Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १०, २०२२

अवकाळी पावसामुळे सावली तालुक्यातील रबीचे नुकसान

अवकाळी पावसामुळे सावली तालुक्यातील रबीचे नुकसान 




सोमवारी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले. खरिप व रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, उडीद ,मुंग पिकाचे नुकसान नुकसान झाल्याचे शेतकरी नितीन कोलते यांनी सांगितले. 

तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. येथे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान पीक महत्त्वाचे पीक असून २ महिन्याआधी देखील अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नितीन कोलते यांनी केली आहे. 


 #Saoli #Chandrapur nitin kolte



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.