Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कामगार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कामगार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर १४, २०१७

आ.धानोरकरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

आ.धानोरकरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


वरोरा/प्रतिनिधी :
गेल्या सहा दिवसापासून साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी विरोधात पूर्व व्रत कामावर घेण्याच्या मागणी साठी ५० कामगार अन्नत्याग आंदोलनाला बसले होते . मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व्यवस्थापना पाझर न फुटल्याने आ .बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट कामगारांना उपोषण सोडण्यास सांगितले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वसन दिले त्या नंतर कामगारांनी उपोषण सोडले .

 साई वर्धा पॉवर जनरेशन या विद्युत तयार करणारया कंपनीतील १५० कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामगारांना कमी केल्याचा प्रकार ३ महिन्यापूर्वी घडला त्या वरून दीडशे हि कामगारांनी संघटित होऊन कंपनी च्या विरोधात आंदोलन पुकारले ३ महिन्यापासून शासन दरबारी न्यासाठी चकरा मारूनही कुठलाही तोडगा न निघाल्याने ७ नोव्हेंबर पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते एक दिवसीय साखळी उपोषण करून ८ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली होती .मात्र सहा दिवस लोटूनही कंपनी व प्रशासनाला पाझर न फुटल्याने व अर्ध्यापेक्षा जास्त उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने अखेर आज त्यांनी उपोषण सोडले . यावेळी आ . बाळू धानोरकर यांनी उपोषण स्थळ भेट देऊन आपण लढवय्ये आहोत .उपाशी राहून आंदोलन करायचे नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहो असे म्हणत बुधवारला उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत बैठक लावणार असल्याचे सांगितले ..त्यांनतर कामगारांनाही उपोषण सोडले यावेळी वरोरा येथील तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते .तर प्रहार संघटनेचे संस्थापक आ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून चर्चा केली असता कंपनी प्रशासन आमचा आदेश पाळत नसल्याचे खळबळ जनक उत्तर त्यांनी दिल्याने हा प्रश्न कामगार मंत्री यांच्याशी बैठक लावून सोडवणार असल्याचे आ कडू यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले .

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

वर्धा पॉवर समोर उपोषण करणाऱ्या 7  कामगारांची प्रकृती चिंताजनक

वर्धा पॉवर समोर उपोषण करणाऱ्या 7 कामगारांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर/प्रतिनिधी: (ललीत लांजेवार)

प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात वरोरा येथे वर्धा पॉवर कंपनी विरोधात साखळी उपोषणाला बसलेल्या सात कामगारांची प्रकृतीत चिंताजनक असल्याची बाब पुढे आली आहे

तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .

या उपोषणात ऐकून ४७ कामगार उपोषणाला बसले होते.त्यापैकी जवळपास ७ कामगारांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामगार वर्गात अत्यंत रोष निर्माण झालेला आहे.
या सात कामगारांपैकी उपोषणात आणखीही बरेचशे कामगार उपोषणाला बसले असून हा प्रकृती गंभीर असलेल्या उपोषण कर्त्यांचा आकड़ा वाढण्याचे सांगण्यात येत आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे मंगळवारपासून या साखळी उपोषणाला सुरूवात केली होती

तीन दिवस उलटूनही यातून कोणताच मार्ग निघाला नसल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा विचार उपोषणकर्त्यांनी घेतला त्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

वरोरा : तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नसल्याने मंगळवारपासून कामगारांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे .
कुठलीही पूर्वसूचना न देता वर्धा पॉवर जनरेशन या वरोरा एमआयडीसी मधील कंपनीने १५० स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले. कामगार आयुक्त यांनी ‘तारीख पे तारीख’ देत समेटाची कारवाई केलीच नाही आणि कंपनी प्रशासनही कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे साखळी उपोषणाला सुरूवात केली असून या आंदोलनात बाळकृष्ण जुवार, अमोल डुकरे, अशोक चिकटे, शामसुंदर ताजने, नितीन नांदे, विनोद जरीले, अतुल कुकडकर, प्रशांत बदकी, सतीश नगरकर, मंगेश समर्थ, गजानन देठे, आशिष ढवस, संजय सादनकर, चतुरकर, विठ्ठल डाखरे, विठ्ठल बोधे आदींचा सहभाग आहे.