Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २७, २०१९

वाघाच्या हल्ल्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांचे ब्रह्मपुरी वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी:

वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यात मागील महिनाभरापासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे यात चार-पाच गावातील आसपासच्या परिसरात एक वाघीण आपल्या बछडे घेवून फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भयभीत होऊन जगावे लागत आहे. गेल्या महिनाभरातअनेक बळी गेले. जख्मी झाले. वाघाच्या दहशतीमुळे तेन्दुपान, मोहफ़ुल हंगाम हातून गेला. त्यामूळे त्रस्त झालेल्या  नागरिकांनी ब्रह्मपुरी वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सायंकाळी पाच वाजेपासून हे आंदोलन सुरू असून अजून पर्यंत अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही..


ब्रह्मपुरी तालुक्यातील परसोडी, तुकुम, गणेशपुर, रामपुरी, एकरा येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.