Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०९, २०२०

कोरोनामुळे चांपा गावाच्या सर्व सीमा बंद:नवीन व्यक्तींना नो एंट्री


चांपा/अनिल पवार:
 कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून उमरेड तालुक्यातील चांप्याच्या गावकऱ्यांनी उमरेड नागपूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना वगळता चांपा गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. 

चांप्याचे सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषाणू संदर्भात विविध उपाययोजना केल्या त्यात गावकऱ्यांना घराबाहेर न जाणं, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत.

उमरेड तालुक्यातील चांपा येथे सुमारे पंधराशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायत तर्फे खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणं बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनावर अशा प्रकारची खबरदारी करणारं तालुक्यातील चांपा हे पहिलेच गाव आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.