Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

pradhan mantri Gram Sadak Yojana | १,६४,००३ रस्त्यांची कामे पूर्ण - खासदार बाळू धानोरकरांच्या प्रश्नावर उत्तर

खासदार बाळू धानोरकरांच्या प्रश्नावर ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे उत्तर  


प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या (पीएमजीएसवाय) विविध उपक्रम / घटकांतर्गत १५ जुलै पर्यंत ६,६९,९८१ कि. मी. लांबीच्या १,६४,००३ रस्त्यांची कमी पूर्ण झाली आहेत. अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत केली. 

           महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार, विदर्भातील बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या रस्त्यांचा राज्यवार लांबीसह तपशील, रस्त्याच्या प्रत्येक घटकासाठी मंजूर आणि जाहीर केलेल्या एकूण रकमेचा तपशील आणि रस्ते पूर्ण होण्याच्या स्थिती आणि राज्यातील आगामी प्रकल्पासाठी नियोजित / मंजूर / प्रस्तावित रस्त्यांचा तपशील आदी माहिती धानोरकर यांनी विचारली होती. 

पीएमजीएसवायच्या अंलबजावणीसाठी राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना मंत्रालयाने दिलेला निधी उर्वरित काम, उर्वरित शिल्लक आणि खर्चाची गती लक्षात घेऊन केले जाते. १५ जुलै पर्यंत पीएमजीएसवाय अंतर्गत राज्य / केंद्रशासित प्रदेशांत केंद्रीय हिस्सा म्हणून २,१३,७१४ कोटी रुपये इतकी रक्कम जाहीर करण्यात आली असून २,५४,२८१ खर्च झाला आहे. असे उत्तरात नमूद केले आहे. 
                              पीएमजीएसवाय हि एक सातत्यपूर्ण योजना आहे. पीएमजीएसवाय -१ आणि पीएमजीएसवाय ३ सर्व कामे मंजूर झाली असून एकूण ९,२६८ किमी आरसीपीएलडब्ल्यूईए अंतर्गत आहेत. ४,१२५ किमी लांबीचे रस्ते पूर्ण झालेत. २,०२४ किमी रस्त्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पीएमजीएसवाय ३ अंतर्गत एकूण लक्ष्य १,२५,००० किलोमीटर आहे. आणि ६२,९६८ किमी मंजूर झाले आहे. पीएमजीएसवाय ३ पूर्ण होण्याची अंतिम मुदत मार्च २०२५ पर्यत आहे, असेही साध्वी निरंजन ज्योती यांनी नमूद केले.    






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.