Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ३१, २०२१

मोटेगाव येथील भीषण आगीत चार घरे खाक



घरातील उपयोगी वस्तू जळल्याने लाखोंचे नुकसान


चिमूर, ता. 31 : तालुक्यातील मोटेगाव येथे बुधवारी अचानक आग लागल्याने चार घरे खाक झाली. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास गावालगत असलेल्या शेतात आग लागली. काही क्षणातच आगीने शेतालगत असलेल्या घरांना वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी चिमूर अग्निशमन विभागाला सूचना केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग विझविण्यात आली.


आगीत प्रकाश बापूराव नेवारे, मंगेश बापूराव नेवारे, सुधाकर शेंडे आणि बापू अडसोडे यांची घरे जळून खाक झाली आहेत. तसेच आगीत घरे आणि संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने या नागरिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप कळले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.