Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

प्रहार जनशक्ती पक्ष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रहार जनशक्ती पक्ष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, डिसेंबर ०८, २०१७

संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा

संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा


वरोरा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करण्यासोबतच इतर काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली.
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अंमलबजावणी केली नाही. त्यातच परतीचा पाऊस, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन व तूर पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. दिवसभर १२ तास तीन फेज वीज पुरवठा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अ औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे महादेव ताठे, शेतकरी माधव जीवतोडे प्रहारचे गणेश उराडे, प्रशांत चौखे, संदीप वासेकर, निलेश ढवस, संदीप झाडे, रवी झाडे, विनोद वाटेकर, रामू डांगे, राजू वर्मा, गुड्डू एकरे, कन्हेैया सालोरकर, नितीन नागरकर, सुशील पिंपळकर व परिसरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

वर्धा पॉवर समोर उपोषण करणाऱ्या 7  कामगारांची प्रकृती चिंताजनक

वर्धा पॉवर समोर उपोषण करणाऱ्या 7 कामगारांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर/प्रतिनिधी: (ललीत लांजेवार)

प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात वरोरा येथे वर्धा पॉवर कंपनी विरोधात साखळी उपोषणाला बसलेल्या सात कामगारांची प्रकृतीत चिंताजनक असल्याची बाब पुढे आली आहे

तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .

या उपोषणात ऐकून ४७ कामगार उपोषणाला बसले होते.त्यापैकी जवळपास ७ कामगारांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामगार वर्गात अत्यंत रोष निर्माण झालेला आहे.
या सात कामगारांपैकी उपोषणात आणखीही बरेचशे कामगार उपोषणाला बसले असून हा प्रकृती गंभीर असलेल्या उपोषण कर्त्यांचा आकड़ा वाढण्याचे सांगण्यात येत आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे मंगळवारपासून या साखळी उपोषणाला सुरूवात केली होती

तीन दिवस उलटूनही यातून कोणताच मार्ग निघाला नसल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा विचार उपोषणकर्त्यांनी घेतला त्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

वरोरा : तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .
कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे साखळी उपोषणाला सुरूवात केली असून या आंदोलनात बाळकृष्ण जुवार, अमोल डुकरे, अशोक चिकटे, शामसुंदर ताजने, नितीन नांदे, विनोद जरीले, अतुल कुकडकर, प्रशांत बदकी, सतीश नगरकर, मंगेश समर्थ, गजानन देठे, आशिष ढवस, संजय सादनकर, चतुरकर, विठ्ठल डाखरे, विठ्ठल बोधे आदींचा सहभाग आहे.