Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जून १०, २०२३

विदर्भातील या जिल्ह्यात पाऊस  | Monsoon Arrives in Kerala

विदर्भातील या जिल्ह्यात पाऊस | Monsoon Arrives in Kerala


अमरावती, नागपूर, यवतमाळ ,भंडारा, वर्धा येथे तुरळ ठिकाणी आगामी काही तसेच  कडकडाटसह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरीही अनेक जिल्ह्यात मान्सुन पाऊस बरसत आहे, तर पूर्व विधार्भात देखील आज ढगाळ वातावरण राहून भंडारा जिल्ह्यात #पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता.

एक आठवड्याच्या विलंबानंतर मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल (Monsoon Arrives in Kerala) झाला असून, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.

८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात सक्रिय होणार आहे. आज ८ जून रोजी विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे  होते. नऊ जून रोजी  विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दहा जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

नऊ जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विज कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. दहा जून अमरावती, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया मध्ये विजांच्या  कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होणार नाही. 


मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी मॉन्सून केरळमध्ये सात दिवसांच्या उशीराने दाखल झाला. 

मंगळवार, एप्रिल १८, २०२३

विदर्भातील वातावरण बदलले;  30 ते 40 किलोमीटर प्रति तास हवेचा वेग असणार IMD  Maharashtra Weather Indian Meteorological Department

विदर्भातील वातावरण बदलले; 30 ते 40 किलोमीटर प्रति तास हवेचा वेग असणार IMD Maharashtra Weather Indian Meteorological Department

भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार विदर्भामध्ये पुढील पाच दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे. दीर्घ मुदतीच्या अंदाजानुसार विदर्भात 23 ते 29 एप्रिल दरम्यान हवामान स्थिती सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    Maharashtra Weather



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात म्हणजेच 19 ते 23 एप्रिलदरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहून 20 ते 23 एप्रिल रोजी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 ते 22 एप्रिलदरम्यान एक दोन ठिकाणी वादळ वारा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  वादळ वारा होत असताना हवेचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असेल.  Indian Meteorological Department


भंडारा जिल्ह्यामध्ये 20 21 22 एप्रिल रोजी विधानसभा होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस अंशतः आकाश ढगाळ राहून 19 ते 22 एप्रिल दरम्यान तृणक आणि एक दोन ठिकाणी अति हलके आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवसात तुलक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. 


नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार 19 ते 23 एप्रिल दरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील आहे. 


पुढील पाच दिवसांमध्ये कमाल तापमान 40° ते 41° अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 22° ते 23° अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.  पुढील 48 तासांमध्ये विदर्भमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवसानंतर दोन ते चार अंशापर्यंत घट होईल. किमान तापमान पूर्व विभागामध्ये पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र पावसाचा अंदाज असल्याने गारपीट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.  Indian Meteorological Department

मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३

यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शालेय राज्य क्रीडा कराटे स्पर्धेमधे कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू यांचा सत्कार


बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य धामणगाव रेल्वे येथे आयोजित कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली व उत्तीर्ण खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण धामणगाव रेल्वे येथे मोठ्या उत्सवात पार पडला स्थानिक तालुक्यात कराटे संस्कृती रुजवून तरुणांमध्ये आत्मरक्षन व बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया संयुक्त विद्यमानाने 26 फेब्रुवारी 2023 रोजी कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आले.


या परीक्षेसाठी मुख्य परीक्षक भंते धम्मासार, कांबळे मुकेश कुमार पोलीस अधिकारी आदिलाबाद तेलंगणा ब्लॅक बेल्ट 7th दान व  सह मास्टर आकाश पवार ब्लॅक बेल्ट 4th दान व मास्टर प्रेम कुमार ब्लॅक बेल्ट 2nd दान  आदीलाबाद तेलंगणा . मास्टर राहुल सर ब्लॅक बेल्ट, मास्टर अंगरिश कांबळे ब्लॅक बेल्ट, संध्य्या पवार ब्लॅक बेल्ट, प्रतूषा चौहान ब्लॅक बेल्ट, अनुष्का ब्लॅक बेल्ट, दीपिका ब्लॅक बेल्ट  आदिलाबाद तेलंगणा, येथून आले होते .बोधी बुडोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मून ब्लॅक बेल्ट 2nd दान  हे मुख्य प्रशिक्षक व सचिन चौधरी व मास्टर प्रतिभा नागलवाडे हे सुद्धा परीक्षक म्हणून उपस्थित होते. 

तब्बल सहा  तास चाललेल्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कराटे कला व प्रात्यक्षिक सादरीकरण केले. उपस्थित उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते धम्मासार (महाराष्ट्र चीफ) भारतभाऊ चिकाटे (माजी सैनिक ) कुंभारे साहेब  (सामजिक कार्यकर्ते )व संचालन सूत्र अद्वैता वैद्य व सोनाली गुप्ता यांनी केले . प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यांच्या हस्ते बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वे ची विद्यार्थ्यांनी कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धे बारामती पुणे येथील  तीने  दुतीय क्रमांक पटकावला. व नॅशनल चॅम्पियनशिप  KCR कप  हैद्राबाद, ऑनलाइन काता मधे धामणगाव रेल्वे तिल कराटे चमू कू. रुकया बोहरा गोल्ड मेडल, साक्षी अतलकर गोल्ड मेडल, सुहानी कोडमकर गोल्ड मेडल, व धर्य नागलवाडे यांना सुद्धा बेल्ट व गोल्ड मेडल देऊन  यांना शाल व पुष्प गुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समापन प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . व पाहुण्यांचे आभार प्रदर्शन सौ .प्रतिभा नागलवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सचिन चौधरी सर, प्रफुल बारसे सर , शिलानद झामरे , व सर्व बोधी बुडोकान कराटे च्या टीम ने प्रयत्न केले.

शुक्रवार, फेब्रुवारी २४, २०२३

आर्थिक विवंचनेतून शिवसेना नेत्याची आत्महत्या | ShivSena leader commits suicide due to financial issue

आर्थिक विवंचनेतून शिवसेना नेत्याची आत्महत्या | ShivSena leader commits suicide due to financial issue




प्रतिनिधी
प्रदीप झूटी/ कारंजा घाडगे
कारंजा तालुक्यातील
आजनादेवी येथील शेतकरी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते विष्णू तेजरावजी खवशी वय 49 यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा मुलगी म्हातारे आई-वडील आहे त्यांची मुलगी सीएच्या अंतिम वर्षाला आहे त्यांच्याकडे 25 एकर शेती आहे..


विष्णू खवशी यांनी आजनादेवी येथे पाच वर्ष सरपंच असताना गावाच्या विकासात्मक योजना राबवून गावाचा विकास केला त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य असतानी योग्य त्या प्रकारे आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.



गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँक शाखा कारंजाचे जवळपास 32 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होते त्यानंतर त्यांनी नऊ लाखांमध्ये हे कर्ज सेटलमेंट केले त्यानंतर भारतीय स्टेट बँक शाखा कारंजांनी पुन्हा त्यांना 2022 मध्ये पाच लाखाचे कर्ज दिले मुला मुलीचे शिक्षण शेतीला लागणारापैसा यामुळे ते सतत आर्थिक विवच्यनेत राहत असत सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी नऊ लाख रुपये बँकेत जमा केली होती ती खाजगी सावकाराकडून घेतले असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे शेतीमध्ये सतत नापिकी असल्यामुळे शेतात लागलेला खर्च सुद्धा दोन वर्षापासून येऊ शकला नाही त्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले..विष्णू खवशी यांच्या अकस्मित निधनाने आजनादेवी येथे मोठी शोक कळा पसरलेली आहे त्यांच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त करत आहे.

ShivSena leader commits suicide due to financial issue



निष्ठावान शिवसैनिक हरपला
कारंजा तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून माजी सरपंच तसेच माझी पंचायत समिती सदस्य यांच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गावाच्या प्रगतीसाठी ते सतत कार्यरत असायचे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ती सतत झटत असायचे राष्ट्रीय महामार्गाचा चक्काजाम असो की महावितरण कार्यालयावर बंडी बैलाचा धडक मोर्चा असो यामध्ये यांचा मोठा सहभाग होता विष्णू पाटलांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे ते कधीच भरून न येण्याजोगे आहे
संदीप भिसे
शिव सेना माजी तालुका संघटक कारंजा

बुधवार, फेब्रुवारी २२, २०२३

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली जप्त  Naxalites

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली जप्त Naxalites

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली गडचिरोली पोलीस दलाने केल्या हस्तगत

Naxalites  



नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त केल्या.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१/०२/२०२३ रोजीचे सकाळी १०:०० वा. चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडो हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत ०१ सिंगल बॅरल १२ बोअर रायफल व ०१ एसएसआर रायफलचा समावेश आहे. naxalites in gadchiroli


सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि, धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि श्री. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. naxalites in gadchiroli