Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नांदेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नांदेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधी

श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधी



नांदेड(बालाजी सिलमवार):- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ महिला श्रीमती नरसाबाई बापूजी संदुलवार वय 95 वर्ष यांचे आज दुपारी तीन वाजता रिम्स हॉस्पिटल आदिलाबाद येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी उद्या गुरुवार ला अंबाडी ता. किनवट येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे 

श्रीमती नरसाबाई यांना काल अन्न पचनाचा त्रास झाला तेव्हा गावातील एका डॉक्टरनी त्यांना इंजेक्शन दिल्याचे कळते. नरासाआजीस त्रास अचानक वाढल्याने त्यांना किनवट हून आदिलाबाद येथे हलविण्यात आले.आदिलाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्युसमयी त्या ९५ वर्षाचे होत्या.श्रीमती नरसाबाई संदुलवार यांना दोन मुले नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त वनअधिकारी श्री दासुजी संदुलवार,बालाजी देवस्थानचे सदस्य श्री लक्ष्मण संदुलवार यांचे मातोश्री तर लिंगी येथील सहशिक्षक श्री दत्तात्रय संदुलवाऱ सर,कृषि विभागातील नरेश संदुलवार,व्यंकटी संदुलवार,श्रीकांत संदुलवार यांची आजी होय.श्रीमती नरसांआज्जी यांच्या निधनाने संदुलवार परिवारावर शोककळा पसरला आहे.
*#भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏🏻*

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

 अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival

अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival

अंबाडीत एक गाव एक गणपती अंतर्गत गणेशोत्सव शांततेत साजरा करा.- पो. नि. अभिमन्यू साळुंके 



किनवट (प्रतिनिधी):-

कोरोना कालावधी ओसरल्यामुळे यंदा ग्रामीण भागात गणेशोस्तव ठिकठिकाणी साजरा करण्यात येत आहे.यावर्षी किनवट पोलिस स्टेशन हद्दिमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.


जानेवारी  2021  ते एप्रिल 2022  मध्ये  मुदत  संपलेल्या,  मुदत संपणाऱ्या,नव्याने स्थापन झालेल्या  ग्रामपचायती  तसेच  मागील  निवडणूकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपचायती अशा किनवट तालुक्यातील एकुण 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषगाने  किनवट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये  गणेशोत्सवामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके हे आपल्या सहकाऱ्यांसह अनेक ठिकाणी गाव भेटी देवून सूचना करीत आहेत.


                दिनांक 1 सप्टेंबर रोजी आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत राजगड बिटमधील मौजे कमठाला,नीचपुर,अंबाडी तांडा,राजगड व अंबाडी येथे भेट देवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून मार्गदर्शन केले.यावेळी अंबाडीचे माजी सरपंच श्री कैलाश सिलमवार यांनी अंबाडी ग्रामस्थाच्यावतीने पोलिस निरीक्षक श्री अभिमन्यू साळुंके साहेब यांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी बिट जमादार श्री पुंडलिकराव बोंडलेवाड यांचेही यावेळी श्री परमेश्वर मुराडवार यांनी सत्कार केला.

          यावेळी पोलीस निरीक्षक श्री साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबाडीत वास्तव्यास असलेल्या बौद्ध,गोंड, मन्नेरवारलू,परधान,भोई, बेलदार,मातंग,मराठा या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असून गावात एक गाव एक गणपती या संकल्पनेतून शांततेत दरवर्षी बसविणाऱ्या सवारी बंगला येथील बसविलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकार्यासह गावकऱ्यांचे कौतुक करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्या हस्ते सत्कार केले.यावेळी त्यांच्यावतीने गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम आणि मिरवणूक शांततेत व्हावे व कुठलेही गालबोट लागू नये यासाठी सूचना  केल्या. 

           यावेळी अक्षय पंडलवार,गजानन बावणे, जुनघरे,यांच्यासह रामप्रसाद जैस्वाल,सुधीर काळुंके, रवी मुराडवार,अक्षय वानखेडे,पोषट्टी नक्कावार,निलेश कोतापेलिवार,भुमंना मिसालवार,विनोद जोगुलवार आदीं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंगळवार, मे ११, २०२१

शासनाच्या कृषि विभागाकडून एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ

शासनाच्या कृषि विभागाकडून एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ





शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक

खबरबात ऑनलाईन वृत्तसेवा नांदेड:-
(बालाजी सिलमवार)
दि. 9 : शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे.
        शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शिर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.
आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
०००००००

गुरुवार, मे ०६, २०२१

 शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध




किनवट :(प्रतिनिधी) बालाजी सिलमवार

 पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याच्या निषेधार्थ शिवणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

 नुकतेच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे.याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 

 तसे पाहिले तर निवडणुकीत कुणाचे तरी जय-पराजय होतच असतो.पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्या कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध म्हणून किनवट तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

           आज शिवणीत भाजपचे तालुका सरचिटणीस श्री बालाजी आलेवार यांच्या उपस्थीतीमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोव्हिड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून भाजपाच्या पदाधिकारी यांना सोबत घेवून श्री आलेवार यांनी तोंडाला काळे मास्क व हाताला काळे रिबीन बांधून आपल्या भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध करण्यात आला भाजपचे यावेळी भाजपचे श्री बालाजी किशनराव आलेवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते शंकर पटेकर भाजप युवक कार्यकर्ता नागेश बेलयवार युवा कार्यकारणी बुच्यागौड रेड्डीवार,राजू भुसिवाड, पवण कार्लेवांड,रवी मैदेवाड,सूर्यकांत कार्लेवांड,विनोद अनंतवार,श्रीकांत कट्टा,सदानंद रेकुलवाड,विनोद मेंढेवाड,आदी कार्यकर्त्यांनी शिवनीत निषेध व्यक्त केला.

शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१

तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओचे टॉवर कार्यान्वित

तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओचे टॉवर कार्यान्वित


                           

  किनवट प्रतिनिधी :-(बालाजी सिलमवार)

किनवट या आदिवासी तालुक्यातील शिवणी येथे आज दिनांक – ३०/०४/२०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता RELIANCE JIO टॉवर चे उद्घाटन करण्यात आले.या उद्धाटन समारंभ शिवणी गावचे   ग्रामपंचायतीचे सरपंच  सौ.लक्ष्मीबाई  डूडूळे,उपसरपंच सौ.सुनिता संतोष जाधव,ग्रा.पं.सदस्य दिगांबर बोंदरवाड ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी महिला मंडळ अध्यक्षा श्री.कमलबाई रामचंद्रराव देशमुख व कृ.उ.बाजार समिती उपसभापती श्री.बालाजी किशनराव आलेवार ग्रा.पं.कर्मचारी दिनेश सायन्ना अष्टपैलू,नागेश गजाराम बेलयवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ग्रामस्थ किशन वानोळे,प्रकाश कार्लेवाड तसेच RELIANCE JIO कर्मचारी उपस्थित होते.
  या अनुषंगाने शिवणी परिसरातील बऱ्याच वर्षापासून इंटरनेट सुविधेच्या प्रतीक्षेत होती.लॉकडाउन काळात शालेय मुलासाठी ONLINE ONLINE CLASSES अशा बऱ्याच अडचणी होत्या,बँकिंग सेक्टर च्या अडचणी होत्या त्या आज दूर झाल्याचे आनंद ग्रामस्थमध्ये दिसून येत आहे त्यामुळे समस्त शिवणी गावातील ग्रामस्तांची अडचणी दूर केल्याबद्धल श्री.मा.मुकेश अंबानी व सुनील गोसावी (महाराष्ट्र CTO) यांना RELIANCERELIANCE JIO टॉवर चालू केल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.