Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०८, २०१७

संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा


वरोरा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करण्यासोबतच इतर काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली.
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अंमलबजावणी केली नाही. त्यातच परतीचा पाऊस, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन व तूर पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कपाशीवरील बोंडअळीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी. दिवसभर १२ तास तीन फेज वीज पुरवठा देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अ औषध फवारणीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे महादेव ताठे, शेतकरी माधव जीवतोडे प्रहारचे गणेश उराडे, प्रशांत चौखे, संदीप वासेकर, निलेश ढवस, संदीप झाडे, रवी झाडे, विनोद वाटेकर, रामू डांगे, राजू वर्मा, गुड्डू एकरे, कन्हेैया सालोरकर, नितीन नागरकर, सुशील पिंपळकर व परिसरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.