Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ब्रम्हपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ब्रम्हपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी


Image result for शाळेत चोरी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील  सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांचे अज्ञात चोरट्यांनी  कुलूप तोडून साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ ऑगस्टच्या रात्री हि घटना घडली. या आधीसुद्धा १३ ऑगस्टच्या रात्री अरहेर-नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलुप तोडून दोन आलमाऱ्या फोडल्याची घटना घडली होती.हि घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनांमुळे चोरट्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळविल्याचे समजते.
             मिळालेल्या माहिती नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये २२ ऑगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. ह्या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यातील सुरबोडी शाळेमधून चोरट्यांनी मॉनिटर व प्रोजेक्टर असे अंदाजे ३५,००० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले तर दुसऱ्या घटनेत नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळेमधून एम्प्लिफायर,माईक,पेनड्राईव्ह व सिपी असे साहित्य चोरीला गेले.याबाबत दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

 मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु;ब्रम्हपुरीचे दोन कराटेपटू जाणारॲथेन्सला

मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु;ब्रम्हपुरीचे दोन कराटेपटू जाणारॲथेन्सला

मिशन शक्तीला ना.सुधीर मुनगंटीवार यांचे पाठबळ
आंतरराष्ट्रीय कराटे साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु करुन आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याच्या वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या योजनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील ऋषिकेश येरमे आणि विजयालक्ष्मी येरमे या दोन आदिवासी विद्यार्थ्यांचा ग्रीस देशातील ॲथेन्स येथील प्रवास निश्चित झाला आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतंर्गत आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पींयनशिप स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरीच्या दोन आदिवासी विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर यांच्याकडे हा निधी वळता करण्यात आला आहे. मिशन शौर्यनंतर आणखी दोन मुले आपला पराक्रम विदेशात दाखविण्यासाठी रवाना होत असल्याचा आनंद राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागाने ऋषीकेश व विजया लक्ष्मी येरमे या दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप 2018 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख अशी एकूण पाच लाख रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली व परिसरातील आदिवासी मुलांना काही विशिष्ट खेळामध्ये प्राविण्य देवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविण्यासाठी तयार करण्याचे ना.मुनगंटीवार यांनी जाहिर केले आहे. चंद्रपूर जिल्हयात तयार होणा-या नव्या क्रीडा संकुलाचा व सुविधांचा वापर या भागातील वंचित घटकाला मोठया प्रमाणात व्हावा व त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्हावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहे. ब्रम्हपूरी परिसरातील या दोन कराटे पटूंनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले व आपल्या परिसराचे नांव लौकिक वाढवावे, अशा शुभेच्छा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: 
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी  प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी  07:00 वाजताच्या सुमारास  येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात  चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.
 

मंगळवार, जानेवारी २३, २०१८

अन पालिकेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पॉर्न विडिओने उडवली खळबळ:पोलिसात तक्रार दाखल

अन पालिकेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पॉर्न विडिओने उडवली खळबळ:पोलिसात तक्रार दाखल

whatsapp साठी इमेज परिणामब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
स्वच्छ सर्वेक्षणात मदत व्हावी या अनुशंघाने ब्रम्हपुरी नगरपालिकेतील एकाने व्हाट्सअप ग्रुप तयार केला .  पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले हे प्रकरण आता थेट पोलीस स्टेशनच्या दारी पोहचले आहे. या प्रकाराबाबद नगरसेवक सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल  केली आहे

सध्या  सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे वारे वाहत आहेत प्रत्येक पालिका अहोरात्र मेहनत घेत आहे.आशतच ब्रम्हपुरी नगरपरिषद देखील कामाला लागली आहे . ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे
यासाठी एक व्हॉट्स अ‍ॅपवर एक ग्रुप तयार केला. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना यात समाविष्ट केले. यात महिलांचाही समावेश आहे, कुठल्याही मुद्यावर निष्पक्ष चर्चा व्हावी, पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले.

अश्लिल व्हिडोओ ग्रुपवर येताच प्रथम ग्रुपमधील पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये आणि नंतर याची सर्वत्र चर्चा होताच संपूर्ण ब्रह्मपुरीतच खळबळ उडाली.रविवारी शहरात दिवसभर नगरपालिकेच्या या ग्रुपची व त्यातील पोस्टचीच चर्चा सुरू राहिली. याबाबत नगरसेवक  सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल  केली आहे. या तक्रारीत त्यांनी ग्रुप मधील महिलांना मानसिक तसेच नाहक प्रकारची हानी सहन करावी लागली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करावी असेदेखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या होऊ घातलेल्या  महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीत, ब्रम्हपुरी तालुक्यात पाच महाविद्यालयाची निवडणूक दिनांक ११ जानेवारी २०१८ संपन्न झाली. या महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने ५ पैकी ४ जागेवर विजय संपादन करीत बाजी मारली. तर एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला समाधान मानावे लागले.
   सविस्तर वृत्त असे की, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुक पार पडली. यात ब्रम्हपुरी तालुक्यातील पाच महाविद्यालयाचा समावेश होता. यात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने शांताबाई भैय्या महिला महाविद्यालयातून मीनाक्षी घनश्याम नाकाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून अविष तुपकर, गंगाबाई तलमले महाविद्यालयातून संतोष रमेश पिलारे, शोभाताई बनसोड कला व वाणिज्य महाविद्यालयातून गोपाल अंतराम बारसागडे यांनी बाजी मारत ४ महाविद्यालयावर आपला झेंडा रोवला.
 तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ने. हि.महाविद्यालयातून प्रशांत राऊत  हा निवडून आल्याने एका जागेवर समाधान व्यक्त केले.या निवडून आलेल्या ४ विद्यापीठ प्रतिनिधीचे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाचे युतीचे मोंटू पिलारे, अनुकूल शेंडे, संजू मेश्राम, अमोल ठेंगरी,मिथुन चौधरी,शरद अंबादे, अंकुश मातेरे, विवेक रामटेके यांनी अभिनंदन केले.

मंगळवार, जानेवारी ०२, २०१८

अनाथ मुलांच्या विकासासाठी सदैव तत्पर

अनाथ मुलांच्या विकासासाठी सदैव तत्पर

  • श्रीकांत पाटील अध्यक्ष, पारधी युवा जणक्ल्याण संस्था

ब्रम्हपुरी/ग्रामीण प्रतिनिधी:
आज नववर्षाची सुरुवात युवा जनकल्याण संस्थानी  राजुरा येथील नारायनदा मावानी छात्रवास चुनाळा(अनाथ) मुलांशी हितगुज साधून विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला त्यानंतर त्याच्या विकासासाठी युवा जनकल्याण सदैव तत्पर राहणार असे श्रीकांत पाटील यानी व्यक्त केले.तसेच नवतरुण युवकांना मार्गदर्शन केले त्या युवकांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोहार आणि फळे वाटप करण्यात केले.यात बालगोपालांना खूप आनंद झाल असेच आम्हा ला भेटत राहावं अस इच्छा श्रीकांत पाटील यानी व्यक्त  व्यक्त केल्या. या कार्यक्रम प्रसंगी युवा जनकल्याण अद्यक्ष श्रीकांत पारधी, युवा जनकल्याण संचालक इंजि.नंदकिशोर सिन्हा,प्रकल्प प्रमुख दिलीप म्हैसने, युवा जनकल्याण सद्स्य स्मित ताकसंडे,अजय किरमिरवार,आकाश गीडवानी,हेमराज तनकर,प्रदीप चंदावार,शारदा कोडापे आदी उपस्थित होते.यानंतर पण युवा जनकल्याण च्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम केले जातील अस ठरविण्यात आले.

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

तंबाखूला राम राम

तंबाखूला राम राम

जि. प. उ. प्रा.  शाळा बाळापूर(बु. )येथे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 

ब्रम्हपुरी- दिवसेंदिवस शालेय विद्यार्थांमध्ये वाढणारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनाचे प्रमाण ही  गंभीर समस्या समस्या बनली आहे. विद्यार्थयांमध्ये ऒरल सबम्युकलस या प्राथमिक कर्करोगाचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याची दखल सलाम मुंबई फाउंडेशन ने घेतली आणि म. रा. शिक्षण संचालनालय मुंबई च्याक सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये तंबाखूमुक्त कार्यक्रम राबविणे सुरू केला आहे.  या उपक्रमा अंतर्गत सी.बी. एस. सी.  बोर्डाचे मानकानुसार ठरविलेले 11 निकष पुर्ण करणा-या शाळांनाच तंबाखुमुक्त  शाळा घोषीत करण्याचा कार्यक्रम हाती घेऊन तंबाखू ला राम राम ठोकला.
या उपक्रमाचाच भाग म्हणून जि. प. उ. प्रा. शाळा बाळापूर (बू. )येथे विद्यार्थांसाठी  " तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम" या विषयावर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी मुख्याध्यापिका सौ. अंजली करंबे, तर प्रमुख पाहूने नवनियुक्त शिक्षक भोले सर , व मांडवटकर सर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपुर्ण जिल्ह्यात तंबाखुमुक्त शाळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारे  हरीश्चंद्र पाल , राज्य स्तरीय  प्रशिक्षक, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई हे उपस्थित होते.
यावेळी शाळेतील समस्त शिक्षक -शिक्षीकाची प्रमुख उपस्थिती होती. 
या वेळी मार्गदर्शन करतांना हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुचे प्रकार, सेवनाच्या विविध पद्धती, तंबाखूमध्ये असणारे घटक,  तंबाखू सोडण्याचे उपाय हे विविध गिते, भारूड,  आरती, चित्रे, पोष्टर यांचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थांनी या कार्यक्रमाचा मंत्रमुग्ध होवून आस्वाद घेतला व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न खाण्याची प्रतीध्न्या घेतली. 
या मार्गदर्शन मेळाव्याचे निमीत्ताने स्व. रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्थेच्या वतीने तंबाखू सेवनाचे दुष्परीणाम दर्शविणा-या पोस्टर प्रदर्शनिचे आयोजन केले होते.  
सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार मांडवटतर सर यांनी केले.

शनिवार, डिसेंबर ०९, २०१७

विकासापासुन अजूनही विदर्भ अपेक्षितच?

विकासापासुन अजूनही विदर्भ अपेक्षितच?

गोविंदराव भेँडारकर
विदर्भवादी अँड गोविंदराव भेँडारकर
ब्रम्हपुरी- असमतोल दूर करायचा असेल, तर लहान राज्यांच्या निर्मितीचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत विदर्भाचा विकास किती प्रमाणात झाला याचा जर आढावा घेतला, तर विकासापासून अजूनही विदर्भ
उपेक्षितच आहे, हे ध्यानात येते. विकासाचा अनुशेष कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व संपत्तीचे विपुल असलेल्या विदर्भामध्ये विकासाची गती मंद आहे. विदर्भात खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. एकट्‌या विदर्भात वीजनिर्मितीची चार केंद्रे आहेत.सोळा कोळसा खाण', धान्याचे कोठार , वनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहेत असे असूनसुद्धा विदर्भाचा 50 वर्षांत विकास का झालेला नाही, याचाही विचार व्हायला हव.
राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केलेला आहे. विदर्भाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात उपयोग न होता तो विदर्भाबाहेरच जास्त होतो. मोठे सिंचन प्रकल्प अजूनही आम्ही विदर्भात उभारू शकलेलो नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलेला आहे. आज सर्वांत जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. खेड्‌यापाड्‌यांचा कायापालट अजूनही झालेला नाही. अनेक विदर्भाचे प्रकल्प अडून पडलेले आहेत. त्यामुळे विदर्भाच्या वाट्‌याला उपेक्षितांचे जिणे आलेले आहे.
विदर्भ वेगळा करण्यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, परंतु त्या आंदोलनांना यश प्राप्त झाले नाही. तसा प्रस्ताव देण्याचासुद्धा विचार सुरू आहे; परंतु राजकीय पक्षांचे एकमत होत नाही. विदर्भ वेगळा हवा की नको यासाठी आपली क्षमता चाचपडून पाहण्याची गरज आहे. आजवर ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिले, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ आहे. विदर्भाचा अनुशेष वाढविण्यासाठी जबाबदार कोण? ज्यांच्यावर आपण इतकी वर्षे विश्वास टाकला त्यापैकी स्व.जांबुवंतराव विदर्भाचा मुद्दा शासन दरबारी लावून धरला पण ही ज्योत मावळली.आता त्यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे.आता आपण निवडून दिलेल्या वैदर्भीय नेत्यांचा करंटेपणाच विदर्भाच्या मागासपणाला जबाबदार आहे. प. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास किती, याची आकडेवारी शासनाने जाहीर करावी. हे सिद्ध होते. परंतु या मागणीला उचलून का धरण्यात आले नाही? याचासुद्धा विचार व्हायला हवा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता जांबुवंतरावांव्यतिरिक्त कोणीही नाही. इतर जे नेते विदर्भाचे तुणतुणे वाजवीत आहेत,का असा सवाल निर्माण होत आहे. अशी माहिती विदर्भवादी अँड गोविंदराव भेँडारकर यांनी दिली.

कर्जमाफी कधी होणार

कर्जमाफी कधी होणार



ब्रम्हपुरी / गुलाब ठाकरे 
राज्य सरकारच्या कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम खात्यात अद्याप जमा न झाल्याने चिंता वाढली आहे. चार महीने उलटला तरी सरकारकडून अद्याप एकाही पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीची चौकशी करताना राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कजर्मुक्ती ला ग्रहण लागले आहे का असा गहन प्रश्न निर्माण होत आहे.
कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या  चार महिन्यात  राबविलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत तालुका शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. कर्जमुक्तीचे ऑनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या दिव्यातून शेतकरी बाहेर पडल्यानंतर तरी किमान कर्जमाफीची गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा असताना ती देखील या  राजाने दाढी हालवाचे काम करून ही योजना फोल ठरली आहे. आता ही कर्जमाफी कधी पदरात पडते याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
 सर्वच नेतेमंडळी उलटसुलट प्रतिक्रिया देत असली तरी प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफीच्या कागदपत्रांची पूर्तता आणि त्यासाठी हेलपाटे मारुन बळीराजा मेटाकुटीला आला आहे. दररोज एक नवीन नियम सांगितला जात असल्याने शेतकरी कर्जमाफी मिळणार तरी कधी? असा उद्विग्न सवाल करत आहे.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा चार महिने झाले. तेव्हापासून राज्य शासनाने लावलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात शेतकरी करत असून सोसायटी, सहकार खाते व अन्य ठिकाणी हेलपाटे मारुन कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, प्रत्येकवेळी नवीन नियम आणि कागदपत्रांची मागणी होत असल्याने शेतकरी पूर्णत: त्रासुन गेला आहे. सहाय्यक निंबधक कार्यालय, जिल्हा बँक किंवा चावडी वाचनाच्या निमित्ताने यामध्ये सहभागी झालेले तहसीलदारही कर्जमाफीबाबत काहीही सांगण्यात उत्सुक नाहीत.शासनाने कर्जमाफीच्या अर्जात कोणी ग्रा. पं. सदस्य, सोसायटी संचालक, चेअरमन, सरपंच आहे का अशी विचारणा करणारा नवा खलीता पाठवून संपूर्ण याद्या पुन्हा तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या निकषात ही कर्जमाफी पुन्हा अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी नक्की मिळणार तरी आहे का? असा सवाल  तालुक्यातील शेतककरी करत आहेत.
 कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला दीड लाखाची कर्जमाफी अपेक्षशेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला असताना शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून शेतकर्यांना दिलासा केव्हा मिळणार की ""राजा बोले दाढी हाले "" असा पेच शेतकऱ्यांना पडत आह.

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव

शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव

ब्रम्हपुरी/शिक्षण विभाग पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत अऱ्हेरनवरगांव बिटस्तरीय शालेय बालक्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा साठी आलेले मा.आम. किर्तिकुमार भांगडीया यांचे हस्ते या कार्यक्रमाच उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. मा.आमदार महोदयानी विध्यार्थी यांना मार्गदर्शना मध्ये की सुप्त कलागुणांना वाव मिळणारे व्यासपीठ म्हणजे ही स्पर्धा याच्या मध्ये किती तरी विध्यार्थ्यानि  भाग घेऊन अंगीy असलेल्या कला सादर करुन आलेल्या मान्यवर मंडळीच मन मोहून टाकले या मुळे या मुलाच कौतुक किती ही करा तेवढे कमीच आहे असे आम.महोदय यानी व्यक्त केले.
 या कार्यक्रमाला उपस्थित  मा.श्री. क्रिष्णलाल सहारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे अध्यक्षतेखाली,मा प्रमोद चिमुरकर सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर, मा सौ दिपालीताई मेश्राम जिल्हा परिषद सदस्या, विलास उरकुडे उपसभापती प स ब्रम्हपुरी,मा थानेश्वर कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, सौ सुनंदाताई ढोरे सदस्या प स ब्रम्हपुरी,मा प्रदिप बिरमवार संवर्ग विकास अधिकारी प स ब्रम्हपुरी, मा वसंता वारजुरकर, मा दिपक उराडे, मा सौ भारती लांजेवार सरपंच ग्रा प पिंपळगाव आदि मान्यवरांचे उपस्थितीत दि ५ डिसेंबर २०१७ ला मौजा पिंपळगाव (भोसले) येथे संपन्न झाला

शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

ब्रम्हपुरी येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी धरणे

ब्रम्हपुरी येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी धरणे

ब्रम्हपुरी - विदर्भ राज्य समन्वय समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणिकरिता  शिवाजी चौक ब्रम्हपुरी येथे आज शुक्रवार ०१/१२/२०१७ ला धरणे आंदोलन  कार्यक्रम  डॉ. डी. एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केले आहे. ११ डिसेंबरला विदर्भ बंद चे आवाहन केले आहे.
सुधीर सेलोकर, अड. गोविंद भेंडारकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, सुदाम राठोड, हरिश्चंद्रजी चोले, विनोद झोडगे, हनुमंतराव राऊत अरविंद नागोसे, निकेश तोंडरे,  सुखदेव प्रधान, विनायक रामटेके ,नामदेवराव गेडाम, डॉ.डी. मेश्राम,  विनायक रामटेके, सुधाताई राऊत,लिनाताई जोगे, प्रतिभा लाडे,  गीताताई  मेश्राम उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा देणार,4 लाख वैदर्भीय बेरोजगारांचा बॅकलाग केव्हा भरणार, विजेचे लोडशेडिंग केव्हा संपविणार, विदर्भातील जनतेसाठी विजेचे वीज दर निम्यावर आना लोडशेडिंग संपवा,आदी मागण्याचा समावेश होता. आभार वासुदेव काढिखाये यांनी मानले.

ब्रम्हपुरी येथे ऑल इंडिया ओपन बुद्धिबळ स्पर्धा

ब्रम्हपुरी येथे ऑल इंडिया ओपन बुद्धिबळ स्पर्धा

ब्रम्हपुरी- ब्रम्हपुरी एज्युकेशनल सिटी ट्रॉफी ऑल इंडिया ओपन फेडरेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेच उद्घाटन आज  १/१२/२०१७ ला दुपारी १:०० वाजता उदघाटन झाले. विविध राज्यातील ११० राज्यातील स्पर्धकानी  प्रवेश नोंदविला आहे. ब्रम्हपुरीतील अनूक्रमे विक्रांत चोले,  निलेश बांडे , रितेश उरकुडे, ओमकार रासेकर,  निषाद खोब्रागडे, वेदांत बांडे, कुमुदीनी बारसागडे ऐश्वर्या बावनकुळे, जुबेर रैय्यानी, आदित्य तलमले व हरीक्रिष्ण सरकार हे खेळाडू देशातील इतर खेळाडूंना ब्रम्हपुरी तर्फे आवाहन देणार आहेत.
ब्रम्हपुरी येथील होणारी विदर्भातील ही सर्वात मोठी मान्यता प्राप्त स्पर्धा असून या करीता प्रा. शुभाष बजाज यांचे अध्यक्षतेखाली स्वागत समिति तयार करण्यात आलेली आहे. नारायण राऊत बोकडे,  प्राचार्य डॉ. देवीदासजी जगनाडे,  डॉ. प्रेमलाल मेश्राम व अँड. गोविंदराव भेँडारकर हे स्वागत समिति चे अध्यक्ष आहेत.
या स्पर्धेत एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख पारितोषीके असून प्रथम रोख पुरस्कार पंचवीस हजार रुपये आहे.याशिवाय साठ खेळाडून टॉफी पुरस्कार देण्यात येणार आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते श्री.मा.अशोक भैया,  प्राध्यापक अतुलभाऊ देशकर , श्री.निलेश मोहोता, डॉ.खिजेंद्र गेडाम, डॉ.जी.एन.मेश्राम , श्री.शुभाषराव ठवरे,  कादर मॅथ्थू निरप्पे ल,  डॉ.लक्ष्मीकांत लाडुकर, श्री.पंचमजी आकरे , श्री.वसंतरावजी कावळे , श्री.रामावतार अग्रवाल, श्री शुभाष अग्रवाल, श्री.शरदराव उराडे , श्री.धनेशजी अग्रवाल, श्री.बंडुभाऊ बांगरे, श्री.राजेश जाजु, श्री रवि लोखंडे , श्री सूखदेव प्रधान , श्री.सारंगभाऊ बनपूरकर,  प्रकाशभाऊ बगमारे,  रंजना चोले.श्री.नंदुजी पिलारे , डॉ.माणिक  खुने व डॉ.राजकुमार लोकरे हे आहेत. ब्रम्ह्पुरी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सर्व सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नाचे पराकाष्ठा करीत आहेत

गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

ब्रम्हपुरी -  आज दि.२९/११/२०१७ रोजी चंद्रपूर येथील वीज विद्युत कामगार वर्कर फेडरेशन सोसायटी सभागृहात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिला कोन्सिल ची बैठक झाली 

संबधित संघटनेने आशा वर्कर व गटप्रवर्तक यानी  दि.१८ डिसेंबर २०१७ ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर आयोजित राज्यव्यापी आक्रोश मोर्चा तयारी सुरु करण्याची माहिती देण्यात आली असून संघटनेच्या वतीने जिला आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुखमंत्री याना निवेदन देऊन दि.७/१०/२०१७ च्या केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय परीपत्रका नुसार एन.एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी ५% मानधन वाढ व 1५% बोनस लागू करण्यात आला आहे त्याचा लाभ आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हि मागणी करण्यात आली,यावेळीजिल्हाभराती ल शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते असे कॉ.श्री.विनोदजी झोडे यानी सांगितले.

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक

ब्रम्हपुरी -  आज दि.२९/११/२०१७ रोजी चंद्रपूर येथील वीज विद्युत कामगार वर्कर फेडरेशन सोसायटी सभागृहात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिला कोन्सिल ची बैठक झाली 

संबधित संघटनेने आशा वर्कर व गटप्रवर्तक यानी  दि.१८ डिसेंबर २०१७ ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर आयोजित राज्यव्यापी आक्रोश मोर्चा तयारी सुरु करण्याची माहिती देण्यात आली असून संघटनेच्या वतीने जिला आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुखमंत्री याना निवेदन देऊन दि.७/१०/२०१७ च्या केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय परीपत्रका नुसार एन.एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी ५% मानधन वाढ व 1५% बोनस लागू करण्यात आला आहे त्याचा लाभ आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हि मागणी करण्यात आली,यावेळीजिल्हाभराती ल शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते असे कॉ.श्री.विनोदजी झोडे यानी सांगितले.

रविवार, नोव्हेंबर २६, २०१७

काव्यशिल्प न्युजच्या बातमीची दखल

काव्यशिल्प न्युजच्या बातमीची दखल

जीवघेण्या रस्त्याला ब्रम्हपुरी नगर परिषदेने दिली तात्काळ मंजुरी

ब्रम्हपूरी/ वार्ताहर : गुलाब ठाकरे 
ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा या मथड्याखाली काव्यशिल्पने बातमी प्रकशित केली होती या बातमीची दखल ब्रम्हपुरी नगरपरिषदेने घेतली आहे.  प्रा.सुयोगकुमार बाळबुधे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी भा.ज.यू.मोर्चा यांच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे.छत्रपती शिवाजी चौक ते सावरकर चौक ब्रम्ह्पुरी येथील सीमेंट रस्त्याला पूर्व कामाला नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे.भा.ज.यु. मोर्चा पदाधिकारी यानी मुख्याधीकारी नगरपरिषद यांना निवेदन सादर केले या रस्त्यांविषयी माहिती मा.प्रा.सुयोगकुमार बाळबुधे शहराध्यक्ष भा.ज.युवा मोर्चा  काव्यशिल्प न्यूज़ ला दिली १४/११/ २०१७ दिली असता. सदर वृत्त १५/११/२०१७ ला काव्यशिल्प न्यूज़ यांनी हे वृत्त प्रकाशित करुन नगरपरिषदे मुख्याधिकारी यांचे डोळे उघडून दिले. आणि त्या जीव घेणा सीमेंट रस्त्याच्याबांधकामाला मंजूरी प्रधान करुन काम सुरू केले.

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

बरडकिन्हीं येथे जागतिक शौचालय दिवस

बरडकिन्हीं येथे जागतिक शौचालय दिवस

ब्रम्ह्पुरी - ब्रम्हपुरी तालुक्यातील  बरडकिन्ही ग्राम.पंचायत कार्यालय येथे जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला.
या जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यासाठी ग्रा.पं.सरपंच सौ.लताताई गुरुदेव बगमारे ,उपसरपंच श्री.तुषारजी तलमले ,श्री.आर.एस नागुलवार ग्रामसचिव ,श्री.नानाजी बगमारे म.तं.मुक्त समिती अध्यक्ष , सौ.विध्याताई ठाकरे सदस्या , सौ.संगीताताई  शेंडे सदस्या, श्रीमती अनिता गुरुनुले अंगणवाडी शिक्षिका, श्रीमती रंजना राऊत अंगणवाडी शिक्षिका,सौ.अनिता बोंडगुलवार अंगण.शिक्षिका ,श्रीमती सवीता दोनाडकर अंगण.शिक्षिका,दोनाडकर मदतनिस,सौ.शीतल प्रधान आशावर्कर ,संगीता सोंदरकर,सौ.सोनीताई राऊत आशावर्कर ,गुलाब राऊत गुलाब ठाकरे यांच्या उपस्थित जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आले.
मार्गदर्शन म्हणून  श्री.आर.एस.नागूलवार ग्रामसचिव यानी  उघड्यावर शौच करू नये, हे अनेकवेळेला समजावून देखील अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, त्यासाठी सरकारी पातळीवर विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जातात, तरी सुद्धा विशेष फरक खास करुन ग्रामीण खेडी भागात पडत नसल्यामुळे वैतागून वेगळ्या मार्गाने शौचालय बांधण्याचे महत्व  ज्यात गावातील महिला उघड्यावर शौचास बसणारे यांच्यावर करडी नजर ठेवण्याची आणि घाण करणार नाही अशी शपथ घेण्यासाठी भाग पाडणे व स्वच्छतेच्या बाबतीत महिला जागरूक असल्यास आणि उघड्यावर शौचास जायला नकार देणारी भूमिका यांच्या विषयी  शपथ  घेतली. तर गावातील आणि घरातील पुरुष देखील महिलांच्या निर्धाराने त्याना सुद्धा स्वच्छतेचि शपथ घ्यायला भाग पाडणे अशी माहिती महिलाना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे शासनानी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय लाभर्थ्याना शौचालय बांधून झाल्यानंतर त्या लाभार्थ्याना निधी ग्राम पंचायत द्वारे प्रधान करने त्यामुळे गाव निर्मल गाव होणार अशी उपाययोजना शासनानि केली ?त्याचाच फायदा बरडकिन्हीं येथील ग्राम पंचायत अंतर्गत या योजनेत भरघोस यश संपादक करुन गावात शौचालय बांधली.अशी माहिती शौचालय दिनी ग्रामसेवक आर.एस.नागुलवार यानी दिली.
श्रीकांत पारधी यांना ध्येयपूर्ती गौरव पुरस्कार

श्रीकांत पारधी यांना ध्येयपूर्ती गौरव पुरस्कार


ब्रम्हपुरी :  ७५ व्या ऑगस्ट क्रांती अमृतमहोत्सवनिमित्त्यानं मैत्री संस्था व सद्भावना संघ मुंबई च्या वतीने घेतलेल्या इंदिरा गांधी  जन्मशताबकर्तृत्व गौरव  पुरस्कार २०१७ मध्ये विविध क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा गौरव सोहळा पार पडला.  युवा जनकल्याण संस्था चे अध्यक्ष श्रीकांत पारधी यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळे त्यांना ध्येयपूर्ति गौरव पुरस्कार  देण्यात आला.
 यावेळी पद्यश्री कुमार केतकर (जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक), हुसेन शेख (सद्भावना संघ मुंबई), वर्षा विद्या विलास (नशाबंदी मंडळ मुंबई) व संयोजक सुरज भोईर (मैत्री संस्था अध्यक्ष) याच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा

गुलाब ठाकरे /ब्रम्हपुरी
दत्तोपंत ठेंगडी , राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड, नागपूर (श्रम व रोजगार मंत्रालय,  केंद्र सरकार, नवी दिल्ली. ) आणि
स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था , वर्धा
द्वारा ग्राम पंचायत देवपायली तालुका नागभिड येथे असंघटीत महीला कामगाराची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन देवपायली गटग्रामपंचायतचे सरपंच सौ.योगीता  देशमुख, यांचे अध्यक्षतेखाली, व श्रीमती इंदीरा नवघडे , उपसरपंच गटग्रामपंचायत देवपायली यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी हरीश्चंद्र पाल सचिव , स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था, तसेच प्रमोद रत्नपारखी, शिक्षणाधिकारी , श्रमिक शिक्षण बोर्ड , नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सौ़. शालू नवघडे,  , प्रास्ताविक प्रमोद रत्नपारखी यांनी तर आभारप्रदर्शन सौ. अल्का चिंचोलकर यांनी केले . या वेळी हरीश्चंद्र पाल, श्रीमती नवघडे, योगीता देशमुख यानी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुमूक्तीची गरज, महीला व्यसनांच्या आहारी गेल्या तर बिघडणारी कौटूंबिक परीस्थिती, आर्थीकतेचा होणारा अपव्य,तंबाखू सेवनाने होणारे विविध आजार , तंबाखू सेवनाचे विविध पद्धती, सेवनाचे प्रकार, कर्करोग होवू नये यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चात्मक व गिताचा आधाराने प्रशिक्षणार्थींना मंत्रमुग्ध केले. तसेच पहील्या सत्रात या कार्यशाळेची गरज आणि महत्व. असंघटीत कामगाराची होणारी पिळवणूक, नेट बँकीगची उपयुक्तता, ऑनलाईन व्यवहाराची गरज व फायदे  अशा विषयांवर मार्गदर्शन केले. तर सौ शालू नवघडे हिने बचत गट काळाची गरज, बचत गटाचे फायदे, विविध व्यवसाय., देवपायली येथील बचतगटाची यशस्वीतता इ. विषयावर माहीती दिली. रोजगार हमी कायदा, व कामगाराचे हक्क आणि कर्तव्य, घरगुती व्यवसाय, कूषी विभागाची गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यावर मार्गदर्शन केले. याशिवाय जिवनात यशस्वी होण्याकरीता वापरावयाची सप्तसुत्रे, 7 या अंकाच्या विकासात्मक खेळातून जिवनात संतर्कतेचे महत्व,  जिवनाचा आनंद कसा घ्यावा, व शारीरिक दूष्टया तंदुरूस्ती कशी राखावी याचे प्रत्याक्षिक गाडी आली, गाडी आली रे, या कृती गितातून महीलांना देण्यात आले.
       ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कार्यशाळांचे नियमीत आयोजन झाले तर ग्रामीण महीला डीजीटल युगाच्या प्रवाहात हळूहळू सामील होतील व ग्रामीण महीला निर्भर होवून , त्यांचे सक्षमीकरण होईल असा आशावाद महीलांनी यावेळी व्यक्त केला.सदर कार्यशाळेला उपस्थित महीला कामगाराचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून प्रतीदिवस रू. 100/ प्रमाने केंद्र शासनाचे निर्देशानुसार ऑनलाईन भत्ता बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहीती रत्नपारखी यांनी दिली.

गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइनद्वारे न सोडता कालव्याद्वारे सोडा

गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइनद्वारे न सोडता कालव्याद्वारे सोडा

माजी सरपंच तथा शेतकरी गोपीनाथ मोरांडे

ब्रम्हपुरी(गुलाब ठाकरे/प्रतिनिधी)
ब्रम्हपूरी तालुक्यात असलेल्या चारही बाजूने अरण्याने वेढलेल्या बल्लारपुर येथील गोपीनाथजी मोरांडे यानी सांगितलेल्या गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइन द्वारे न सोडता कालव्या द्वारे सोडण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
गोसीखुर्द कालव्याच काम जवळ पास पूर्ण झालेले आहे.लहान कालवे तयार करुन शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे(पाटाने ) शेतीला पाणि दिल जाते.पण ज्या शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे पाणी होऊ शकत नाही ते शेतकरी आईल इंजिन ,किवा इलेक्ट्रिक साधन (मोटर पंप )या साधनामुळे शेती पीकवली जात असून गुरे ढोरे ,पशु पक्षी इतर प्राणी याना सुद्धा लहान कालव्याच्या सहायाने खुलेआम पाणी उपयोग करीत आहे हे निर्विवाद आहे.पण असे ऐकण्यात आले असून की ज्यां शेतकऱ्यांना  पाणी होत नाही त्या शेतकऱ्यांना शेतीतुन तीन फूट खोलीत टाकलेल्या पाईपलाइन द्वारे शेतीला पाणी देण्यात येणार आहे अशी चर्चा परिसरात होत असून शेती ही चढ़ उतार असल्यामुळे शेतीला पाणी होऊ शकत नाही त्या मुळे गोसीखुर्द चे पाणी लहान कालव्याच्य सहायानेच पाणी शेतीला पुरविणे योग्य आहे असे शेतकरी यांची मत आहे.कोणत्याही मंत्री महोदयाना हे कळत नाही की सर्व जीव जंतूनाप्राणी मात्राणा भरपूर पाण्याचा आस्वाद हा कालव्याद्वारे घेता येत होते ते पाणी खोका असलेल्या इंजीनियर च्य डोक्यामुळे हा आनंद शेतकरी ,प्राणी जीवजंतु याना या पाईपलाइन द्वारे घेता येत नाही त्यामुळे गोसीखुर्द चे पाणी पाटानेच शेतीला देण्यात यावे असे मत शेतकरी गोपीनाथजी मोरांडे माजी सरपंच यानी सांगितले आहे.

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा

ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा

प्रा.सुयोगकुमार बाळबुध्दें भा.ज.यू.मोर्चा ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितित नगर परिषदे ला निवेदन.

 ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
 ब्रम्ह्पुरी येथील शिवाजी चौक तें मर्दान अली या सीमेंट रस्त्यांची दूरावस्था झाली असून अपघाताच प्रमाण वाढले आहे त्या रस्त्याच्या संदर्भात मा.मुख्याधिकारी न.प.ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.
 सदर रस्त्यांच बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे रस्त्याला खूप असॆ खड्डे पडलेली आहेत अशी माहिती खासदार मा.अशोक नेते यानी  मागील महिन्याच्या आढावा बैठकीत नगरपरिषददेंला  आदेश देण्यात आले होते. सदर रस्त्यांच काम दिवाळी नंतर सुरू करू असॆ आश्वासन नगर परिषद तर्फे मा.खासदार साहेबाना देण्यात आले होतें.परंतु दिवाळी लोटूनही  एक महीना होत आला तरी नगर परिषद तर्फे कामाला सुरुवात झालेली नाही.
   सदर रस्त्याच काम तात्काळ करण्यात यावे त्या साठी  भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.परेश शहादाणी ,भा.ज.यु.मो.ब्रम्हपुरी शहराध्यक्ष प्रा.सुयोगकुमार बाळबुद्दें,शहर महामंत्री श्री.रितेश दशमवार ,शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवे ,शहर सचिव श्री.दत्ता येरवार यानी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तात्काळ या रस्त्याच काम न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा ब्रम्हपुरी वासिय जनता आणि भा.ज.यु.मो.यांच्या वतीने नगर परिषद ला माहिती देण्यात आली.