यांमधील गाळा मध्ये अडकून या दोघांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी त्यांना ओढून बाहेर काढले. त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी ते मयत असल्याचे सांगितले. अभिलाष परदेशी यांनी या घटनेची खबर जुन्नर पोलिसांना दिली. पुढील तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.


जुन्नर, महाराष्ट्र 410502, भारत

Latest News on Junnar | Breaking Stories and Opinion Articles


related query 

रविवार, जुलै ०३, २०२२

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तालुकाध्यक्षपदी सौ.अनिताताई गुंजाळ यांची निवड #anitagunjal

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तालुकाध्यक्षपदी सौ.अनिताताई गुंजाळ यांची निवड #anitagunjal




जुन्नर /आनंद कांबळे 

    जुन्नर प्रकल्पतील सर्व सेविका. मिनी सेविका. मदतनीस  यांचा संघटनात्मक  मेळावा  कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी  पार पडला.यावेळी तालुकाध्यक्षपदी   आनिताताई गुंजाळ यांची निवड करण्यात आली अशी माहिती राज्याचे  उपाध्यक्ष निलेश दातखिळे यांनी दिली.

     सण 1986साली एकात्मिक बालविकास सेवा योजना  प्रकल्प जुन्नर ची निर्मिती झाली. प्रकल्प अंतर्गत  लहान  मुलांचे  कुपोषण निर्मूलन व्हावे म्हणून अंगणवाडी सेविका. मिनी सेविका. मदतनीस  यांची  नेमणूक करण्यात आली.

प्रकल्प निर्मिती मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  मोठे योगदान  आहे.

      अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुरवातीला 50रू मानधन  होते.संघर्ष करून  सद्या त्यांचे मानधन 8250रू झाले अल्पशा मानधनात  काम करावे  लागत  होते. अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन.कॉम्रेड एम. ए पाटील सरच्या  मार्गदर्शनाखाली कॉम्रेड ब्रिजपाल सिंग व कॉम्रेड व्ही डी दातखिळे तसेच  सविंद्रा बोऱ्हाडे  यांच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तयार  करून  पायाभरणी केली. एक एक महिलांना जोडत  संघटनेचा  बालेकिल्ला जुन्नर प्रकल्पत तयार  करण्यात आला.

      जुन्नर प्रकल्प मेळाव्याच्या निमित्ताने अंगणवाडी कर्मचारी  यांना शासकीय  कर्मचाऱ्यांचा  दर्जा द्या. मानधन  वाढ करा. पेन्शन योजना  लागू करा. आजारपणाची  रजा द्या. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर  करणे.लहान  मुलांना चांगल्या  प्रतीचा  आहार द्या. अमृता  आहारातील दरवाढ  करा.आशा  अनेक अत्यंत महत्वाच्या विषयवार  संघटनात्मक चर्चा करण्यात आली.

     अंगणवाडी कर्मचारी  यांना शासकीय  सेवेत वर्ग करून  स्पे स्केल लागू करण्याबाबत  औद्योगिक न्यायालय  पुणे येथे केस घालण्यात आली  आहे

    आदीवासी  भागातील पेसा अंतर्गत ए पी जे अमृत आहार देण्यात येतो. महागाईच्या दृष्टीने 

शासना कडून दरवाढ न झाल्यामुळे दि 1ऑगस्ट 2022पासून लाभार्थी यांना वाटप न करण्याचा  निर्णय अंगणवाडी कर्मचारी यांनी घेतला  आहे.

      अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्यासाठी केंद्र व शासन  स्तरावर या पुढे  अनेक  लढे  देण्याबाबत संघर्ष करण्याचा  निर्धार करण्यात आला.

     कोव्हीड 19मध्ये अंगणवाडी कर्मचारी  यांनी स्वतःच्या कुटुंबाचा  विचार  न करता कोव्हीड चे  काम जिगरीने काम केले. समाजामध्ये उल्लेखनीय काम करून  स्वतःला सिद्ध करून  दाखवले  आहे.

       मेळाव्याच्या निमित्ताने नवीन  प्रतिनिधी  ची  नेमणूक करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी  अनिताताई गुंजाळ. तर  तालुका सचिव  पदी  मीराताई तळपे  यांची नेमणूक करण्यात आली आहे .संघटनात्मक 

सोशल  मीडिया प्रतिनिधी म्हणून किशोरी  खंडागळे  यांची  नेमणूक करण्यात आली.

 तसेच  काही बिट मध्ये नवीन  बिट प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली.

      भारतीय  महिला  फेडरेशन  तालुका प्रतिनिधी म्हणून सविंद्रा ताई बोऱ्हाडे. शैलेजा  कोऱ्हाळे. शोभा  डुंबरे. मालती नवले  यांची  नेमणूक करण्यात आली  आहे.

       अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी यांची  पटसंख्या वाढवी तसेच लहान  मुलांचे  कुपोषण निर्मूलन करावे.व पूर्व प्राथमिक शिक्षण  लहान  मुलांना देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतील. गरम  व ताजा आहारापासून लाभार्थी वंचित  राहणार  नाही. या बाबत  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी  संघांचे  राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश  दातखिळे व जिल्हा अध्यक्ष सविंद्रा बोऱ्हाडे यांनी उपस्तित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन सोनाली हांडे यांनी केले.केंद्र सरकारने  व महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे  गांभीर्याने लक्ष  देऊन जगण्या इतके वेतन  द्यावे अशी  अपेक्षा कर्मचाऱ्यांची  आहे.

    शैलेजा  कोऱ्हाळे. अनिता थोरात.  रंजना  देवाडे.रंजना गायकवाड.राजश्री शेळकंदे. नंदा  गायकवाड.विदया ढोले. अरुणा  दुराफे. वनिता  ढोले. गुलाब वाबळे. स्मिता वाघुले. पुलावती थोरवे.शिला  मातेले गंगुबाई साबळे. मीना चकवे रोहिणी गवारी.तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संखेने उपस्थित होत्या. 



जुन्नर, महाराष्ट्र 410502, भारत

शनिवार, जानेवारी २२, २०२२

हिरडा कारखान्यांचे चेअरमन प्राणांतिक उषोषण करणार |

हिरडा कारखान्यांचे चेअरमन प्राणांतिक उषोषण करणार |

काळू शेळकंदे


जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील कुकडेश्वर आदिवाशी हिरडा कारखान्यास शासनातर्फे आर्थिक मदत करण्यास शासन जाणूनबुजून चालढकल करत असल्याने येत्या २६ जानेवारी पासून तहसिल कार्यालयासमोर प्राणांतिक उषोषण करणार आहेत. याबाबत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन काळू शेळकंदे व मारुती वायाळ यांनी माहिती दिली.

याबाबत मुख्यमंत्री ,आदिवाशी मंत्री ,जिल्हाधिकारी व संबंधित विभागास निवेदन देण्यात आले आहे. जुन्नर ,आंबेगाव, व खेड तालुक्यातील  आदिवाशी शेतकऱ्यांनी एकत्र येवून श्री कुकडेश्वर आदिवाशी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी  संस्था सन १९९९ रोजी स्थापन केली आहे. संस्थेचे सुमारे ३हजार सभासद आहेत. संस्थेने खानापूर येथे कारखाना उभारला असून सर्व यंत्रसामग्री आणली आहे परंतु शासन आर्थिक मदत करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याने कारखाना अडचणीत आला असून तो सुरु करता येत नाही असे शेळकंदे यांनी सांगितले ,
  या कारखान्यात हिरडा या फळावर प्रक्रिया करुन उत्पादन करण्यात येणार आहे. हिरडा फळास आदिवासी महामंडळाकडून अल्प प्रमाणात बाजारभाव मिळत असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येवून हिरड्यावर  युडीसीटी (रसायन ) मुंबई येथे संशोधन करुन त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादित मालास जागतिक बाजारपेठ असल्याने हा कारखाना उभारला. शेतकऱ्यांनी सुमारे ६७लाख भागभांडवल उभारले तसेच सहकार विभागाकडून  १कोटी २१लाख घेतले तर नाबार्ड करुन १कोटी ६७लाख कर्ज घेतलेले आहे. 

संस्थेचा प्रकल्प  कार्यान्वित  होण्यासाठी  शासनाकडून  सुमारे तीन कोटीची आवश्यकता आहे ,याबाबत सन १९९९ पासून आदिवाशी विभागाकडे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वेळोवेळी प्रस्ताव सादर केले आहेत परंतु शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.


आदिवासी मंत्री मधुकर पिचड , विष्णू सावरा ,बबनराव पाचपुते, के.सी पाडवी या सर्वानी प्रस्तावाबाबत संचालक मंडळाबरोबर अनेक बैठका  घेतल्या परंतु सदर बैठकामध्ये प्रकल्पाला मदत करण्यासाठी ठोस निर्णय घेतला नाही असे ही शेळकंदे यांनी सांगितले ,
  संस्थेने वेळोवेळी प्रयत्न करौनही आदिवासी विभागाकडून  संस्थेला योग्य न्याय मिळाला नाही ही खेदाची बाब आहे.
 आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांनी २२जानेवारी २०२०रोजी बैठक घेवून शबरी वित्त महामंडळाकडून ७कोटी ९६लक्ष देण्याबाबत मान्यता दिली. याबाबत आदिवासी विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रस्ताव सादर केलेले होते.
त्यानंतर १४जून २०२१रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही, संस्थेच्या प्रस्तावात जाणूनबुजून वेगवेगळ्या प्रकारच्या त्रूटी काढून पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या जातात. संस्था पूर्तता पूर्ण करुन देत असतानाही शासनाकडून आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ करत आहे,
    संस्थेच्या सभासदांचा व संस्थेचा राजकीय नेत्यांनी वारंवार आश्वासन देवून गैरफायदा घेतला आहे. संस्थेला कशा अडचणी निर्माण कशा होतील या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत असा आरोप ही शेळकंदे यांनी केला आहे. संस्थेने नाबार्ड कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असून संस्थेचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे.

आदिवासी मंत्री व आदिवासी विभाग यांच्या समवेत  २२जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सामंजस्य करार करुन संस्थेस आर्थिक सहाय्य करण्याचे ठरले होते परंतु याबाबत पुढील कार्यवाही न करता अर्थसाह्य करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात आहे असे ही शेळकंदे यांनी सांगितले .

 श्री  कुकडेश्वर आदिवाशी हिरडा  कारखान्यास अर्थसाहय्य तातडीने मिळण्यासाठी येत्या २६जानेवारी पासून प्राणांतिक उषोषण करणार आहे असे ही या संस्थेचे चेअरमन काळू शेळकंदे यांनी सांगितले ,

चौकटीसाठी मजकूर
१) आदिवासी शेतकरी यांनी एकत्र येवून तयार केलेल्या संस्थेस आर्थिक सहाय्य देण्यास टाळाटाळ
२) नाबार्डचे कर्ज थकले
३) विद्युत पुरवठा बंद
४) राजकीय नेत्यांचा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न 
५) आदिवासी विभाग जाणूनबुजून  सतत अनेक त्रुटी काढून चालढकल करत आहे.

मंगळवार, जानेवारी ०४, २०२२

जुन्नर : मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी  savitribai

जुन्नर : मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी savitribai


जुन्नर : मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी



जुन्नर /आनंद कांबळे
: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी रूपष्री महिला विकास संस्था, जुन्नर येथील अश्विनी नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनल तळपे होत्या‌. यावेळी गृहपाल अर्चना पवार, रमेश पाटोळे, सुनीता शेळकंदे, बेबी गागरे यांची उपस्थिती होती. यावेळी सोनल तळपे या विद्यार्थीनींने 'व्हय मी सावित्री बोलते' ही एकांकिका सादर केली.

यावेळी विद्यार्थीनींशी संवाद साधताना अश्विनी नवले म्हणाल्या, "आयुष्य मध्ये आपण आपले एक उद्दिष्ट ठरवले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. तसेच यश संपादन करण्यासाठी कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे आणि असा जर आपला प्रवास असेल तर आपण नक्कीच यश संपादन करू शकतो."

जुन्नर वासियांसाठीही सावित्रीबाई व ज्योतिबांचे योगदान मोठे - अर्चना पवार

तर गृहपाल अर्चना पवार म्हणाल्या, "सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी सारा बंदी चळवळ उभी केली. दुष्काळी परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून न डगमगता ओतूर दुष्काळ निवारण करण्यासाठी मोठी अन्नछत्र उभारली. ओतूर खटला प्रकरणात स्वतःची ४५ एकर जमीन विकावी लागली. सावकारशी, जमीनदारांशी असहकार लढा पुकारला. दुष्काळ ग्रस्त मदतीसाठी सावित्रीबाई ओतुरला निवासी होत्या. त्यांनी ज्योतिबांना पत्र लिहून जुन्नर मधील दुष्काळ निवारण करण्यासाठी मदत पाठवावी असे कळवले. त्यामुळे जुन्नर वासियांसाठीही सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचे योगदान मोठे होते.

सावित्रीबाईंनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेत ९ विद्यार्थीनी होत्या. त्यात अस्पृश्य समाजातील अधिक विद्यार्थीनी असत. फुले ना मारेकरी पाठवण्यात आले, त्यात लहुजी साळवे होतें. त्यांनी आपल्या नातीमध्ये झालेला बदल शाळेत जाऊन पाहिला आणि फुले दांपत्याला मारण्याऐवजी ते त्यांचे रक्षणकर्ते झाले, असेही पवार म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वाती गवारी यांनी केले. तर दिपाली पारधी, संध्या रावते, अपेक्षा साबळे, धनश्री भवारी या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.