Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

क्राईम डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्राईम डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

एकाच घरात चौघांचे आढळले मृतदेह | पत्नी, मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

एकाच घरात चौघांचे आढळले मृतदेह | पत्नी, मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या



नागपूर : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात एकाच घरातील चौघांचे मृतदेह, आढळल्याने परिसरात तसेच नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.पत्नी,मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर येत आहे.

आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहेत.

मदन अग्रवाल असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मदन याने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी किरण, मुलगा वृषभ आणि मुलगी तोषिता यांची चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मदन हा चायनीजचा स्टॉल चालवत होता.मागील अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर अनेकांची उसनवारी होती. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. दयानंद पार्क परिसरात ज्या भाड्याच्या घरी मदन अग्रवाल यांचे कुटुंब राहत होते. तिथे आज सकाळपासून कुठलीही हालचाल

झाली नाही.त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आल्याने अग्रवाल यांच्या ओळखीतल्या काही लोकांना घरात कुठलीही हालचाल नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी येऊन दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा मदन अग्रवाल हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. तर आतील खोलीत पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

The bodies of four were found in the same house  Suicide of the head of the family by killing his wife and children


सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

तावीज(क्राईम डायरी)

तावीज(क्राईम डायरी)

तावीज (क्राईम डायरी)

फेसबुक लिंक https://bit.ly/2QD2J30
जोरदार वळीव पाऊस सलग तीन दिवस पडत होता. सकाळी कडक ऊन, उकाडा अन् दुपारी जोरदार पाऊस यामुळे शेतातील कामे लवकरच करावी लागत होती. यावर्षी वळिवाला लवकर सुरुवात झाल्यामुळे पाऊस अधिक आहे असे भाकीत जाणकार शेतकरी व्यक्त करत होते. विजेचा लपंडाव सुरू झाला होता. पांडूनाना शेतातल्या खोपीत बसून होता. समोरच वीज चमकायची तसं नानाचं काळीज हालायचं. नानाचं पाच एकर शेत एका जागेला होतं. दुपारची भाकरी खाऊन नाना हातात सुताची दोरी वळत होता. पुन्हा वीज झाली तसा नाना उठला अन् भांगलणीचं खुरपं खोपीच्या दाराम्होरं टाकलं. तेवढ्यात जोरात वीज झाली अन् समोरच लिंबाचं झाड जळताना दिसलं. तसा नाना स्वतःशी पुटपुटला, ‘थोरल्याला सांगितलं होतं लिंबाचं झाड इजेला धार्जिण असतंय; तवा तोडून टाक. पण म्हातार्याचं ऐकतंय कोण?’ पूर्ण झाड जळताना बघून नानाचं मन कालावलं. दोन-चार कुत्र्यांचा जोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला.
तसा नाना पावसातच उठला. हातात खुरपं अन् काठी घेऊन तो कुत्र्यांच्या आवाजाकडे जाऊ लागला. मळ्याच्या एका बाजूला ओढा होता. त्या ओढ्याकडे कुत्र्यांचा मोठा आवाज ऐकू आला. दोन-चार कुत्री माती उकरत होती. नाना पुढं जाईल तसं कुत्री नानावरच गुरगुरू लागली. तसा दगडाचा टिपिरा एकाला दिला, तसं ते ओरडतच पळालं. नानानं पुढं होऊन बघितलं नी नानाच्या काळजात धस्सं झालं.
आल्यापावली नाना माघारी फिरला अन् पावसातच नानानं घर गाठलं. काय बघितलं हे पोरग्याला सांगितलं. पोरगा पावसातनंच
पोलिसपाटलांच्या घरी गेला. ताबडतोब पाटलांनी पोलिसांना खबर दिली.
घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. फौजदार माणिक मनोहर यांनी पुढं होऊन पाहिलं आणि शिपायांना इशारा केला. साहेबांच्या इशार्याबरोबर पोलिस ओली माती उकरू लागले. उकरलं तेव्हा एका तरुणाचं प्रेत बाहेर आलं. कपड्यावरून तो तरुण शहरी भागातला वाटत होता. पण कोणताच ओळखीचा मागमूस नव्हता. प्रेत बाहेर काढण्यात आलं. प्रेताचा पंचनामा करून प्रेत पी. एम.ला पाठविण्यात आलं. पोलिस घटनास्थळी चौकशी करत होते. मात्र एकही वस्तू पोलिसांना संशयास्पद आढळून आली नाही.
जिथं प्रेत पुरलं होतं तिथं जवळपास नानाची खोप व दुसर्या दोन-तीन खोपी होत्या. जवळपास कायमची वस्ती नव्हती. त्यामुळे या तरुणाला कुणीतरी मारून आणून इथे पुरल्याचा अंदाज मनोहर यांनी बांधला. नानाकडे पुन्हा पोलिसांनी चौकशी केली. परंतु नानाला काहीच माहिती नव्हती. कुत्र्यांच्या आवाजावरून नानाला प्रेत दिसलं होतं.
पोलिस गावात येऊन मयत तरुणाचा फोटो दाखवून चौकशी करत होते; मात्र नानाच्या गावातील कोणीच त्या तरुणाला ओळखत नव्हते. डॉक्टरांच्या अहवालात गळा दाबून खून असा निष्कर्ष आल्याने खून करूनच प्रेत पुरले होते हे निश्चित. चार दिवस होऊनही मयताची ओळख पटत नव्हती. कोणत्याही पोलिस स्टेशनला संबंधित तरुणाच्या वर्णनाची केस नोंद नव्हती. त्यामुळे प्रेताची ओळख पटल्याशिवाय तपास करणं फौजदार मनोहर यांना अवघड झालं होतं.
पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा बारकाईने पाहणी सुरू केली. जवळपास 100 फुटांचा परिसर पिंजून काढला. अन् एक अंधूकसा धागा पोलिसांना मिळाला. एक लहानसा तावीज व त्याला बांधलेला काळा दोरा होता. त्याची बारकाईने मनोहर यांनी पाहणी केली. मयत तरुणाचा अथवा आरोपीपैकी एकाच्या गळ्यातील तावीज असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांनी लागलीच मोहल्ल्यात धाव घेतली. परंतु, हा तावीज या भागात मिळत नसल्याचे बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी सांगितले. पुन्हा पोलिसांचा भ्रमनिरास झाला. मग हा तावीज मिळतो कुठे? हा प्रश्न पोलिसांना पडला. तालुक्याच्या ठिकाणी असणार्या मशिदीमधील मौलवींना हा तावीज फौजदार मनोहर यांनी दाखविला. त्यांनी मात्र हा तावीज ओळखला. अशाप्रकारचे तावीज दुर्गम जिल्ह्यात मिळत असल्याची मौलवींनी माहिती दिली. ♍पोलिस एका जिल्ह्यात पोहोचले. परंतु नेमके कोणत्या तालुक्यात माहिती नसल्याने ते प्रत्येक तालुक्यात फिरू लागले. दोन-चार तालुके पालथे घालून आले. पोलिस कंटाळले अन् एका तालुक्यात मात्र पोलिसांना यश आले. सदरचा तावीज तालुक्यातील एका दर्ग्यासमोर विकत मिळत होता. पोलिस दर्ग्यासमोर पोहोचले. तावीज विक्रेत्यांची दोन दुकाने तिथे होती. एका दुकानदाराने तावीज आपण विकल्याचे सांगितले. तावीजच्या मागे काहीतरी खूण होती ती बघून आपण हा एक महिन्यापूर्वी विकल्याचे सांगितले. प्रेत सापडून दहा दिवस झाले होते. मात्र, अद्याप पोलिसांना ओळखही पटवण्यात यश आले नव्हते.
मयताचा तावीज असावा असा अंदाज करून फोटो दाखविताच दुकानदाराने ओळखला. तावीज घेताना आणखी एक तरुण त्याच्या बरोबर होता. पोलिसांनी दर्ग्याजवळच्या गावामध्ये जाऊन चौकशी केली. अगदी दहा-बारा गावांमध्ये चौकशी केल्यानंतर शेवटी एका गावातील मयत तरुण असल्याचे दिसून आले. त्याचे नाव महंमद शफीक असे होते.
प्रेताची ओळख पटल्यामुळे महत्त्वाचे काम पोलिसांचे झाले होते. महंमदची संपूर्ण कुंडली पोलिसांनी काढली. परंतु त्याचा कुणाबरोबर झगडा-वाद नव्हता. त्याचे कुणाशी अनैतिक संबंधही नव्हते, मग अशा तरुणाचा खून करून प्रेत एवढ्या लांब नेऊन कोण पुरेल हा प्रश्नच पोलिसांना पडला होता. तो एका कंपनीमध्ये कामाला होता, तिथे चौकशी केली. परंतु तिथेही त्याचे रेकॉर्ड चांगले होते. खबरेही कामाला लावले. घरातील माणसांना तो कामावर आहे एवढेच माहीत होते. कंपनीच्या समोर चहाची टपरी होती. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.♍
ज्यावेळी खून झाला त्याच्या आदल्यादिवशी महंमद व अन्य तिथे सुट्टी झाल्यानंतर चहा पिण्यासाठी इथे आले होते. त्यांच्यामध्ये कोणत्यातरी शैला नावाच्या महिलेची चर्चा सुरू होती, जे कामगार होते ते आता कामावर होते. त्याबरोबर हवालदार ठोंबरेंनी मनोहरना कल्पना दिली. टपरीवाल्याला घेऊन पोलिस कंपनीत गेले. बाजूला उभे राहून त्या तिघांना त्याने आळखले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
तिघांनाही पोलिसांचा चांगलाच पाहुणचार मिळाला. मात्र, महंमद कुठे आहे हे माहीत नाही असेच त्यांनी सांगितले. मात्र शैला कोण हे त्यांनी सांगितले. आपण महंमदला मारले नाही. आम्ही त्याला शैलावरून चिडवत होतो. असेच पालूपद त्यांनी लावले. पोलिसांनी कंपनी गेटवरून शैलाला ताब्यात घेतलं.
‘बोला शैला मॅडम, महंमद कुठे आहे?’ ‘मला काय माहीत नाही. अन् माझा काय संबंध त्याच्याशी?’ असा उलट सवालच तिने पोलिसांना केला. त्याबरोबर वाघमारे बाईंनी जोराचा दणका तिला दिला. त्याबरोबर ती धडपडली, रडू लागली, ‘साहेब, मीच मारलं महंमदला. मी त्याच्याकडून उसने पैसे घेतले होते. परंतु माझी पैसे परत करण्याची ऐपत नव्हती. त्या बदल्यात मी त्याला ‘हवे ते’ द्यायला तयार होते परंतु त्यानं मला सरळ नकार दिला.
तो सारखे आपले पैसे परत मागत होता. त्यामुळे शेवटी माझा नाईलाज झाला. कंपनीतील अशोक शिपायाला मी यामध्ये सामील करून घेतले. त्या बदल्यात मी त्याला ‘हवे ते’ दिले. अन् मग तो तयार झाला. पैसे देतो असे सांगून आम्ही त्याला माझ्या घरात नेऊन त्याचा दोघांनी गळा दाबला. अन् रात्रीच्या अंधारात त्याला पोत्यात घालून मोटारसायकलवरून दूर एका रानात पुरला. पण आम्ही कसं काय सापडलो काय माहीत?’ ‘चला मॅडम स्टेशनला, आम्ही तुम्हाला तिथेच समजावून सांगतो आणि तुम्ही दोघेही आता तुरुंगात बसा हिशेब करत.’ असे सांगून अशोकलाही ताब्यात घेतले.♍
तावीज (क्राईम डायरी)

सोमवार, जुलै २७, २०२०

क्राईम डायरी : काम फत्ते

क्राईम डायरी : काम फत्ते

 क्राईम डायरी  

काम फत्ते(?). 

रामा वॉचमन म्हणून एम. आय. डी. सी. मध्ये कामाला होता. दुपारी चारला कामावर आलेला आता रात्री 12 ला ड्युटी संपवून तो घरी जाण्याच्या गडबडीत होता.

‘सकाळी लवकर उठून नदीजवळ जनावरांसाठी वैरण आणायला जायला पाहिजे, नाहीतर 50 रुपये दंड भरावा लागेल’ या विचारातच तो होता. त्याने गाडी कंपनीतून बाहेर काढली. किक मारून तो गाडी घेऊन तो फाट्यापर्यंत आला. लघुशंकेसाठी त्याने गाडी थांबवली. रस्त्याच्या बाजूला तो गेला. आज रात्रीचा अंधार अधिकच दाटून आला होता. या रस्त्यावर वाटमारी होते हे तो ऐकून होता. त्यामुळे आपले आवरून तो निघणार एवढ्यात समोर त्याला काहीतरी दिसलं, तशी त्यानं गाडी सुरू करून गाडीचा लाईट त्यावर पाडला अन् तो दचकला. जवळ जावून बघतोय तर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
तो वाचमन म्हणून ड्युटी करत असल्याने व निवृत्त सैनिक असल्याने त्याने प्रथम जवळच्या पोलिस स्टेशनला फोन केला. घटनेची खबर मिळताच हावलदार ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. रामाकडून माहिती घेऊन त्याला जाऊ देण्यात आले. रामा गाडी चालवित होता. परंतु, त्याने पाहिलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
रात्र भरपूर झाल्यामुळे घटनेची खबर हावलदार ठोंबरेंनी वरिष्ठांना देऊन रात्रभर प्रेताजवळ पहारा दिला. सकाळीच फौजदार रोहिणी सुतार या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातच पावसानंही आज जोर धरला होता. दोन पंचासमक्ष पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टेमला पाठविण्यात आले. फौजदार सुतार यांनी मयताची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक कारखान्यात पोलिसांना पाठवून दिले. मात्र, प्रत्येकजण ही व्यक्ती आमच्याकडे नव्हतीच असेच सांगत होते. त्यामुळे मयताची ओळख पटणे कठीण झाले होते.
आता खून होऊन चार दिवस झाले तरी मयताची ओळख पटत नव्हती. वृत्तपत्रात बातमी व मयताचा फोटो दिल्यानंतर पाच दिवसांनी एक हॉटेल मालक फौजदार रोहिणी सुतार यांना भेटण्यास आला.
‘मॅडम, आज पेपरला आलेला मयताचा फोटो पाहून आलोय. त्याबरोबर पोलिसांनी त्याला बसण्यास खुर्ची दिली. आता बोला,’ या सुतार यांच्या वाक्याने तो पुढे बोलू लागला. ‘मॅडम, मयत तरुण हा माझ्या हॉटेलात कामाला होता. परंतु, चार दिवसांपासून तो कामालाच आला नाही. आता पेपरमध्ये फोटो बघून आलोय, मात्र तो कोठून आलाय हे माहीत नाही. बहुतेक तो बिहार भागातील असावा.’ ओळख पटत होती. मात्र बाकीचे धागेदोरे लागत नव्हते. मयताचे नाव रामनरेश होते. एम. आय. डी. सी. सोडून तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करत होता. मग इकडे कसा आला हा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलिसांनी एम. आय. डी. सी. मधील ज्या ज्या कारखान्यात परप्रांतीय कामगार आहेत तिथे चौकशी केली; परंतु काहीच धागा हाती लागत नव्हता. त्यामुळे मयत तरुण कुठला अन् त्याचा खून कोणी केला असावा? याचा अंदाजच फौजदार सुतार यांना येत नव्हता. एम. आय. डी. सी. मधील एकही परप्रांतीय तरुण मयत रामनरेशला ओळखत नव्हता.
आठवडा उलटला तरी मयत तरुणाची चौकशी करण्यासाठी कोणीच आले नव्हते. ज्या हॉटेलमध्ये तो काम करत होता तिथे पोलिसांनी तपास करण्याचा निर्णय घेतला. साध्या वेशामध्ये पोलिस हॉटेलमध्ये बसले होते. चार तास बसूनही हावलदार ठोंबरेंच्या हाती काहीच लागले नव्हते अन् अचानक काऊंटरजवळ ‘रामनरेश आया था क्या?’ असा प्रश्न हॉटेल मालकाला एक तरुण करत होता. त्याबरोबर हॉटेल मालकांनी पोलिसांना इशारा केला, त्याबरोबर बाजूला बसलेल्या चार पोलिसांनी त्या तरुणाला पकडले. पोलिस स्टेशनला आणून त्याची चौकशी सुरू केली.♍
‘मॅडम, हम बिहार से आये है, मैं गाँव गया था, लेकिन चार दिनसे रामनरेश नहीं मिला था, आज सुट्टी थी इसलिए मिलने आया था’ त्याच्याकडून माहिती घेऊन एक पथक बिहारला पाठविले. दुसर्या दिवशी बिहारहून आलेल्या नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत देण्यात आले. बिहारमध्ये हावलदार ठोंबरेंनी कसून चौकशी केली. कारण गावठी कट्ट्यामधून गोळ्या झाडून रामनरेशचा खून करण्यात आला होता. त्यामुळे खुनी हे बिहारमधीलच असावेत, असा पोलिसांना संशय होता. मात्र बिहारमध्ये रामनरेशचे कुणाशी वैर नव्हते. मग मात्र खुनी हे एम. आय. डी. सी. विभागातीलच असावेत असा अंदाज बांधून पोलिसांनी बिहार सोडले. शिवाय बिहारमध्ये रामनरेशचे पोलिस रेकॉर्ड नव्हते. वेगवेगळ्या अँगलनी तपास करूनही पोलिसांना यश येत नव्हते. खून होऊन 12 दिवस उलटून गेले होते. त्यामुळे तपास लागणार की, रेंगाळणार असे प्रश्न वृत्तपत्रातून झळकत होते.
एम. आय. डी. सी. विभागात येणार्या प्रत्येक ट्रकवाला व कंपनीच्या कामगारापासून चहाच्या टपरीवाल्यापर्यंत कोणीच रामनरेशला ओळखत नव्हते. मग हा त्या माळावर कशासाठी अन् का गेला? हा प्रश्न सुटल्यास खुनाचा गुंता सुटणार होता. मात्र, हाच गुंता सुटत नव्हता.
20 व्या दिवशी मात्र पोलिसांना एक धागा मिळाला. मयत रामनरेश हा एका कंपनीत काम करणार्या कृष्णकुमारच्या घरी नेहमी जायचा. या खबरीने मात्र पोलिसांना संजीवनी मिळाली. पत्ता शोधत पोलिस कृष्णकुमारच्या घरी पोहोचले. दरवाजा ठोठावताच एका महिलेने दरवाजा उघडला. ‘मॅडम, आप रामनरेश को पहचानते हो क्या?’ या प्रश्नावर ती थोडीशी बावरली व ओळखत नाही असे उत्तर दिले. बाहेर अंगणात दोन लहान मुले खेळत होती. हावलदार ठोंबरेंशी गप्पा मारत तेथेच थांबले. हावलदार प्रकाश यांनी बाहेर अंगणात खेळणार्या मुलांकडे मोर्चा वळविला.
‘मुलांनो, रामनरेश काकांना ओळखता का?’ या प्रश्नावर दोन्ही मुलांनी मान हलवली अन् मग पोलिसांना हायसे वाटले. कृष्णकुमार घरी नव्हता. त्यामुळे पोलिस माघारी फिरले. रात्रीच्या वेळी पोलिस दबा धरून बसले. रात्री 12 च्या दरम्यान कृष्णकुमार घरी आला. पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली. मात्र ‘रामनरेश माझा मित्र होता, मी त्याचा खून का करू?’ हे पालूपद त्याने लावले होते. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. तरीसुद्धा कृृष्णकुमारच्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली.
एके दिवशी दुपारी दोघेजण कृष्णकुमारच्या घरी शिरले. हावलदार ठोंबरेंनी ताबडतोब फौजदार सुतार यांना माहिती दिली अन् ताबडतोब ठोंबरेंनी त्या दोघांना कृष्णकुमारच्या घरातच पकडले. पोलिस स्टेशनला आणून रामकुमार व प्रेमनाथला पोलिसांनी बदडून काढले.♍
मग मात्र पोलिसांचा मार असहाय्य झाल्यामुळे दोघांनी तोंड उघडले, ‘साल्याला आम्हीच मारलं मॅडम, गेला साला नाहीतर आणि कुणाच्यातरी बहिणीची अब्रू त्यानं लुटली असती मॅडम’ असे ते म्हणू लागले.
बिहारमधल्या एका खेड्यात आम्ही राहत होतो मॅडम, मी रामनरेश, रामकुमार व प्रेमनाथ असे तिघे मित्र होतो. त्यामुळे प्रत्येकाचे घरी नेहमी येणंजाणं असायचं. अशीच माझी (प्रेमनाथची) बहीण रानात-जंगलात जळण आणण्यासाठी गेली होती. मात्र त्या हरामखोर रामनरेशनं 12 वर्षांच्या माझ्या बहिणीची अबू्र लुटली मॅडम. जात पंचायतीमध्ये केस गेली. तीन महिने माझी बहीण अंथरुणाला खिळून होती. तिचं मन हरवलं होतं. जात पंचायतीनं त्याला गाव सोडण्यास सांगितलं, पण तो मुंबईला आला अन् या तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलात काम करू लागला. कृष्णकुमारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली होती. परंतु कृष्णकुमारला आम्ही काहीच कळू दिले नाही. त्या दिवशी आम्ही कृृष्णकुमारला भेटण्यासाठी आलो होतो. त्या दिवशी परत जाताना चौकातील एका लॉजमधून कृष्णकुमारची पत्नी व रामनरेशला बाहेर पडताना पाहिले अन् आम्ही निर्णय घेतला, ‘हा सुधारणार नाही.’ दुसर्या दिवशी गावाकडे जावून गावठी कट्टा आणला. हा रामनरेश कृृष्णकुमारच्या घरी वारंवार येणार हे आम्हाला माहीत होतं. एका मोटारसायकलवरून हा येत होता. रात्रीचा अंधार होता अन् त्या अंधारातच चाप ओढला. काम फत्ते झालं. मोटारसायकलवाला पळून गेला अन् आम्ही इथेच राहिलो.’ रितसर खटला चालून दोघांनाही शिक्षा झाली♍

. क्राईम डायरी  _  काम फत्ते(?)

🔸क्राईम डायरी: कार नं. 333🔸

🔸क्राईम डायरी: कार नं. 333🔸

♦️  (क्राईम डायरी). ♦️

⭕कार नं.‘ट्रीपल थ्री’⭕
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव 
________________________
कर्ज फेडण्यासाठी व वरकमाई करण्यासाठी काही संशयितांनी वृद्धेचे घरातून अपहरण केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=207886202942644&id=100011637976439
तिला कारच्या डिकीत कोंबून कार शहराच्या बाहेर सुसाट निघाली. शहराबाहेर आल्यानंतर कारमधील संशयितांनी डिकी उघडून पाहिली असता, त्यांना धक्काच बसला. तर, दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीतून तीन वेळा ‘3’ आकडा असणार्या वाहनाचा शोध घेत मुंबईतून वृद्धेच्या अपहरणकर्त्यांचा शोेध घेतला. संशयितांकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. फक्त मालमत्तेचा वाद आणि कर्जापोटी दिलेल्या पैशांसाठी केलेले अपहरण दोन कुटुंबांसाठी घातक ठरले.
दूपारच्या सुमारास शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या इमारतीत कार शिरली. कारमधून तीन व्यक्ती पटापट उतरल्या. काही क्षणातच त्यांनी इमारतीतील एका सदनिकेत प्रवेश केला. सदनिकेत एक वृद्धा झोपलेली होती. तिघांनी मिळून झोपलेल्या चादरीतच गुंडाळून वृद्धेला उचलले आणि पुन्हा कारच्या दिशेने आले. त्यांनी डिकीत चादरीत गुंडाळलेल्या वृद्धेस टाकून कार पुन्हा इमारतीच्या पार्किंगमधून बाहेर काढून शहराबाहेर भरधाव पळवली. शहर सोडल्यानंतर घाटात त्यांनी कार थांबवली. तिघांच्या चेहर्यांवर घाम निथळत होता. तरीदेखील तिघांच्या चेहर्यावर काम फत्ते केल्याचा असुरी आनंद झळकत होता. कारचालकाने घाट परिसरात मोकळा श्वास घेत कारची डिकी उघडली. चादर बाजूला करत त्यांनी वृद्धेला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चालकाच्या पायाखालची माती सरकली. त्याने ही बाब दोघांना सांगताच पुन्हा तिघांच्या चेहर्यावर भीतीचे ढग जमा झाले. वृद्धेचा डिकीतच गुदमरून मृत्यू झाला होता. त्यामुळे तिघांनी वृद्धेचा मृतदेह घाटातच टाकून कार मुंबईच्या दिशेने पळवली.♍
दुसरीकडे, वृद्धेचा मुलगा कुंदन व त्याची पत्नी अंजलीने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, वृद्धा सापडली नाही. त्यामुळे हतबल होत अंजलीने पोलिस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. अंजली घाम पुसतच पोलिस ठाण्यात शिरली. ‘साहेब, माझ्या सासूचे तीन संशयितांनी घरातून अपहरण केले आहे, तिचा शोध घ्या,’ असे म्हणतच अंजलीने मदतीची याचना केली. ठाणेदारानेही याची दखल घेत ताबडतोब वरिष्ठांना माहिती कळवली. तातडीने पोलिसांचे पथक अंजलीच्या घरी आले. पोलिसांनी अंजलीसह शेजारच्यांकडे चौकशी केली. त्यावेळी अंजलीने सांगितले की, ती मुलांसोबत बाहेर गेली होती. घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश करून सासूबाईंना शोधले, तर सासूबाई दिसल्या नाहीत. शेजारच्यांकडे विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला सांगता येणार नाही. मात्र, काही युवक चादरीत अवजड सामान घेऊन इमारतीतून बाहेर पडताना दिसले. पोलिसांनी त्यांचा मोर्चा शेजारच्यांकडे वळवला. त्यांनीदेखील हीच माहिती दिली.
त्या युवकांनी चादरीतील सामान एका चारचाकी वाहनाच्या मागील डिकीत टाकल्याचे सांगितले. म्हणून पोलिसांनी आणखीन खोलात शिरून शेजारच्यांकडे गाडीबद्दल, संशयितांबद्दल विचारपूस केली. त्यात वाहनाचा रंग राखाडी होता आणि वाहनाच्या क्रमांकात तीन वेळा 3 हा आकडा असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी ट्रिपल थ्री असलेल्या वाहन क्रमांकाचा शोध सुरू केला. या क्रमांकाशी संबंधित सर्व वाहनक्रमांकाची यादी आल्यानंतर पोलिसांनी शेजारच्यांना आणि अंजलीला कोणता क्रमांक होता ते विचारले. त्यावेळी अंजलीची नजर एका क्रमांकावर वारंवार जात असल्याचे पोलिसांनी हेरले. पोलिसांनी या वाहन क्रमांकांची चौकशी केली असता, ते वाहन मुंबईस्थित विलासचे असल्याचे समजले. पोलिसांनी विलासबद्दल अंजलीकडे विचारपूस केली असता, विलास आपला नातलग असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
त्यांनी आणखी चौकशी केली असता, अंजली माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी मुंबईत पथक पाठवून विलासला नाशिकला आणले. विलासकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, घटनेच्या दिवशी त्याचा दिनक्रम सांगण्यात त्याला अडचण आल्याचे पोलिसांनी हेरले. त्यामुळे त्यास पोलिसांनी सखोल प्रश्न विचारले असता, तो ढसाढसा रडला. पोलिसांनी एकमेकांकडे पाहत गुन्हा उलगडत असल्याचा विश्वास व्यक्त केला.♍
विलास अंजलीचा मेव्हणा. व्यापारासाठी विलासने अंजलीचा पती कुंदनला लाखो रुपये उधार दिले होते. या पैशांच्या जोरावर कुंदनने व्यवसायात पकड पकडली. मात्र, कालांतराने मालमत्तेची विभागणी झाल्याने कुंदनसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे कुंदनने विलासला पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर विलासने वैतागून अंजलीकडे तगादा लावला. संपत्तीचा वाटा पडल्याने आपल्यालाही कमी संपत्ती मिळाल्याचा राग अंजलीच्या डोक्यात होता. त्यामुळे त्यांनी संगनमत करून सासूचे अपहरण करण्याचा कट रचला. अपहरण करून कुंदनच्या भावाकडे मोठी रक्कम मागून कर्जाची परतफेडही होईल आणि आर्थिक संकट दूर होईल, असे अंजली आणि विलासला वाटले. त्यानुसार दोघांनी मुंबईतीलच दोन युवकांना हाताशी धरत अंजलीच्या सासूचे अपहरण केले. मात्र, चादरीत गुदमरून सासूचा मृत्यू झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून विलासच्या कारचा क्रमांक न सुटल्यानेच या गुन्ह्याची उकल करण्यात यश आल♍

सोमवार, जुलै २०, २०२०

🔹क्राईम डायरी🔹

🔹क्राईम डायरी🔹

आषाढवारी

 (क्राईम डायरी)

  तरण्या पावसानं जोर धरला होता. साध्या खापरीची घरं आता पाणी झिरपू लागली होती. दमदार पावसानं अनेक घरांच्या भिंती पडत होत्या.
पडलेल्या भिंतीना काहीजण कागद लावत होते. पावसाचा जोर वाढतच होता. नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गावात पसरत होतं. म्हातारी माणसं पाठीवर इरलं घेऊन पूर बघत होती. पण वाढत्या पाण्यामुळे काही कुटुंबांना प्रशासन इतरत्र हलवत होतं. तासभरात पांडूनानाच्या घरात पुराचं पाणी शिरणार हे निश्चित होतं. त्यामुळे घरातील सामान इतरत्र हालविण्याचे काम सुरू होतं. पांडूनानाची पोरं बाहेर काढण्यात आली.♍
सायंकाळी सहाला पाणी नानाच्या घरात शिरलं तसा नाना घाबरला. कच्च्या मातीच्या भिंती वाडवडिलांनी बांधलेल्या. चार पोरींचे लग्न करण्यातच नानाचं आयुष्य गेलं. घर काय बांधता आलं नाही. आता भिंती कोसळणार याच विचारानं नानाला वेढलं होतं. अंधार पडला होता. पाऊस वाढतच होता. तसा नानाचा जीव खालीवर होत होता.
अंधाराच्या रात्रीत गावातील वीजही गायब झाली होती. रात्रीचे अकरा वाजले होते तसा नाना पुन्हा पाण्यातून आपल्या घरात आला अन् त्याला धक्काच बसला. एका तरुणाचे प्रेत नानाच्या घरात अडकून बसलं होतं. नानाचं काळीज पडलं हे काय नवं झेंगट म्हणून त्यानं प्रेत हलविण्याचा प्रयत्न केला. तसा कुजका वास त्याच्या नाकात घुसला. तसा तो मागे झाला. अन् सरळ सरपंचाच्या घरी जाऊन वार्ता दिली. तसे सरपंच व पोलिसपाटील यांनी पोलिसांना बोलावून घेतले. रात्रीची वेळ, धुवाँधार पाऊस अशा स्थितीमध्ये हवालदार ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले. रात्र फार झाल्याने प्रेत घरातच पुराच्या पाण्यात ठेवून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी फौजदार रावबहाद्दूर आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. प्रेताचा पंचनामा करून प्रेत कुजल्यामुळे जागेवरच पीएम करण्यात आले.
आता दमदार पावसात प्रेताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांना अवघड झाले होते. खबर्यांनाही सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, महापुरातून नेमके कोणत्या गावातून प्रेत वाहून आले असेल हे कळणे अवघड होते. भर पावसात पोलिसांनी ओळख पटविण्यास सुरुवात केली. परंतु, पांडूनानाच्या गावातील किंवा शेजारच्या गावातील ही व्यक्ती नव्हती. मग मयत व्यक्ती कोण? हा प्रश्न पडला होता.
पोलिसांनी दोन दिवस गावे पालथी घालूनही ओळख पटत नव्हती. शिवाय कोणत्याही जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला बेपत्ता व्यक्तीची नोंद नव्हती. डॉक्टरांनी अहवाल दिला. त्यामध्ये चाकूचे पोटावर वार करून खून करण्यात आल्याचे डॉक्टरांनी अहवालात लिहले होते. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे हे आता वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे मयत व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय तपास करणे फौजदार रावबहाद्दूर यांना कठीण झाले
होते.
चौथ्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंड्या रवाना झाल्या होत्या. पांडूनानाच्या गावातूनही दिंडी रवाना झाली होती. जवळपासच्या नदीकाठच्या दहा-बारा गावातून फेरफटका मारत पोलिस तपास करत होते. हावलदार ठोंबरे ठोसर गावात आले. गावच्या पाराजवळ जुनी मंडळी बसली होती. पुराच्या बातम्या काही मंडळी वाचत होती. तेवढ्यात हावलदार ठोंबरे तिथे पोहोचले. त्यांनी मयताचे फोटो त्यांना दाखविले. त्याबरोबर एकजण उत्तरला, ‘आ! हे शिंद्याचं विष्ण्या’ त्याबरोबर ठोंबरेनी पारावरच बसकान मारलं. कोतवालाला बोलावून घेण्यात आलं. त्यानं विष्णू शिंदेचं घर ठोंबरेना दाखवलं. विष्णूची पत्नी रेणुकाला फोटो दाखविताच तिने हंबरडा फोडला. तशी गल्लीतील माणसं गोळा झाली. काय झालं म्हणून प्रत्येकजण चौकशी करू लागला.
विष्णू शिंदे पंढरपूरला दिंडीतून गेला अन् मग हा फोटोतला कोण? असा प्रश्न जो-तो करू लागला. पांडूरंगानं माझ्या धन्याला कसा नेला? असं म्हणून रेणुका ऊर बडवून रडू लागली. प्रेत ताब्यात घेण्यासाठी जबाबदार माणसे घेऊन ठोंबरे पोलिस स्टेशनला पोहोचले. प्रेत बघताच सर्वांना प्रेताची ओळख पटली. प्रेत विष्णूचेच होते. सोपस्कार पूर्ण करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रेताची ओळख पटल्यामुळे फौजदार रावबहाद्दूर यांनी तपासाचा वेग वाढविला. नातेवाईक व ग्रामस्थही तो दिंडीतून आषाढवारीला गेला असे म्हणत होते. मग त्याचं प्रेत पांडूनानाच्या घरात पुरातून कसे आले? हा प्रश्न पोलिसांना सोडवायचा होता. पोलिसांनी ठोसर गावची दिंडी जिथे असेल तिथे जाण्याचा निर्णय घेतला. गावातून दिंडीचा मार्ग विचारून घेतला. पोलिसांची गाडी दिंडी तपासात पुढे जात होती. पंढरीपासून दोन मुक्काम
अंतरावर एका शाळेत ठोसरची दिंडी
उतरली होती. फौजदार रावबहाद्दूर तिथे पोहोचले.
दिंडी प्रमुखाला त्यांनी बाजूला बोलावून घेतले. सगळे दिंडीतील लोक घाबरले. कोणालाच कळेना नेमके काय झालंय ते. सगळेजण पोलिसांकडे पाहू लागले.
‘साहेब विष्णू शिंदे दिंडीत आलाच नाही तर त्याच्याबद्दल आम्ही काय सांगावं.’ तसं सगळ्यानीच विष्णू दिंडीत आला नसल्याचं सांगितलं. तसा पोलिसांना प्रश्न पडला. बायको म्हणते व ग्रामस्थही म्हणतात विष्णू दिंडीतून गेला. परंतु इथं तर उलटे आहे पोलिस तिथून पुन्हा ठोसर गावात आले.
गावात विष्णूच्या बायको-रेणुकाविषयी चौकशी केली. तर अतिशय सोज्वळ चेहरा म्हणून ती प्रसिद्ध होती. कुणाशीही वैर नाही, वागणं अत्यंत नम्र, चरित्र्यसंपन्न. त्यामुळे पोलिसाना पुन्हा पेच पडला. पोलिसांनी पुन्हा पोलिस स्टेशनला गाडी घेतली. गाडी गावातून जात असताना पोलिसांना पाहून एक मुका माणूस काहीतरी खुणा करत असल्याचे फौजदार रावबहाद्दूरांनी पाहिले. तशी काहीतरी डोक्यात चमक येऊन त्यांनी ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगितले. गाडी पुन्हा मुक्याजवळ आली. रावबहाद्दूरांनी मुक्याला गाडीत घेतलं. त्याला पोलिस स्टेशनला आणलं.
मुका काहीतरी खाणाखुणा करून मारल्यासारखं दाखवत होता. परंतु, पालिसांना ते कळत नव्हतं. एका मुकबधिर शाळेतील शिक्षकांना बोलवून घेण्यात आले. अन् मग थोडा तपशील उलगडला. मारेकरी एक नव्हे तर मुक्याच्या म्हणण्याप्रमाणे दोन होते. एक बाई व एक वारकरी पुरुष. आता रावबहाद्दुरांना खात्री पटली. विष्णू दिंडीस गेला होता. परंतु दिंडीत येण्यापूर्वी त्याचा खून करण्यात आला होता.
विष्णू अगदी साधाभोळा माणूस. दोन पोरांचा पिता. अतिशय धार्मिक वृत्तीचा. गेली 15 वर्षे तो पायी आषाढवारी करत होता. मुक्याला बोलावून घेण्यात आले. विष्णूची बायको रेणुकालाही पोलिस चौकशीला बोलावण्यात आले. लांबूनच मुक्याला दाखविण्यात आलं. तसं
त्यानं काहीसं प्रात्यक्षिक करून
पोलिसांना दाखविलं. मग मात्र खुनी
कोण? हे रावबहाद्दुरांनी ओळखलं. ताबडतोब रेणुकाला अटक करण्यात आली.
दोन दिवस मार खाऊनही आपण काहीच केलं नाही असं ती सांगत होती. परंतु, मार असह्य झाल्याने तिसर्या दिवशी तिनं तोंड उघडलं. ‘होय साहेब आम्हीच मारलं माझ्या नवर्याला!’ असं म्हणून ती रडू लागली. अन् तिनं नाव सांगितलं ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. ज्याच्याशी पोलिसांनी चर्चा केली तो दिंडीप्रमुख नामदेव महाराजच खुनी निघाला.♍ पंढरपुरातून त्याला अटक करण्यात आली. मात्र, समोर रेणुकाला बघून तो गारच पडला. मुक्याने दोघांनाही ओळखले. अन् मग मात्र महाराजांनी तोंड उघडले.
‘साहेब आम्हीच मारलं विष्णूला. तेही रेणुकाच्या सांगण्यावरून. विष्णू व रेणुका आमच्या शेतात नेहमी कामाला असायची. विष्णू नेहमी पूजाअर्चा -धार्मिक कृत्ये यामध्ये नेहमी पुढे असायचा. त्यामुळे काहीवेळा तो मजुरीवर उशिरा यायचा. त्यावेळी रेणुका व मीच शेतात असायचो. त्या दिवशी मी बांधाला बसलो असताना रेणुकाचा पदर छातीवरून ढळला. अन् मी बघतच राहिलो हे तिच्या लक्षात येताच ती हसली. अन् मग त्या दिवसापासून आमचे प्रेमसंबंध निर्माण झाले.
त्यावेळी रेणुकाला मुल नव्हते. नवीन लग्न होऊनही तो नेहमी भजन कीर्तन यातच रंगलेला असायचा अन् रेणुका मात्र तळमळायची अन् मग तिने माझा आधार घेतला. तिला दोन मुले झाली. तसं त्या दोघांचं बिनसू लागलं. अन् याचा फायदा मी घेतला. दोन्ही मुलं नामदेवचीच म्हणून तो रेणुकाशी आतल्या आत भांडायचा. त्यामुळे रेणुका वैतागली होती. एके दिवशी तिने मला याचा काटा काढा नाहीतर माझ्याकडे येऊ नका? असे सांगितले. परंतु माझ्या व रेणुकाच्या संबंधाची गावात कुठेच कुणकुण नव्हती.♍
त्यादिवशी वारीला सकाळी लवकर म्हणून तो उठला. पाऊस जोरात कोसळत होता. शौचालय नसल्याने तो नदी बाजूला शौचालयास आला. पहाटेचे चार वाजले होते. मी व रेणुकाही पाठोपाठ आलो. मी त्याचे तोंड दाबून धरून चाकूने वार केले. रेणुकाने त्याला कवळ्यात दाबून धरले. पाच मिनिटात तो संपला ते प्रेत वाहत्या महापुरात टाकून देऊन मी अंघोळ करून देवळात आलो. अन् दिंडी घेऊन पंढरपूरला प्रयाण केले. प्रेमात बेभान झाल्याने मला विचारच सुचला नाही साहेब. इथे विचारांवर अविवेकाची मात झाली.’ रितसर खटला चालून नामदेव महाराज व रेणुकाला जेलची हवा खावी लागली.♍

आषाढवारी