Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ११, २०२०

कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले पाडसाचे प्राण




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: सायगाव परिसरातील हनुमानवाडी येथील कांतिलाल देव्हडे यांच्या शेतात हरिणाच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही घटना तेथे गुरे चारणारे माणिक सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पाडसाला पाच कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. देवराम उशीर, सीताराम देव्हडे, कचरू जठार, ज्ञानेश्वर मुळे, अमोल जठार, पांडुरंग देव्हडे, बाळू जठार, दत्ता जठार यांनी पाडसाचे प्राण वाचविले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.