Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अहमदनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहमदनगर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार

घरात घुसून 74 वर्षीय महिलेला मारहाण करून बलात्कार



अहमदनगर- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . एका 74 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना शहरातील तारकपूर परिसरात घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे . या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . दरम्यान , पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे .

शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१

हेलिकॉप्टरमधून उतरून स्वीकारला सरपंचपदाचा पदभार

हेलिकॉप्टरमधून उतरून स्वीकारला सरपंचपदाचा पदभार



अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. 

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना सांगितले.


रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

  अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):

 अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.

यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.
अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

विष्णू तळपाडे/खबरबात प्रतिनिधी/अकोले(अहमदनगर)

अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.

         अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.

                   यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.

रविवार, फेब्रुवारी १०, २०१९

प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला

प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):

१० फेबु़वारी रविवार आदिवासी रत्न राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठक्का बाबा गांगड यांचे आज सकाळी८:३०वाजता दुःखद निधन झाले.कामडावणा नृत्याला दिल्ली पर्यत नेऊन मोठ-मोठ्यांना आश्चर्यचकित करुन आदिवासीच्या शिरपेचात आपल्या आवाजाचा मानाचा तुरा रोवणारे व आपल्या कलेतुन विविध पशु-पक्षाचा आवाज काढणारा आदिवासी मोगली यांचेवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाची अनेक दशके त्यांनी लोकरंजन केले..जवळपास ८५वर्षे वयोमान असलेला हा उत्साही व्यक्ती   वाघ,सिह,कोल्हा,कुञा,मांजर,बैल,पोपट,कावळा,कोकिळा,बकरी याबरोबरच अनेक प्राण्यांचे आवाज पाहण्याची संधीच बाबांच्या रुपाने अकोले तालुक्याला लाभली होती.

स्वतः ला महान समजणारे अनेक कलाकार पाहिले,पैशासाठी कलाविकणारे ही पाहिले कलेच्या नावाखाली बाजार मांडणारे ही पाहिले.स्वतःच्या कोशात हरवलेले अनेक जण नजरेस पडले.पण कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांसाठी वाहुन घेतलेला आमचा हा बाबा आमच्या दृष्टीने ठकाबाबा खरच शांत ..कारण तो कलेनेच नव्हे तर,माणुसकीनेही खुपच मोठा आहे.कलेसाठी सर्वस्व अर्पण करणारा हा अवलिया पाहिला की डोळ्यातून पाणी येते.आपल्या वेदना आपल्याच असतात.त्या जगाला दाखविण्यासाठी नसतात.

हे माणुन जगाच्या मनोरंजनासाठी सज्ज असलेला हा मोठा माणुस दुःख चेहऱ्यावर जाणवू न देता.आपल्या कलेतुन निखळ आनंद देणारा हा महान आत्मा अनेक सत्कारांचा पुरस्कार्थी पण घराची झोळी सतत रिकामीच आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी ही कलाआदिवासी भागातील नागरिकांनसाठी सादर केली होती.त्यातुन त्यांना कधी पैसे मिळाले नाहीत.पण हा अवलिया कलेशी प्रामाणिक राहिला.कलेद्वारे अनेक पिढ्याचे मनोरंजन करत राहिला.आपल्या आवाजाची जादु प्रेक्षकांना दाखवत राहिला.कोणी काय दिले माहिती नाही.पण त्यांनी प्रेक्षकांना भरभरुन मनोरंजन मात्र दिले.अडथळ्याना हसत-हसत सामोरे जाणारा पैशासाठी नव्हेतर माणसासाठी कला सादर करणारा महान कलावंत,कलाकाराला भावपुर्ण श्रध्दाजली.

गुरुवार, जानेवारी ३१, २०१९

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):

बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान सोहळा पार पडला.यावेळी अकोले तालुक्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना कृषीरत्न पुरस्कार व निसर्गवासी किसन इष्टे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पारधी व सुरेश बांडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी प्रकाश धिगे हे होते.या वेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शंकर अस्वले GSTचे सहाय्य आयुक्त मुरलीधर बांडे नगरसेवक संदिप लोटे,धर्मा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाची भूमिका व कार्य शिवाजी सुरकुले यांनी सांगितले.प्रस्तावीक भारती उडे यांनी केले,तसेच सूञसंचालन सुधीर साबळे यांनी केले तर आभार किसन भारमल यांनी मानले.
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान

 विष्णू तळपाडे(अकोले-अहमदनगर):

बदलापुर येथील कोळी महादेव समाज संघटना,आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य,वधुवर परिचय मेळावा,गोतेभाऊ स्नेह संमेलन,आदिवासी संस्कृती मेळावा आणि आदिवासी संस्कृती सन्मान सोहळा पार पडला.यावेळी अकोले तालुक्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना कृषीरत्न पुरस्कार व निसर्गवासी किसन इष्टे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पारधी व सुरेश बांडे यांनी केले.अध्यक्ष स्थानी प्रकाश धिगे हे होते.या वेळी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शंकर अस्वले GSTचे सहाय्य आयुक्त मुरलीधर बांडे नगरसेवक संदिप लोटे,धर्मा लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाची भूमिका व कार्य शिवाजी सुरकुले यांनी सांगितले.प्रस्तावीक भारती उडे यांनी केले,तसेच सूञसंचालन सुधीर साबळे यांनी केले तर आभार किसन भारमल यांनी मानले.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

अकोले(अहमदनगर)विष्णु तळपाडे:

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हेॕ केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात.
हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय.
यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन,शिपाई ,अरोग्य सेविका,सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण

अकोले(अहमदनगर)विष्णु तळपाडे:

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हेॕ केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात.
हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय.
यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन,शिपाई ,अरोग्य सेविका,सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी

-विष्णु तळपाडे

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु  विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.

       मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.

     मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !

अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी

-विष्णु तळपाडे

सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु  विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.

       मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.

     मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.

शुक्रवार, जानेवारी २५, २०१९

#krushimahotsav प्रारंभ

#krushimahotsav प्रारंभ

khabarbat.in

खबरबात प्रतिनिधी-विष्णु तळपाडे अकोले (अहमदनगर)

-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या  विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
            शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav

#krushimahotsav प्रारंभ

#krushimahotsav प्रारंभ

khabarbat.in

खबरबात प्रतिनिधी-विष्णु तळपाडे अकोले (अहमदनगर)

-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या  विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
            शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav

शनिवार, जानेवारी १९, २०१९

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

विष्णू तळपाडे:अकोले(अहमदनगर):
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 4 गंभीर
                            अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची  बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.
संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू

विष्णू तळपाडे:अकोले(अहमदनगर):
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 4 गंभीर
                            अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची  बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.

सोमवार, जानेवारी १४, २०१९

 अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):
दुष्काळ साठी इमेज परिणाम
राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन शेकडो गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला.मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण समिती च्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला.मात्र वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आदिवासी तालुक्यांविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .याबाबत मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश देऊनही आदिवासी भागात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्येवाही झालेली दिसत नाही .तेव्हा आदिवासी भागात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा,आशा प्रकार ची मागणी आज अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव करताना दिसतात .

आदिवासी भागात पाऊस सर्वाधिक असतो.बहुतेक धरणे ही आदिवासी भागात येतात .धरणांनसाठी आदिवासींच्या जमिनी गेल्या मात्र पाणी धोरणात धरणांमधुन पाणी उचलण्याचा अधिकार आदिवासींना नाही,त्यामुळेच त्यांना पाणी घेता येत नाही .आदिवासी भागात पावसाळ्यानंतर पुढचे आठ महिने नेहमीच पाण्याची समस्या असते .

हि वस्तुस्थिती लक्ष्यात न घेता नेहमीच आदिवासी भागावर अन्याय होत असल्याची जनतेची भावना आहे.राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ घोषित करते;परंतु आदिवासी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.रोजगाराचा प्रश्न ही निर्माण झाला आहे .

राज्यकर्तेच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.तरी आदिवासी भागातील या समस्या लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि सर्व दुष्काळी सवलती लागु कराव्यात.दरम्यान आदिवासी भागात दुष्काळ जाहिर करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल,आशी अपेक्षा आदिवासी बांधवाच्या मनात आहे.
 अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):
दुष्काळ साठी इमेज परिणाम
राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन शेकडो गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला.मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण समिती च्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला.मात्र वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आदिवासी तालुक्यांविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .याबाबत मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश देऊनही आदिवासी भागात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्येवाही झालेली दिसत नाही .तेव्हा आदिवासी भागात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा,आशा प्रकार ची मागणी आज अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव करताना दिसतात .

आदिवासी भागात पाऊस सर्वाधिक असतो.बहुतेक धरणे ही आदिवासी भागात येतात .धरणांनसाठी आदिवासींच्या जमिनी गेल्या मात्र पाणी धोरणात धरणांमधुन पाणी उचलण्याचा अधिकार आदिवासींना नाही,त्यामुळेच त्यांना पाणी घेता येत नाही .आदिवासी भागात पावसाळ्यानंतर पुढचे आठ महिने नेहमीच पाण्याची समस्या असते .

हि वस्तुस्थिती लक्ष्यात न घेता नेहमीच आदिवासी भागावर अन्याय होत असल्याची जनतेची भावना आहे.राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ घोषित करते;परंतु आदिवासी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.रोजगाराचा प्रश्न ही निर्माण झाला आहे .

राज्यकर्तेच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.तरी आदिवासी भागातील या समस्या लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि सर्व दुष्काळी सवलती लागु कराव्यात.दरम्यान आदिवासी भागात दुष्काळ जाहिर करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल,आशी अपेक्षा आदिवासी बांधवाच्या मनात आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

विष्णु तळपाडे(अकोले/अहमदनगर):

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जि.प.मराठी शाळांचा दर्जा उंचावला गेला असून इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओंघ वाढत आहे.त्यामध्ये शिक्षकाचे मोलाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.सुनिता भांगरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले(शिक्षिण विभाग)आयोजित बालआनंद मेळावा रणद बु.येथे उद्घाघाटन प्रसंगी केले.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे होते.व्यासपिठावर पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर ,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजना कोरडे व ग्रामस्त ,शिक्षक व कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्यानी उपस्थित होते.

आधुनिक युगा सोबत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बद्दल घडतोय,जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे .यावेळी अशोक भांगरे म्हणाले आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत व्यवहारीक ज्ञानातही वाढ होते .आणि त्यांच्या कलागुणांना वावही मिळतो.सांस्कृतिक ,शैक्षणिक ,सामाजिक प्रगति घडुन बुद्धीला चालना मिळते .यावेळी रणद बु.च्या विद्यार्थ्यांनी मोठा बाजार भरविला होता.विक्रीसाठी रानभाज्या,वडापाव,इडली,आईस्क्रिम,भाजी-भाकरीचे स्टाँल उभारण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक ,शाळाव्यवस्थापन समिती आणि जिल्हा. प.राजुर गट यांनी विशेष परिस्ञम घेतले .

जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे

विष्णु तळपाडे(अकोले/अहमदनगर):

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातील जि.प.मराठी शाळांचा दर्जा उंचावला गेला असून इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओंघ वाढत आहे.त्यामध्ये शिक्षकाचे मोलाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.सुनिता भांगरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले(शिक्षिण विभाग)आयोजित बालआनंद मेळावा रणद बु.येथे उद्घाघाटन प्रसंगी केले.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे हे होते.व्यासपिठावर पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर ,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर,सरपंच अंजना कोरडे व ग्रामस्त ,शिक्षक व कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्यानी उपस्थित होते.

आधुनिक युगा सोबत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बद्दल घडतोय,जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे .यावेळी अशोक भांगरे म्हणाले आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत व्यवहारीक ज्ञानातही वाढ होते .आणि त्यांच्या कलागुणांना वावही मिळतो.सांस्कृतिक ,शैक्षणिक ,सामाजिक प्रगति घडुन बुद्धीला चालना मिळते .यावेळी रणद बु.च्या विद्यार्थ्यांनी मोठा बाजार भरविला होता.विक्रीसाठी रानभाज्या,वडापाव,इडली,आईस्क्रिम,भाजी-भाकरीचे स्टाँल उभारण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक ,शाळाव्यवस्थापन समिती आणि जिल्हा. प.राजुर गट यांनी विशेष परिस्ञम घेतले .

गुरुवार, डिसेंबर २७, २०१८

बिबट्या गायीच्या आस-याला !

बिबट्या गायीच्या आस-याला !


विष्णू तळपाडे/अहमदनगर(अकोले) -खबरबात प्रतिनिधी अलिकडच्या काळात जंगल ,वनिकरण यांचे दिवसेंदिवस कमी होताना दिसते.आज प्राण्यांना आपला बचाव करण्यासाठी थेट गावांचा आस्रा घेवा लागत आहे.
काल पासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला असला तरी प्रचंड प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे.पशु ,पक्षी ,प्राणी कुठे तरी आपलाआस्रा शोधताना दिसतात .

अशाच प्रकारची घटना आश्वी ता.संगमनेर या ठिकाणी घडताना आपल्याला पहावयास मिळते. हा अदभुत क्षण थंडी पासून बचाव करण्यासाठी थेट बिबट्या गाईच्या गोठ्यातच गाईच्या आसर्याला बसलेला आपणांस पहावयास मिळतो.