Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

राष्ट्रवादी काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राष्ट्रवादी काँग्रेस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑक्टोबर २७, २०१८

 रा.यु.काँग्रेसने केला जिल्हा शल्यचिकित्सकांचा घेराव

रा.यु.काँग्रेसने केला जिल्हा शल्यचिकित्सकांचा घेराव

Image may contain: 6 people, people sitting, table and indoorचंद्रपूर/प्रतिनिधी:-
मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूर च्या शासकीय रुग्णालयात चार महिन्यात एकूण 125 हून अधिक नवजात बालकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. सरकारी दवाखान्यातील मृत्यूच्या सरासरी पेक्षा हि आकडेवारी जास्त असल्यामुळे सरकारी दवाखान्यातील भोंगळ कारभाराचा विषय चव्हाट्यावर आला होता. त्यातच भर म्हणून की काय एक धक्कादायक बाब समोर आली असून *दसऱ्याच्या दिवशी तब्बल सहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. या गंभीर विषयासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना घेराव करण्यात आला. 
चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून या महाविद्यालयामुळे उच्चशिक्षित व आधुनिक तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा होती परंतु रूग्णालयातील भोंगळ कारभारामुळे व बालमृत्यू सारख्या गंभीर गैर प्रकारामुळे सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. या रूग्णालयात जवाबदारी असलेल्या अनेक डॉक्टरांचे स्वतःचे शहरात दवाखाने असल्याने येथील सेवेत दुर्लक्ष करून स्वतः च्या दवाखान्यातील रूग्णांकडे जास्त वेळ व लक्ष देतात यामुळे सुध्दा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल गंभीर आहे. 
व म्हणून आजारी झालेल्या रूग्णालयाच्या स्थितीकडे तातडीने लक्ष देण्यासह बालमृत्यू ला जवाबदार असणार्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना घेराव केला. 


सदर शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शिक्षक सेलचे शहर अध्यक्ष निमेश मानकर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, मागासवर्गीय सेलचे शहर अध्यक्ष महेंद्र लोखंडे, रा.वि.का.शहर अध्यक्ष सुजित उपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप रत्नपारखी, जिल्हा सरचिटणीस संजय ठाकूर, प्रतिक भगत, जेष्ठ पदाधिकारी किसनराव झाडे, युवा नेते राहूल आवळे व सिंहल नगराळे, पवन बंडिवार, प्रफुल कूचनकर, संजय रामटेके, बिट्टू ढोरके, आशु मत्ते, राहूल भगत सह पदाधिकारी उपस्थित होते..

रविवार, डिसेंबर १०, २०१७

लाटणे मोर्चा घेऊन मुन्ना यादवला पकडून देऊ

लाटणे मोर्चा घेऊन मुन्ना यादवला पकडून देऊ

#हल्लाबोल पदयात्रेच्या नवव्या दिवशी बुटीबोरीकडे मार्गक्रमण करताना आसोलाजवळ #धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. खासदार @supriya_sule यांना शाल-श्रीफळ भेट देत धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी त्यांनी केली.
नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही- सुप्रिया

बुटिबोरी सभा-  राष्ट्रवादी हल्लाबोल

बुटिबोर/ प्रतिनिधी -
मुन्ना यादवला अटक होत नाही याला जबाबदार आहेत. मी माथुरजींना सांगू इच्छिती की तुम्ही राज्याची कायदा व सुव्यवस्था पाहा. आम्ही महिला लाटणे मोर्चा घेऊन या मुन्ना यादवला पकडून देतो, असा प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. बुटिबोरी सभेत त्या बोलत होत्या.
मा. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मी दरवर्षी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला येत असे. मी लहान होते तरीही नागपूरमध्ये फिरताना कधीच भीती वाटली नव्हती. पण आता नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या
या सरकारने शिवस्मारकाच्या भूमिपूजनावर पाच कोटी खर्च केले. तेच पैसे जर स्मारकासाठी खर्च केले असते तर आतापर्यंत काम चालू झाले असते.
राज्य सरकार जाहिरातींवर वारेमाप खर्च करत असल्याची बाब समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मारकाची जाहिरात जोरात केली. मात्र दोन्ही स्मारकांचे काम सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका गोष्टीसाठी दाद द्यावी लागेल. ते सफाईनं खोटं बोलतात. 'मी लाभार्थी'च्या कॅम्पेनमध्ये सर्व खोट्या जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यामुळेच ते कॅम्पेन बंद करावे लागले. विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. इथल्या महिलांची पांढरी कपाळं पाहून पोटाला पिळ बसतो. मला प्रश्न पडलाय इतकं सगळं विदर्भात होत असताना मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागते, असा हल्ला त्यांनी चढविला.

 
हल्लाबोल पदयात्रेच्या निमित्ताने गेले नऊ दिवस आम्ही विदर्भाचे हाल पाहत आहोत. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे झालेले नुकसान नैसर्गिक असते. मात्र विदर्भात सरकारच्या नाकर्त्या वृत्तीमुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत.
- बुटिबोरी सभा


फसव्या योजना आणि यांचा फोटो जनतेला दाखवण्यासाठी ने साडेतीन हजार कोटी खर्च केले आहेत. यांनीही ३५० कोटी जाहिरातींवर खर्च केले.
- बुटिबोरी सभा

नोटाबंदीनंतर जीएसटीचा झटका सरकारने दिला. सुरुवातीला जीएसटी कसा भरायचा हे व्यापाऱ्यांना न कळल्यामुळे व्यवहार करणेच त्यांनी बंद केले होते. - बुटिबोरी सभा
बोंड अळीचे संकट नैसर्गिक असले तरी हा प्रश्न सोडवता आला असता. योग्य वेळीच बियाणे तपासून बदलले गेले असते तर आज विदर्भातील जनतेला अश्रू ढाळण्याची परिस्थिती आली नसती.
-

 
कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच माणसांना जाळून मारत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागायचा? त्यामुळे जनतेने आता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे सभेला पांठिबा देऊन सरकारचा धिक्कार करावा.

विदर्भातील लोकांचा भ्रमनिरास झालाय. शेतकरी देशोधडीला लागलाय. बेरोजगारी वाढली. जुन्याजाणत्या लोकांना माझं सांगणं आहे की विदर्भातील जनता एकटी नाही. सर्व महाराष्ट्र विदर्भातील जनतेच्या पाठीशी उभी आहे. त्यासाठीच हा आहे.

 

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

भाजपने जनतेचा विश्वासघात केला

भाजपने जनतेचा विश्वासघात केला

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे*

वर्धा/प्रतिनिधी - विश्वासाने जनतेने भाजपला निवडून  दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेलसुरा जिल्हा वर्धा येथील सभेत केला.
विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही.सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुरेखा ठाकरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आज एकूण 14 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी यात्रा वर्धा येथे जाणार आहे.

#हल्लाबोल मोर्चाच्या आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात देवली येथून झाली. एका जिनिंग मध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.

बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार

सत्ताधाऱ्यांना काँग्रेसची भीती वाटत आहे: शरद पवार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2019 ची काँग्रेसच्या निवडणुकीची तयारी बघता राज्यकर्त्यांना राहुल गांधी यांची भिती वाटू लागली आहे.त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात बंद झालेल्या प्रकरणाची फाईली पुन्हा उगदून काढून काँग्रेसची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.  ज्या इटालियन माणसावर ठपका होता तोही आता जिवंत नाही.राहुल गांधींवर बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असा थेट आरोप पवार यांनी मेळाव्यात बोलताना केला.


शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून स्थानिक नागपूर रोड वरील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात आयोजीत मेळाव्यात कार्यकर्तांना संबोधतांना म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की इंदिरा गांधी यांना तुरुंगवास झाल्यानंतर  फक्त 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. हा घड़लेला इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत.त्यांनी हा ईतिहास आठवावा,चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही चंद्रपूर जिल्यात मोठया प्रमाणात दारू विक्री आजही होत आहे. दारूबंदी करायची होती तर त्या संबंधी ठोस कायदे निर्माण करून केलीस असती तर बंदीतल्या दारू बंदीचा काही फायदा झाला असता. मात्र, या सत्ताधाऱ्यांनी या बंदीच्या निमित्तानं भ्रष्टाचार वाढवले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार असे वाटत नाही



दारूबंदी उठवा; लिकर असोशिएशनचे शरद पवारांना निवेदन

दारूबंदी उठवा; लिकर असोशिएशनचे शरद पवारांना निवेदन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील दारूबंदीमुळे अनेक लोकांचे परिवार रस्त्यावर आले. अनेक लोकांच्या हातून काम गेले त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला,राज्यशासनाच्या कोट्यवधींचा महसूल बुडाला, त्यामुळे हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिकर असोशिएशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.शरद पवार हे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यावेळी  शासकीय विश्रामगृहात हे निवेदन देण्यात आले.
करोडोचे कर्ज परवाना धारक बार मालकावर आहे,दारूबंदी झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात पोलीस करोडो रुपयाची दारू जप्त करत आहे.यावर दारूबंदी पूर्णतः फसली आहे,अशी हि फसवी दारूबंदी उठविण्यासाठी व शासनाचा कोट्यावधीचा महसूल भरून काढण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल,यांच्यासह लिकर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

सरकारने जनतेचे प्रश्न सोडवावे;शरद पवार यांचे चंद्रपुरात वक्तव्य

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आणि गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीत नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे.सरकारने येथील बंद उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे.  ह्या  जिल्ह्यातील लोकांचे ,रोजगार व आर्थिक प्रश्न सरकारने  सोडवले नाही आणि युवकांच्या हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक नक्षलवादाकडे कसे वळतात, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे . त्यामुळं सरकार कोणतीही असो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर असलं पाहिजे.- शरद पवार
sharad pawar साठी इमेज परिणाम

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

  नागपूर /प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतःहून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले.शरद पवार सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत ,शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला जात असताना कार आणि टिप्परचा अपघात झाला त्यात चारजण अडकली होती . हा अपघात बघून पवारांनी त्यांची गाडी थांबवली आणि ते स्वत: अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

अपघातग्रस्त कारचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. यावेळी स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले

रविवार, नोव्हेंबर १२, २०१७

राष्ट्रवादी आेबीसी सेलचे जनजागृती अभियान

राष्ट्रवादी आेबीसी सेलचे जनजागृती अभियान

नागपूर/प्रतिनिधी- प्रदेशाध्यक्ष आमदर सुनील तटकरे, विधिमंडळाचे गटनेते अजीत दादा पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी संघटनात्मक समन्वयासाठी व ओबीसी जनजागृती अभियान रथयात्राी तयारी, नियोजनासाठी खालील मान्यवरांची निरीक्षक म्हणून नियुक्ति केली कृपया नोंद घ्यावी • गडचिरोली - श्री वामनराव झाडे - ९४२२१३६६९९ • चंद्रपुर -  श्री सतीश ईटकेलवार - ९९२३०११९९९ • यवतमाळ - श्री हिराचंद बोरकुटे - ९४०५१५४४४३ • वर्धा - श्री उत्तम गुल्हाणे - ९८५०९१३५३३ • गोंदिया - श्री नरेश अरसडे - ९४२२११७२४१ • भंडारा - श्री अविनाश गोतमारे - ९८११३१५७१ • ऩागपुर - श्री ईश्वर बाळबुधे - ९८२२२२५५८१ • अमरावती - श्री गोविन्द भेराणे - ९४२१८३६१२५ • अकोला - श्री मंगेश भटकर - ७७६९८०४६७८ • वाशीम - श्री राजु गुल्हाणे • अहमदनगर - अॅड सचिन औटे - ९९२१९१२७४२ • धुळे - श्री उमेश सोनवने ९८९०९३४९६२

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार -  ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढणार - ईश्वर बाळबुधे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु होणार जनजागृती रथयात्रा...

नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी समाजाला भाजप सरकारनं फक्त आश्वासनांची गाजरंच दाखवली आहेत. भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यभर जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष Ishwar Balbudhe यांनी दिली. आज राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये पार पडली.

ही जनजागृती रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसापासून सुरु करण्यात येणार आहे. या जनजागृती रथयात्रेमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. ही रथयात्रा नागपूरहून सुरु करण्यात येणार आहे.

त्यामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहीर करा, राज्यमागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतीगृह, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ४ हजार कोटी भागभांडवल दया, ओबीसी दाखले सुलभरित्या मिळावेत, क्रिमीलेअरची अट रद्द करा, शेतमालाला खर्चावर आधारीत भाव दया, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अमलात आणा, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, विधानपरिषद,विधानसभा,लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण दया, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, महिलांना सबलीकरण अशा मागण्यांचा समावेश असणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष भगवान कोळेकर, दत्तात्रय घाडगे, नानासाहेब राऊत, राज राजापूरकर, सचिन आवटे उपस्थित होते.

#NCP #OBCCell #RathYatra