Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अहमदनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहमदनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार



अहमदनगर- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना शहरातील तारकपूर परिसरात घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे . या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . दरम्यान , पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे .

शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१

हेलिकॉप्टरमधून उतरून स्वीकारला सरपंचपदाचा पदभार

हेलिकॉप्टरमधून उतरून स्वीकारला सरपंचपदाचा पदभार



अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. 

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना सांगितले.


रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

  अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):

 अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.

यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.
अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

विष्णू तळपाडे/खबरबात प्रतिनिधी/अकोले(अहमदनगर)

अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.

         अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.

                   यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला

प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):

१० फेबु़वारी रविवार आदिवासी रत्न राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठक्का बाबा गांगड यांचे आज सकाळी८:३०वाजता दुःखद निधन झाले.कामडावणा नृत्याला दिल्ली पर्यत नेऊन मोठ-मोठ्यांना आश्चर्यचकित करुन आदिवासीच्या शिरपेचात आपल्या आवाजाचा मानाचा तुरा रोवणारे व आपल्या कलेतुन विविध पशु-पक्षाचा आवाज काढणारा आदिवासी मोगली यांचेवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाची अनेक दशके त्यांनी लोकरंजन केले..जवळपास ८५वर्षे वयोमान असलेला हा उत्साही व्यक्ती   वाघ,सिह,कोल्हा,कुञा,मांजर,बैल,पोपट,कावळा,कोकिळा,बकरी याबरोबरच अनेक प्राण्यांचे आवाज पाहण्याची संधीच बाबांच्या रुपाने अकोले तालुक्याला लाभली होती.

स्वतः ला महान समजणारे अनेक कलाकार पाहिले,पैशासाठी कलाविकणारे ही पाहिले कलेच्या नावाखाली बाजार मांडणारे ही पाहिले.स्वतःच्या कोशात हरवलेले अनेक जण नजरेस पडले.पण कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांसाठी वाहुन घेतलेला आमचा हा बाबा आमच्या दृष्टीने ठकाबाबा खरच शांत ..कारण तो कलेनेच नव्हे तर,माणुसकीनेही खुपच मोठा आहे.कलेसाठी सर्वस्व अर्पण करणारा हा अवलिया पाहिला की डोळ्यातून पाणी येते.आपल्या वेदना आपल्याच असतात.त्या जगाला दाखविण्यासाठी नसतात.

हे माणुन जगाच्या मनोरंजनासाठी सज्ज असलेला हा मोठा माणुस दुःख चेहऱ्यावर जाणवू न देता.आपल्या कलेतुन निखळ आनंद देणारा हा महान आत्मा अनेक सत्कारांचा पुरस्कार्थी पण घराची झोळी सतत रिकामीच आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी ही कलाआदिवासी भागातील नागरिकांनसाठी सादर केली होती.त्यातुन त्यांना कधी पैसे मिळाले नाहीत.पण हा अवलिया कलेशी प्रामाणिक राहिला.कलेद्वारे अनेक पिढ्याचे मनोरंजन करत राहिला.आपल्या आवाजाची जादु प्रेक्षकांना दाखवत राहिला.कोणी काय दिले माहिती नाही.पण त्यांनी प्रेक्षकांना भरभरुन मनोरंजन मात्र दिले.अडथळ्याना हसत-हसत सामोरे जाणारा पैशासाठी नव्हेतर माणसासाठी कला सादर करणारा महान कलावंत,कलाकाराला भावपुर्ण श्रध्दाजली.