Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपुर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै २९, २०२२

 state government approved RDSS worth around 39,602 crore

state government approved RDSS worth around 39,602 crore

 Mumbai:Keeping in mind the need for further empowerment and modernization of the current electricity distribution system to meet the increasing demand of electricity in the future, the state government has recently approved the Revamped Distribution Sector Scheme(RDSS) of about 39 thousand 602 crore to improve the quality of electricity supply, reduce distribution losses and enhance consumer service.

In order to improve the financial stability of the power distribution companies in the state, the RDSS will be implemented with the financial assistance of the Central Government. Due to this scheme, there will be a radical change in the power distribution system of MSEDCL. Features of the scheme are to improve financial stability and operational efficiency through conditional financial assistance, strengthen basic distribution infrastructure, improve quality and availability of power supply, focus on energy audit through smart metering and provide funds for power loss reduction works.

To provide quality, reliable and affordable power supply to the consumers of MSEDCL, to reduce technical and commercial losses to 12 to 15 percent by FY 2024-25 and to bring to zero the gap between the average cost per unit of electricity supply and the average revenue per unit by FY 2024-25. These are the main objectives of this scheme.

In the scheme smart meters will be installed to 1 crore 66 lakh consumers and about Rs 11 thousand 105 crore will be spent on this. Special efforts will be made to reduce the distribution losses and about Rs. 14 thousand 231 crore will be spent on this. This includes construction of 527 new 33/11 KV sub-stations at various places in the state, capacity enhancement of 705 sub-stations, installation of about 29 thousand 893 new distribution transformers and development of SCADA system in 21 cities of the state etc. Similarly, about 14 thousand 266 crore will be spent on empowerment and modernization of power distribution system.

As smart meters will be installed in this scheme, the customers will get accurate electricity bills and as a result, distribution loss will reduce and increase revenue. Also, due to this scheme, uninterrupted and quality power supply will be supplied to the customers. Special efforts have been made by Mr. Vijay Singhal, Chairman and Managing Director of MSEDCL under the guidance of Principal Secretary (Energy) of the State and Chairman and Managing Director of MSETCL Mr. Dinesh Waghmare for the approval of this scheme.

सोमवार, जुलै १८, २०२२

 नागपुरातील दोन युवा वकिलांचा मनसेत प्रवेश

नागपुरातील दोन युवा वकिलांचा मनसेत प्रवेश





सध्या महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळलेली राजकीय परिस्थिती, राजकारणाचा घसरलेला स्तर यामध्ये बदल करण्याचे सामर्थ्य फक्त मनसे अध्यक्ष *श्री राजसाहेब ठाकरे* यांच्यात आहे हे लक्षात घेऊन नागपूर मनसे करीत असलेल्या चांगल्या कामाला मजबुती प्रदान करण्याच्या उद्देशाने आम्ही आज मनसेत प्रवेश करीत आहोत असे प्रतिपादन नागपुरातील युवा वकील *ॲड. यशोधन गानु व केयुर रहाळकर* यांनी केले. #maharashtranavnirmansena

 मनसे राज्य सरचिटणीस *श्री हेमंत गडकरी* यांच्या उपस्थितीत या दोघांनी मनसेत प्रवेश केला.
 शहर अध्यक्ष *अजय ढोके*  विभाग अध्यक्ष *तुषार गिऱ्हे*, विभाग उपाध्यक्ष *चेतन बोरकुटे* व इतर मनसे पदाधिकारी  यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड.यशोधन व केयुर यांच्या सारख्या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर  मनसेला नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त करून हेमंत गडकरी यांनी मनसेचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. रामदास पेठ व धरमपेठ सारख्या शहरातील उच्चभू समजल्या जाणाऱ्या परिसरातील या युवा वकिलांच्या प्रवेशामुळे शहरात मनसेचे जाळे सर्वत्र पसरते आहे असे अजय ढोके यांनी सांगितले.  ॲड. यशोधन गानु व ॲड. केयुर रहाळकर व सहकारी यांच्या मनसे प्रवेशासाठी विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी पुढाकार घेतला.

#maharashtranavnirmansena #maharashtra #mnsadhikrut #rajsaheb #rajsahebthackeray #isupportrajthackeray #mns #rajthackeray #amitthackeray #manse #mumbai #mnsadhikrutmumbai #maharashtramaza #mipanrajsaheb #maharashtrian #balanandgaonkar #ig #rajsamarthak #marathi #fc #isupportavinashjadhav #mnsadhikrutpune #mnsadhikrutnashik #amitthakrey #maharashtrasainik #cmomaharashtra #rajupatilmns #maharashtrapolitics #mipanrajthakery #adityathackeray  #maharashtranavnirmansena #maharashtra @mnsadhikrut 

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

 हरीश तिवारी बने अध्यक्ष पश्चिम नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( मीडिया सेल ) #NCPMEDIACELL

हरीश तिवारी बने अध्यक्ष पश्चिम नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ( मीडिया सेल ) #NCPMEDIACELL



संगठन को मजबूत करेंगे: अमित दुबे।

राष्ट्रवादी कांग्रेस मिडिया सेल के जिलाध्यक्ष नागपुर शहर अमित दुबे इन्होंने नववर्ष के उपलक्ष्य मे हरीश तिवारी की "पश्चिम नागपुर अध्यक्ष" पद पे नियुक्ति की है हरीश तिवारी पिछ्ले कुछ वर्षो से सामाजिक क्षेत्र से जुडे है कोरोना महामारी के समय उन्होने विभिन्न सामाजिक कार्यो मे समिल्लित होकर कईयो बेसहारा लोगो की निस्वार्थ भावना से मदत की थी उनके द्वारा इस तरह के उत्कृष्ट सामाजिक कार्यों को देखते हुए पार्टी ने इस बात की दखल देते हुवे उनकी नियुक्ति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मीडिया सेल मे की गयी।

   इस अवसर पर हरीश तिवारी इन्होंने कहा कि वे शहर भर का दौरा करके संगठन को बढ़ाने व मजबुत करने का कार्य अपनी टीम के साथ व राष्ट्रवादी कांग्रेस मीडिया सेल नागपुर शहर जिलाध्यक्ष अमित दुबे के नेतृत्व में मीडिया सेल संबंधित समस्याओं को लेकर सदैव कार्य करते रहेंगे।

  हरीश तिवारी इन्होंने अपनी नियुक्ति पर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विजय विश्वकर्मा, सुनील लव्हात्रे, प्रकाश पसेरकर, शीतल नंदनवार, अवनीश सिंह, आकाश शर्मा इन सभी का आभार माना व ऐसा ही मार्गदर्शन मिलता रहे ऐसी विनंती की है। 


सोमवार, मे १७, २०२१

 कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी  ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी

‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 

नागपूर, ता. १७ : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये नागरिकांमध्ये खूप भीती आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असतानाच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचा-याची धडपड सुरू आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक जण आता सुरक्षेबाबत सजग झालेला आहे. आता कोरोना पाठोपाठ इतर आजारांचा शिरकाव होत आहे. याला कोरोनामधून बरे झालेले रुग्ण जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे संकटाला थोपवून लावण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाने मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर वा जिथे गर्दी होत असेल अशा ठिकाणी किमान काही महिने जाणे टाळणे आवश्यक आहे. एकूणच कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाने सुरक्षेची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

  नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.१७) व्हॅस्कूलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट डॉ.अतुल रेवतकर आणि कन्सल्टंट रेडिओलॉजीस्ट डॉ.वर्षा सारडा यांचे 'कोव्हिड नंतरची गुंतागुंत फायब्रोसिस व थ्रोम्बोसिस निदान व उपचार' या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

  कोरोनामध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावर अनेक औषधांचा उपचार केला जातो. जीव वाचविण्यासाठी अनेक ‘हेवी डोज’ सुद्धा द्यावे लागतात. त्याचा प्रभाव प्रतिकारशक्तीवर पडतो. परिणामी रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला कमजोरी जाणवते. अशा वेळी रुग्णाला फायब्रोसिस व थ्रोम्बोसिसचा धोका संभावतो. फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारे बदल व त्यातून पुढे संभावणारा धोका. ते टाळण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाचे एचआरसीटी स्कॅन करणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये बहुतांशी लोक एचआरसीटी स्कॅन काढत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते काढले जावे. एचआरसीटी स्कॅन मुळे रुग्णाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात येते. रुग्ण बरा झाल्यानंतर एचआरसीटी स्कॅन केल्यास त्याला होउ शकणारा संभाव्य धोका लक्षात येतो व तसे उपचार करता येतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्ण डॉक्टरांनी दिलेले औषध बंद करतात ही धोकादायक बाब आहे. कोणत्याही रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे बंद करू नये. बरे झाल्यानंतर सकस आहार, हलका व्यायाम सुरू ठेवावा, असा सल्ला डॉ.वर्षा सारडा यांनी यावेळी दिला.

  फायब्रोसिस प्रमाणेच थ्रोम्बोसिसला अनेक रुग्ण बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.  थ्रोम्बोसिस  म्हणजे रक्तात गाठ झाल्याने उद्भवणारा धोका. कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसावर आघात करतो तसाच तो रक्तवाहिन्यांमध्य सुद्धा आघात करतो. शरीरातील ज्या रक्तवाहिन्यांवर आघात झाला त्याचे परिणाम दिसून येतात. डोक्यातील रक्तवाहिनीमध्ये गाठ निर्माण झाल्यास अर्धांगवायूचा धोका असतो. छातीमध्ये झाल्यास हृदयविकार व असे वेगवेगळ्या अवयवांबाबत विविध धोके संभावतात. थ्रोम्बोसिसचे निदान होण्यासाठी सुद्धा एचआरसीटी स्कॅन महत्वाचे ठरते. रक्त वाहिन्यांमध्ये गाठ होणे हे कोव्हिडपूर्वी पण होतेच मात्र कोव्हिडमध्ये त्याची तीव्रता जास्त दिसून येते. त्यामुळे कोव्हिड नंतर किंवा कोव्हिडमध्ये कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू ठेवा. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीद्वारे उपचार करू नका. आहार, व्यायाम याकडे नियमित लक्ष द्या, असा सल्ला डॉ.अतुल रेवतकर यांनी दिला.

रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर

रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर

 रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर


कोरोना नियंत्रण कक्षाला भेट : नागरिकांना होतेय मदत


नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बेड्स उपलब्धतेसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय नियंत्रण कक्षामुळे नागरिकांचे काम सोपे झाले आहे. फक्त रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध बेड्सची माहिती वेळच्या वेळी अद्ययावत केल्यास गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.


रविवारी (ता.  १७) त्यांनी मनपा मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथून नागरिकांना मिळत असलेल्या सेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वयंसेवी संस्थेच्या नीरजा पठाणीया उपस्थित होते. त्यांनी महापौरांना संपूर्ण व्यवस्थेची माहिती दिली. 


याबद्दल बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय नियंत्रण कक्ष सुरू करण्याची तयारी मनपाने केलेलीच होती. दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश आला. तयारी असल्याने दुसऱ्याच दिवशी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. कुठल्याही रुग्णाला त्यांच्या सोयीनुसार बेड्स मिळणे सोपे झाले आहे. शासनाचा आदेश असतानाही खाजगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स शासकीय दराने उपलब्ध करून देण्याचा नियमाला हरताळ फासण्यात येत होता. मात्र नियंत्रण कक्षामुळे त्याला आला बसला आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी समर्पण भावनेने कार्य करीत आहे. उत्कृष्ट संचलन होत आहे. ज्यांना बेड्सची आवश्यकता आहे, त्यांना ओटीपी दिला जातो. तोच ओटीपी रुग्णालयाला पाठविला जातो. त्या आधारावर रुग्णालयात प्रवेश मिळतो, अशी माहिती त्यांनी दिली. 


नागपुरात ९९६ व्हेंटिलेटर बेड्स आहेत. मात्र ऑनलाईन साईटवर २७ उपलब्ध दाखवित आहे. याचा अर्थ स्थिती खराब आहे अथवा रुग्णालयांनी माहिती अपडेट केली नसावी. मनपा प्रशासनाने रुग्णालयांना आकस्मिक भेट देऊन याबाबत शहानिशा करावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.