Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

शुक्रवारपासून हल्लाबोल पदयात्रा

यवतमाळ - नाकर्त्या सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल पदयात्रेची माहिती देण्यासाठी आज यवतमाळ येथे आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधला. ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यातून जाऊन 12 डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावावर धडकणार आहे.
राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही. या संकटास राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हेच जबाबदार आहेत.

बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतक-यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाई पोटी शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.