Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुनगंटीवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुनगंटीवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै २९, २०१८

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य  Bagh or main short documentary

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य Bagh or main short documentary

International Tiger Day special short documentary
Providing information/lalit lanjewar:(9175937925):
A beautifully made short documentary released on at Nagpur by the forest department. The documentary is prepared by the staff of Pench Tiger Reserve Conservation Foundation Maharashtra under the guidance of CCF & FD Mr. M S Reddy (IFS). the documentary tells us the importance of the tiger species as well as how any common man can contribute towards protecting the tiger and its habitat the forests.





शुक्रवार, जुलै १३, २०१८

रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाल्या नंतर सुधीर मुनगंटीवार यांचे रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश

रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाल्या नंतर सुधीर मुनगंटीवार यांचे रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश

सुधीर मुनगंटीवार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 मागील आठवडाभर सतत चंद्रपूर शहरासह इतर भागामध्ये चांगला पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. तसेच गेल्या 2 दिवस चंद्रपूर शहरात झालेल्या रस्ते अपघाताच्या प्रकरणी मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे तसेच शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि सार्वजननिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत.
शहरात झालेल्या रस्ते अपघातात गेलेले बळी या अतिशय दुर्देवी घटना असून या घटनांची पुनरावृत्ती होवू नये, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे कडक निर्देश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रशासनाला दिले आहेत.


रविवार, जुलै ०१, २०१८

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर/ललित लांजेवार:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वडाळा गावाच्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नाव आहे. गावातील दोन लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हे पत्र त्यांच्या नावाने लिहीले होते.
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या महिन्यात मंत्रालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना लक्ष करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नक्षलीविरोधी कारवाई केल्यामुळे ते पत्र आलं होतं. आता हे इतरांना त्रास देण्यासाठी हे पत्र लिहिलं असल्याची प्राथमिक माहिती असली तरी पोलीस याची कसून चौकशी करत आहेत. मात्र अश्या निनावी पात्रांनी खळबळ माजविणाऱ्याना विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी !

मंगळवार, जून १९, २०१८

आता होणार पीक कर्ज वाटपासाठीप्रत्येक तालुक्यात मेळावे

आता होणार पीक कर्ज वाटपासाठीप्रत्येक तालुक्यात मेळावे

ना.मुनगंटीवार यांचे निर्देश
सुधीर मुनगंटीवार साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनाने महा कर्जमाफीनंतर येत्या हंगामामध्ये खरिपासाठी शेतकऱ्यांना सुलभ व सहज कर्ज मिळावे, यासाठी उपाय योजना केली आहे. तथापि चंद्रपूर जिल्हयात काही ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेमध्ये सुलभतेने कर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी शेतक-यांच्या हातात पीककर्ज मिळावे, यासाठी जिल्हयातील सर्व यंत्रणांना सक्रीय करुन तालुकास्तरावर खरीप पिक कर्ज वाटपासाठी मेळावे घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. पात्र असणाऱ्या कोणताही शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी नव्या हंगामात खरीप पीक कर्जासाठी पात्र आहेत. तथापि असे असताना देखील काही बँकाकडून शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी किंवा थकित दाखवून कर्ज देण्यासाठी हरकत घेतली जात आहे. ही बाब योग्य नसून गावागावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, बँक शाखा व गावातील चावडी मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे या यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांना सन 2018-19 या वर्षात शेतक-यांना अधिकाधिक लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यासाठी बँकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. राज्य शासनाने 2018-19 या वर्षासाठी चंद्रपूर जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चंद्रपूर जिल्हयात 15 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बॅकेच्यामाध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील 41 हजार 764 शेतक-यांना 296 कोटी 59 लाख 61 हजार रुपयाचे खरीप पीक कर्जाचे वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे.
दिलेल्या उद्दिष्टांपैकी फार कमी कर्ज वाटप जिल्हयात झाले असून बँकांनी ही बाब लक्षात घ्यावी तसेच बँकांनी पेरणीचा हंगाम बघता तातडीने शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, असे आव्हान त्यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शीर्ष बँक व अधिनस्त सर्व बँकांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या यंत्रणेमार्फत कर्जवाटपाच्या प्रक्रियेवर लक्ष वेधावे असेही त्यांनी सुचविले आहे. ज्या बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी मागेपुढे पाहत असतील त्या बँकेवर आवश्यक कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार, जून ०९, २०१८

या विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात पाण्याचे ATM

या विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात पाण्याचे ATM

चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावातील नागरिकाला पिण्‍यासाठी शुध्‍द पाणी मिळावे हा मी केलेला संकल्‍प आज पूर्णत्‍वास आला याचा मला आनंद आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये आज जलशुध्‍दीकरण संयंत्र अर्थात वॉटर एटीएम जनतेच्‍या सेवेत रूजु झाले आहेत. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍यात येतील आणि हा मतदार संघ अशा पध्‍दतीने नागरिकांना शुध्‍द पाणी देणारा देशातील एकमेव मतदार संघ ठरेल असे प्रतिपादन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर परिसरात जलशुध्‍दीकरण संयंत्राच्‍या लोकार्पण सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, वर्षभरापूर्वी जेव्‍हा मी या परिसरात आलो असता वेकोलि च्‍या कॉलनीत शुध्‍द पाणी मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्‍या होत्‍या. त्‍याचवेळी मी प्रत्‍येक गावात जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याचा संकल्‍प केला होता. पहिल्‍या टप्‍प्‍यात उर्जानगर, कोठारी, विसापूर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मी लोकार्पित केल्‍या. मुल आणि बल्‍लारपूर तालुक्‍यासाठी अनुक्रमे ३८ व ४७ कोटी रू. खर्चुन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण करीत आहोत. त्‍यानंतर मुल तालुकयातील उथळपेठ येथे वॉटर एटीएम बसविण्‍याचा पहिला प्रयोग मी केला. तेथील सरपंचांनी मला दिलेल्‍या माहितीनुसार त्‍या गावातील ९५ जार संपुष्‍टात आले आहेत. याचा अर्थ आजार होण्‍यामागील प्रमुख कारण अशुध्‍द पाणी आहे. म्‍हणूनच या मतदार संघातील प्रत्‍येक गावात वॉटर एटीएम बसविण्‍याचा संकल्‍प मी केला, असेही ते म्‍हणाले.
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्‍यक्‍त करत ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, भेल आणि महानिर्मीती या कंपन्‍यांच्‍या सीएसआर निधीतुन चंद्रपूर तालुक्‍यातील ५० गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याची विनंती मी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्‍यांनी ती तात्‍काळ मान्‍य केली. या परिसरातील उष्‍णता लक्षात घेता या जलशुध्‍दीकरण संयंत्राला चिलर बसविण्‍याची विनंती मी त्‍यांना केली. ती सुध्‍दा त्‍यांनी तात्‍काळ मान्‍य केली. आता शुध्‍द पाण्‍यासह थंड पाणी सुध्‍दा नागरिकांना प्‍यायला मिळणार आहे. ही संयंत्रे देखभाल व दुरूस्‍तीसाठी आपण महिला बचतगटांना देत आहोत. १५ हजार कुटूंबांना जार आणि कार्ड आपण देत आहोत. या पुढील टप्‍प्‍यात बल्‍लारपूर तालुक्‍यात वे.को.लि. च्‍या माध्‍यमातुन २९ ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्र आपण बसविणार असुन टप्‍प्‍या टप्‍प्‍याने संपूर्ण मतदार संघात प्रत्‍येक गावात हे संयंत्र बसविण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते प्रमोद कडू, रामपाल सिंह, रामू तिवारी, हनुमान काकडे, रोशनी खान, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, विलास टेंभुर्णे, वनिता आसुटकर, संजय यादव, फारूख शेख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते उर्जानगर येथील केसरीनंदननगर, कोंडी, दुर्गापूरातील वार्ड नं. 2 आझाद चौक, वे.को.लि. कॉलनी, लख्‍मापूर या ठिकाणी जलशुध्‍दीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्‍यात आले. अन्‍य गावांमध्‍ये भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या हस्‍ते ही संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.
प्रत्‍येक गावात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. नागरिकांना पिण्‍याचे शुध्‍द व थंड पाणी मिळणार असल्‍याने नागरिकांमध्‍ये आनंद व उत्‍साह दिसुन येत होता. तशा भावना सुध्‍दा नागरिकांनी व्‍यक्‍त केल्‍या. या लोकार्पण सोहळयाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
वेकोलि दुर्गापूर कॉलनी, ऊर्जानगर, समतानगर, आयुषनगर, नेरी, दुर्गापूर वार्ड क्र. 1, भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली, वढोली, कढोली, विचोडा, मोहुर्ली, डोणी, चोरगांव, आंभोरा, वरवट, अडेगांव, चिचपल्‍ली, जांभर्ला, जुनोना, अजयपूर, टेमटा, लोहारा, घंटाचौकी, बोर्डा, वलनी, दुधाळा, पहामी, पेठ, नंदगूर, पिंपळखुट, हळदी, झरी, नागाळा (म.), गोंडसावरी, चक मरारसावरी, झोपला मारोती, मामला, वायगांव, चक निंबाळा, निंबाळा, ऊर्जानगर येथील केसरीनंदन नगर, दुर्गापूर वार्ड क्र. 2 येथील आझाद चौक, लख्‍मापूर, ऊर्जानगर परिसरातील कोंडी या ठिकाणी सदर जलशुध्‍दीकरण संयंत्रे लोकार्पित करण्‍यात आली.

दोषसिध्दीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर पोहोचवा: मुनगंटीवार

दोषसिध्दीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर पोहोचवा: मुनगंटीवार

 सायबर क्राईम जनजागृतीचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिध्दी मध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. मात्र पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सवलती उपलब्ध केल्या जात आहे. या दलामध्ये कार्यक्षमताही प्रचंडच आहे. त्यामुळे आगामी काही काळात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने दोषसिध्दी मध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर पोहोचवावे असे आव्हान राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. येथे नागरी सुरक्षा दल यांना सायकल वाटप बॅरिकेट्स वाटप व सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाची सुरुवात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने एका कार्यक्रमाद्वारे केली.  
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपस्थित होते. मा.सा. कन्नमवार स्मृती सभागृहामध्ये झालेल्या एका शानदार समारंभात जिल्ह्याभरातील नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांना सायकलचे वाटप करण्यात आले मुल राजुरा गडचांदूर या भागासाठी मिळणाऱ्या नक्षल निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने आजच जिल्हाभरात सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाला सुरुवात केली आहे.
मोबाईल वर येणारे फसवे मेसेज, एटीएम साठी होणारी फसवणूक, बँकेच्या अकाऊंट संदर्भात मागितली जाणारी बेमालूम माहिती, महिला, बालके वरिष्ठ नागरिकांची मोबाईल वरून होणारी फसवणूक यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे. यासाठी एक सुसज्ज चित्ररथ तयार करण्यात आला असून यामध्ये अनेक माहितीपट दाखविले जाणार आहे. सोबतच जिल्हा पोलिस प्रशासनाने सायबर क्राईम जनजागृती संदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले असून त्याचे वाटप सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केले जाणार आहे. यासंदर्भातील एका चित्ररथाला आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिक सुरक्षा समितीच्या सदस्यांना संबोधित केले.पोलीस विभागाला जिल्ह्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून नागरी सुरक्षा दलाच्या मार्फत पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच भर पडणार आहे पोलिसांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा चे जाळे घट्ट केले जाईल. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सुलभ होईल. महाराष्ट्राच्या पोलिस विभागातील ज्या काही अद्यावत सुविधा असतील त्या सर्व चंद्रपूर पोलीस प्रशासनाला मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागरी सुरक्षा समितीने पोलिसांचे डोळे आणि कान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना सर्वकाही पोलीस करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे असून या देशाचे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाची काही कर्तव्य आहेत. अशा सुजाण नागरिकांमध्ये आपला जिल्हा घडल्या जाईल यासाठीच सायबर क्राईम जनजागृती उपक्रम जिल्ह्यात सुरू झाला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. नव्यायुगातील सायबर क्राईम मधील धोक्यांपासून सावध व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज सिंह राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन पोलीस इन्स्पेक्टर विकास मुंडे यांनी केले.

गुरुवार, मे ३१, २०१८

८१ टक्के वृक्ष जिवंत;मुनगंटीवार यांचा दावा

८१ टक्के वृक्ष जिवंत;मुनगंटीवार यांचा दावा

mungatiwar साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
वृक्षारोपणासंदर्भातील संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने सर्व जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. २ कोटी वृक्ष लागवड करताना विभागाला ६७.९० लाखांचे उद्दिष्ट दिले होते, प्रत्यक्ष ६८.३० लाख वृक्षलागवड यशस्वीपणे पूर्ण केली. त्यापैकी ८१ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनामती येथे नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्षलागवड मोहीम तसेच पूर्वतयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. नागपूर विभागाला २ कोटी ६२ लाख ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आढावा बैठकीत खासदार रामदास तडस, आमदार नाना शामकुळे, आशिष देशमुखसमीर कुणावार, कृष्णा गजबे, ॲड. संजय धोटे, गिरीश व्यास, प्रकाश गजभिये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदी उपस्थित होते.
४ कोटी वृक्षलागवड मोहीम राबविताना नागपूर विभागाला १ कोटी ३६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ७० टक्के जिवंत वृक्षाचे प्रमाण आहे. वृक्षलागवड मोहीम राबविताना प्रत्येक वृक्षसंगोपन ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. जेथे जागा उपलब्ध असेल तेथे ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने अत्यंत कल्पकतेने १३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन एक महिन्यात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. खड्डे खोदण्यापासून तर वृक्षांच्या उपलब्धतेपर्यंतची तयारी पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी वनमंत्र्यांनी केले.
सॅटेलाइट सर्वेक्षणातून वॉच
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राच्या गैरवनक्षेत्रात २७३ चौरस किलोमीटर क्षेत्रात, वृक्षाच्छादित पट्टा निर्माण झाला. देशात वृक्षाच्छादित पट्टा निर्माण करण्यात संपूर्ण देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. वृक्षलागवडीसाठी १९ हजार ७३१ जागा निवडण्यात आल्या असून, त्यावर १ कोटी ५४ लाख ८५ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिमेसाठी ३ कोटी ६२ लाख ७१ हजार वृक्ष उपलब्ध आहेत. वृक्षलागवड मोहिमेवर वॉच ठेवण्यासाठी सॅटेलाइट सर्वेक्षणाचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
जिल्हा : उद्दिष्ट
नागपूर : ४३ लाख ४४ हजार

वर्धा : ३३ लाख ७ हजार

भंडारा : २४ लाख ५९ हजार

गोंदिया : ३४ लाख ६० हजार

चंद्रपूर : ७७ लाख २१ हजार

गडचिरोली : ५० लाख ७४ हजार
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

मंगळवार, एप्रिल १०, २०१८

चंद्रपूरला सुरु होणार एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र

चंद्रपूरला सुरु होणार एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र


मुंबई/प्रतिनिधी:
संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात यावे, कुठल्याही निधीच्या दायित्वाशिवाय येत असलेल्या या प्रस्तावास उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सोमवारी मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
 संपूर्णपणे सामाजिक दायित्व निधीचा उपयोग करून हे  उपकेंद्र सुरु करावयाचे झाल्यास यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव अभ्यासपूर्ण पद्धतीने टाटा ट्रस्ट, पेट्रोलियम कंपन्या,जेएनपीटी, बजाज, डब्ल्यूसीएल,यासारख्या मोठ्या कंपन्यांकडे सादर करून या उपकेंद्रासाठी 100 ते 125 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नक्षलग्रस्तजिल्हा म्हणून केंद्र सरकारकडून या उपकेंद्रासाठी काही निधी मिळू शकतो का याचाहीअभ्यास केला जावा. 
 चंद्रपूर हानक्षलग्रस्त जिल्हा असून आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्याशेवटच्या टोकावरचा हा जिल्हा आहे. येथील महिलांच्या विकासासाठी हे उपकेंद्रनिर्माण होणे गरजेचे आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनीसांगितले.या उपकेंद्रासाठी जागेची उपलब्धता करून दिली जाईल, असे सांगून ते म्हणाले, दरम्यानच्या काळात विद्यापीठाने महिलांसाठी या उपकेंद्राच्या माध्यमातून कोणतेअभ्यासक्रम सुरु करता येतील याची निश्चिती करावी. उपकेंद्राचे कॅम्पस डिझाईननिश्चित करून टप्प्याटप्प्यात त्याचे काम हाती घेतले जावे. हे अभ्यासक्रम सुरुकरताना ते शिक्षण पायावर उभे करणारे असावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आणि त्याची उपलब्धता यातील दरीसांधण्याचा प्रयत्न होण्याची गरज असल्याचे ही ते म्हणाले.

बुधवार, मार्च १४, २०१८

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

बुधवार, मार्च ०७, २०१८

चंद्रपुरात उतरणार विमान

चंद्रपुरात उतरणार विमान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन पाहणी व तपासणी केल्याने राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट तयार करण्याचा मार्ग सूकर झाला आहे. त्यानंतर सदर प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या चंद्रपूर जिल्ह्यात वीज, सिमेंट, कोळसा, लाकूड, लोखंड, पेपरमील, आयुध निर्माणी असे विविध प्रकारचे कारखाने आहेत. या सर्व कारखान्याचे संचालन मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बंगरुळ, अहमदाबाद येथून चालते. त्यांना येण्या-जाण्यासाठी विमानाची सोय नसल्यामुळे जाणे येणे फारच अवघड ठरत आहे. त्यामुळे बरेच कारखाने सुरू करण्यासाठी उद्योजक उत्सुक नाहीत. कारखानदार संचालकांना जाणे येणे करण्यासाठी विमान किंवा त्यांचे खासगी हेलीकॉप्टर असतानासुद्धा विमानतळाची सोय नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासन व विमान प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने मूर्ती येथे येऊन जागेची पाहणी केली. नुकताच त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून दोन टप्यात काम करण्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात ७२० एकर जमिनीची आवश्यकता असून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा १२० एकर जागा, अशी एकूण ८४० एकर जमीन लागणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळाची निर्मिती करण्यासाठी पाऊल उचलले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात शासनाची जमीन कोठे उपलब्ध आहे, याचा शोध घेतला व राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे एक हजार चाळीस एकर जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाच्या भारतीय विमान प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला. त्यानुसार त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मान्यता मिळताच मूर्ती येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड एअरपोर्टमुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली व तेलंगणातील आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियल येथील लोकांना विमान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

शनिवार, जानेवारी २७, २०१८

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातून रोजगाराची संधी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

इमेज परिणाम बल्लारपूर मतदार संघात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रोजगार विविध विकास कामे केली जात आहेत़ परिसरातील युवकांना सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे़ या मतदार संघातील युवकांचे प्रतिनिधीत्व पोलीस भरतीमध्ये ठळकपणे उमटावे, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे़, अशी माहिती वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे पाण्याच्या एटीएम मशीन लोकार्पण व डस्टबीन वितरण व इको पार्क लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अ‍ॅड़ संजय धोटे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, पोंभूर्णा नगर पंचायतचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य ज्योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायत सभापती पुष्पा बुरांडे, नेहा बघेल, किशोर कावळे, अतिक कुरेशी, विजय कस्तूरे, मोहन चलाख, श्वेता वनकर, सुनिता मॅकनवार, रजिया कुरेशी,शारदा कोडापे, अमरसिंह बघेल, कल्पना गुरनुले, सविता गेडाम, जयपाल गेडाम, माधुरी चांदेकर,मुख्याधिकारी विपीन मुधदा, अभियंता राजेश सोनोने,प्रमोद कडू आदी उपस्थित होते.
ना़ मुनगंटीवार म्हणाले, पोंभूर्णा नगर पंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला़ यातून विकासकामे गतीमान झाली आहेत़ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी यापुढेही निधी देण्यात येणार असून, विकासापासून कोणताही समाजघटक वंचित राहणार नाही़ या मतदार संघाने मला मतरूपी आशिर्वाद दिल्यामुळे पाचव्यांदा विधानसभेत गेलो. मंत्री झालो. मला महाराष्ट्रभर सन्मान मिळत आहे. याची जाणीव ठेवून या मतदार संघातील प्रत्येक शहर व गावातील विकासासाठी प्रयत्न करीत आहे, असेही ना़ मुनगंटीवार यांनी नमूद केले़
पोंभूर्णा नगर पंचायतीचे महाराष्ट्रात नावे व्हाव़े अशी अपेक्षा व्यक्त करून पुढे म्हणाले, जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण केली जात आहे़ यातून गरीब व हुशार युवक-युवतींना तरुण विविध क्षेत्रात उच्च पदावर जाण्याची संधी मिळणार आहे़ या भागातील उमेदवारांनी सैन्यदल, पोलीस दल आणि अन्य विभागात भरती व्हावे, यासाठी लवकरच पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुरुवात बल्लारपूर मतदार संघात करणार आहे़ सैन्य व पोलीस भरतीत या भागातील तरुणांची निवड व्हावी, यामागची आपली भूमिका असून रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रशिक्षण संस्था उभारणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़
पाटबंधारे विभागाच्या तलाव सौंदर्यीकरणाचे भूमीपूजनही यावेळी पार पडले़ मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावाही घेतला़ परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या़ कार्यक्रमाप्रसंगी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी जादा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली़ विकासकामांच्या लोर्कापणप्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते़