Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

महानगरपालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महानगरपालिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ०३, २०२२

चंद्रपूर शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा #Election2022

चंद्रपूर शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा #Election2022



 


चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) आज महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे चंद्रपूर (चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत) शहर महापालिकांच्या सदस्य संख्येत पुन्हा सुधारणा होईल.  लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. त्यानुसार 3 लाखांपेक्षा अधिक व 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 65 इतकी तर कमाल संख्या 85 इतकी असेल.


राज्य सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी 2017 साली जी प्रभाग रचना होती तीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेतदेखील बदल होईल. 


या बैठकीत महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.


-----

------------

#election #election2016 #electionday #elections #selection #election2019 #theselection #summersunselection #presidentialelection #inaelectionobserversos #election2018 #fashionselection #joinmyselection #election2020 #tattooselection #indonesiaelection #chefselection #2016election #midtermelections #selectionrp #02wintheelection #2020election #naturalselection #generalelection #election2012 #pixelection #loksabhaelections2019 #officialselection #electionnight #2019elections #electionday2016 #saintselection #elections2016 #theselectionseries #casadiringhieraselection #elections2018 #massivefraudelection #selections #uselection #election2017

शुक्रवार, मे १८, २०१८

पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करा:कुकरेजा

पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करा:कुकरेजा

स्थायी समिती सभापती,आयुक्तांनी घेतला आढावा
डीआरएच्या कार्यप्रणालीवर ओढले ताशेरे 
नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात पाच लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा आणि नव्याने मीटर द्यावे आणि चालू आर्थिक वर्षात पाणी बिल वसुलीपोटी ३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. 
डीआरए नामक कन्सल्टन्सीने सादर केलेला प्रकल्प राबविण्याचे कार्य ओसीडब्ल्यू करीत आहे. मात्र डीआरएच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत स्थायी समिती सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातही एनईएसएलने तातडीने निर्णय घ्यावा, असेही निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. 
नागपूर शहरात होणारा पाणीपुरवठा, नागरिकांच्या तक्रारी, थकीत बिलाची वसुली, अवैध नळ कनेक्शनचे नियमितीकरण, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती आदी विषयांवर सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात विशेष बैठक पार पडली. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेवक सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, जुल्फेकार भुट्टो, राजेश मानकर, नगरसेविका सोनाली कडू, मंगला खेकरे, अर्चना पाठक, विद्या कन्हेरे, मनिषा अतकरे, अभिरुची राजगिरे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, लेखाधिकारी शिंदे, ओसीडब्ल्यूचे सर्वश्री मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, उपसंचालक (ग्राहक सेवा) राहुल कुलकर्णी, उपसंचालक राजेश कालरा उपस्थित होते. सध्या नागपुरात तीन लाख ३० हजार एकूण नळ कनेक्शन असून त्यापैकी दोन लाख ४० हजार ग्राहकांच्या मीटरची रीडींग घेण्यात येते. ५३ हजार ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येते तर २२ हजार ग्राहकांना फ्लॅट बिल पाठविण्यात येते. थकबाकीदारांमध्ये ५० हजार ते एक लाख थकबाकी असलेले २२७६ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एक लाखांवरील थकबाकीदार ७९३ आहेत. पाच हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या एक लाख २४ हजार आहे. एक लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या २२७६ पैकी १८०० ग्राहकांची नळ जोडणी कापली असून अन्य ग्राहकांना नोटीस देण्यात आले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
ज्या ग्राहकांचे मीटर चोरीला गेले आहे, अशा ग्राहकांकडे पुढील १५ दिवसांत मीटर लागायला हवे. यासाठी ग्राहकांना प्रथम नोटीस देण्यात यावी. १५ दिवसांत ग्राहकांनी मीटर बदलवावे, अन्यथा मनपा ते मीटर बदलवेल. मीटरची किमत सहा महिन्यांत बिलामधून टप्प्याटप्प्याने वसूल केली जाईल, असे निर्देश सभापती कुकरेजा यांनी दिले. यावर झालेल्या चर्चेनंतर ग्राहकांनी ५० टक्के रक्कम द्यावी, ५० टक्के रक्कम ओसीडब्ल्यूने भरावी, अशी सूचना काही सदस्यांनी दिली. चर्चेअंती हा विषय निर्णय घेण्यासाठी एनईएसएलकडे पाठविण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. जुन्या बिलाच्या तडजोडीचा निर्णय घेण्याचा विषयही एनईएसएलकडे वर्ग करण्यात आला. अनेक पाणी पुरवठा पाईपलाईनवर सीमेंट रस्ते तयार झाले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. 
पुढील बैठकीपासून ओसीडब्ल्यूने वसुलीचे महिनानिहाय विवरण सादर करावे, असेही निर्देश स्थायी समिती सभापती कुकरेजा यांनी दिले. बैठकीला ओसीडब्ल्यूचे डेलिगेटस्‌ व अन्य संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 -----------------------------------------------------------------------         
    जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



गुरुवार, मे १७, २०१८

नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार

नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षण नागपूर साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
'स्वच्छ सर्वेक्षण २०१८' चे पुरस्कार आज (ता. १६) नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले. नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे.
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी ह्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र हे सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील एकूण नऊ शहरांना पुरस्कार मिळाले असून सहा राष्ट्रीय स्तरावरचे तर तीन विभागीय स्तरावरचे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्कारामध्ये नागपूर शहराचा समावेश आहे.नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात नागपूर शहराने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांनी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण चमू कामाला लावली होती. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भात झोन निहाय बैठका घेऊन कृती आराखडा प्रत्यक्षात उत्तरविला. स्वच्छ सर्वेक्षणात कुठेही कमी राहु नये यासाठी म्हापैर नंदा जिचकार, तत्कालीन मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आणि अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवकांनी वस्त्यावस्त्यामध्ये मध्ये दौरे करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. स्वच्छ्ता अम्बेसडरची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्वच्छ्ता सर्वेक्षणाची माहिती पोचविली.
नागपूर साठी इमेज परिणाम
लोकसहभागासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागपुरकरांनीही जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ्ता दूत आदीच्या सामूहिक प्रयत्नातून नागपूर शहराने ही यशश्री खेचून आणली. स्वच्छता अम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, आरजे निकेता साने, हास्य कवि मधुप पांडेय, डॉ. अमित समर्थ, कौस्तभ चैटर्जी यानीही जनतेचे आभार मानले आहे.
जनतेचे आभार : महापौर नंदा जिचकार
नागपूर शहराने स्वच्छ सर्वेक्षणात मारलेली मुसंडी हे सामूहिक प्रयत्नाचे फलित आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानासोबतच जनतेने या सर्वेक्षणात जो भरभरून प्रतिसाद दिला, त्याबदल जनता आणि सर्वांचे महापौर या नात्याने मी आभार मानते आणि सर्व नागपूरकरांचे अभिनंदन करते.

सामूहिक प्रयत्नाचे यश : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
नागपूरने स्वच्छ्ता सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर मिळविलेले यश हे सामूहिक प्रयत्नाचे आणि प्रामाणिक कामगिरीचे फलित आहे. मनपातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांनी खरच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. नागरिकांमध्ये जाण्यास नगरसेवकांनी सहकार्य केले. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.
नागपूरकरांचे अभिनंदन : आयुक्त वीरेंद्र सिंह
स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारलयबद्दल नागपूरांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. यापुढेही अशीच सामूहिक कामगिरी करून सर्व क्षेत्रात यश प्रप्त करू.
महापौर आणि आयुक्तांच्या नेतृत्वाने दिले यश : स्वच्छता अम्बेसडर कौस्तभ चैटर्जी
सन २०१७-१८ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणाला महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने गती दिली. या दोघांच्याही काम करण्याच्या पद्धतीने अशिकारी, कर्मचारी आणि अभियानात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन मिळाले. काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि यामुळेच स्वच्छता सर्वेक्षण लोकांपर्यंत पोचले. या दोन्ही नेतृत्वाचे आणि सर्व संबंधितांचे मी अभिनंदन करतो.
                                     -----------------------------------------------------------------------
जाहिरात...



भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

शनिवार, मे १२, २०१८

महापौर,आयुक्तांच्या उपस्थितीत फुटाळा तलावावर स्वच्छता अभियान

महापौर,आयुक्तांच्या उपस्थितीत फुटाळा तलावावर स्वच्छता अभियान

१० झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

तलावातील अतिक्रमण आणि गाळ काढला

नागपूर/प्रतिनिधी: 
नागपूरकरांची चौपाटी म्हणून ओळखला जाणाऱ्या फुटाळा तलाव आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. फुटाळा तलावाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतानाच तलावातील गाळ काढण्यासही या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रारंभ करण्यात आला.
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सकाळी ७ ते ९ या वेळात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात संपूर्ण दहाही झोनच्या सहायक आयुक्तांसह झोनल अधिकारी व झोनमधील कर्मचारी तसेच ग्रीनव्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्व झोनला फुटाळा तलावालगतचा एक-एक परिसर स्वच्छतेसाठी विभागून देण्यात आला होता. स्वत: झोनच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनात संबंधित झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना स्वच्छतेसाठी मिळालेला परिसर स्वच्छ केला. आयुक्त वीरेंद्र सिंह आणि महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण परिसराची आणि अभियानाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
                          दरम्यान आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी अमरावती मार्गाकडील मंदिरापासून बॉटनिकल गार्डनपर्यंत फुटाळा तलावाच्या पाळीवरून चालत अभियानादरम्यान होत असलेल्या स्वच्छतेची पाहणी केली. तलावात साचलेल्या वनस्पतींना कसे काढता येईल, याबाबत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासाठी नीरीची मदत घेता येईल का, याची पडताळणी करा, जसे शक्य आहे ती पद्धत वापरून तलावातील वनस्पती पावसाळ्यापूर्वी काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.फुटाळा चौपाटीवर ठिकठिकाणी कचरा पेटी लावण्यात याव्या. वाढलेल्या झुडपी वनस्पती काढण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 
                                    यावेळी अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, उद्यान अधीक्षक चोरपगार, नासुप्रचे कनिष्ठ अभियंता पंकज आंबोरकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल उपस्थित होत्या. 
बॉटल्स, निर्माल्यचा कचरा 
मनपा आयुक्त वीरेंद्रसिंह यांना पाहणीदरम्यान तलावात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आणि काचेच्या बॉटल्स आढळल्या. निर्माल्याने तलाव भिंतीलगतचे पाणी अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झालेले आढळले. हा कचरा काढण्याला प्राधान्य क्रम देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.फुटाळा तलावालगत असलेल्या पाळीवर अनेक नागरिक, युवा, लहान मुले फिरत असतात. याच पाळीवर भिंतीला लागून एक उघडी डीपी आयुक्तांना दिसली. त्यातील वायर बाहेर आलेले होते. आयुक्तांनी तातडीने नासुप्रच्या अभियंत्यांना बोलावून तातडीने नवीन डीपी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
गोठा, पानठेल्याचे अतिक्रमण हटविले
या सफाई अभियाना दरम्यान तलावाच्या काठावर मंदिराजवळील पाळीवर असलेले पानठेल्याचे पक्के बांधकाम, तलावात पाणी नसलेल्या भागावर बांधण्यातआलेलागोठा आणि तलावातच असलेली एक झोपडी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी भुईसपाट केली. 
तलावाचे खोलीकरणही सुरू
परिसर स्वच्छतेसोबतच फुटाळा तलावाचे खोलीकरणही सुरू करण्यात आले. आज मंदिराच्या दिशेने हे खोलीकरण सुरू झाले. पाच जेसीबी आणि चार पोकलॅण्डच्या साहाय्याने गाळ काढण्याची प्रक्रिया आयुक्तासमक्ष सुरू करण्यात आली. 
महापौरांनी वाढविला उत्साह
आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी केली. त्यांनी स्वत: संपूर्ण फुटाळा परिसराला फेरफटका मारत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. फुटाळाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी काय मदत हवी ती घ्या पण नियमित स्वच्छता ठेवा, असे त्यांनी सांगितले. यापुढे तलावात निर्माल्य टाकणाऱ्यांवर दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरतीही यावेळी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

बुधवार, मार्च १४, २०१८

मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प;विरोधकांचा आक्षेप

मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प;विरोधकांचा आक्षेप

chandrapur municipal corporation images building साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
२०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. हा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असला तरी याला विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे.
आयुक्त काकडे यांनी सादर केलेल्या ४०२ कोटींच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची मनपाची बचत दाखविण्यात आली आहे. तर संपती करासहीत अन्य कराच्या माध्यमातून ५८.२३ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित असून २३९ कोटी रूपये सरकारकडून अनुदान स्वरूपात अपेक्षित असल्याची माहिती मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेता वसंता देशमुख, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, मुख्य वित्त अधिकारी गजानन बोखडे आदी उपस्थित होते.
माहिती देताना राहुल पावडे म्हणाले, मनपा अर्थसंकल्पात पालकमंत्री प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांना मदत केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिला व पुरूषांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय बांधकाम करण्यात येणार असून यासाठी ३० लाख रुपये तर पालकमंत्री धनलक्ष्मी योजने अंतर्गत ‘सब पढे, सब बढे’, ‘स्कूल चले हम’ मिशन, पालकमंत्री शुध्द पेयजल व शिष्यवृत्ती योजनेसाठी ५० लाखांची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला बचत गटांसाठी रोजगार संमेलन व मंच स्थापित करण्यासाठी ३० लाख, कर्मचाºयांच्या प्रशिक्षणासाठी १० लाख, शहरातील मटन, मच्छी, चिकन मार्केटच्या विकासासाठी १ कोटी, कांजी हाऊससाठी ५० लाख, महत्त्वपूर्ण मोठे पूल बांधण्यासाठी १ कोटी, आरोग्य केंद्राच्या विकासासाठी १ कोटी, मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौºयासाठी ३० लाख, मनपा झोन कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी ५० लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात असल्याची माहिती सभापती पावडे यांनी दिली.
ऐतिहासिक संग्रहालय उभारणीसाठी २० लाख, स्वर्गरथ वाहनाच्या खरेदीसाठी १५ लाख, सराई मार्केट विकासासाठी ७ कोटी, मनपा कामकाजाची माहिती पुस्तिका छपाईसाठी ५ लाख, महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ३० लाख, मनपाच्या योजनांचा प्रचार, प्रसारासाठी ३० लाख, मनपा क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यासाठी १० लाख, समाज प्रबोधन संमेलनासाठी १० लाख, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यासाठी १० लाख, विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन वितरीत करण्यासाठी १० लाख, कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी १० लाख, महिलांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण कामाकरिता ५० लाख, महापौर, सभापती जनता दरबार कार्यक्रमासाठी ५ लाख, दिव्यांगाचे विवाह संमेलन आयोजनासाठी ३० लाख तसेच शहरातील चार चौकांचे सौंदर्यीकरणासाठी ७० लाख रूपये अशा २०.३५ कोटींच्या कामांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे सभापती पावडे यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांनाही खर्चासाठी तरतूद
अर्थसंकल्पात महापौर, सभापती यांच्या आकस्मिक खर्चासाठी ५० लाख, मनपा पदाधिकारी आकस्मिक खर्चासाठी १० लाख, मनपा आपत्कालीन खर्चासाठी १० लाख, महापौर, सभापती सहायता कल्याण निधीसाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता, राहुल पावडे यांनी आपत्कालीन खर्च गरजूंना मदतीसाठी ठेवण्यात आला आहे. अनेकदा मदतीची इच्छा असतानाही आर्थिक तरतूद नसते, असे सांगितले.
महिलांना कराटे व ड्रायव्हिंग प्रशिक्षण
महापौर तेजस्वी अभियानासाठी ५० लाख रुपयांची शिफारस स्थायी समितीने केली आहे. या निधीतून शहरातील युवती व महिलांना आत्मरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण तसेच ड्रायव्हींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापौर तक्रार निवारण केंद्राची उभारणी
मनपा अर्थसंकल्पात महापौर तक्रार निवारण केंद्रासाठी २५ लाखांची शिफारस करण्यात आली आहे. या केंद्रात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचा लवकर निपटारा होण्यास मदत होईल, असे पावडे यांनी म्हटले.

कोणत्याही नगरसेवकांच्या सूचना, दुरूस्ती ऐकून न घेता आयुक्तांनी स्थायी समितीत बजेट सादर केला. राष्ट्रीय लेखा संहिता पद्धतीने बजेट सादर होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बजेटमध्ये अनेक चुका व घोळ असून यावर आपला आक्षेप आहे.
- नंदू नागरकर, नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती.

बुधवार, जानेवारी ३१, २०१८

विरोधकांच्या गदारोळाणे गाजली मनपाची आमसभा

विरोधकांच्या गदारोळाणे गाजली मनपाची आमसभा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
चंद्रपूर मनपाच्या नगरोत्थान निधीचा वाद संपता संपेना बुधवारी मनपाच्या सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी नगरोत्थान निधीचा विषय, अंबुजा कंपनी कचरा प्रक्रिया विषय, सराई मार्केट या विविध विषयांवर सभागृहातील वेलमध्ये जाऊन चांगलाच गदारोड बघायला मिळाला. सत्ताधार्यांनी नगरोत्थान निधी स्वत:च्या प्रभागात पळविळ्याचा आरोप बसपा गटनेता अनिल रामटेके यांनी केला आहे, यात विरोधकांनी वेलमध्ये येऊन संपूर्ण पदाधिकार्यांसमोर ठिय्या देत तीव्र निषेध नोंदविला.

राज्यसरकारकडून प्रत्तेक वर्षी शहरातील प्रभागाच्या विकास कामांसाठी नगरोत्थान निधी देण्यात येतो. या नगरोत्थान निधीचे समांतर वाटप हे प्रत्तेक नगरसेवकाला द्यावे लागते.  यावेळी देखील ८ कोटी  ७५ लाख २० हजार ७०० रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला होता . निधीच्या वाटपासाठी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आणि गटनेता वसंता फुलझेले यांचा समावेश असलेली समिती गठीत केली होती. समितीकडून निधीचे समान प्रमाणात वाटप होईल, अशी सर्व नगरसेवकांना आशा होती. मात्र, पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या प्रभागात अधिकाधिक निधी ठेवून घेत काही नगरसेवकांना लाखो रुपयांची कामे दिली गेली. तर, अनेक प्रभागात निधी देण्याचा समितीला विसर पडला. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह समर्थन देणारे मनसे, सेना, अपक्ष नगरसेवक आणि बसप नगरसेवकांत तीव्र संताप व्यक्त केला   . सत्ताधार्यांनी सत्तेतील अधिकाराचा गैर फायदा घेत या नगरोत्थान निधीच्या वाटपाच्या समितीतील सदस्यांनी ७० टक्के निधी हा आपल्याच प्रभागात वडता केला व ईतर नगरसेवकांना कमी प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले.  त्यामुळे उर्वरित सत्तेतील व विरोधातील काही नगरसेवकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातला. महापौर अंजली घोटेकर यांनी विश्राम गृहात नाराज गटनेत्यांची बैठक घेतली होती व त्यांना नगरोत्थान व दलित वस्तीतील ४० टक्के कामे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने आज विरोधकांनी मनपाच्या सभागृहात चांगलाच गोंधळ घातला, यात बसप गटनेते अनिल रामटेके,पप्पू देशमुख ,पुष्पा मून, रंजना यादव, लक्ष्मी कारंगल, पितांबर कश्यप, धनराज सावरकर, बंटी परचाके,प्रदीप डे,  व अन्य नगरसेवकांनी संताप व्यक्त करत चांगलाच गदारोळ घातला. या आधीही नगरोत्थान निधीच्या वादावरून उपमहापौर अनिल फुलझेले आणि भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यात  चांगलीच शाब्दिक झाली होती.

मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुखांचे "अंबुजा गो बॅक"
बुधवारी झालेल्या मनपाच्या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला चंद्रपूर शहराच्या कंपोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते तसेच प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र देखील महापौर अंजली घोटेकर यांच्या नावे लिहले होते. उपरवाही ग्रामसभेने अंबुजामध्ये प्लास्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.यामुळे दुर्गंधी व अनारोग्य पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती.या तक्रारी च्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंती सुध्दा केली होती.चंद्रपूर मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत असतांना अश्या बेजाबदार पाने काम करणाऱ्या व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या तसेच गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कंपनीला प्रक्रीया करण्यासाठी कचरा देणे चंद्रपूर मनपासाठी भूषणावह ठरणार नाही अशी भूमिका नगरसेवक पप्पू देशमुख  त्यांनी मांडली होती. हा विषय आमसभेत चर्चेला आल्यानंतर देशमुख व अन्य काही नगरसेवकांनी अंबुजा "गो बॅक" चे नारे दिले व त्यानंतर सर्वानुमते अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.

वडगाव प्रभागातील दत्त नगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेध..
शहरातील वडगाव प्रभाग हा एक महत्वाचा प्रभाग गणल्या जातो.वडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये 900 च्या वर लोक वास्तव्यास आहे. या प्रभागात गेल्या  20 वर्षापासून रस्ते,नाल्या यासोबतच अनेक विकासकामे झालेली नाहीत.२०१७-२०१८  या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थानमधेही दत्त नगरला वगळण्यात आले.याचाही नगरसेवक देशमुख यांनी महापौर यांच्या डायस समोर जाऊन निषेध केला.

सराई मार्केटची ईमारत ठाकूर यांच्या संस्थेला देण्यास नगरसेवकांचा विरोध.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथील महानगर पालिकेच्या मालकीची ६३४९.५९ चौरस मीटर मध्ये असणारी इमारत गेल्या काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे, जुन्याकाळी हि ईमारत धर्मशाळा म्हणून वापरली जात होती. सध्या हि ईमारत भग्नावस्थेत असल्याने इंडिअन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज चालविणाऱ्या ईतिहासकार अशोकसिंग ठाकूर यांनी हि ईमारत त्यांच्या संस्थेला मिळावी यासाठी मनपात २६ डिसेंबर २०१७ ला अर्ज केला होता. अशोकसिंग ठाकूर हे पुरततव जाणकार असून ते विविध विषयांवर प्रदर्शनी भरवित असतात.  मनपाने हा विषयाला २८ डिसेंबरला सर्वसाधारण सभेत मंजुरी देखील प्रधान करण्यात आली होती.  मात्र काही नगरसेवकांनी शासनाची ऐतिहासिक ईमारत एका अशासकीय संस्थेला देण्यात येऊ नये यासाठी विरोध दर्शविला. तर पप्पू देशामुख यांनी या ऐतिहासिक इमारतीला जर मनपा कोणाला देत नसेल तर या ईमारतीला विकसित करत त्यात राणी हिराईचे संग्रहालय बनविण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. 



सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

फुटपाथ मोकळे करा, नियोजनातून फेरीवाल्यांनाही न्याय द्या-

फुटपाथ मोकळे करा, नियोजनातून फेरीवाल्यांनाही न्याय द्या-

 केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांचे आवाहन

महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा



चंद्रपूर
: शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता अनेक ठिकाणी रस्त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, त्यासाठी त्यांचे रुंदीकरण आणि पादचारी नागरिकांना हक्काचा फुटपाथ मिळालाच पाहिजे. मात्र ज्यांचा उदरनिर्वाह रस्त्यावरील व्यवसायावर आहे त्या फेरीवाल्यांनाही व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन महानगरात करण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.


शहराचे दायित्व सांभाळणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, राहुल सराफ, राजेश मून, वसंता देशमुख, राहुल घोटेकर, उपायुक्त विजय देवळीकर, मुख्य अभियंता श्री. बारई, अभियंता श्री. बोरीकर, श्री. हजारे उपस्थित होते.

श्री. अहीर म्हणाले, शहरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा मिळायला हव्यात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नव्या पद्धतीने योजना राबवाव्यात. वेंडर ॲक्टची अंमलबजावणी करताना ओळखपत्र तपासून व प्रमाणपत्र देवून मनपाने फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी, यासंदर्भातील सर्व्हेक्षण पूर्ण करावे.

बाबुपेठ उड्डाण पुलासाठी बाधीत 68 घरांसाठी तत्काळ पर्यायी जागा द्याव्या, पुनर्वसन करण्याकरिता शासनाने मनपाकडे 2 कोटी 74 लाख 92 हजार 18 निधी उपलब्ध करून दिलेला आहे, रेल्वेच्या जागेत येणाऱ्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून संरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले.

अमृत योजनेतील कामांना गती देऊन तातडीने पूर्ण करा, मंजूर 8 पाण्याच्या टाक्यांपैकी 6 टाक्यांची कामे सुरू आहेत. शास्त्रीनगर, रेव्हन्यू कॉलनी येथील पाण्याच्या टाकी बांधकामातील अडथळे दूर करून कामे त्वरित सुरू करावी, 4.5 कि.मी.चे इरई डॅमपासून मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे, वितरण व्यवस्थेची कामे ही सोबतच सुरू करावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा अंतर्गत 264 घरांची कामे सुरू आहेत. मनपानी जागा उपलब्ध करून दिल्यास म्हाडा काम करण्यास तयार आहे. त्यामुळे या संदर्भात मोठया प्रमाणात नागरिकांनी अर्ज केले असून शहरात 8 हजार घरांची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधावे अशी सूचना त्यांनी केली. यासाठी म्हाडासोबत समन्वय साधून योग्य मार्ग शोधावा. गरज पडल्यास शहरातील मनपाच्या, महसूल, वेकोलि इत्यादीच्या जागा शोधून जमीन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी आवश्यकतेनुसार जागेची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी, अशी सूचना त्यांनी केली.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या 50 कोटी वृक्षलागवडीच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आगामी काळात जुन्या चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनची मोकळी जागा, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेनी वृक्षलागवड व सौंदर्यीकरणाकरिता उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा विचार करुन मनपाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी जेनेरीक मेडिसीनचे दुकान शहरातील मनपा दवाखान्यात सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. 

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

 महापौर नंदा जिचकार जर्मनीत

महापौर नंदा जिचकार जर्मनीत

नागपूर/ प्रतिनिधी - जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीएईआय दक्षिण आशिया सोबत अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कार्यान्वित असून अर्बन नेक्ससच्या ऊर्जा, पाणी आणि अन्न यावर कार्य सुरू आहे.

आरईएक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. महापौर नंदा जिचकार ह्यांचा विषय संसाधन कार्यक्षमता हा असून या क्षेत्रातील कामांना नागपूर शहरातच नव्हे तर विभागात प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्य करतील. आरईएक्सकॉमच्या सदस्या म्हणून जर्मनी बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित परिषदेत त्या सहभागी होणार आहेत. यात त्या नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जागतिक पातळीवर सादर करणार आहे.
आज महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

आज महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

  • नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी  : नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १२ नोव्हेंबर रोजी लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर सायंकाळी ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. वी.बी.बी.ए.चे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ, आय.बी.बी.एफ.चे महासचिव चेतन पठारे, आ. जोगेंद्र कवाडे, अ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ.विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्षनेता मो. जमाल, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, राकाँ पक्ष नेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका मनिषा धावडे, आय.बी.बी.एफ.चे अध्यक्ष प्रेमचंद डेगरा उपस्थित राहतील. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी केले आहे.