राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे
नागपूर/प्रतिनिधी:
ऐन प्रचार तोफा थंडावताच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर ह्यांनी कॉंग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले,लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपला. त्यानंतर लगेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेतली यांच्या भेटीने संपूर्ण राजकीय समीकरण बदल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रपुरात कॉंग्रेसमध्ये पुगलिया आणि वडेट्टीवार असे दोन गट आहेत,ह्यातील पुगलिया गट हा धानोरकरांना तिकीट मिळाल्यामुळे नाराज झाला होता,माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्या तिकीट कापल्याने संपूर्ण तेली समाज नाराज झाला होता, तर पक्ष अध्यक्ष राहुल गांधी धानोरकर यांच्या प्रचाराला चंद्रपुरात आले असता नाराज नरेश पुगलिया ह्यांची त्यांच्या सभेला अनुपस्थिती होती,त्यामुळे पुगलिया हे वरिष्ठांवर नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
निवडणुकीचा अर्धा कार्यकाळ आटोपला असतानाही धानोरकर हे पुगलीयांच्या भेटीला गले नाहीत,अशातच धानोरकर आणि पुगलिया यांच्यातला एक जुना फोटो सोशल मिडीयावर कॉंग्रेस समर्थकांनी व्हायरल केला होता, यावरून सोशल मीडियात फेसबुकवर चांगलाच वाद रंगू लागला होता, त्या फोटोत सीट मिळतात धानोरकर पुगलीया यांचेकडे गेले असा संदेश मतदारांमध्ये गेला. मात्र त्यानंतर हा फोटो जुना असल्याचा स्पष्ट झाले.
या भेटीदरम्यान धानोरकर-पुगलिया यांच्यात १ तास गुप्त चर्चा झाली, ह्यात नरेश पुगलिया यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यावेळी धानोरकर यांनी केला असल्याचे बोलल्या जात आहे,मात्र धानोरकर आणि पुगलिया यांच्यात मतभेद नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.नरेश पुगलिया हे अनुभवी राजकारणी आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो असल्याचे धानोरकरांनी सांगितले,पुगलिया यांची पक्षनिष्ठा बघता व नाराज गटातील मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न धानोरकर यांचेकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.