Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नवी दिल्ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवी दिल्ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

 बावनकुळे यांची केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याशी सदिच्छा भेट | Bawankule's goodwill meeting with Union Home Minister Shah

बावनकुळे यांची केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याशी सदिच्छा भेट | Bawankule's goodwill meeting with Union Home Minister Shah

 प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांच्याशी सदिच्छा भेट

 






भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जीभाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष जी यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.

मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. अमित शाह यांनी मा. बावनकुळे यांना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल मार्गदर्शन केले.

मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी यांची सदिच्छा भेट घेतली. मा. नड्डा जी यांनी मा. बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा झाली व मा. नड्डा जी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

मा. बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री मा. बी. एल. संतोष जीकेंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयलकेंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादवकेंद्रीय रेल्वेराज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली.  



Bawankule's goodwill meeting with Union Home Minister Shah

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

जानेवारीत चंद्रपुरात ओबीसींचे राष्ट्रीय अधिवेशन |  खासदार बाळू धानोरकर यांची नवी दिल्लीत घोषणा

जानेवारीत चंद्रपुरात ओबीसींचे राष्ट्रीय अधिवेशन | खासदार बाळू धानोरकर यांची नवी दिल्लीत घोषणा

जानेवारीत चंद्रपुरात ओबीसींचे राष्ट्रीय अधिवेशन

खासदार बाळू धानोरकर यांची नवी दिल्लीत घोषणा



khabarbat Chandrapur

ओबीसी (obc) समाजाच्या विविध मागण्यांवर सर्वव्यापी चर्चा करण्यासाठी येत्या जानेवारीत चंद्रपुरात ओबीसींचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याची घोषणा खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी नवी दिल्लीत केली. तसेच प्रत्येक राज्यामध्ये ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय आहे, त्या धर्तीवर केंद्रामध्ये ओबीसींचे मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली. (Balu Dhanorkar)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम (Talkatora Indoor Stadium ) येथे आज 7 ऑगस्टरोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्वरत सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने देशभर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागास वर्गीय प्रवर्गासाठी जागांवर २७ टक्के आरक्षणाचा कायदा आणावा, १०३ व्या घटना दुरुस्तीत आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के सवलत देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थेत २७ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी संविधान संशोधन विधेयक आणण्याची मागणी केली. ओबीसींच्या मागासलेला लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी क्रिमीलेयरच्या उत्पन्नात वाढ करून १५ लाख रुपये वार्षिक करण्यात यावी, अशी मागणी केली.
या अधिवेशनासाठी सर्व ओबीसी बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नवी दिल्ली, दिल्ली, भारत Talkatora Indoor Stadium  In the Indian Constitution, OBCs are described as socially and educationally backward classes (SEBC), and the Government of India is enjoined to ensure their ..

मंगळवार, जुलै २६, २०२२

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल




दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा विषारी दारू नागरिकांच्या जीवावर उठली आहे. बोटाद आणि अहमदाबाद जिल्ह्यात विषारी दारू सेवन रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत 24 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे मृतांची आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


विषारी दारु सेवन केल्याने बोटाद जिल्ह्यातील रोजिद गावात सर्वाधिक 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शिवाय अलावा उंचडी, चंदरवा, आकरू आणि अनिवारी या गावांतही मृत्यूचे तांडव सुरूच आहे. विषारी दारूने दोन दिवसांत 15 जणांचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


 #Alcohol #Gujarat 

मंगळवार, जुलै ०५, २०२२

LaluPrasadYadav यांची प्रकृती चिंताजनक; मोदींनी केली विचारपुस

LaluPrasadYadav यांची प्रकृती चिंताजनक; मोदींनी केली विचारपुस

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक




पटना राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. पटना शहरातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. परंतु आता त्यांच्या शरीराच्या काही भागांची हालचाल बंद होण्याचा धोका आहे.

यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करण्यात आडचण येतं आहे. लालू यादव अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. किडनीच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना एम्समध्ये भरती केलं होतं. हॉस्पिटलमधील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे.

प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. वेदना कमी करणारे औषध दिल्यास किडनी फेल होण्याचा धोका आहे. खांद्याच्या फ्रॅक्चरवर उपचार केल्यानंतर त्यांच्या किडनीवर उपचार केले जाणार आहेत.

#LaluPrasadYadav

मंगळवार, जून २१, २०२२

भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर

भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर






भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं रामनाथ कोविंद यांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. आता यावेळी आदिवासी महिलेला संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली. भाजपनं राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक घेतली आणि उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख २९ जून आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, विरोधी पक्षांनी देखील उमेदवार जाहीर केला आहे. बिनविरोध निवडणुकीसंदर्भातील चित्र येत्या काळात स्पष्ट होईल.


राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री व टीएमसी नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.