Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जोरगेवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जोरगेवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑक्टोबर ३१, २०१८

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा संघर्षातून मिळवू: जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
घरकूल लाभार्थ्यांना घरे द्या तथा नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्यांना कायमस्वरुपी पट्टे द्या, या मुख्य मागणीकरिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक मोर्चाच्या स्वरुपात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

चंद्रपूर जिल्हाची ओळख अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून आहे.त्यामुळे आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्याची चुक करु नका, आमचा अधिकार हक्काने दया अन्यथा रस्त्यावर उतरुन संघर्षातून मिळवु असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला. जैन भवन जवळून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, घरकुल योजनेच्या नावावर शासनाने २१७९५ हजाराहून नागरिकांडून अर्ज भरुन घेतले यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरवीण्यात आले आहे. तर ०२ हजार २२२ अर्ज अपात्र ठरवीण्यात आले आहे. मात्र यात लाभार्थी ठरलेल्यांपैकी अदयाप घराचा लाभ मिळालेला नाही. त्यामूळे घरकुल लाभार्थी असूनही हक्काच घर प्रत्येक्षात साकार झालेल नाही. ही या लाभार्थ्यांची एक प्रकारे थट्टा असून शासनाने नागरिकांना फक्त घराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनमध्ये रोष आहें. एकीकडे योजनेतील हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्या जात आहे. तर दुसरी कडे असलेल घरही नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. असे असतांनाही चंद्रपूकर शांत आहे. हा त्यांचा संयम आहे. मात्र त्यांचा संयम आता तुटत असून आपल्या हक्कासाठी संघर्ष करायला चंद्रपूरकर सज्ज झाला आहे. याचीच साक्ष देणारा आजचा हा अभुदपुर्व मोर्चा असून हा संघर्ष यापूढेही असाच सुरु ठेवत आणखी तिव्र करु असा ईशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

हक्काच घर मिळालाच पाहिजे असा नारा बुलंद करत हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चाच्या मार्गावरील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, इंदिरा गांधी यांच्या पुतळयाला जोरगेवार यांनी माल्यार्पण केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच जोरगेवार यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले. घरकुल योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधून देण्यात यावे, या योजनेतील अटी शीथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जंदारांनाही घकुलाचा लाभ देण्यात यावा, या योजनेची नोंदनी प्रक्रिया पुन्हा सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नजूलच्या जागेवर घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, आदि मागण्यांचा या निवेदणात समावेश आहे. या मागण्यांचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हाधिका-यांनीही याबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विनोद अनंतवार, सुनील पाटील, अमोल शेंडे, देविदास बानबले, इरफान शेख, सलीम मामू, कांबळेजी, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, नितीन नागरिकर, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे, यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८

३३३ रिक्त पदे भरण्यास वेकोलीची मंजुरी

३३३ रिक्त पदे भरण्यास वेकोलीची मंजुरी

नागपूर सि.एम.डी. कार्यालयावरील जोरगेवारांच्या आंदोलनाला यश

नागपूर/प्रतिनिधी;
   २०१६ पासून वेकोली तर्फे भरण्यात न आलेल्या माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्यात या मागणीसाठी नागपूर येथील सिएमडी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागातील ३३३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन चे प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळणार आहे.

वेकोली मध्ये नौकरी लागेल या आशेने नागपूर विभागातील विद्यार्थ्यानी मायनिंग सारख्या महागड्या विभागात शिक्षण घेतले मात्र नागपूर विभागातील वेकोली कडून २०१६ पासून माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे या विभागातील माईनिंग मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे जागा निघण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु तीन वर्षाचा काळ लोटत आला तरी जागा निघत नसल्याने त्यांच्यावर नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामूळे या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. या मागणीच्या पुर्तेसाठी १८जुलै २०१८ ला नागपूर येथील सी.एम.डी. वेकोली कार्यालयासमोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागणीसाठी जोरगेवार यांनी सतत पाठपूरावा करत अधिका-यांची बैठका केल्या होत्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने माईनिंग सरदार आणि ओव्हरमेंन यांच्या ३३३ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी जाहिरातही त्यांच्या कडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तीर्ण होऊनही तिन वर्षापासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या चंद्रपूरातील या युवकांना रोजगार मिळणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

रविवार, जुलै २९, २०१८

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या ४० गुरुवर्यांचा सत्कार
स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्राचीन काळापासूनच समाजात गुरुला विशेष स्थाण देण्यात आले आहे. मनुष्य जन्मापासूनच त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रक्ष रित्या विविध क्षेत्रातील अनेक गुरुंचे संस्कार होत असते मात्र हे गुरु दुर्लक्षित झाले आहे परंतु त्यांच्याकडून झालेल्या संस्कारातुमच उत्तम समाज घडू शकतो त्यामुळे उत्तम समाज घडवीण्यात परंपरागत गुरूंचे मोठे योगदान असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मातोत्री सभागृहात आयोजीत या सत्कार सोहळयात कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून उषाताई हजारे, प्रमुख पाहुणे प्रा. सुर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, बबनराव फंड, विमल काष्टीया, किशोर पडगेलवार, आशा बुरडकर, दादाजी नंदनवार, किशोर तळवेकर, प्रमिला गटलेवार, नंदा जोशी, वंदना हातगावकर, संतोशी चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, आजवर धनादय, सर्वपरिचीत अश्या व्यक्तींचाच सत्कार केल्या जात होता. मात्र या समाजात असेही गुरु आहेत त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत अणेक विदयार्थी घडवीले. आज या गुरुंमुळे अणेकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी या गुरुकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात प्रथमच अश्या अनोख्या सत्कार सोहळयाचे आयोजन केल्या गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगीतले.
या सत्कार सोहळ्यात ड्राइंग चित्रकार चंदु पाठक, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, पोलीस मार्गदर्शक रामदास खुजे, मूर्तीकार वामन बोरसरे, मल्लखांब प्रशिक्षक किशोर पडगेलवार, संगीत शिक्षक किशोर तळवेकर, आखाडा प्रशिक्षक महादेव बेले, कारपेंटर प्रशिक्षक वासुदेव वनकर यासारख्या परंपरागत गुरूंचा सत्कार करण्यात आला यांनी अनेकांना घडविले त्यातून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिले त्याबद्दल यांचा विशेष सत्कार संस्थे द्वारे करण्यात आला.
विकलांग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर हे नेहमी संस्थेच्या माध्यमातून अंध – अपंगांची मदत करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक विकलांग यांना शिलाई मशीन असो किव्हा तीनचाकी सायकल यासारखे अनेक साहित्य वाटप करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना
 सक्षम केले त्यामुळे त्यांचे समाजात उत्तम योगदान असल्याने त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 

पार पडलेल्या सत्कार सोहळयात विविध क्षेत्रातील जवळपास ४० गुरुवर्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संगीत क्षेत्रात काम करत असतांना अणेकांना संगीताचे धडे देऊन त्यांच्यातील कलाकरांना मंच उपलब्ध करुन देणा-या बंडु देठे यांचे ४४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उषाताई हजारे, प्रा. सुर्यकांत खनके, सुरेश पचारे, विमल काष्टीया, बंडू देठे, किशोर तळवेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ईरफान शेख यांनी केले तर संचालन एकता बंडावार यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बेलखेडे, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, दर्शन बुरडकर, विनोद गरडवा, सुधीर माजरे, प्रकाश चंदनखेडे, विनोद अनंतवार, हर्षद कानमपल्लीवार, नितीन नागरिकर, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, विजय वरवाडे, राशेद हुसैन, लोकेश कोटरंगे, शांताबाई धांडे, रजनी चिंचोळकर, बबलू मेश्राम, दिलीप बेंडले, रवी करमरकर, सुरज चव्हाण, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.

मंगळवार, जुलै ०३, २०१८

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पशुसंगोपन कार्यशाळेला ग्रामवासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकरी तथा बेरोजगार युवकांना शेतीपूरक जोडधंद्याच्या माध्यमातून आर्थीकरित्या सक्षम करण्यासाठी स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वेंडली येथे आयोजीत केलेल्या चार दिवसीय पशुसंगोपन अभियानाला बेरोगार व शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत तीन दिवसात जवळपास 380 मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. गुरुवारी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. 
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकरी संकटात सापडत असतो. यातून मार्ग काढत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून या तीन दिवसात शास्त्रोक्त शेळीपालन व्यवसाय, कुक्कुटपाल व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारला दुग्ध व्यवसाया बाबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. शहरात दुध, शेळी, मासे, यांची मोठी मागणी आहें. ही मागणी पुर्ण करण्यासाठी बाहेर राज्यातून मासे आणि शेळ्या चंद्रपूरात पुरवील्या जातात ही बाब लक्षात घेता शहराला लागुन असलेल्या ग्रामीण भागात शेती पूरक जोडधंदे केल्यास येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो तसेच येथील बेरोजगार युवकांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळू शकतो या उद्देशाने स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आणि किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने या चार दिवसीय पशुसंगोपन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दत्ता इंस्टियुट ऑफ कृषी तंत्रज्ञान व पशुसंगोपन संवर्धन प्रशिक्षण विभाग नागपुर येथील तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.


बुधवार, जून ०६, २०१८

 गंगुबाई जोरगेवार ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित

गंगुबाई जोरगेवार ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित

टोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ ;पुणे येथे रंगला सत्कार सोहळा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 
महिलांनी जेव्हा जेव्हा बंड पुकारला तेव्हा तेव्हा एक नवी क्रांती घडली हा या देशाचा इतिहास आहे. असाच एक परिस्थिती विरोधातील संघर्ष चंद्रपुरातील गंगुबाई जोरगेवार यांनी पतीच्या निधनानंतर आजपासून २५ वर्षापूर्वी सुरु केला विपरीत परिस्थिती असली तरी जिंकण्याचि जिद्द उराशी बाळगून टोपल्या विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरु केला. आणि यातून मिळेल त्या अल्प पैश्यातुन ३ मुली व २ मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या संघर्षाला आज मोठे फलित आले असून आज जिल्ह्यातील प्रतिष्ठीत घराणे म्हणून जोरगेवार घराणे समोर आले आहे. त्यांचा एक मुलगा किशोर जोरगेवार यांनी राजकारणात ठसा उमटवला असून त्यांची समाजासाठी मोठे कार्य सुरु आहे. तर लहान मुलगा हा उत्तम व्यावसायिक बनला आहे. गंगुबाई यांच्या या संघर्षाचे मोठे यश असून त्यांच्या या संघर्षाचि पावती म्हणून त्यांचा अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे ‘मातोश्री’ पुरस्कार देऊन पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे सुपुत्र, किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, सुना, कल्याणी जोरगेवार, रंजिता जोरगेवार, नातवंड कोमल जोरगेवार, कामिनी जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, यथार्थ जोरगेवार यांची उपस्थिती होती. आज जोरगेवार घराण्याची परिस्थिती बदलली असली तरी ‘गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही’ या उक्ती प्रमाणे गंगुबाई आजही मनपा समोर फुटपाथ वर टोपल्या विक्रीचा व्यवसाय नित्य नियमाने करीत आहे हे विशेष.