जळगाव महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि. 03 : जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी ही माहिती दिली.