Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १३, २०१९

दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे) वर्धा:


सावरगाव वरून काटोल मार्गी आपल्या दुचाकीने बांगडापूर येथे जातांना नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्वार असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान धर्ती गावाजवळ घडली.दुचाकीस्वराचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट धर्ती गावाजवळील पुलावर जावून धडकली.
MH.32.F.7231 या वाहनाने दोघेही आपल्या गावाकडे जात होते.यात रामभाऊ मारोती धाडसे रा. बांगडापूर जागीच ठार झाले तर दुसरा विवेक लक्ष्मण कन्नाके याला जखमी अवस्थेत कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.हे दोघेही बांगडापूर येथील रहिवासी आहेत.पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.