Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

हत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २१, २०१८

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

कुऱ्हाडीने वार करून सख्या भावानेच केली भावाची हत्या

 ललित लांजेवार:
वारंवार होणाऱ्या भांडणातून चिडलेल्या लहान भावानेच सख्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील नकोडा येथे शुक्रवारी घडली. 
बिसु शिवानंद शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी लहान भाऊ दिपक शिवानंद शर्मा याला घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ हा तापट,उर्मट,व गुंड प्रवृत्तीचा असल्याने मोठा भाऊ बिसु व लहान भाऊ दीपक यांच्यात नेहमी वाद व्हायचे,हा वाद जास्तच विकोपाला जात असे,शुक्रवारी देखील बिसुने दिपकशी भांडण केले व झोपी गेला.अश्यातच राग धरून असलेल्या लहान भाऊ दीपकने त्याला जीवनेशी मारण्याचा मनात कट रचला व बिसू गाढ झोपेत असतांना घरातील कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले.
या हल्ल्यात बिसुचा जागीच मृत्यू झाला व दिपकने घरातून पळ काढला.घरचे इतर व्यक्ती कामानिमित्य बाहेर गेले होते ते घरात येताच बिसू रक्ताने माखलेला दिसताच आरडा ओरड करण्यात आली व यांची माहिती घुग्गुस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले.शेवटी रात्री उशिरापरीयंत दिपकला नकोडा परिसरातुन अटक करण्यात आली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात PSI राहुल थांगणे,संतोष धांडेवार,गोपाल अतकुलवार,सचिन बोरकर,विनोद वनकर,सुधीर मत्ते करीत आहेत.





बुधवार, जुलै ०४, २०१८

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या

हत्या साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळील ढाब्या जवळ एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे.  प्रवीण पेंडाने राहणार नेहरू नगर  असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ५ ते ६ युवक लोहारा गावातील एका धाब्यावर पार्टी करण्याकरिता आले होते.हे सर्व दारूच्या नशेत होते आणि काही क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले.व त्यात एकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली, वृत्तलिहित परियंत मृतकाचे नाव कळू शकले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव आपल्या ताब्यात घेऊन शव शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक दीपक गोतमारे करीत आहेत.


सोमवार, जून ११, २०१८

नागपूर हादरलं! भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या

नागपूर हादरलं! भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या


नागपूर/प्रतिनिधी:
नागपूरकरांची आजची पहाट हादरा उडवणारी ठरली आहे. कारण एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्या आहे. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी येथील आहे.
कमलाकर पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शनिवार, मे १९, २०१८

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

ठेचून खून साठी इमेज परिणामनागपूर/प्रातिनिधी:
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.
शनिवारी सकाळी विशाल मानकरचा मृतदेह नरसाळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सकाळी ७ वाजता ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. विशालच्या मृतदेहाशेजारी दगड आणि दारूची बाटली पडून होती. त्यामुळे आरोपीने दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर विशालला दगडाने ठेचून मारले असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज काढला. विशाल कॅटरर्सचे काम करायचा. फावल्या वेळेत तो जुने फर्निचर विकत घेणे आणि ते चांगले करून विकण्याचे काम करायचा. त्याची हत्या करणारे कोण, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
   -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

सोमवार, एप्रिल १६, २०१८

मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

गोंडपिपरी (चंद्रपूर) :
हत्या साठी इमेज परिणाम
 चार दिवसापुर्वी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना चंद्पूर जिल्हातील गोंडपिपरी तालूक्यातील हिवरा गावात समोर आली होती. दुर्घटना असल्याचा बनाव केल्याचे आता समोर आले असून, ही मोठ्या भावानेच लहान भावाला मारल्याचे समोर आले आहे.आनंदराव मशाखेत्री असे मृत्यू झालेल्या लहान भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी खुशालराव मशाखेत्री (मोठा भाऊ) व त्याची पत्नी अर्चना विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 
याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख करित असल्याची माहिती धाबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जिवन लाकडे यांनी दिली.आंतरजातीय विवाह केलेल्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात खुशालराव आपल्या कुटूंबियासह आनंदरावांच्या मुलीला घेऊन गेला होता. ''दुसऱ्या समाजातील तरूणासोबत विवाह करणाऱ्याच्या कार्यक्रमाला माझ्या मुलीला का नेले''? यावरून दोन्ही भावात वाद झाला. दरम्यान, रागच्या खुशालराव याने आनंदरावच्या डोक्यावर उभारीने वार केले.यात तो गंभीर जखमी झाला. चंद्रपूरात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेची चर्चा तालूक्यात जोर धरू लागल्यानंतर आरोपीच्या पत्नीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच आनंदराव मांडवावरून कोसळ्याल्यामुळे त्याचा मृत्यू खुशालराव आणि अर्चना यांनी बनाव केला. यानंतर पोलिस तपासात ही हत्या असल्याचे समोर आले.

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

 नक्षल्यांकडून पोलिस पाटलाची हत्या

नक्षल्यांकडून पोलिस पाटलाची हत्या

गडचिरोली/प्रतिनिधी:
बुधवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील पोलिस पाटलाची  दगडाने ठेचून व नंतर गळा चिरुन नक्षलवाद्यांनी हत्या केली. कटिया पैका कुमोटी(५४) असे मृत पोलिस पाटलाचे नाव आहे. 
                     कटिया कुमोटी हे बुधवारी पत्नी, मुलगा व सुनेसह आपल्या शेतात गेले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास १५ ते २० हातात  शस्त्र  नक्षलवादी शेतावर गेले. त्यांनी पोलिस पाटील कटिया कुमोटी यास बाहेर नेले. कटियाच्या पत्नीने जाब विचारला असता नक्षल्यांनी काहीही उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी गावा बाहेरच्या जंगलात कटियाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करुन नंतर गळा चिरण्यात आला, अशी प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी लांजी गावानजीकच्या जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांचा कटिया पैका कुमोटी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशय होता याच संशयावरुन नक्षल्यांनी कटिया कुमोटी याची हत्या केली असावी, असा अंदाज आहे सध्या वर्तविल्या जात आहे.

शनिवार, जानेवारी १३, २०१८

मानकापूरमध्ये युवकाची हत्या

मानकापूरमध्ये युवकाची हत्या

दोघांना अटक, वैमनस्यातून गेम
नागपूर/प्रतिनिधी:
 एका युवकाची क्षुल्लक कारणावरुन दारुच्या नशेत दोन मित्रांनीच निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मानकापूर हद्दीत श्रीहरीनगर परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. 
मंगेश श्रावण खोटे (२८) रा. प्लॉट नं. ६१, गणपतीनगर, महाराजा अपार्टमेंट नं. २, च्या मागे स्वामीनगर असे मृतकाचे नाव आहे. जयकिशोर उर्फ जॉकी राजकुमार लोन्हारे (२८) तथा राजकुमार नंदलाल लोन्हारे अशी आरोपींची नावे आहेत. 
पोलिस सुत्रानुसार, मंगेश, जॉकी व राजकुमार हे तिघेही मजूर असून सोबतच काम करतात. काही दिवसांपूर्वी मंगेश खोटे याच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. यावेळी जयकिशोर याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मंगेशने याची माहिती आपली आई पुष्पा खोटे हिला सांगितली. तिने आपल्या मुलाला घेऊन लिन्हारे यांचे घर गाठले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्षाने समजुत काढून वाद मिटविला. मात्र शुक्रवारी रात्रीला मंगेश हा राजकुमार यांच्या घरी जात असल्याचे सांगुन घरुन निघाला. तिघांनी बसून येथेच्छ दारु ढोसली, दरम्यान त्यांच्यात वाद झाला. दारु पिऊन असल्याने वाद विकोपाला गेला. आणि दारुच्या नशेत दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून मंगेशची हत्या केली. रात्र होऊनही मंगेश घरी परत न आल्याने आई पुष्पा ही शोधासाठी निघाली असता श्रीहरीनगर येथे त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले दिसला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

 नक्षलवाद्यांकडून युवकाची गळा चिरून हत्या

नक्षलवाद्यांकडून युवकाची गळा चिरून हत्या

एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा जंगलातील घटना
गडचिरोली /प्रतिनिधी
पोलीस आणि नक्षलवाद्यांचा वाद काही संपता संपेना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा - जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथील जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. मनोज राजू नरोटे रा. झारेवाडा, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गट्टा -जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किमी अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगल परिसरात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षापूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परत आला असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. मात्र, आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटे याचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.

चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या  असल्याच्या संशयावरुन धानोरा तालुक्यातील ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भू-सुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर पडियलमेट्टा जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनांवरून झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मद्य प्राशन करून रोज घरी भांडण करण्यासह पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने रागाच्या भरात डोक्यावर धारधार शास्त्राने सपासप वार करून हत्या केली. सोमवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास दुर्गापूर पोलिस स्टेशन  हद्दीत हा प्रकार घडला . या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .

या प्रकरणातील आरोपी शंकर दोडके यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.सोमवारी आरोपी शंकर दोडके हा कामआटोपून घरी दारूच्या नशेत आला. आल्यानंतर त्याची पत्नी वआरोपी शंकर यांच्यात वाद झाला.

शंकर हा दारूच्या नशेत असल्याने व आधीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने रंगाच्या भरात व दारूच्या नशेत पत्नीवर धारधार शस्त्राने सपासप वार केले व तिला जागीच संपविले .या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ  गाठून पंचनामा करत आरोपी शंकर दोडकेयास ताब्यात घेतले.

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

गळा चिरून तरुणाची हत्या

गळा चिरून तरुणाची हत्या


नागपूर - वाडी येथील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जितू कालबांडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. रविवारी डिफेंस येथे आठवडी बाजार असल्याने त्याने मित्रासोबत चांगलीच दारू ढोसली होती. त्यानंतर डिफेंस परिसरात गेला. तिथे वादची ठिणगी पडली व त्याची गळा कापून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 

वाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रूग्णालयात दाखल केले. आरोपीचा शोध वाडी पोलीस घेत आहेत.

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

यवतमाळ / प्रतिनिधी :-  उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील प्राथ.उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रदीप शेळके (७) रा.पार्डी याचा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला व आश्रमशाळा परिसरात असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. प्रकरणी बिटगाव पोलीस ठाण्यात अप.क्र. १८४/२०१७ भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप चा खून करणा:या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आज अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
    प्रदीपच्या खूनामुळे ढाणकी शहरात व परिसरात तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेतून व सोशल मिडीयामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे नेतृत्वाखाली  युध्द पातळीवर तपास करण्याचे आदेश दिले होते.
    गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथक गुन्हा घडले पासून आश्रम शाळा परिसरात तळ ठोकून होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज सकाळी शाळेतील एका विद्याथ्र्यास शौचास गेल्यावर एक चिठ्ठी मिळून आली. सदर चिठ्ठी मध्ये चिठ्ठी लिहीणा:याने एका विद्याथ्र्यांचा फोटो चिटकवून हा गुन्हा मी केला आहे असा मजकूर लिहीला होता. त्यावरुन पोलीसांनी तपास केला असात सदर चिठ्ठी लिहीणा:या  मुलानेच मयत प्रदीप याचा रविारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्यास शेततळे परीसरात घेवून गेला व त्या ठिकाणी प्रथम त्यांचे डोक्यावर फरशीच्या दगडाने मारुन त्यानंतर स्वत:चे करदोळ्याने त्याचा गळा आवळून खून केला.
    सदर खूनाचा आळ हा दुस:यावर यावा या उद्देशाने त्याने चिठ्ठी लिहीली होती. यातच तो फसला. पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने रविारी केलेल्या कृत्याबाबत पोलीसांना सविस्तर सांगितले. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७

कौटुंबिक कलहातून प्राचार्य वानखेड़े यांची हत्या

कौटुंबिक कलहातून प्राचार्य वानखेड़े यांची हत्या

प्राचार्य वानखेडेच्या खुनाचा उलगडा 24 तासांचा आत
नागपूर :(ललित लांजेवार)
शुक्रवारी सकाळी नागपूर चंद्रपूर मार्गावरील निरी गेटसमोर प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या  खुनाचा तपास नागपूर पोलिसांनी 24 तासात लावलेला आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली ति म्हणजे कुटुंबीयांनीच सुपारी देऊन प्राचार्य वानखेड़े यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.


55 वर्षीय प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हे चंद्रपूरमधल्या टुकूम इथल्या खत्री कॉलेजमध्ये प्रचार्च पदावर कार्यरत होते. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अनिता, विवाहित मुलगी सायली आणि मुलीचा मित्र शुभम सहारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्राचार्य वानखेडे यांची नागपुरात हत्या झाल्यानंतर चे वृत्त पसरताच त्यांच्या हत्येमागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते कोणी म्हणत होते की सध्या विद्यापीठात निवडणुकीचे वारे सुरू आहे तर कुणी काही वेगळं! यातच पोलिसांनी तपास योग्य दिशेने फिरवला आणि समोर जे आलं ते अतिशय धक्कादायक होत

नागपूरच्या शुक्रवारी प्राचार्य वानखेडे यांची  तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. वानखेडे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुचाकीने रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र वर्धा रोड परिसरातील निरी संस्थेसमोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी पाडून तलवारीने त्यांची हत्या केली.

वानखेड़े यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते.याच कौटुंबिक वादातून 4 लाखांची सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली पत्नी अनिता वानखेडे आणि मुलीने पोलिसांना दिली. त्यापैकी 20 हजार रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते. वानखेडेंच्या मुलीच्या मित्राने भाडोत्री मारेकरी शोधण्यास मदत केली. हे मारेकरी हत्येच्या 2-3 दिवस आधी प्राचार्य वानखेडे यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते.आणि अखेर शुक्रवारी त्यांनी वानखेडेंची हत्या केली. शुभम सहारे याची माहिती दिल्यानंतर मारेकरी निघून गेले.

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे अतिशय तापट स्वभावाचे होते. घरी किंवा बाहेरही त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील वातावरण तणावाचं असायचं. ह्यालाच कंटाळून त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली.

या प्रकरणी पत्नी, मुलगी, तिचा मित्र आणि दोन मारेकऱ्यांना अटक केली असून दोन मारेकऱ्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत  आहे.

शुक्रवार, नोव्हेंबर ०३, २०१७

 चंद्रपूरच्या प्राचार्याचा नागपुरात खून

चंद्रपूरच्या प्राचार्याचा नागपुरात खून

नागपूर/प्रतिनिधी :ललित लांजेवार

नागपुरात नीरी गेट जवळ चंद्रपूरच्या एका प्राचार्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मोरेश्वर वानखडे (वर्ष 55) असे या प्राचार्यांचे नाव असून ते चंद्रपूर येथील एका प्रख्यात खत्री कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असल्याचे सांगण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे,मोरेश्वर वानखडे यांची आज सकाळी ८ च्या सुमारास उघड़किस आली. नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागपूर शहरात असलेल्या निरी पर्यावरण संशोधन संस्थेसमोर अध्न्यात व्यक्तींकडून तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली ,नागपुरात गेल्या 3 दिवसातील तिसरी खुनाची घटना आहे, या घटनेविषयी सध्या प्राथमिक माहिती मिळाली असून अध्न्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बजाजनगर पोलीस (नागपूर) अंतर्गत सुरु आहे.



चंद्रपूरच्या तुकूम भागातील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांच्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट नसले तरीही वैयक्तिक भांडणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूरमधील नामांकीत महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे यांच्या हत्येने नागपूर आणि चंद्रपूर येथे खळबळ उडाली आहे. उपराजधानीत नरेंद्र नगर भागातील रहिवासी डॉ. वानखेडे गेली ९ वर्षे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम बघत होते. रोज सकाळी आपल्या दुचाकीने रेल्वे स्टेशनवर जात असत. स्टेशनवर दुचाकी वाहन पार्क करून ते रेल्वे गाडीने चंद्रपूरला जात. रोजप्रमाणे आजही सकाळी ते आपल्या घरातून निघाले. पण, कॉलेजला मात्र पोहोचलेच नाहीत. त्यांच्या पत्नी अनिता वानखेडे देखील पेशाने शिक्षिका आहेत.

पहाटे ४.१५ च्या सुमारास नागपूर पोलिसांना शहरातील गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या मार्गावरील निरी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराहून काही अंतरावर हा मृतदेह पडला होता. जवळच पडलेल्या मोबाईल फोनमुळे हा मृतदेह प्राचार्य वानखेडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.