Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर १३, २०२३

वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसन

वन नेशन वन इलेक्शन : चर्चेतून झाले श्रोत्यांच्या शंकांचे निरसन

वन नेशन; वन इलेक्शन संकल्पना योग्य नाही : ॲड. फिरदौस मिर्झा

*एक देश; एक निवडणूक देशासाठी लाभदायक : एड. श्रीरंग भंडारकर*

*लोकगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने चर्चा*



*नागपूर, ता. 10 :*
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "वन नेशन वन इलेक्शन" या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे. त्यांनी यासाठी एक समिती स्थापन केली. जी या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि व्यावहारिक उपाययोजनांचा अभ्यास करेल. "वन नेशन वन इलेक्शन" ही संकल्पना अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी संविधानात बदल करणे आवश्यक आहे. तसेच, या संकल्पनेमुळे भारताच्या संघीय स्वरूपाला धोका निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. भारत देशांमध्ये एक देश एक निवडणूक ही संकल्पना योग्य नाही, असे विचार ज्येष्ठविधीतज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांनी, तर एक देश एक निवडणूक देशासाठी लाभदायक ठरेल, अशी भूमिका एड. श्रीरंग भंडारकर यांनी मांडली. दोन्ही वक्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे विचार व्यक्त करीत श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.

लोकगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राष्ट्रभाषा येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक, नागपूर येथे आयोजित चर्चेत नागपूर शहरातील प्रसिद्ध वकील सर्वश्री ॲड. श्रीरंग भांडारकर आणि ॲड. फिरदौस मिर्झा यांनी सहभाग घेतला होता. 

भारत देशात विविधतेत एकता आहे. भारतात खानपान, पोशाख, भाषा, संस्कृती वेगळी आहे. अशा स्थितीत केवळ संविधानामुळे हा देश एक राहिला. मात्र, वन नेशन; वन इलेक्शन म्हणजे संविधानाचा आत्मा मारण्याचा प्रयत्न होईल. देशाचे हित एक निवडणुकीत नसून, त्याऐवजी वन नेशन; वन एज्युकेशन झाले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता ऍड. फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले.  

ते म्हणाले की, देशात लोकसभा किंवा विधानसभा पूर्ण ५ वर्ष चालल्या नाहीत. अशावेळी विनानिवडणूक सरकार कसे चालवायचे. देशात काही तात्काळ निर्णय झाले. नोटबंदी,  लॉकडाऊन सारख्या निर्णयामुळे देशातील सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतात, हे देखील तपासले पाहिजे. त्यामुळे एक राष्ट्र, एक निवडणूक शक्य नाही. कारण, विधानसभा काही कारणास्तव २ वर्षात बरखास्त झाली तर त्या ठिकाणी पुढील सरकार नियुक्तीसाठी निवडणूक घ्यायची की नाही. राज्यातील अनेक महानगरपालिका २ वर्षांपासून प्रशासकाच्या हाती आहेत. मग, लोकशाहीची पायमल्ली नाही का? इस्राईलची लोकशाही पध्दत एकदा बघितली पाहिजे. चीन आणि रशियामध्ये वेगवेगळ्या पद्धत आहेत. तिथे काय स्थिती आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. वन इलेक्शनचा राजकीय किंवा कायद्याचा अभ्यासक म्हणून विचार केला तर काहीही फायदे दिसून येत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी श्रीरंग भांडारकर म्हणाले, एक देश एक निवडणूक ही संकल्पना लोकशाहीला बळकटी देईल. यामुळे निवडणुकीची खर्च कमी होईल आणि मतदारांना एकाच वेळी सर्व निवडणुकांचे निकाल जाणून घेता येतील. या देशाची लोकशाही लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य या संकल्पनेत आहे. अशावेळी एक देश; एक निवडणुकीचा जनतेवर काय परिणाम होईल, याचा विचार झाला पाहिजे. एक देश; एक निवडणूक हे लगेच होईल असेही नाही. त्यावर चर्चा होईल. विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतील. समिती अहवाल तयार करेल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. एक देश एक निवडणूक लाभदायकच ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर उपस्थित नागरिकांनी विचारलेया प्रश्नांची उत्तरे वक्त्यांनी दिली. 

प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले. त्यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त केली. त्यांच्या हस्ते दोन्ही वक्त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष नागपूरचे एड. रोशन बागडे, मनपाच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, लोकगर्जना प्रतिष्ठानचे शुभंकर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी राजेश कुंभलकर यांनी आभार व्यक्त केले.

रविवार, सप्टेंबर १०, २०२३

या जिल्ह्यात येणार पाऊस  | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli

या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli




या जिल्ह्यात येणार पाऊस

rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.



नागपूर, 10 सप्टेंबर 2023: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत (10 आणि 11 सप्टेंबर) पूर्वविदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली (Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli) या पाच जिल्ह्यांत पुढील पाच दिवस (6 ते 10 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 11 ते 12 सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच, घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.

अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान

  • पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
  • रस्ते, पुल, इमारतींचे नुकसान
  • शेतीचे नुकसान
  • जीवितहानी

अतिवृष्टीपासून बचाव

  • नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवा
  • घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा
  • मुसळधार पावसाच्या वेळी घरातच रहा
  • आवश्यक असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
  • पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित द्या
  • Heavy rain
  • Eastern Vidarbha
  • Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
  • Cloudy sky
  • Light to moderate rain
  • Thunderstorm with lightning
  • Possibility of flooding
  • Safety measures to be taken during heavy rain
पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास

पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास

पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू वितरण व महआरतीचे आयोजन

मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास


101 Kg Bundi Ladu at Panchmukhi Hanuman Temple; A mesmerizing array of more than 800 lamps

नागपूर : शनिवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी, बाबुलखेडा, नागपूर येथे विशेष पूजा आणि १०१ किलो बुंदी लाडू व महाप्रसाद वितरण तसेच महाआरतीचे आयोजन रोहित अतकरे (निवेदक) आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले.

यावेळी मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची आरास करण्यात आली होती. पहाटे ०४:४५ वाजता श्री हनुमान मूर्तीवर विधिवत मंगल अभिषेक करण्यात आला त्यानंतर संपन्न झालेल्या महाआरतीला १२०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. तसेच यानंतर सर्व भाविक भक्तांनी १०१ किलो बुंदी लाडू वितरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन श्री. पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लारी, बाबुलखेडा, नागपूर आणि निवेदक रोहित अतकरे व मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. करनेवाले हनुमानजी आणि करानेवाले भी हनुमानजी अशी भावना या कार्यक्रमप्रसंगी आयोजकांनी व्यक्त केली.



पंचमुखी हनुमान मंदिर पर 101 किलो बूंदी लड्डू वितरण एवं महाआरती का आयोजन

मंदिर में 800 से अधिक दीपकों की आकर्षक रोशनाई
नागपुर: शनिवार 09 सितंबर 2023 को पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी, बाबुलखेड़ा, नागपुर में एंकर रोहित अतकरे और मित्र परिवार द्वारा विशेष पूजा और 101 किलो बूंदी के लड्डू और महाप्रसाद का वितरण और महाआरती का आयोजन किया गया।

इस समय मंदिर को 800 से अधिक दीपकों की रोशनाई से सजाया गया। प्रातः 04:45 बजे श्री हनुमान मूर्ति के विधिवत मंगल अभिषेक किया गया। उसके उपरांत संपन्न महाआरती में 1200 से अधिक भक्त गण शामिल हुए। पूजा एवं आरती के समापन पर सभी श्रद्धालु भक्तों ने 101 किलो बूंदी लड्डू वितरण एवं महाप्रसाद का लाभ उठाया।

कार्यक्रम का आयोजन श्री. पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लारी, बाबुलखेड़ा, नागपुर और एंकर रोहित अतकरे तथा मित्र परिवार द्वारा किया गया था। इस अवसर पर आयोजकों ने कहा की, करनेवाले भी हनुमानजी और करानेवाले भी हनुमानजी यह भावना आयोजकों द्वारा व्यक्त की गई।


शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

नागपूर:
ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ ऍड अंजली साळवे आणि भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु झाली आणि त्यापाठोपाठ देशाच्या इतरही राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील डॉ ऍड अंजली साळवे यांनी 2019 सालापासून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी विविध स्तरावर आंदोलने आणि निवेदनेच नव्हे तर विधिमंडळात ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करून तो केंद्राकडे पाठवण्याची मागणी करत केंद्र जर ओबीसी गणना करत नसेल तर ती राज्यांनी करावी ही मागणी लावून धरली त्याला प्रतिसाद म्हणून 2020 ला तत्कालीन राज्य सरकार द्वारे ओबीसी जनगणना ठराव पारित झाला, परंतु केंद्राने तो फेटाळून लावला. डॉ साळवे यांनी कित्येक खासदारांमार्फत ओबीसी जनगणनेचा लढा संसदे पर्यंत पोहोचवित सर्वोच्च न्यायालयात देखील आपला लढा सुरु केला.

जनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय लोकसंख्येची माहिती एकत्रित करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि तत्सम माहिती सरकारद्वारे गोळा करणे अपेक्षित आहे व त्याआधारे जनतेसाठी शासकीय योजनांची आखणी, धोरण निश्चिती, त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करायची असतांना सरकार जवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसतांना इतकी वर्षे कोणत्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असल्याचे मत डॉ साळवे यांनी व्यक्त केल आहे.

मागासवर्गीयांना केवळ वोट बँक म्हणून वापरलं जातं आहे, परंतु त्यांची नेमकी संख्या किती आहे, याबाबत कोणीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्याचे शल्य आहेत, भारतीय राज्य घटना तसेच जनगणना कायद्यानुसार इतर मागासवर्गिय घटकांची जनगणना होणे अपेक्षित असतांना अनुसूचित जाती - जमाती सोबतच इतर मागासवर्गियांची सुद्धा स्वतंत्र जनगणना होणे अपेक्षित आहे. इतर मागासवर्गियांच्या जनगणनेच्या घटकांचा मुद्दा जनगणनेत दुर्लक्षित केल्या जात असल्याने दिवंगत ऍड भगवान पाटील व इतरांनी दाखल केलेल्या 2001 व 2011 च्या याचिकेला पुनर्जीवित करण्यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये मध्यस्थ म्हणून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता, उच्च न्यायालयात त्यांचे सहकारी ऍड अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

ओबीसी जनगणनेची न्यायालयीन लढाई अधिक सशक्त व्हावी यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटने सोबत काही कायदेशीर डावपेचा अंतर्गत मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सोबतच इतर राज्याच्या ओबीसी जनगणनेची प्रकरणे मा.सर्वोच्च न्यायालयात एकत्र असल्याचे डॉ. साळवे यांनी सांगितले. ओबीसी घटकांचा समावेश जनगणनेच्या प्रश्नावली नमुन्यात होईस्तोवर प्रस्तावित जनगणनेला स्थगिती देण्यात यावी सोबतच यासंदर्भात इतरही योग्य वाटत असेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निगर्मित करण्याची प्रार्थना या अर्जात त्यांनी केली आहे.

ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसी (व्हीजे, एनटी, डिएनटी, एसबीसी) चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अशी पाटी लावा मोहिम सुरु करणा-या डॉ साळवे यांच्या प्रयत्नांना सामान्य ओबीसी नागरिकांकडून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून या मोहिमेचे लोण आता विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. मंडल आयोगाच्या शिफ़ारसीनुसार माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारने ओबीसीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर डॉ ऍड अंजली साळवे यांची ओबीसी जनगणना 2021, न्यायालय, संसद, विधीमंडळ, पाटी लावा ही मोहीम ऐतिहासिक ठरली आहे. प्रस्तावित जनगणनेत इतर मागासवर्गिय घटकांची स्वतंत्र गणना झाल्यास आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या उपेक्षित घटकांना जनगणनेत यथोचित स्थान मिळेल व लोकसंख्येच्या अनुपातात त्यांना त्यांचा हक्क मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer)

द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer)



बुटीबोरी, नागपूर - युवा पत्रकार आणि आमची बुटीबोरी डिजिटल सोशल नेटवर्किंग साइटचे संचालक चारुकेश कापसे यांच्या "द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर" या पुस्तकाचे प्रकाशन आज बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (BMA) चे अध्यक्ष नितीन लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. (the Secrets Digital Marketing and Freelancer)

BMA सभागृहात पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला BMA अध्यक्ष नितीन लोणकर, माजी अध्यक्ष के.ना.सेठ, हेमंत अंबसेलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या पुस्तकात चारुकेश कापसे यांनी आजच्या तरुणाईसाठी डिजिटल मार्केटिंग कशी करायची, डिजिटल मार्केटिंगचे फायदे तोटे आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये स्वत:च्या व्यवसायासाठी फ्रीलान्सिंग कसे करावे याचे संपूर्ण सारांश देण्यात आले आहे. पुस्तकात एकूण १५० चित्राचा समावेश करण्यात आला आहे.

"हे पुस्तक डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलांसिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक आहे," लोणकर म्हणाले. "हे पुस्तक डिजिटल मार्केटिंगच्या मूलभूत गोष्टींपासून ते प्रगत तंत्रांपर्यंत सर्व काही समजावून सांगते. तसेच, ते फ्रीलान्सिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान देखील प्रदान करते."

पुस्तकाचे लेखक चारुकेश कापसे म्हणाले, "मी या पुस्तकावर गेल्या आठ महिन्यांपासून काम करत आहे. मी या पुस्तकाद्वारे डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलांसिंग क्षेत्रातील माझ्या ज्ञान आणि अनुभवाचा एक छोटासा भाग तरुणांशी शेअर करू इच्छितो. मी आशा करतो की हे पुस्तक त्यांना त्यांच्या करिअरच्या वाढीसाठी मार्गदर्शन करेल."

the Secrets Digital Marketing and Freelancer
पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाची प्रशंसा केली.


  • Digital marketing
  • Freelancing
  • Young people
  • Business
  • Success
  • Inspiration