येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: सायगाव परिसरातील हनुमानवाडी येथील कांतिलाल देव्हडे यांच्या शेतात हरिणाच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही घटना तेथे गुरे चारणारे माणिक सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पाडसाला पाच कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. देवराम उशीर, सीताराम देव्हडे, कचरू जठार, ज्ञानेश्वर मुळे, अमोल जठार, पांडुरंग देव्हडे, बाळू जठार, दत्ता जठार यांनी पाडसाचे प्राण वाचविले.